नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
म्हणजे गंगा नावाचा द्रवरूप प्रवाह म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. महापातकीचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे, अशा शब्दात गंगेची महती सांगितली आहे.
अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच – साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती,
आत्तापर्यंतच्या धाडसाचे आणि मेहनतीचे चांगलेच फळ मला मिळाले होते. टेलिव्हिजनवर पूर्वी मी युवदर्शनमध्ये गायलो होतो. आता मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम मिळाला. या कार्यक्रमात श्रीकांत ठाकरे यांची दोन नवी गाणी मी सादर केली. कार्यक्रम मिळत होते. आत्मविश्वास वाढत होता. आता एक संपूर्ण कॅसेट गाण्यासाठी प्रयत्न करायचे मी ठरवले.
नागरी बॅंका/पतसंस्था किंवा कोणत्याही संस्थेतील सी.ई.ओ.- मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे व्यवस्थापनातील वजिराचे प्यादे असते. .ई.ओ ची भूमिका यशस्वीरीत्या निभावणे म्हणजे तारेवरची कसरत असते. ही भूमिका त्याला प्रभावी रीत्या निभाविता यावी, यासाठी त्याची नेमकी बाबदारी काय? भूमिका कार्य? र्यादा काय? यांचे सांगोपांग विवेचन व मार्गदर्शन शाखा व्यवस्थापन या लोकप्रिय व दुसरी आवृत्ती निघालेल्या पुस्तकाचे लेखक व नागरी बॅंकांचा प्रदीर्घ अनुभव सणारे डॉ. माधव गोगटे यांनी या पुस्तकातून केले आहे.नचिकेत प्रकाशन पाने : १४४ किंमत : २५० रु.
साप्ताहिक मार्मिक त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करत होते.त्यांतली मा. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे मराठी मनांना जागवीत होती. संपादकीयात काय लिहिलंय ह्याला खूप महत्त्व होतं. जून १९६६मध्ये शिवसेनेचा स्थापना झाली होती.
सुरुवातीला ‘आई’ चित्रपटाचं उदाहरण अशासाठी दिलं की, श्यामला, स्वतः मातृभक्त नसताना हा चित्रपट फार आवडला. त्यामध्ये ‘आई’ची भूमिका करणारी नीना कुळकर्णी त्याला जवळची वाटली. तिची करारी भूमिका त्याच्या मनावर ठसली.
भगवान युद्ध सत्य, अहिंसा आणि मोक्षमुक्तीचा मार्ग कसा मिळवायचा याची लोकांना शिकवण देत देत एका गावात आले. त्यांना भेटण्यासाठी एक माणूस आला. बुद्धांना म्हणाला की, तुम्ही तुमच्या धर्माद्वारे सत्य, अहिंसा आणि मोक्षप्राप्तीचामार्ग सांगत आहात. परंतु मला सांगा, तुमची शिकवण ऐकून किती लोकांना मोक्षप्राप्ती झाली किंवा मुक्ती मिळाली. गौतम बुद्धांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व ते स्मितहास्य करून त्याला म्हणाले की, तुझा प्रश्र अगदी योग्य आहे. मात्र त्या प्रश्र्नाचे उत्तर मिळण्यासाठी तूच एक काम कर. या गावातील अनेक लोकांना तू भेट व त्यापैकी किती लोकांना शांती हवी अहे, किती लोकांना सत्याचा मार्ग हवा आहे व किती लोकांना मोक्ष हवा आहे याची तू यादी तयार कर वती घेऊन माझ्याकडे ये म्हणजे मग मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन.गौतम बुद्धानी सांगितल्याप्रमाणे तो माणूस त्या गावातील लोकांना भेटला च त्याने अनेकांना याबाबत तुम्हाला नेमके काय हवे आहे, असा प्रश्र विचारला. कोणी म्हणाले, आम्हाला भरपूर पैसा हवा आहे. त्याच्यामुळेच सुख-शांती मिळू शकेल. कोणी म्हणाले, आम्हाला सुपीक जमीन हवी आहे, तरक्केणी म्हणाले, आम्हाला सत्ता हवी आहे, - कोणाला राजवाडा हवा होता, तर कोणाला चांगली नोकरी हवी होती. एकानेही मला मोक्ष हवा आहे, असे पटकन संगितले नव्हते. काही दिवसांनी तो माणूस गौतम बुद्धांना भेटला व त्याने तयार केलेली यादी बुद्धांना सादर केली व बुद्धांना तो म्हणाला, लोकांना सत्य, शांती आणि मोक्ष सोडून बाकीचे सर्व काही हवे आहे. त्यावर बुद्ध त्याला म्हणाले, तुझ्या प्रश्राचे उत्तर तुला आता मिळालेच आहे. लोकांना जे काही हवे आहे त्यामुळे त्यांना सुख-शांती किंवा मोक्ष मिळणार नाही.उलट सुखाच्या प्राप्तीसाठी ते दुःखाच्या मार्गाने चालले आहेत. गौतम बुद्धांच्या या उत्तराने स्वा माणसाचे समाधान झाले व तो त्यांचे आशीर्वाद घेऊन तेथून निघून गेला.
सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल.
खरे रूप माणसा तुझे
कोणते कळेना?
तूच नगरपालिकेतही तूच
तुझा सरकारी देखील बाणा……….
कवटी फुटल्याचा आवाज झाला. रात्र गारठत होती. सगळी मंडळी आपापली बूड झटकत त्या मसणवट्यातून उठून घराकडे निघाली. त्याला झाडाआडून दिसत होते. चितेच्या लाकडांनी चांगलाच पेट घेतला होता. सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री करून, तो अंधारातून बाहेर आला. चितेजवळ जाऊन बसला. त्या लाल ज्वाळांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर उष्ण हवेचे झोत मारत होता. क्षणभर त्याला त्या उष्ण लहरी काहीतरी सांगताहेत असे भासले.
Copyright © 2025 | Marathisrushti