(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स

    ८० च्या दशकात ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स ही कल्पना आपल्या भारतात चांगलीच रुजली व फोफावली. आधी फक्‍त हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले Glamarised कलाकारच स्वता:ला (फक्‍त चेह-याला) विकत होते. काळ बदलला तसे ’श्वास’ चित्रपटानंतर मराठी इंडस्ट्रीनेही कात टाकली. चांगले दर्जेदार चित्रपट मराठीत येऊ लागले. मराठी चित्रपटांकडे पुन्हा एकदा प्रेक्षक वळु लागला. त्याचाच फायदा मराठी नट नट्यांना झाला. मराठीत ज्या कलाकारांचे नाणे खणखणीत वाजत आहे, अशा भरपुर कलाकरांना वेगवेगळ्या संस्थांनी स्वत:चे ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स म्हणून घेतले आहे.

  • आयुष्य फार सुंदर आहे!..

    एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं… असं वाटण्याची जागा, मूल झालं की… मोठं घर झालं की… अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .

  • लेखक होण्यास काय लागतं ?

    तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला ‘लेखक’ होण्याची लहानपणापासूनच मोठी हौस होती. (म्हणजे अजूनही आहेच! तसे आम्ही याबाबतीत, मराठीत चिवट, आणि इंग्रजीत ‘नेव्हर गिव्ह अप’ मधले.) पण लेखक व्हायला काय लागते? या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता, पन्नाशी कधी उलटून गेली कळलच नाही!

  • अशी गाणी, अशा आठवणी…..

    आधुनिक वाल्मीकी ग.दि.माडगूळकरांच्या जीवनातील अनेक अज्ञात ह्रदयस्पर्शी प्रसंग…..

  • कार्यकर्ता सत्तू

    (लेखक – ऍड. कृष्णा पाटिल, तासगाव, सांगली) साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरवशाचा कार्यकर्ता. आघाडीचा नेता. पक्ष वाढवावा तर सत्तूने. सत्तू म्हणजे साहेबांचा उजवा हात. सत्तू म्हणजे मुलुख मैदान तोफ. धाडसाचं दुसरं नाव सत्तू….

  • अलाकान

    आजपर्यंत १८० चित्रपट करणाऱ्या या रेखा नावाच्या ‘खुबसूरत’ अभिनेत्रीने काही अविस्मरणीय चित्रपटही दिले, ज्या चित्रपटांची निर्मिती जणू काही तिच्यासाठीच केलेली होती.. ‘खुबसूरत’ चित्रपटात तिने अल्लड तरुणीची, हलकीफुलकी भूमिका केली. ‘उत्सव’ मधील तिची वसंतसेना कुणीतरी विसरु शकेल का? ‘उमराव जान’ चित्रपटात तर तिने ‘जान’च ओतली आहे.. ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातील जोहराबाईला, खुद्द लंबूही विसरला नाही, मग आपली काय पत्रास?

  • सिमेपलिकडची खवय्येगिरी! (माझी लंडनवारी – 22 )

    माझ्या शेजारी Allan बसायचा. तो तर नेहमीच काही ना काही खाऊ आणून आम्हाला देत होता. कधी चॉकलेट्स, कधी प्रिंगल्स, कधी क्रोशंट. तो लंचसाठी बाहेरून सलाड्स, बर्गर काही तरी आणायचा स्वतःसाठी आणि आम्हाला काही ना काही ऑफर करायचा. आपले इंडियन पदार्थ त्याच्या पोटात जायचे. किती आवडत होते कोण जाणे? पण तो ते एन्जॉय करत असावा.

  • शिवकाल भूषण

    भोसलेकुलोत्पन्न प्रथम पूजनीय प्रातःस्मरणीय युगपुरुष, शककर्त्या छत्रपति शिवाजी महाराजांचे सार्थ, यथार्थ वर्णन समकालीन व्यक्तींपासून ज्यांनी ज्यांनी केलेले आहे त्यात आधुनिक युगात बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव त्या मांदियाळीत अवश्यमेव घ्यावेच लागेल. बाबासाहेब नेहमीच सांगत आलेत,

  • काळाची काठी !

    एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • स्वप्नमय दिवस (माझी लंडनवारी – 20)

    थोडीशी भूगोलाची उजळणी करून आधीच असलेल्या अघाद ज्ञानात गोंधळाची भर टाकून आम्ही गाशा गुंडाळला. भूगोलाची लक्तर प्राईम मेरिडियनला लटकावून आम्ही खाली उतरलो. आता अंधार पडत चालला होता. आता परत कसं जायचंय असा सवाल सगळ्यांनी उपस्थित केला.