(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • इस्त्री’ ची घडी

    पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत असताना घरात ‘इस्त्री’ हा प्रकार नव्हता. फक्त वडिलांचेच कपडे अधूनमधून जवळच्या लाॅन्ड्रीतून इस्त्री करुन आणावे लागत. मी सर्वात लहान असल्याने ते काम माझ्याकडेच असायचे. ती ‘लक्ष्मी लाॅन्ड्री’ होती राऊत नावाच्या माणसाची. त्याचा मुलगा माझ्या वडिलांचा विद्यार्थी.

  • उगाच काहीतरी -३ (बिस्किट्स नॉस्टॅल्जिया)

    हल्लीच दुकानात बिस्किटांचे विविध प्रकार पाहत होतो. किती प्रकार, किती रंग, किती फ्लेवर्स काय नि काय. अचानकपणे आमचे दिवस आठवले.
    त्यावेळेस ही बिस्किटांचे बरेच प्रकार असावेत पण आमच्या माहितीत हेच मुख्य होते.

  • वानप्रस्थाश्रम

    मार्केटला जाण्यासाठी मी घराबाहेर पडलो, खाली रस्त्यावर आलो आणि रिक्षाही पकडली. सहजच माझं लक्ष रिक्षा चालकाकडे गेलं. आणि मी चपापलोच!
    आमच्याच कॉलनीत राहणारे परब रिक्षा चालवत होते!
    "साहेब, नमस्कार," परब आरशातून माझ्याकडे पहात उद्गारले.
    "नमस्कार, परब हे काय नवीन? " मी विचारलं.
    "हो, हल्लीच हा एक नवीन उद्योग सुरु केला आहे."
    "चांगलं आहे," परबांच्या आवाजातल्या मजबूरीच्या सूराला दूर सारण्यासाठी मी म्हणालो.
    रिक्षातून उतरत असताना परबांनी त्यांचं रिक्षा पुराण मला सविस्तर ऐकवलं. आपण रिक्षा का चालवतो याचं परबांनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकून मी हबकूनच गेलो.

    "तुम्हाला माहितच आहे साहेब मी रिटायर होऊन घरीच असतो. सकाळच्या वेळी आमच्या घरात नुसती धांदल उडालेली असते. मुलाला आणि सुनेला कामावर जायचं असतं, नातवडांना शाळेत जायचं असतं, बायको किचनमध्ये कामात गर्क असते. या सगळ्या गडबडीत मीच एकटा घरात निरुद्योगी असतो. त्यात आमची वनरुम किचन. सगळे घराबाहेर पडण्याच्या धांदलीत असताना मी तिथे लोळत पडणं म्हणजे इतरांना अडचण. थोडक्यात सकाळच्या वेळी आपल्यामुळे घरच्यांना अडचण भासते हे माझ्या ध्यानात आलं तेव्हाच मी काहीतरी उद्योग करण्याचं ठरवलं.

    परबांचं रिक्षापुराण रंगात आलं होतं. मीही कान देऊन ऐकू लागलो. परब आपली कथा विस्तारने पुढे सांगू लागले.

    "सकाळच्या वेळी घरातून बाहेर पडण्यासाठी मी सरळ रिक्षा चालविण्याचं नक्की केलं. आता घरातले उठण्याआधी सकाळी सहालाच मी घराबाहेर पडतो. सकाळी सहा ते दुपारी अकराबारापर्यंत रिक्षा चालवतो. चार पैसे हातात येतात. दुपारी घरी जाऊन जेवतो आणि ताणून देतो. आपण कुठे आणि कधी इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं आणि त्याप्रमाणे तिथून दूर राहिलं की आपल्याही डोक्याला ताप नसतो आणि इतरांच्याही."

    शेवटच्या वाक्याला खदखदून हसत परब रिक्षा घेऊन निघून गेले. मी अवाक् होऊन परबांचं तत्वज्ञान जिरवू लागलो. आपण कुठे आणि कधी इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं की आपल्या डोक्याला ताप होत नाही आणि इतरांच्याही ! साध्या भोळ्या परबांनी सहजीवनाचं सार अगदी मार्मिक शब्दात मांडलं होतं. आयुष्यात अनेक वाद निर्माण होतात ते आपल्या अनाठायी वास्तव्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची आपल्याला सवयच जडलेली असते. अनेकांना फुकटचे सल्ले देण्यात आपण बाकबगार असतो. पण ते सल्ले दुसऱ्यांना हवे आहेत का, आपण सर्व विषयांवर मत व्यक्त करणं गरजेचं आहे का आणि मुख्य म्हणजे आपण सर्व ठिकाणी उपस्थित राहणंही आवश्यक आहे का याचा विचार करणं खरोखरच गरजेचं असतं. दुसऱ्यांच्या कामात आपल्यामुळे व्यत्यय येत असेल, दुसऱ्यांना आपली अडचण भासत असेल तर तिथून शहाणपणानं वेळीच दूर जाणं उत्तम हे परबांचं तत्वज्ञान मला मनोमन पटलं.

    सामाजिक कार्यात वावरतानाही अशी नको असलेली अनेक मंडळी आपल्याला भेटतात. ही मंडळी एखाद्या मिटिंगला अथवा सभेला आली की डोकेदुखी आली असेच भाव अनेकांच्या चेहऱ्यावर उमटतात. स्वतःच्या अक्कलहुशारीने समस्या उभ्या करुन इतरांना हैराण करणे हा मंडळींचा स्थायिभाव. एकदा एका संस्थेत एका महिलेने सर्वांनाच असं भंडावून सोडलं होतं. दरवेळी संस्थेच्या मिटिंगला हजर राहून नाना प्रकारचे प्रश्न विचारुन ही महिला सर्वांना गोत्यात आणण्याचा उपद्व्याप करी. सर्व काही मलाच समजतं आणि तुम्ही सर्व मुर्ख आहात अशा पवित्र्यानेच ही महिला सभेत वावरे.

    गंमत म्हणजे त्या सभेचे अध्यक्ष त्या महिलेचा सर्व उच्छाद शांतपणे सहन करीत. अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्या महिलेला कधीच झापण्याचा प्रयत्न केला नाही की दरडावण्याचा. शेवटी भांडून भांडून स्वतःच ती महिला रागाने सभात्याग करुन निघून जाई. एकदा मी त्या महिलेचा त्रास तुम्ही सहन तरी कसा करता असा प्रश्न त्या अध्यक्षांना केला. त्या प्रश्नाला अध्यक्षांनी दिलेलं उत्तर मासलेवाईक होतं. शांत चेहऱ्यावरची सुरकुतीही न हलवता अध्यक्ष उद्गारले-

    'मी मनातल्या मनात त्या बाईच्या नवऱ्याचं स्मरण करतो आणि शांत राहतो."

    "नवऱ्याचं स्मरण? ते कशासाठी? " मी आश्चर्याने अध्यक्षांना विचारलं.

    'मी मनात विचार करतो, तो बिचारा नवरा त्या बाईला आयुष्यभर सहन करतो आहे, तर आपण तासदोनतास तिचा धुडगुस सहन करायला काय हरकत आहे? "

    अध्यक्षांच्या त्या उत्तराने मला अनेक गोष्टींचा खुलासा झाला. स्वतःच्या उपस्थितीने इतरांसमोर अडचणी उभ्या करणाऱ्या मंडळींविषयी इतरांच्या मनात कशाप्रकारचे भाव उमटतात याचा प्रत्यय अध्यक्षमहोदयांनी आपल्या उत्तरातून घडविला होता. आपण कुठे नको आहोत ते समजलं नाही की लोक आपली काय किंमत करतात याचं सुंदर विश्लेषण अध्यक्षांनी केलं होतं.

    प्राचीन काळी वानप्रस्थाश्रम असे. इहकर्तव्य बजावून मंडळी वानप्रस्थाला जात म्हणजेच संसारातून निवृत्त होत. सर्व कारभार नव्या पिढीच्या हाती सोपवून निवृत्त होणं या संकल्पनेचा आजही गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आज माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत माणसं ठणठणीत असतात आणि अनेक कामांत सक्रीयाही राहू शकतात.

    गंमत म्हणजे सर्व जगात आपल्या देशातच युवकांची संख्याही टक्केवारीने सर्वाधिक आहे.

    दुसऱ्या कुठल्याही देशापेक्षा आपल्या देशात युवा पिढीची संख्या अधिक आहे. म्हणजेच आयुष्यमान वाढल्याने आधीच्या पिढीची मंडळीही सुखनैव नांदत आहेत आणि कारभार हाती घेण्यासाठी युवा पिढीही मोठया संख्येने पुढे सरसावते आहे.

    या विचित्र सामाजिक समस्येवर उपाय म्हणजे आधीच्या पिढीने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारुन पुढच्या पिढीच्या हाती कारभार सोपवणं. प्रत्यक्ष वानप्रस्थात जाणं कालबाह्य झालं असलं तरी संसारात राहूनच निवृत्तीची पथ्ये पाळणं. वयस्कांच्या तब्येतीच्या दृष्टीनेही हे बाजूला होणं लाभदायक असतं. आजकाल बहुतेक आजार उद्भवतात ते मानसिक ताणांमुळे. रोगजंतूंमुळे उद्भवणारे बहुतेक आजार आता अॅन्टीबायोटिक्स औषधांमुळे कह्यात आले आहेत. मात्र मनातल्या किंतूंमुळे उद्भवणाऱ्या आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. दुसऱ्याने आपला सल्ला ऐकला नाही की आपलं ब्लडप्रेशर वाढतं आणि त्रास आपल्यालाच होतो. थोडक्यात परबांच्या तत्वज्ञानानुसार आपण कधी आणि कुठे इतरांना नको आहोत हे जाणून घेतलं की आपल्या डोक्याला ताप होत नाही आणि इतरांच्याही. इतरांच्या डोक्याला होणाऱ्या तापाचा विषय बाजूला ठेवला तरी आपल्या डोक्याला ताप होऊ नये म्हणून परबांचं तत्वज्ञान वागणूकीत रुजवणं केव्हाही उत्तम.

    -सुनील रेगे

  • महान विदुषी डॉक्टर ‘इरावती कर्वे’

    त्यांनी पुण्याच्या केईएम रुग्णालयात कुटुंबनियोजनाचे पहिले केंद्र काढावयास भाग पाडले आणि दुसरी गोष्ट “ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र“ अशी व्याख्या त्यांनी केली. पावसातील संगीत ऐकणारं कविमन, त्याच वेळी मानवाच्या हाडांचे सांगाडे तपासणारी एक शास्त्रज्ञ. दोन्ही गोष्टी त्यांच्या देहातच होत्या, त्या संपूर्ण आयुष्य कान आणि डोळे उघडे ठेवून जगल्या.

  • आजी ग आजी!

    सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते.

    लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर केलेल्या असतात. तिने जीवनाचा संसारिक अनुभव अनेक प्रसंगातून घेतलेला असतो. आजपर्यंत ती जीवनाची गाठोडी, केवळ जमा करण्यातच व्यस्त होती. आज्ञा ऐकणे पाळणे, वा करणे, ह्याच कार्यचक्रात ती गुंतलेली होती. आता ती परिपक्व भूमिकेत आलेली आहे. येथे जे जे आजपर्यंत जमा केलेले होते ते सारे वाटीत जाणे आता तिचे काम झाले आहे. निसर्ग चक्रानुसार घटनाची सतत पुनुरावृती होत असते. तशाच गोष्टी थोड्याश्या फरकाने होत असतात. ज्या इतरांना सर्वस्वी नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या असतात, त्याचा आंतरिक गुंता आजीच्या अनुभव चौकटी मधलाच असतो. त्यामुळे त्याचा धागा तिच्या लक्षात येत असतो. अनुभवाच्या मार्ग दर्शनाचे पैलू येथेच मदत करतात.

    आज मला माझ्या बालपणीची आठवण झाली. मी त्यावेळी दहा वर्षाचा असेन. मला शिकवण्यासाठी एक शिक्षक ( त्यांना आम्ही गुरुजी म्हणत असू ) घरी येत होते. चांगले शिक्षक परंतु अतिशय शिस्तप्रिय व कडक अश्या स्वभावाचे होते. त्याकाळी मुलांना त्यांच्या चुकाबद्दल बेशिस्तपनाबद्दल सतत मार बसे. रागावले जायचे. कोणतीही गोष्ट मुलांना समजावून सांगणे, त्यांच्या भावना जाणणे, ह्याबाबतीत पालकांना, शिक्षकांना, आणि कोणत्याही वडील व्यक्तींना मुळीच आस्था नव्हती. हा केवळ वेळ व्याया घालविण्याचा मार्ग आहे ही त्यांची धारणा असे. ” छडी लागे छम छम, विद्या एयी घम घम.” ह्या पुर्वकालीन तत्वज्ञानात त्यांचा विश्वास होता. त्याच प्रसंगी योग्य वेळी योग्य शिक्षा ही धाक व शिस्त निर्माण करते ही त्यांची अनुभव संपन्न समजूत होते. ( आता काळ पूर्ण बदलला, शिक्षक बदलये, आणि विद्यार्थीही.).

    माझे शिक्षक अर्थात पूर्वकालीन होते. रोज रात्री सात वाजता ते एकतास शिकवीत असे. त्या वेळचे पाठ शिकवीत व गृहपाठ देत असे. बालवय व विद्यार्थी म्हणून अनेक चुका करीतच शिक्षणाचा मार्ग चालला होता. मात्र चुकले की ” गाढवा, मूर्ख ” असल्या शिव्या ते देत व अधून मधून पाठीत धपाटा ही लागावीत. मी निराश होत होतो. केव्ह्ना केव्ह्ना रडू येत होते. परंतु ” रडतोस काय असा ?” म्हणून त्यावरचा शांत करण्याचा उपाय म्हणून आणखी एखदा धपाटा पाठीत बसत असे. शिकणे तसे सारे दिव्यच होते. त्या वेळेला कळवळंल्याच्या आजही आठवणी येतात व हसू येते.

    माझी वेगळी खोली होती. खाली सतरंगी अंथरून आम्ही बसत असू. एक दिवस अचानक माझी आजी तेथे आली. तिच्याजवळ कापूस होता. ती वाती व फुलवाती करीत तेथेच बसली. नेहमीच्या सवयी प्रमाणे, माझे चुकतच “ गाढवा ही बेरीज अशी होती का?” म्हणत गुरुजींनी माझा कान पिळला व मला धपाटा लगावला. मी कळवळंलो. मला रडू आले. आजी जवळ होती. तिला वयाचा एक अलिखित अधिकार मिळालेला होता. ती उसळून गुरुजीना म्हणाली “ अहो एवढे काय मारता त्या लहान मुलाला. चुकला असेल तर समजावून सांगा.” गुरुजी एकदम सटपटले. त्यांनी उत्तर दिले नाही. मात्र त्यानंतर त्यांच्या वागण्यातला झालेला बदल जाणवला. आता आजीच्या केवळ तेथे अस्तित्वामुळे वातावरण बदलल्याचे माझ्या लक्षात येऊ लागले. शिक्षेऐवजी प्रेमळ शब्दात समजावणे हे होऊ लागले. दुसऱ्या दिवसा पासून सतरंजी टाकून ठेवणे, वह्या पुस्तक पेन्सिल घेणे, ह्याच बरोबर ताटात कापूस, वाटीत थोडीशी रांगोळी आणि खिडकीजवळ आजीसाठी पाट ठेवणे हे आठवणीने केले जायचे. कदाचित त्यासाठीच व अशाच प्रसंगांना आई बाबा पासून वेगळ्याच संरक्षणाची भिंत बनणारी आजी मला खूप आवडायची.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • बिग-बीं सोबत

    २ मे २००५ या दिवशी सकाळी अभिषेक बच्चन यांचा मला फोन आला. ऑल इंडिया अचिव्हर्स कॉन्फरन्स या दिल्ली येथील संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून ते बोलत होते. २००४ चा सर्वोत्कृष्ट गझल गायक म्हणून 'कोहिनूर ऑफ इंडिया' या पुरस्कारासाठी माझी निवड झाली होती. मला अतिशय आनंद झाला. त्यांचे पुढील वाक्य होते. "हा पुरस्कार सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते तुम्हाला दिला जाणार आहे.” मला काय बोलावे तेच सुचेना. जो माझा सर्वात आवडता अभिनेताच नव्हे, तर आमच्या पिढीचे रोल मॉडेल होता. ज्याचा मी डाय हार्ड फॅन होतो, त्याच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळणार होता. त्यांच्या सोयीसाठी या समारंभाचे आयोजन मुंबईतच केले जाणार होते. ही बातमी लवकरच सगळीकडे पोहोचली आणि माझ्या आप्तेष्टांनी, मित्रांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. लवकरच २६ मे २००५ रोजी मुंबईच्या हॉलिडे इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या दिमाखदार समारंभात सुपरस्टार श्री. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते २००४ चा सर्वोत्कृष्ट गझल गायक म्हणून कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार मी स्वीकारला. समारंभाला अभिनेत्री राणी मुखर्जी यांचीही विशेष उपस्थिती होती. हा दिवस माझ्यासाठी एक अविस्मरणीय दिवस होता. या समारंभातील भाषणात अमिताभ बच्चन म्हणाले, "कलाकार की ऊँचाईयों पे कभी पाबंदी नहीं होती। आप एक मंजिल पा लेते हो तो और कई मंजिले दिखाई देती हैं। और इस सफर में आप हमेशा लोगोंको खुशियाँ बाँटते हो, इसलिए कलाकार होना बड़े नसीब की बात हैं।" त्यांच्या चिरपरिचित धीरगंभीर आवाजातील ते शब्द मी कधीच विसरू शकणार नाही. अशा महान कलाकाराच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचे मला लाभले. या पुरस्कारासाठी मी काहीही केले नव्हते. काहीही न मागता ईश्वराने मला अनेक गोष्टी दिल्या. त्यापैकी ही एक! त्या रात्री मी झोपू शकलो नाही. झोपणार कसा? स्वप्नवत तर आत्ताच घडून गेले होते. या पुरस्काराने मला प्रचंड ऊर्जा दिली होती. रात्रभर बसून मी पुढील कार्यक्रमांची आखणी सुरू केली. संपूर्ण रात्रभर तेच शब्द कानात घुमत होते, 'कलाकार की ऊँचाईयोंपे कभी पाबंदी नही होती।'

    लवकरच माझे हितचिंतक प्रकाशजी गुप्ते यांच्यासाठी कार्यक्रम केला. तसेच माझे मित्र प्रकाश दामले यांनी स्टेट एक्साईजसाठी माझा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर 'आंबा महोत्सव'मध्ये मी गायलो. काही दिवसांनी अंकुर प्रॉडक्शन्सने आयोजित केलेल्या 'गजरा' या विविधरंगी कार्यक्रमात बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे मी भाग घेतला. माझ्याबरोबर त्यागराज खाडिलकर, सुधीर गाडगीळ, स्मिता तळवळकर आणि रामदास फुटाणे असे प्रथितयश कलाकार होते.

    -अनिरुद्ध जोशी

  • झोंबतो ‘गारवा’

    सदाशिव पेठेत एकेकाळी नॉनव्हेज निषिद्ध होतं. हळूहळू शेडगे आळीतील ‘हॉटेल नागपूर’ने सुरुवात झाली. मंडई जवळील बाबू गेनू चौकातील ‘दुर्गा’ची बिर्याणी सुप्रसिद्ध होती. कुमठेकर रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागे आवारे मटनाची खानावळ होती, ती आता नव्या दिमाखात उभी आहे.

  • आजचे रामशास्त्री

    रोजचे वर्तमानपत्र उघडले रे उघडले, की बलात्कार, दरोडे, खून, लफडी, घोटाळे, अब्जावधी-कोट्यवधी बेनामी मालमत्तेचा पोलिसांनी लावलेला शोध, खोट्या चलनी नोटांचे कारखाने या अशा बातम्या वस्सकन अंगावर येतात. संघटित गुन्हेगारी, पोलीस खात्याची बदनामी हे विषय तर वर्तमानपत्रात रतीब घालणारे विषय झाले आहेत. रोज सकाळी वृत्तपत्र वाचून मन विषण्ण होते, सुन्न होते. काही इंग्रजी वृत्तपत्रांत, विशेषत या दैनिकांच्या रविवार पुरवण्यात स्वैर सेक्स, पोर्नोग्राफी यांना प्रतिष्ठा देणारे लेख वाचायला मिळतात.

  • मुखवटा नाटीका क्रमांक २ (आठवणींची मिसळ २२)

    नाटकांतलं खरं खोटं ठरवणं मोठं मुष्किल. समजा नाटकामधे रंगमंचावर प्रणय प्रसंग चालू आहे. नायक-नायिका रंगात आली आहेत. प्रेक्षकांना त्या प्रणयाच्या दृष्याने भारून टाकलंय. ते मनाशी म्हणतायत, “किती छान अभिनय !” त्याचवेळी पहिल्याच रांगेत बसलेल्या नायकाच्या पत्नीला मात्र तो अभिनय “अभिनयच” आहे की खरेच रंगलेत? ह्या शंकेचं काहूर छळत असतं आणि नंतर नाटक संपल्यावर तोच नायक तिच्याशी लडिवाळपणे बोलून प्रेम व्यक्त करतो, तेव्हां तिच्या मनांत येतं “आता हा अभिनय तर नाही ना?” अभिनय तर आपण सर्वच करत असतो.

  • हे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे!

    दिवाळीच्या दिवसात, सं.शांतिब्रह्म, सं. घन अमृताचा, सं. ऐश्वर्यवती, यासारख्या माझ्या संगीत नाटकांचे, आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून झालेले प्रक्षेपण, केवळ रत्नागिरी केंद्रमुळेच शक्य झाले. आणि माझ्या आयुष्यातील यशाचा परमोच्च बिंदूसुद्धा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रमुळेच प्राप्त झाला.