नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बापलेकीच्या मनसोक्त गप्पा झाल्या आणि आई-बाबा ठरल्याप्रमाणे निवृत्तीनंतरचं निवांत आयुष्य जगू लागले. फिरणं, नाटक-सिनेमा, वाचन, मनात आलं की बाहेर जेवण, देवदर्शन, सण, नातेवाईक, समारंभ आणि बरंच काही ..
समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रामचा मित्र स्वत:शीच विचार करीत झोपाळ्यावर पहुडला होता. तेनालीरामने त्याला विचारले, “मित्रा कसला विचार करतोस?” तेव्हा तेनालीरामच्या मित्राबरोबर त्याचा संवाद सुरू झाला.
गाडी त्या सुप्रसिद्ध हायफाय वृद्धाश्रमाजवळ थांबली.त्यातून साठ पासष्टीचा माणूस त्याची पत्नी त्याचा मुलगा सून उतरले.तिथले वातावरण पाहून त्याला खूप बरे वाटले.ऑफिसमध्ये गेला तो कोण आणि का आला ते संगितले.
तेनाली रमण एकदा सपत्नीक मित्राच्या विवाहास जात होते. लग्नसमारंभाला जायचे म्हणून पत्नी महागडी साडी आणि दागिन्याने लखलखलेली होती. चारचौघात उठून दिसावे म्हणून तिने सर्व काळजी घेतली होती.
वडगावात एक मोठा वाडा होता. वाड्यातील बिऱ्हाडात चार मुलगे होते. राजू, संजू, अजू, बंडू ही त्यांची नावे. रामराव त्या वाड्याचे मालक. त्यांना मूलबाळ नव्हते. ते फार मायाळू होते. मुलांना ते कधी खाऊ देत, कधी पैसे देत. एकदा ते गावाला जायला निघाले. ते तीन महिन्यांनंतर परत येणार होते.
ती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती. ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले. पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,
ती पण माझ्याकडे बघत होती.
एका चोराने देवळातली घंटा चोरली व तो जंगलातल्या बाजूने पळून गेला. जंगलातून जाताना चोराला वाघाने ठार केले. चोराने चोरून नेलेली घंटा जंगलातच पडून राहिली. पुढे ती घंटा एका माकडाला सापडली. माकड आपले दररोज दिवसा रात्री जोरजोराने ती घंटा वाजवी. जंगलाजवळच्या गावात त्या घंटेचा आवाज ऐकू येई. गावातील लोकांना वाटे रात्री, अपरात्री घंटा कोण वाजविते?
‘तंबाखू’ नावाच्या बाई नव्याने शाळेत आल्या नि शिस्तचा बडगा… नव्हे दांडकाच वर्गात अवतरला. सोनिया चूप बैठनेवालोंमेसे नही थी. तंबाखू बाई एक शब्द उच्चारला तरी शिकवणे बंद करी. चूप बसत. हे म्हणजे टू मच, थ्री मच, मचमच होतं. ना? तंबाखू बाईंनी न शिकविता पाठ पूर्ण झाल्याचे वर्गात सांगताच वर्गात टाचणी शांतता पसरली.
बिरबलाला बादशहाच्या मर्जीतून उतरविण्यासाठी त्याचा द्वेष करणारे लोक नेहमीच काहीना काही डाव रचीत असत. परंतु बिरबलापुढे त्यांची डाळ मुळीच शिजत नसे. त्यांचे सर्व डाव त्यांच्याच अंगाशी येत व त्यांची चांगलीच फटफजिती होते.
अकबर बादशहाच्या पदरी अनेक सरदार होते. एका सरदाराला उंची दागिने घालण्याचा शौक होता. त्याच्या अंगावर नेहमी हिया-मोत्यांच्या माळा झगमगत असत.
Copyright © 2025 | Marathisrushti