(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • माता, भगिनी, सौ साऱ्या (सुमंत उवाच – ७०)

    सुमंत जयंत परचुरे. 

    आजचा दिवस खूप चांगला आणि योग्य आहे असे प्रमाण मानून आजपासूनच आपल्या आयुष्यात असलेल्या गौरीला, समाजातल्या कित्येक गौरींना वासनेचे बळी पाडण्याऐवजी त्यांना प्रेमाचे, आपुलकीचे कवच अर्पण करा. श्री गणेश आपल्यावर नक्की प्रसन्न होतील.

  • मराठीतील दादामुनी

    १९७१ साली मी नटराज टाॅकीजला गजानन जहागिरदार दिग्दर्शित, 'दोन्ही घरचा पाहुणा' हा कृष्णधवल चित्रपट पाहिला. त्यामध्ये श्रीकांत मोघे व आशा पोतदार, प्रमुख भूमिकेत होते व एका सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत एक नवीन चेहरा पहिल्यांदाच दिसला. तेव्हाच मला खात्री पटली होती की, हा 'लंबी रेस का घोडा' आहे. आणि घडलंही तसंच. आज त्या चित्रपटाला ५१ वर्षे पूर्ण झाली. तरीही, याची घोडदौड सुरूच आहे.

    ४ जून १९४७ साली मुंबईत या कलाकाराचा जन्म झाला. त्याची मोठी बहीण, ही अशोक कुमार उर्फ दादामुनींची जबरदस्त फॅन होती. तिने आग्रह धरला की, माझ्या भावाचं नाव 'अशोक'च ठेवायचं. हाच तो, आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारा, बहुरंगी व बहुढंगी भूमिका, लीलया साकारणारा. अशोक सराफ!

    शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या इच्छेखातर, स्टेट बॅंक आॅफ इंडियामध्ये नोकरी करणाऱ्या अशोकला नाटकात काम करण्याचं वेड होतं. 'हमीदाबाईची कोठी' नाटकात, त्यांची नाना पाटेकरशी घनिष्ठ मैत्री झाली. त्यावेळी अशोकला २५० व नानाला ५० रुपये नाईट होती.

    'दोन्ही घरचा पाहुणा' नंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' पासून, अशोक सराफ यांचे दिवस पालटले. त्यातील दादांचा बेरकी मित्र, महादू हवालदारची भूमिका तुफान गाजली. पुढचा 'राम राम गंगाराम' चित्रपटातील 'म्हमद्या खाटीक'ला कुणीतरी विसरणं शक्य आहे का? 'तुमचं आमचं जमलं' या चित्रपटानंतर अशोक, पुन्हा कधीही दादांबरोबर दिसले नाहीत.

    दरम्यान अशोक यांनी अनेक मराठी चित्रपट केले. महेश कोठारे यांच्या 'धुमधडाका' पासून लक्ष्मीकांत बेर्डेशी त्यांची जोडी जमली. दोघांनी एकत्र मिळून वीस वर्षे प्रेक्षकांचं मनमुराद मनोरंजन केलं.

    सचिन पिळगांवकर सोबत अशोक यांनी विविध भूमिका साकारल्या. 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटातील अशोक यांची भूमिका, अविस्मरणीय अशीच आहे. 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील धनंजय मानेनं धम्माल केली आहे. 'नवरा माझा नवसाचा' मध्ये अशोक, कंडक्टर झालेले आहेत.

    अशोक यांनी सर्व चित्रपटात हिरोचीच भूमिका साकारली आहे असं नाहीये. 'कळत नकळत' मध्ये छोट्या भाच्यांच्या, मामाची भूमिका करताना स्वतःच्या आवाजात एक बालगीतही म्हटलंय. 'चौकट राजा' मध्ये नंदूला समजून घेणाऱ्या अशोक यांच्या, गणाच्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी येतं.

    अशोक आणि रंजना, ही जोडी 'मेड फाॅर इचआदर' अशीच होती. त्यांची 'केमिस्ट्री' पडद्यावर पहायला, धमाल मजा यायची. 'बिनकामाचा नवरा', 'सासू वरचढ जावई', 'खिचडी', 'गोंधळात गोंधळ', 'गुपचुप गुपचुप' हे चित्रपट कधीही पहा, तुम्ही 'ताणतणाव' विसरुन जाल, हे नक्की.

    अशोक यांनी खलनायकही रंगवले आहेत. 'अरे संसार संसार' मधील साकारलेला, वासनांध सावकार पाहून 'मदर इंडिया' मधील कन्हैयालाल आठवतो. 'अनपेक्षित' नावाचा चित्रपटही तसाच वेगळा आहे.

    दूरदर्शनच्या 'हम पाॅंच' मालिकेतील, शोभा आनंदचे पती झालेले अशोक, अनेक वर्षे हसवत होते. हिंदी चित्रपटात देखील अशोक यांनी लक्षवेधी भूमिका केलेल्या आहेत. 'दामाद' पासून त्यांनी हिंदीत पाय रोवले. 'मेरी बीवी की शादी', 'करण अर्जुन', 'खुबसूरत', 'कोयला', 'येस बाॅस, 'सिंघम' अशा अनेक हिंदी चित्रपटांतून त्यांनी अजोड भूमिका केलेल्या आहेत. 'करण अर्जुन' मधील 'राणाऽ तो, अब गयोऽ' हे पालुपद, त्यांच्या खास शैलीत ऐकायला धमाल वाटते. 'सिंघम' मधील, त्यांचा मराठी हवालदार लक्षात राहतो.

    अलीकडे अशोकजी निर्मिती सावंत बरोबर 'व्हॅक्युम क्लीनर' या धमाल विनोदी नाटकातून भेटत आहेत. आजचा शिवाजी मंदिर मधील प्रयोग, प्रेक्षकांसाठी विनामूल्य ठेवलेला होता.

    त्यांच्या चित्रपटांची पेपर पब्लिसिटी केल्यामुळे, प्रिमिअर शोचे वेळी अशोकजींची अनेकदा भेट झाली, मात्र बोलणं असं कधी झालं नाही. ज्यांच्या फक्त नावावर चित्रपट चालतात, त्यांना जाहिराती कुणी केलेल्या आहेत किंवा कशा झालेल्या आहेत याबद्दल फारसं स्वारस्य नसतं.

    अशोक सराफ यांनी, स्टेट बॅंक ऑफ इंडियाची नोकरी सोडलीच नसती तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी व रंगमंच एका ग्रेट कलाकाराला मुकला असता. तरीदेखील अशोक सराफ यांच्या खात्यावर कोट्यावधी रसिक प्रेक्षकांचे, अब्जावधी हशे आणि टाळ्या जमा आहेत.

    -- सुरेश नावडकर.

    मोबाईल: ९७३००३४२८४

    ४-६-२२.

  • हवाहवासा ‘पाहुणा’

    सुमित्रा भावे गेल्या, किशोर नांदलस्कर. अशी चित्रपट क्षेत्रातील एकेक जण ‘एक्झिट’ घेऊ लागल्यावर, काळजात धस्स होऊ लागलं. आज ना उद्या हा कोरोना जाईलही, मात्र जाताना अजून किती जणांना घेऊन जाणार आहे? हे त्याचा तोच जाणे.

  • उद्यान एक्सप्रेसचा थरार

    इकडे स्टेशन मास्तरांच्या एव्हाना ही घटना दृष्टीस पडली होती. त्यांनी स्वप्नील कडे नजर टाकली आणि शुभांगी च्या दिशेने हात करत बोलले,” स्वप्नील,  तिकडे  बघ,  कोणीतरी लहान मुलगा ट्रॅक वर पडला आहे.” स्वप्नील ने तिकडे बघितले आणि तो एकदम बेभान झाला. काय करावे हा तो विचार करत होता तेवढ्यात स्टेशन मास्तरांनी आपल्या हातातील लाल झेंडा उंच उभारून उद्यान एक्स्प्रेस च्या लोकोपायलट ला धोक्याचा इशारा दिला होता.

  • चष्मा (गूढकथा)

    पंतांना नुकतीच गाढ झोप लागली होती. वयोमान प्रमाणे, त्यांची झोप कमीच झाली होती, साडेबारा एक तर निद्रादेवीच्या आगमनाची, नेहमीचीच वेळ! अचानक त्यांना जाग आली. कोणी तरी हलवून जागे केल्या सारखी! काही क्षण ते अंथरुणावर तसेच पडून राहिले. आपण कोठे आहोत? हि कोणती जागा आहे? कोकणातली कारली तर नाही? 

  • हा तर खरा बौद्धिक व्यायाम

    शारीरिक व्यायाम ही जरी गरज असली, तरी मानसिक समाधान ज्या योगे प्राप्त होते, तो हाच खरा बौद्धिक व्यायाम नव्हे काय?

  • भाऊबीज

    डोळ्यासमोर घड्याळातील काटे ‘आठ पंचवीस ‘ची वेळ दाखवत होते आणि डोक्यामध्ये ” आता ही नोकरी जर नाही मिळाली तर परत घरात पाऊल टाकू नकोस, तिकडेच तोंड काळं कर ” हे आप्पांचे शब्द घुमत होते, अश्या परिस्थितीत साडे आठची मुंबई ला जाणारी उद्यान एक्स्प्रेस पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने संजीव प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कडे पळत सुटला होता… तेव्हढ्यात ट्रेन चा भोंगा वाजला अन ट्रेन हलली, हातातली बॅग सांभाळत त्याने समोर दिसलेल्या दरवाज्यातून अक्षरशः स्वतःला आत झोकून दिलं.

  • मातृभक्त सैनिक

    एक आरमारप्रमुख होता. आपल्या आरमारातील सैनिकांनी साहसी असावे, आपली आज्ञा पाळताना कोणतेही संकटं आले तरी त्यांनी न डगमगता संकटावर मात करावी, असा त्याचा नेहमीच आग्रह असे. त्यामुळे कधी कधी तो आपल्या सैनिकांची परीक्षाही पाही. ही परीक्षा कधीकधी फार कठोरही वाटे.

    एकदा तो जहाजावरून फिरत असताना त्याला एक सैनिक दिसला. आरमारप्रमुखाने ताबडतोब त्याला समुद्रात उडी मारायला सांगितले. मात्र त्या सैनिकाला उडी मारायला थोडासा वेळ लागला. ते पाहून संतप्त झालेल्या त्या आरमारप्रमुखाने त्या सैनिकाला त्याचा कोट काढण्यास सागितले. सैनिकाने कोट काढताच आरमारप्रमुखाने तो कोट समुद्रात भिरकावून दिला.

    तेवढ्यात अचानक समुद्रात वादळ सुरू झाले मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि आरमारप्रमुख नको नको म्हणत असतानाच त्या सैनिकाने त्या वादळातही समुद्रात उडी घेतली व लाटांवर तरंगत असलेला तो कोट घेऊन पुन्हा जहाजावर आला.

    आरमारप्रमुख नको नको म्हणत असतानाही त्या सैनिकाने उडी मारली होती म्हणजे एका परीने त्याने आरमारप्रमुखाचा आज्ञाभंग केला होता. हा आरमारप्रमुख कठोर शिस्तीचा भोक्ता होता. हा आज्ञाभंग तो सहन करणार नाही, असे साऱ्यांनाच वाटले. त्यामुळे इतर सैनिकांना आता आरमारप्रमुख काय करतात याबाबत कमालीची उत्सुकता वाटत होती.

    आरमारप्रमुखाला मात्र उडी मारणाऱ्या त्या सैनिकाचे आश्चर्य वाटले होते म्हणून त्याने त्याला विचारले, ' 'मी नाही म्हणत असतानाही तू वादळात उडी मारण्याचे एवढे मोठे धाडस का केलेस?''

    त्यावर तो सैनिक नम्रपणे म्हणाला, '' त्या कोटात माझ्या आईचा फोटो होता व मला जेव्हा जेव्हा आईची आठवण होते, तेव्हा तेव्हा मी तो फोटो पाहत असतो. ''

    त्या सैनिकाची मातृभक्ती पाहून तो आरमारप्रमुखही चकित झाला व त्याने त्याला आज्ञाभंगाच्या मुख्यातून मुक्त केले.

  • एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – क

    ज्‍या इंग्रजीच्‍या आक्रमणाची आपल्‍याला एवढी धास्‍ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्‍द इतर भाषांमधून मुक्‍तपणे घेतले आहेत आणि त्‍यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे

  • श्री क्षेत्र कनकेश्वर देवस्थान अलिबाग

    पावसाळ्यात पहिल्या श्रावणी सोमवारी हजारो अलिबागकरांची पावले कनकेश्वरच्या प्राचीन शिवमंदिराकडे आपसूकच खेचली जातात. निसर्गाच्या कुशीत आणि उंच डोंगरावर असलेल्या या देवस्थानाकडे जण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक चोंढी कार्लेखिंड मार्गावरील मापगांव हुन मुख्य पायवाट तर अलिबाग रेवस रोडवरील झिराड गावातून जाणारी पायवाट.