(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • रोगा’यण !!

    खूप दिवसा पासून ,म्हणजे फेसबुक वर ती पोस्ट वाचल्या पासून ,या क्षणाची मी वाट पहात होतो . तो क्षण माझ्या आयुष्यात आलाच ! तसा तो बरेचदा आला आहे .पण आता मला ‘त्या ‘पोस्ट ‘ मुळे नेमकं काय करायचं ते कळलंय ,आणि मी ते करण्याचा निश्चय केला आहे !

  • माझा बालवाडीत प्रवेश

    छे हो मला बालवाडी हे माहित नव्हते. पाच वर्षे पूर्ण झाली की थेट पहिल्या इयत्तेत. आणि पु. ल. यांच्या भाषेतील पालक केजी वगैरे काही नव्हते. चार मैत्रीणीसोबत शाळेत जायचे आणि यायचे. रडले नाही कधीच. पण नोकरी करत असताना मात्र बालवाडीत बसण्याची संधी मिळाली होती ती अशी. माझी नगर परिषदेची शाळा. त्यामुळे पहिल्या इयत्तेत मुलांना प्रवेश मिळणे सोयीचे व्हावे आणि शाळेची सवय व्हावी म्हणून बालवाडी सुरू करण्यात आली होती. ती ही बऱ्याच वर्षांनी. एकदा एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन शाळेत आले. बालवाडीत नांव घातले. आणि सांगितले की या मुलाची आई मानसिक दृष्ट्या बरोबर नाही म्हणून तो घाबरतो. मोकळ्या पणाने रहात नाही आणि हट्टी स्वभाव आहे त्याचा. हात जोडून विनंती करतो की कृपया त्याला समजून घ्या आणि रागवू नका. ते स्वतः निवृत्त शिक्षक होते. पहिल्याच दिवशी वर्गात गेला मी सोबत होते त्याच्या. आणि माझा मुलगाही त्याच बालवाडीत होता म्हणून मी त्याला मुलाकडे जा असे सांगितले. पण तो माझा पदराला घट्ट धरून उभा होता. पद्धतीप्रमाणे मुलांनी नवीन मित्र आला आहे म्हणून टाळ्या वाजवल्या तरीही तो ढिम्म जागचा हलला नाही. आणि कावराबावरा झाला घाबरून थरथर कापत डोळे भरून आलेले. मला समजले की याची काय अवस्था आहे. त्यामुळे मी त्याला घेऊन मुलांच्या रांगेत सतरंजीवर त्याला जवळ घेऊन बसले. तसा तो शांत झाला. आता शिक्षिकेची परिस्थिती बिकट झाली. कारण मुख्याध्यापिका खाली मुलात बसल्या आहेत. त्यामुळे त्याच गोंधळून गेल्या. मग मुलांच्या मधल्या सुट्टीत एकत्रित जेवण. गाणी. गोष्टी यात रमला आणि मी हळूच बाहेर पडले. शाळा सुटायची वेळ झाली होती म्हणून. त्याचे आजोबा आले तेही वेळेपूर्वीच. काळजीनं घामाघूम झाले होते म्हणून मी त्यांना घेऊन बाहेरुन नातवाला दाखवले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला होता.

    नंतर त्यांनी वर्ग शिक्षिकेला विचारले होते की काय जादु केली तुम्ही आता तो रोज शाळेत जायला लवकरच तयार होतो. बाईंनी सांगितले की माझी नाही मु. अ. बाईंची जादू आहे ही आणि सगळे सविस्तर माहिती दिली. आजोबांना जे वाटले होते ते त्यांना बोलून दाखविता आले नाही पण त्यांच्या डोळ्यातील पाण्याची भाषा मला समजली. त्यामुळे मला बालवाडीत प्रवेश मिळाला याचा जास्त आनंद झाला. एका अंकुरणाऱ्या छोट्याश्या जीवासाठी मी काही तरी करु शकले. पण आता अंगणवाडी बालवाडीत मुलांना रमण्यासाठी खूप खेळणी असतात. प्रशिक्षण घेतलेल्या बाई टिचर. मदतनीस. रिक्षा. पालक यांची मदत असते. हे सगळे पाहून वाटत की आमच्या काळी का नव्हते हे. असो काही का होईना बालवाडीत मुलांच्या समवेत एक दिवस घालवला तिथे.

    -- सौ. कुमुद ढवळेकर.

  • एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची नावे

    मराठी भाषेतील एक अद्भुत गंमत बघा. एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांची नावे कशी आली आहेत ते बघा....

    अगं कमल, उठ, पाय धु, रस, भजॆ, चहा बनव.

    अ :- अकोला, अमरावती, अौरंगाबाद, अहमदनगर
    ग :- गडचिरोली, गोंदिया
    क :- कोल्हापूर
    म :- मुंबई
    ल :- लातूर
    उ :- उस्मानाबाद
    ठ :- ठाणे
    प :- पालघर, पुणे, परभणी
    य :- यवतमाळ
    धु :- धुळे
    र :- रायगड, रत्नागिरी
    स :- सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
    भ :- भंडारा
    ज :- जळगाव, जालना
    च :- चंद्रपूर
    ह :- हिंगोली
    ब :- बीड, बुलढाणा
    न :- नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबार
    व :- वर्धा, वाशिम

  • विहीण की मैत्रीण (कथा)

    अहो आई आणि ए आई हा फरक तसा नेहमीच राहतो. तरीही या काळातील अहो आई आणि ए आई असा फरक मुलींसाठी तसा कमीच झाला आहे. या लाॅकडाऊनच्या मिळालेल्या वेळेमुळे तो अजून कमी झाला असेल. अशी अपेक्षा आहे. 

  • ठाण्याचे अभिनेते

    सहा दशकांची नाट्यपरंपरा लाभलेल्या ठाणे शहरात होऊन गेलेल्या आणि सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱया सर्व अभिनेत्यांची दखल घ्यायची तर त्यासाठी स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. नाट्यसंमेलनाच्या स्मरणिकेच्या माध्यमातून ठाण्यातील काही निवडक, प्रातिनिधीक अभिनेत्यांचा घेतलेला हा ओझरता आढावा.

  • गाडीच्या मागची शेरोशायरी … आणि सी.रामचंद्र !

    कारने प्रवास करतांना पुढच्या वाहनाच्या पाठीमागे काय लिहिलंय हे वाचण्याची अनेकांना आवड असते .

  • ज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना I

    केव्हा तरी सकाळ होऊन जीवनाला हाकारता यावे – ” ज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना !” उगाच रुसून गेलेल्या, आपली चूक नसताही दुरावलेल्या जीवनाला नव्याने आवतण द्यायला हवे- बघ सगळं सहन करूनही,झालेल्या मोडतोडीने खोलवर दुखावून, व्रण मिरवत आम्हीं डगमगत्या पावलांवर उभे आहोत.

  • सुटका

    काही दिवसांनी समोरच्या सोसायटीत एक अ‍ॅम्ब्युलन्स आली .. कोणीतरी दोघे उतरले .. बिल्डिंगमधल्या बाकीच्यानी त्यांच्या त्यांच्या खिडकीतून टाळ्या वाजवल्या .. आनंदानी कसल्याश्या घोषणा दिल्याचे आवाज ऐकू आले.

  • विश्वासातील शंका

    एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते.

    श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले.

    श्रीकृष्ण हसून म्हणाले " दुर अंतरावर मी बघीतले की माझा एक भक्त माझ्या नावाने भजन करीत होता. ' कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण ' म्हणत रस्त्याने गात नाचत चालत होता. त्याच वागण, मोठ्यने हातवारे करीत गाणे म्हणने, हे कांही जवळून जाणाऱ्याना वेगळेच वाटले. ते त्याला वेडा समजून मारु लागले. तो खालती पडला तरी देखील माझे नांव न सोडता तसाच गात होता. त्याचा आर्तस्वर माझ्या कानी पडला. माझे लक्ष्य त्याच्याकडे वेधले गेले. मी त्याला सहाय्य करण्यासाठी जाऊ लागलो. दारापर्यंत आलो. अचानक मी बघीतले की त्या भक्ताला कुणीतरील दगड मारला. तो त्याच्या भाळी लागला. एकदम रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानी त्याच्यावर झालेल्या हल्याचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःच एक दगड उचलला. तो त्यानी त्या लोकावर फेकला. तो आपले रक्षण स्वतः करण्यास उद्युक्त होऊन करीत आहे. त्याच क्षणी त्याने माझे नांव व भजन सोडून दिले. माझे नांव सोडल्यामुळे त्याची माझ्यावरची अवलंबुनता निघून गेली. आता तेथे जाण्यांत अर्थ नाही. "

    जीवनांत देखील अनेकजण ईश्वर भक्ती करतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात.

    मानवाची ईश्वरी संकल्पना दोन अंगाने दिसून येते.

    १- ईश्वर सर्व शक्तीमान, सर्वव्यापी, व विश्व चालक ह्या प्रमुख भावनांतील भूमिकेमध्ये तो व्याप्त समजला जातो. ह्या उदात्त समजाला मन नेहमी अनुभवण्याचा प्रयत्न करीत असते. जे कळल ते जाणल पाहीजे ही भावना. त्याच्या भक्तीमार्गाचा, भजनाचा, नामस्मरणाचा स्रोत ह्याच मार्गाने व्यक्त होत असतो.

    २ - तो कृपावंत, संकटविमोचन व सुखकर्ता समजला जातो.

    त्याच वेळी त्याने हेही अनुभवल असत की ईश्वर खऱ्या अर्थाने व्यवहारी जीवनांत केंव्हाही कृपा करीत नसतो. संकटसमयी धावून कोणतीही मदत करीत नाही. तुमच्या मिळणाऱ्या सुखांत त्याचा प्रत्यक्ष सहभाग केंव्हाच नसतो. हे सारे सत्य असते.

    ईश्वराची महानता वेगळी आणि त्याचा व्यक्तिच्या जीवनातील सहभाग समजणे हे सर्वस्वी भिन्न समज होत. निसर्गाचे निश्चित व ठरलेले नियम असतात. त्याचप्रमाणे जगरहाटी चालते. कांही मिळणे वा न मिळणे येथे मानवी इच्छेचा प्रश्न नसतो. ते सारे घडणाऱ्या परिस्थिती नुसारच होते. अनेक कथा वा प्रसंग मात्र आळवून सांगीतले जातात.

    ईश्वर भक्ती फक्त मनोबल वाढवीत असते. संकटाची सोडवणूक ज्याची त्यालाच करावी लागते. हाच ह्या छोट्या कथेचा बोध नव्हे कां?

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सोनेरी तसवीर !

    त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते. भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. ग्रंथालयात शिरताच भिंतीवर एक भव्य काचेची फ्रेम केलेली तसवीर दिसली. फ्रेमची चौकट सोनेरी असून, अतिशय आकर्षक होती. मध्यभागी एका वहीचा वेडावाकडा फाडलेला कागद चिकटवलेला होता. त्यावर चार रेघोट्या आखून कसलासा आलेख काढलेला होता. अतिशय उत्कृष्ट सजविलेल्या कालाकृतीपूर्ण, अशा फ्रेम मधल्या त्या लहानश्या तुकड्याने, मनाची उत्सुकता शिगेला पोहोंचली. खालती टीप म्हणून एक संदेश होता.

    वैद्यकीय शास्त्रातला एक महान संशोधक अलेक्झांदर फ्लेमिंग याने पेनिसिलीन ह्या जीवदायी व मानववादी जीवसृष्टीला वरदान ठरेल असे औषध शोधून काढले. त्याच्या ह्या शोध कार्याची दाखल घेऊन त्याला नोबेल पारितोषिक ही दिले गेले. त्यांनी भारताला भेट दिली, तेव्हा ते पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले होते.

    जमलेल्या एका विद्यार्थी समुदायात अनौपचारिक गप्पा मारीत असताना, कुणीतरी त्यांना पेनिसिलीन विषयी प्रश्न विचारला. एका विद्यार्थ्याच्याच हातातली वही घेऊन, त्यांनी चटकन छोटा ग्राफ काढला. आणि प्रश्नाची उकल केली. तोच तो भाग्यवान कागदाचा तुकडा,

    ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तास्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवीत होता.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०