नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सांगायलाच ह्वंय, असं नाही... हा भगवान निळे यांचा सृजन प्रकाशनचा नुकताच प्रकाशित झालेला कवितासंग्रह वाचला.
मी म्ह्णजे, तुम्हीही! या पहिल्याच कवितेत कवी सर्वसामान्य लोकांच प्रतिनिधित्व करताना दिसतो. तेव्हाही आजच्यासारखे... ही कविता अजूनही आपल्या समाजव्यवस्थेत फार आशादायी असे बदल झालेले नाहीत हे पटवून देते . अशी कित्येक वर्षे लोटतील या कवितेतून कवीने आपण आजही कसं भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहोत हे नवरा- बायको संबंधाच्या माध्यमातून उत्तमरित्या पटवून दिले आहे.
सर्पमिठी ही कविता स्त्री-पुरूष समानतेवर भाष्य करते. आरस्पानी बाई या कवितेत नवर्याच्या कुशीतील आपल्या पत्नीकडेही नवरा आजही फक्त एक बाई म्ह्णूनच पाह्त असतो हे सत्य उत्तमरित्या मांडताना दिसते. कोण हा पुरुष सारख्या काही कविता पुरुषातील पुरूष नाही तर माणूस शोधण्यास प्रवृत्त करताना दिसतात. सत्यामागे दडलेले सत्य सारख्या कविता अश्लीलता ही पाह्णार्याच्या डोळयात दडलेली असते हे सत्य उगडपणे पटवून देते. पुरूषांच्या सावलीमागे लपलेल्या बायका ही कविता आजही स्त्री पुरूषाचाच आधार शोधत असते हे सत्य मांडताना दिसते.
दोन चेहरे मुंबई नगरीचे या कवितेत एकाच नाण्याच्या दोन बाजू पण त्या दोन बाजूत असणारा पराकोटीचा विरोधाभास कवीने अप्रतीम मांडला आहे. असं का होतं? या कवितेत आजचा माणूस कसा सुखाला पोरका झालेला आहे हे सांगण्याचा कविचा प्रयत्न यशस्वी झालेला दिसतो. पाच तुकडे प्रार्थनेचे या कवितेत कवी आजही समाज मनात रुतून बसलेल्या अंधश्रध्देवर भाष्य करताना दिसतो. माझाही बाप आणि आई गेल्यानंतर या कविता आई बापावर त्यांच्यातील नाते- संबंधावर फार दाह्कपणे पण वास्तववादी भाष्य करताना दिसतात. मुलगी मोठी होते तेव्हा... या कवीतेत कवी बाप-मुलीच्या नातेसंबंधाची एक झाकलेले बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कवितासंग्रहातील मी मरेन तेंव्हा ... या शेवटच्या कवितेत कवी जगातील नश्वरता मांडताना दिसतो...
भगवान निळे यांच्या सांगायलाच ह्वंय असं नाही... या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता एक सुविचार आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. प्रत्येकाने वाचावा असा हा कवितासंग्रह आहे मी वाचला आता तुम्हीही वाचा वाचल्यावर तुंम्ही नक्कीच म्ह्णाल की सांगायलाच ह्वंय, असं नाही...
-- निलेश बामणे
कोलोनचे हॉटेल सोडून ब्लँक फॉरेस्टच्या घनदाट जंगलामार्गे आम्ही अंदाजे साडे चार पाच तासात सुमारे 490 किमी अंतर पार केले आणि टीटीसीच्या कूकू क्लॉक फँक्टरी भागात, भात, पोळीला फाटा देउन, चविष्ट राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेतला. खूपच सुंदर जेवण होत. तिथून पुढचा -हाइन फॉल (Schaffhausen Neuhausen) हा 85 ते 90 किमीवर आहे. या मार्गावरुन जाताना दूतर्फा निसर्गानी हिरवेगार गालिचे अंथरले होते. मधेच काही टुमदार उतरत्या छपरांची घर दिसत होती. घरांच वेगळेपण डोळ्यात भरणार होत. काही वेळातच जर्मनीची हद्द पार करुन आम्ही स्वित्झरलंडमधे प्रवेश केला आणि -हाईन फॉल्सकडे आगेकूच केली.
तिला कळत नव्हतं ,त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय . कालपासून त्यांचं वागणं काहीसं अनाकलनीय वाटत होतं . पंचेचाळीस वर्षांच्या सहजीवनाचा इतिहास ती कालपासून धुंडाळत होती . थोडंसं काही हाती लागत
होतं , काही हातातून निसटून जात होतं . पण कालपासूनच्या वागण्याचा बोध तिला होत नव्हता .

युद्धाच्या काळात जिम बराच काळ बाहेर होता. त्याची बहीण मॅगी कालाढूंगीला एकटीच रहात होती. तेव्हा दळणवळणाची साधने पण नव्हती. जवळचे मोठे शहरसुद्धा २० किलोमीटर दूर! पण मॅगीच्या सुरक्षिततेची चिंता जिमला क्षणभरसुद्धा वाटली नाही. कारण ती त्याच्या मित्रांच्या सहवासात पूर्ण सुरक्षित आहे याची त्याला खात्री होती आणि हे मित्र म्हणजे भारतीय लोकच होते. त्यांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता.
जिम कॉर्बेटला आयुष्यात खूप मान-सन्मान प्राप्त झाले. १९४२ साली त्याला ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर' व पुढे 'कम्पॅनियन ऑफ द इंडियन एम्पायर' हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला. 'फ्रिडम ऑफ जंगल' हा सुद्धा त्याला सन्मान मिळाला होता व त्यामुळे भारतातील कोणत्याही जंगलात फिरण्याची त्याला मुभा होती. हा मान फक्त दोनच लोकांना देण्यात आला होता.
जिम कॉर्बेटने आपल्या आयुष्यात खूप वेळा परदेश दौरे केले पण तो कुठेच रमला नाही कारण भारत हे त्याचे घर होते.
जिम कॉर्बेटचे घर कालाढुंगीला नैनितालच्या वाटेवर होते. येणारे जाणारे तिथे पाय लावून जात. कोणी पैशाच्या मदतीच्या अपेक्षेने तर कुणी एक कप चहाच्या अपेक्षेने तर कुणी आपली गाऱ्हाणी सांगण्यासाठी तर कोणी औषधासाठी सुद्धा! त्याचे घर म्हणजे सर्वांना मुक्तद्वार होते. जिमला सरकारने विशेष दंडाधिकारीचा दर्जा दिला होता. त्याला न्यायनिवाडा करण्याची अनुमती दिली होती. लोकांचे त्याच्यावर प्रेम होते. विश्वास होता. लोक तर त्याची भलावणी 'गोरा साधू' म्हणून करीत. सर्वजण त्याला 'कारपिट साहेब' म्हणून ओळखत असत.
कालाढुंगीमध्येच त्याने साधारण १ एकर जागा घेऊन एक घर बांधले व त्याचे नाव ठेवले 'विंटर हाऊस.' उन्हाळा सोडून त्याचा बराचसा मुक्काम विंटर हाऊसमध्येच असे. या विंटर हाऊसच्या परिसरात १९१५ साली त्याने २१० एकर जागा १५०० रुपयाला खरेदी केली व त्या जागेचे ४० भाग करून एक वसाहत स्थापन केली. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याने नाले बांधले त्या जागेत लोकांना वसवले. त्यांना शेती करण्यासाठी प्रद्युक्त केले. त्यासाठी मक्याचे बियाणे त्याने आफ्रिकेतून आणवले. मका, केळी, बटाटा, गहू इ. ची लागवड केली. त्यांच्या शेतीचे जनावराकडून नुकसान होऊ नये म्हणून या परिसराभोवती जवळजवळ ६ फूट उंचीची व ९ कि.मी. लांबीची भिंत बांधली. त्यासाठी त्याने स्वत: चे पैसे खर्च केले. आपल्या मोतीसिंग नावाच्या नोकराला व इतर लोकांना घरे बांधून दिली. लोकांनी एकत्र यावे, विचारांचे आदान-प्रदान व्हावे म्हणून ३ सज्जे बांधले. मोतीसिंगसाठी बांधलेल्या घरात आज त्याची तिसरी पिढी सुखाने रहात आहे. त्याने बांधलेली भिंत आजही उभी आहे. त्याच्या या 'छोटी हल्दवानी' वसाहतीत आजही पाणी खळाळत आहे. आजही हा सर्व परिसर हिरवागार आहे. या वसाहतीत १-२ वृद्ध भेटतात, ज्यांनी जिमला पाहिले होते. जिमचे नाव काढताच त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. १९४७ साली जिमने भारत सोडला तेव्हा या सर्व जमिनी त्याने कोणताही मोबदला न घेता त्या गरीब गिरीजनांना देऊन टाकल्या. तरीपण त्याच्या मृत्यूपर्यंत तो त्या जमिनीचा कर भरत होता.
जिम कॉर्बेट श्रद्धाळू ख्रिश्चन होता. तो चर्चमध्ये जात असे. पण प्रत्येक हिंदू सणात त्याचा फार मोठा सहभाग असे. नैनिताल-कालाढुंगी रस्त्यावर त्याने देवीचे देऊळ बांधले होते. त्याने जातिधर्मात कधीच भेदभाव केला नाही.
१९३६ ते १९४३ या काळात मॉरक्विस लिनलिथगो हे भारताचे व्हाईसरॉय होते. त्या काळात भारताचा व्हॉईसरॉय म्हणजे सर्वोच्च पद! एके दिवशी त्यांच्या वाचण्यात जिमचे लेख आले व त्यांना जिमबद्दल कुतूहल निर्माण झाले. पुढे संयुक्त प्रांताच्या गव्हर्नरकडून जिमचे एक पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्यावेळी भारताची उन्हाळी राजधानी सिमला होती. उन्हाळ्यात व्हॉईसरॉयचे कार्यालय सिमल्याला स्थलांतरित करण्याच्या कालावधीत व्हॉईसरॉय दक्षिण भारताचा दौरा करीत. पण लिनलिथगोना इच्छा झाली या काळात एखाद्या जंगलात, शांत ठिकाणी आपण काही काळ वास्तव्य करावे आणि विशेष म्हणजे ते जिमच्या कालाढुंगीला आले व शेवटी जिमचे अतिशय जवळचे मित्र झाले. जिमबरोबर ते स्थानिक लोकांत मिसळत, गोरगरिबांशी, गिरीजनांशी गप्पा मारत. त्यांच्याशी हस्तांदोलन करीत. भारताचा व्हॉईसरॉय आपल्याशी इतका जवळिकीने वागतो हे पाहून लोकांना आकाश ठेंगणे होई पण त्याबरोबर सर्वांना हे माहित होते या सर्वाला जिम कारणीभूत आहे. जिमच्या 'मॅन इटर्स ऑफ कुमाऊँ' या पुस्तकाची आशीर्वादपर प्रस्तावना लिनलिथगो यांनी लिहिली होती. लिनलिथगोनी सहकुटुंब बऱ्याचवेळा कालाढुंगीला भेट दिली होती व जिमबरोबर सुखाचे दिवस घालवले होते.
भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. ब्रिटिशांबद्दल चीड जनमानसात पसरू लागली. आज ना उद्या भारत स्वतंत्र होणार हे स्पष्ट दिसू लागले. त्याचे युरोपियन मित्र मायदेशी परतू लागले आणि मग जिम पुढे प्रश्न उभा राहू लागला, स्वातंत्र्यानंतर या भारतात आपले स्थान काय? जरी तो जन्माने भारतीय असला तरी शेवटी तो युरोपियन होता. त्याला वाटू लागले, या पुढे आपले स्थान हे दुय्यम नागरिकाचे! शेवटी जड अंतःकरणाने त्याने भारताचा कायमचा निरोप घेऊन केनियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आपले नैनितालमधील घर त्याने वर्मा कुटुंबियांना विकले व कालाढुंगीचे घर पण विकण्याचा प्रस्ताव दिला पण हे घर त्यावेळी विकले गेले नाही. जिम केनियाला गेल्यानंतर ते घर चिरंजी लाल यांनी २००० रुपयांना विकत घेतले. पण काही दिवसांनी ते घर चिरंजी लाल यांच्याकडून परत विकत घेऊन त्याचा कम्युनिटी सेंटरमध्ये बदल करण्याचा जिमचा विचार होता पण तो सफल झाला नाही. 'छोटा हल्दवानी' तील तर सर्व जमीन तिथे राहणाऱ्या लोकांना त्याने वाटून टाकली होती. शेवटी एके दिवशी जड अंतःकरणाने त्याच्या आवडत्या लोकांचा, त्याच्या लाडक्या भारताच त्याने निरोप घेतला. पण भारताशी आपला संबंध संपू नये या हेतूने त्याने आपले नैनितालच्या अलाहाबाद बँकेतील खाते बंद केले नाही. आजही या बँकेत जिम कॉर्बेटचे खाते आहे व बँकेच्या सुरक्षा कक्षेत 'मॅगीचे', जिमच्या बहिणीचे मृत्युपत्र सुरक्षित आहे. भारत सोडण्यापूर्वी त्याने आपला नोकर रामसिंग याला कालाढुंगीला जमीन दिली व दरमहा १० रुपये रामसिंगला देण्याची सूचना बँकेला दिली. जिमच्या मृत्यूनंतर हीच प्रथा मॅगीने पण पुढे चालू ठेवली.
नोव्हेंबर १९४७ मध्ये लखनौ-मुंबई मार्गे तो केनियाला निघून गेला. त्याने २-३ ठिकाणी स्थायिक होण्याचा प्रयत्न केला व शेवटी तो नेयरी या ठिकाणी स्थायिक झाला. कारण त्या ठिकाणाहून दिसणारी केनिया पर्वतराजीचे अनुपम दृश्य! हे निश्चित, नैनितालहून दिसणाऱ्या हिमालयाच्या पर्वतरांगांची सर त्याला नव्हती. पण आता आहे त्यावर त्याला समाधान मानावे लागत होते. नेयरीला त्याने कॉफीचे मळे घेतले. 'सफारीलँड' नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी काढण्याचा मूळ हेतू म्हणजे लोकांनी शिकारीपासून दूर जावे व प्राण्यांचे छायाचित्रण करावे.
नेयरीचा सर्व परिसर जंगलांनी वेढलेला. वन्य पशूंचा त्या ठिकाणी वावर. नेयरीजवळ एका मोठ्या झाडाच्या आधाराने झाडावर एक छोटेसे हॉटेल तयार केले होते. 'ट्री टॉप' या नावाने ते प्रसिद्ध होते. खूप हौशी प्रवासी त्या हॉटेलच्या व्हरांड्यात बसून वन्य पशूंच्या निरीक्षणाचा आनंद लुटत. फेब्रुवारी १९५२ मध्ये ब्रिटनची राजकन्या एलिझाबेथ व तिचा नवरा प्रिन्स फिलीप यांनी या परिसराला भेट देण्याचे ठरवले. तेव्हा त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी जिमवर सोपवली होती.
एका प्रकारे जिमचा तो सन्मानच होता. आपली बंदूक घेऊन जिम सतत त्यांच्याबरोबर होता. या त्याच्या अनुभवावर त्याने 'ट्री टॉप' हे छोटेखानी सुरेख पुस्तक लिहिले आहे.
केनियातसुद्धा पशु-प्राण्यांच्या संरक्षणासाठी खूप प्रयत्न केले. केनिया सरकारनेसुद्धा त्याल 'वन्यजीव प्रतिपालक' ही उपाधी देऊन त्याचा सन्मान केला.
नेयरीत जिम रमण्याचा प्रयत्न करीत होता तरी त्याचे व मॅगीचे मन भारताकडे वारंवार ओढ घेत होते. भारताच्या आठवणी तो विसरू शकत नव्हता. मॅगीने जल पण त्याला भारतात परत जाण्याविषयी सुचवले होते. आपल्या भारतातील मित्रांना परत भेटण्याची त्याची खूप इच्छा होती. निदान काही दिवसांसाठी भारत भेटीवर येण्याची त्याची खूप इच्छा होती पण ती शेवटपर्यंत फलद्रूप झाली नाही.
१९५१ व १९५३ साली त्याने ब्रिटनला भेट दिली. त्यावेळी ब्रिटनच्या राणीशी त्याची भेट झाली होती.
भारतात असताना त्याला झालेला मलेरिया, अति धूम्रपानाची सवय व नेयरीमध्ये ज्वालामुखीतून पसरणारी राख याचा विपरीत परिणाम जिमवर तो केनियात गेल्यापासून होऊ लागला होता. १९ एप्रिल १९५५ रोजी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारासाठी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण सर्व व्यर्थ ठरले. काही वेळातच त्याचे देहावसान झाले. आपल्या मृतदेहावर हिंदू पद्धतीप्रमाणे अग्निसंस्कार व्हावेत अशी त्याची इच्छा होती पण दुसरे दिवशी नेयरीच्या सेंट पीटर चर्चच्या आवारात त्याच्या देहावर ख्रिश्चन रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले गेले.
जिम कॉर्बेट शेवटपर्यंत अविवाहित होता. त्याला जन्मभर साथ दिली त्याच्या बहिणीने, मॅगीने. ती पण अविवाहित होती.
निसर्गाच्या मोहपाशात गुरफटलेला हा जिम कॉर्बेट पर्यावरण प्रेमींच्या हृदयात कायमचे स्थान प्राप्त करून बसला आहे. त्यांनी वाघाच्या इंडो-चायनीज प्रजातीला 'कॉर्बेट टायगर' म्हणून नाव दिले आहे. आज जगभर ही प्रजाती 'कॉर्बेट टायगर' म्हणून ओळखली जाते.
'Always be brave, and try & make the world happier place for others to Live in.' जिमने मॅगीला उद्देशून उच्चारलेल्या या त्याच्या शेवटच्या शब्दातच त्याच्या जीवनाचे मर्म सामावलेले आहे. अशा या कॉर्बेटला विसरणे केवळ अशक्य आहे.
--प्रकाश लेले
डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते. रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे.
नुकताच मी टीव्ही लावला होता आणि कुठे काही चांगला कार्यक्रम आहे का ते पाहात होतो. चॅनल बदलता बदलता एका अतिप्रसिध्द चॅनलवर अचानक ब्रेकींग न्यूज झळकली ‘ढोणी इडली खातोय’. म्हटलं बघूया तर हे काय प्रकरण आहे ते. तेवढ्यात स्टुडीओत सादरकर्ती माया अवतरली.
मायाः प्रेक्षकहो, आताच आमच्या बंगळूरू येथील वार्ताहराकडून आम्हाला ब्रेकींग न्यूज मिळाली आहे कि साक्षात ढोणी आत्ता इडली खात आहे. चला तर बंगळूरू येथे आमच्या वार्ताहराकडून अधिक माहिती घ्यायला. राजू ,जरा आम्हाला सविस्तर माहिती दे.
(राजू हे नाव ऐकताच मी शेअरबाजारात गुंतवणूक करत नसताना वा स्वतः सीए नसताना देखील दचकलो. पण हा राजू वेगळा दिसत होता.)
राजूः आता सकाळच ९ वाजून ५० मिनिटे झालेली आहेत. हा बंगळूरूमधील महात्मा गांधी रोड आहे. त्यावरील नित्यानंद हॉटेलच्या बाहेर आम्ही उभे आहोत. माया.
मायाः तुम्ही तिथे काय करत आहात?
राजूः आताच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ढोणी या हॉटेलात शिरला आहे. हॉटेलच्या सूत्रांकडून आम्हाला आताच माहिती मिळाली आहे की त्याने इडलीची ऑर्डर दिली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता त्याचे इडली खाणे आम्ही लाइव्ह दाखवणार आहोत. माया.
मायाः पण त्याने इडलीचीच ऑर्डर का दिली?
राजूः त्याचा नाश्ता झाल्यावर आम्ही त्याला हा प्रश्न नक्की विचारू. चला आपण आता आतमध्ये जाऊ. हा कॅश काउंटर. इथून पुढे गेल्यावर तिकडच्या कोपर्यात तो ढोणी बसलेला दिसत आहे. वेटरने आताच त्याच्यासमोर गरमागरम इडली आणून ठेवली आहे. आता वेटर सांबार आणि चटणी ठेवत आहे. ढोणीने आता डाव्या हातात काटा आणि उजव्या हातात चमचा धरलेला आहे. त्याने आता इडलीचा पहिला तुकडा मोदून तो सांबारात बुडवलेला आहे आणि आता त्याने तो तुकडा खायला सुरुवात केलेली आहे.
मायाः प्लेटमध्ये किती इडल्या आहेत?
राजूः तीन. इथे कर्नाटकात बहुतेक ठिकाणी तीन इडल्या दिल्या जातात. महाराष्ट्रात मात्र बहुतेक ठिकाणी दोनच दिल्या जातात.(यानंतर शेवटच्या तुकड्यापर्यंत ढोणी कसा इडली खात आहे हीच कॉमेंटरी सुरू राहते.)
राजूः आताच हॉटेलच्या सूत्रांकडुन अशी माहिती मिळालेली आहे कि त्याने इडलीची आणखी एक प्लेट ऑर्डर केली आहे.
मायाः त्याने दुसरी प्लेटपण इडलीचीच ऑर्डर का दिली?
राजूः याचे कारण झारखंडमध्ये इडली मिळत नाही.
मायाः मग झारखंडमध्ये काय मिळते?
राजू ः ढोणीला विचारुन सांगतो!
मायाः बर आता आम्हाला पुढं काय होतय ते सांग.
राजूः ढोणीने आता दुसर्या प्लेटमधील इडली खायला सुरुवात केली आहे. (तेच दळण कॉफी पिण्यापर्यंत सुरू.)
राजूः आता ढोणी बाहेर पडत आहे. आता त्याच्याकडून आपण अधिक माहिती घेऊ. पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचे सोडून तू इथेच कसा आलास?
ढोणीः पंचतारांकित हॉटेलमध्ये आमच्यासारखे बरेच लोक येत असतात त्यामुळे त्यांना आमचे कौतुक नसते. इथे आम्हाला राजासारखी वागणूक मिळते वर बिलही द्यावे लागत नाही!
राजूः म्हणजे राजासारखी वागणूक मिळावी अशी तुझी अपेक्षा असते?
ढोणीः मलाच काय, सर्व क्रिकेटपटूंना वाटते की ते राजेच आहेत.
राजूः तुला पद्म पुरस्कार मिळाला तरी तू घ्यायला गेला नाहिस?
ढोणीः मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही राजे आहोत. आमच्या एकेक मिनिटाची किंमत हजारो रुपये असते. त्यातून जाहिराती करणे आणि क्रिकेट खेळणे यातून आम्हाला खूप पैसा कमवायचा असतो कारण त्यातूनच आमचे राजेपण टिकणार असते. मग त्या किरकोळ रकमेच्या पद्म पुरस्काराची काय कथा? त्यातून आम्ही राजे आहोत हे सरकार ध्यानात घेत नाही. कोण कुठले शास्त्रज्ञ, कलाकार अशा फालतु लोकांबरोबर आम्ही सत्कार करून घ्यावा अशी सरकारची अपेक्षा. ते आम्हाला कसे चालणार? सरकारने असे समारंभ आमच्या सवडीने व आम्ही सांगू तसे आयोजित केले तर सरकारवर उपकार म्हणून आम्ही असे पुरस्कार स्वीकारू. हे दाखवून देण्यासाठीच यावेळी जेव्हा दोन सामन्यांसाठी माझ्यावर बंदी आली आणि शूटींगही नव्हते तेव्हा मी हा पुरस्कार स्वीकारला.
राजूः पण सरकार तर जनतेचे प्रतिनिधी असते.
ढोणीः अहो या देशात लोक सरकारपेक्षा आम्हाला जास्त मानतात. आम्ही पैशासाठी खेळतो असे असूनही लोक आम्ही देशासाठी खेळतो असे समजतात. आम्हाला पैसा मिळावा म्हणून स्वतःचा कामधंदा सोडून आणि स्वतःचे पैशाचे नुकसान करून घेऊन लोक खेळ बघतात. राजेशाहीत दुसरे काय असते? आमचा प्रायव्हेट क्लब आहे, तो संघ निवडतो, सगळे निर्णय घेतो आणि सरकार निमुटपणाने तो देशाचा संघ म्हणून स्वीकार करते. बाकी सर्व खेळांच्या बाबतीत सरकारला अधिकार आहे पण आमच्याबाबतीत नाही. आमच्या क्लबचे पदाधिकारी खूपच पॉवरफूल आहेत त्यामुळेच आम्ही वाटेल तसे वागू शकतो. आमचा दरारा फक्त भारतातच नाही तर जगभर आहे. अंमली पदार्थविषयक चाचणीला संपूर्ण जगात फक्त आम्हीच विरोध केला आणि आमच्या क्लबने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. दुसरे उदाहरण. एका माजी क्रिकेटपटूला परकीय चलन बाळगल्याबद्दल सरकार काही करू शकलं नाही तिथे आम्ही तर आजचे क्रिकेटपटू आहोत. मग आम्ही राजेपण मिरवले तर कुठे बिघडले?
राजूः आता आणखी एक प्रश्न.
ढोणीः आता शूटींगला जायचे आहे त्यामुळे बास.
राजूः ढोणी आता गेलेला आहे. त्याने मुलाखतीत जे सांगितले त्याचा सूज्ञ प्रेक्षकांनी विचार करावा. भारतात आपण सर्वच क्षेत्रात व्यक्तीपूजेचे स्तोम माजवले आहे. ते ज्यादिवशी कमी होइल तो सुदिन. कॅमेरामन दिपकबरोबर राजू अमुक चॅनलसाठी.
(वरील सादरीकरणात कुणाला सत्य घटना आढळल्यास तो योगायोग समजावा.)
-- कालिदास वांजपे
सातारा स्टँडवर सरवांची वर्दळ सुरू असल्यानं स्टँड बहरल व्हती,कॉलेज ची गावठी पोरं उगाचच उनाडक्या करीत इकडून तिकडं फिरत व्हतं..त्यासनी असं वाटत व्हतं जणू सगळ्या जगाची अक्कल त्यासनी आलीय…एक एका गावची एस टी येत व्हती तसं पोरा अन पोरींचा घोळका लगबगीनं गाडीकड धाव घेत एकमेकांसनी म्होर ढकलत जात व्हता.
गोष्ट फार जुनी आहे. चाळीस वर्षे झाली त्या गोष्टीला. मी सरकारी नोकरीत होतो. उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ औरंगाबाद विभाग प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली होती तेव्हाची.
आज ५ मे .. साधनाताईंचा ९५ व जयंती दिवस .. या निमित्ताने माझ्या 2 ओळी त्यांच्या चरणी अर्पण करते आणि त्यांना विनम्र अभिवादन करते..
गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. तेव्हा भृगु महाऋषी त्या द्वारपालाला शाप देतात, “तुम्ही तीन जन्म पृथ्वीतलावर उन्मत्त असे राक्षस होऊन पडाल तेव्हा द्वारपालांनी शरण येऊन भृगु महाऋषीस उःशाप मागितला. भृगु ऋषी म्हणाले “तुम्ही राक्षस होऊन पडल्यावर श्रीविष्णु तुमचा उद्धार करतील व तुम्ही पुन्हा द्वारपाल व्हाल तेव्हा ते पृथ्वीतलावर हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप असे दोन राक्षस होऊन पडले. हे दोन्ही भाऊ उन्मत्त व महाअंतुरबळी युद्धिष्ठर असे बनले.
Copyright © 2025 | Marathisrushti