(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अंबाक्का

    या चित्रपटाचं यश जातं, पटकथा-संवाद लिहिणाऱ्या अण्णा देऊळगावकरांना.. कथानक जरी उत्तम असलं तरी ते चुरचुरीत संवादांनी फुलवणं, हे काम अण्णांनी लीलया केलं. प्रेमा किरणचा हा पहिलाच चित्रपट होता.. तिला त्यांनी ‘अंबाक्का’ हे टिपिकल गावठी नाव दिलं.. तिच्या पहिल्याच एंट्रीला ‘काॅटन स्मिता’ असा लक्ष्याच्या तोंडी संवाद दिला.. सिल्क स्मिता ही दक्षिणेकडील हाॅट नायिका होती, ही महाराष्ट्रातील.. म्हणून ‘काॅटन स्मिता’! पहिल्याच चित्रपटात तिची व लक्ष्याची केमिस्ट्री जुळली व नंतर दोघांनी अनेक चित्रपटांतून धमाल कारकिर्द केली..

      June 3, 2022


  • आम्ही सारे खवय्ये

    विदर्भ स्पेशल पुडाची वडी/सांबार वडी पुण्यात कुठे मिळेल ” अशी चौकशी कोणीतरी करत होतं आणि माझ्या लक्षात आलं अरेच्चा, आपण तर या सिझनमध्ये एकदाच करून खाल्लीये सांभार वडी..आहाहा अगदी नाव काढलं तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटतंय.. वरचं खरपूस आवरण, आत हिरव्यागार कोथिंबिरीचं गच्च भरलेलं सारण..व्वा!

      January 17, 2024


  • हतबल – भाग एक.

    नाईलाजाने ड्यूटी ऑफिसर त्या मॅडमची चोरीची फिर्याद लिहून घ्यायला सुरुवात करतो. त्याच वेळी डीटेक्शन स्टाफचे एक हवालदार आणि महीला पोलिस यांना जीपने मॅडमच्या सोसायटी कडे त्या कामवाल्या बाईना आणण्यासाठी रवाना करतो. ज्या घरात त्या बाई काम करत असतात त्या घराकडे सिक्युरीटी वॉचमन पोलिसांना घेऊन जातो.

      April 2, 2023


  • देवतात्मा हिमालय – भाग 1

    सुमारे ५ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्याचा जन्म झाला व त्याचेच एक अपत्य म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वीसुद्धा सूर्यासारखीच लालभडक रसरसलेली होती. त्यावेळी पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप, वायुरूप असा सूर्याभोवती फिरणारा एक गोळा. काळ कुणासाठीच थांबत नाही. वर्षांमागून वर्षे सरत होती. पृथ्वीचा हा गोळा थंड होऊ लागला. पृथ्वी बाह्यतः थंड झाली. पण अंतरंगात मात्र धगधगत राहिली. पण थंड होत असताना तिच्या पृष्ठभागावर कवच निर्माण झाले. जणू दुधावरची साय. तिचा पृष्ठभाग थंड झाला, घन बनला. कवच्याच्या खोलगट भागात पाणी साचले. तिथे महासागर निर्माण झाले. उरलेला भाग म्हणजे भूखंड. थोडक्यात कवचावर जमीन आणि पाणी अशी वाटणी झाली. जमीन असलेले शिलावरण आणि पाणी असलेले जलावरण! शिलावरणाचे नाव होते पांगेआ (Pangea). तर आजही पृथ्वीचा अंतर्भाग शिलारसाने भरलेला आहे.

    आणि एके दिवशी भूगर्भातील अनाकलनीय घटनेमुळे ह्या भूकवचाचे दोन तुकडे झाले. परत ह्या तुकड्याचे आणखी सहा मोठे व बारा-तेरा लहान तुकडे झाले. हे तुकडे हालचाल करू लागले. एकमेकांपासून दूर सरकू लागले. त्यामुळे आताचे ऑस्ट्रेलिया व भारत हे देश आफ्रिकेपासून सुटून दूर गेले. भारत ज्या भूकवचावर आहे त्या कवचाचे नाव गोंडवन. हा गोंडवन उत्तर दिशेला असलेल्या युरेशियन ह्या भूकवचाच्या तुकड्याकडे सरकू लागला.

    सुमारे ९० कोटी वर्षांपूर्वी युरेशियन व गोंडवन ह्यांच्या सीमा ‘टेथिस' समुद्राने निश्चित केल्या होत्या. ह्या दोन्ही भूखंडावरून येणाऱ्या नद्या आपल्या बरोबर गाळ आणत होत्या व टेथिस समुद्रात आपल्या बरोबर आणलेला गाळ समर्पित करत होत्या. शेवटी एके दिवशी ह्या गाळाने हा समुद्र उथळ झाला.

    गोंडवन उत्तरेकडे सरकतच होते आणि ५-६ कोटी वर्षांपूर्वी लाव्हारसाच्या प्रचंड शक्तीने हे दोन्ही भूखंड दोलायमान झाले. भारत ज्या भूखंडावर आहे तो भूखंड उचलला गेला व युरेशियन भूखंडावर आदळला. बिचारा टेथिस समुद्र या भूखंडांच्या मधे चिरडला गेला. तळाच्या गाळासह टेथिस समुद्र दुमडला व त्याचा तळ उचलला गेला. त्याच्या तळाला असंख्य वळ्या पडल्या आणि हिमालयाचा जन्म झाला. ह्या वळ्या म्हणजेच हिमालयाच्या पर्वतरांगा! आजही हा तळ दुमडला जात आहे. त्यामुळे वर्षास ९ ते १५ सें.मी. वेगाने पूर्व दिशेला हिमालयाची वाटचाल सुरू आहे तर दरवर्षी १.५ ते ५ सें.मी.ने त्याची उंची वाढत आहे.

    दिवसामागून दिवस, वर्षांमागून वर्षे उलटत होती. वातावरणात बदल होत होते. हिमालयाचे रूप बदलत होते. पर्वत शिखरे बर्फात हरवू लागली. उन्हाने बर्फ वितळून प्रवाह वाहू लागले. उंच कड्यावरून खोल दऱ्यात ते झेपावू लागले. वृक्ष-वल्लीत परिसर नटू लागला. हिरवाईत हरवू लागला तर निरनिराळ्या फुलात खुलू लागला. ह्या सौंदर्याचे वर्णन सर्वांना सांगण्यासाठी झरे, नद्या वाहू लागल्या. पृथ्वीवर जणू स्वर्गच उतरला.

    आणि एके दिवशी मानवाची पावले ह्या परिसरात पडली. निसर्गाचे हे वैभव पाहून तो थक्कच झाला. एका वेगळ्याच अनुभूतीने त्याला भारून टाकले. त्याची प्रतिभा खुलू लागली. विचारात प्रगल्भता आली. त्याने राहण्याची, विचार करण्याची, आचाराची, उच्चाराची एक धारा निश्चित केली व एका संस्कृतीचा उदय झाला. एका धर्माचा उदय झाला. सिंधू नदीच्या खोऱ्यात हिंदू धर्माचा उदय झाला. आपले प्रगल्भ विचार, कल्पना त्याने हिमालयाच्या कुशीत वेद, उपनिषदे, पुराणाच्या रूपात सर्वांना सांगण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी तो हिमालयाला विसरला नाही. वेदात तर तो हिमालयाची केवळ स्तुती करून थांबला नाही तर त्याला देवत्व दिले आहे व हवी अर्पण करून त्याची आराधना केली आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात म्हटले आहे की, ज्याचा महिमा विशाल हिमवान म्हणून गायला जातो त्याचे महानत्व समुद्र व धरती गात आहे. अनंत दिशा ज्यांचे विशाल बाहू आहेत, असा हा हिमालय आहे.

    काही ऋचांवरून किंवा संदर्भातून एक निष्कर्ष निघतो की हिमालय हे अनेक औषधी वनस्पतींचे आगर आहे. अथर्ववेदातील काही ऋचांचा अर्थ हिमालयात उगम पावून समुद्राला मिळणाऱ्या अनेक नद्या आम्हाला औषधी वनस्पती देतात, असा निघतो. रामायणातील एका प्रसंगी लंकानिवासी वैद्यराज सुर्पणानेही 'संजीवनी १४/ हिमशिखरांच्या सहवासात औषधीचे स्थान' म्हणून हिमालयाचा उल्लेख केला आहे. वस्तुतः हिमालय ही अगणित औषधी वनस्पतींचा खजिना आहे.

    वेदात, उपनिषदात तसेच वायुपुराण, ब्रह्मपुराण, पद्मपुराण इ. जवळ जवळ सर्वच पुराणात हिमालयाचा उल्लेख खूप ठिकाणी आढळतो. मार्कंडेय पुराणात हिमालयाचे वर्णन करताना, 'हा पर्वत पूर्व व पश्चिम समुद्रापर्यंत धनुष्याच्या खेचलेल्या दोरीसारखा दिसतो.' असे केले आहे. तर विष्णुपुराणात भारतीयांची ओळख करून देताना पुराणकारांना हिमालय आठवला आहे तो असा:

    उत्तरे यत्समुद्रस्य हिमाद्रे श्चैव दक्षिणम् ।
    वर्ष तद भारतं नाम भारती यत्र सततिं ।।

    स्कंदपुराणाच्या केदारखंडात तर हिमालयातील नदी-नाले, सरोवरे, पर्वत-शिखरे व गुहांची तसेच अनेक स्थानांची पवित्रता सूचित करण्यासाठी विविध कथा कथन केल्या आहेत व शेवटी सांगितले आहे की ह्या भागाची यात्रा करणारा जन्म-मृत्युच्या चक्रातून मुक्त होतो. त्याचा परत जन्म होत नाही. उलट त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. पुराणात हिमालयाची व्याप्ती पाच खंडात झाल्याचे म्हटले आहे.

    खण्डा: पंच हिमालयस्य कथिता नेपाल कुर्माचलौ ।
    केदारोऽथ जलोधरोऽथ रुचिर: काश्मीर संज्ञोऽन्तिमः ।।

    प्रथम खंड म्हणजे नेपाळ तर दुसरा खंड म्हणजे कुर्माचल (आताचा कुमाऊ). तिसरा खंड म्हणजे केदारखंड (आताचा गढवाल) चौथा खंड म्हणजे जालंधर-पंजाब (आताचा हिमाचल प्रदेश) तर पाचवा खंड म्हणजे काश्मीर.

    -प्रकाश लेले

      July 4, 2022


  • रोपण – एक डागडूजीची प्रक्रिया

    बालकवीची कविता वाचीत होतो.

    हिरवे हिरवे गार गालिचे

    हरित तृणाच्या मखमालीचे

    त्या मखमालीवरती

    फुलराणी ही खेळत होती.

    सुंदर गवतांची हिरवळ …..

      October 1, 2013


  • बालकुमार -कथा – मोन्या

    आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे.

      January 10, 2019


  • कुत्रा – एक वेगळा विषय

    मला कुत्रा या प्राण्याची फार ओढ. मलाच कशाला, आमच्या घरातील सर्वांनाच कुत्रा प्रिय. तसे सर्वच प्राणी आम्हाला आवडतात, परंतू मुंबईसारख्या शहरात त्यातल्या त्यात कुत्रा पाळणं सोयीचं, म्हणून कुत्रा एवढंच. मांजरही तशी छान वाटते, पण तिचा आपल्या विषयी पुरेसा विश्वास पटेपर्यंत ती काही आपल्या वाऱ्याला उभी राहात नाही.

      July 12, 2017


  • स्त्री

    प्राचीन ऐतिहासिक काळात देखील स्त्रिया सुशिक्षित असून सर्व शास्त्रात पारंगत होत्या. सर्वांची नावे किंवा दाखले देणे इथे अशक्य आहे. थोडक्यात आजच्या काळात स्त्रीची प्रगती अधिक सबल आणि समोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला धैर्याने, विवेकबुद्धीने सामोरी जाण्याची जिद्द बाळगून आहे. हेच महत्वाचे आहे.

      March 24, 2022


  • कृत्तिका नक्षत्राची गोष्ट

    (ऑस्ट्रेलियन लोककथा)

    एका राजाची एक सुंदर राणी होती. एका कावळ्याला ही राणी खूप आवडत होती. एके दिवशी राणी आपल्या सहा दासींसोबत रानात पांढरे सुरवंट शोधीत होत्या. कावळ्याने पाहिले आणि कावळ्याला एक युक्ती सुचली. कावळ्याने सुरवंटाचे रूप घेतले. रानातील दाट झुडपात लपून बसला. राणीच्या दासींनी सुरवंट पकडण्यासाठी साधे लाकडी गळ टाकले.

      November 15, 2025


  • माझे श्रद्धेवर जगणे ?

    श्रद्धेचा जन्मच ज्ञानातून होतो. जस जसे ज्ञान प्राप्त होऊ लागते, समज येऊ लागते, जाणीव होऊ लागते, माणसाच्या विचारांना तशा “ विश्वासाच्या  चौकटी ” निर्माण होऊ लागतात. चौकटीचे निर्माण केलेले अस्तित्व म्हणजेच श्रद्धा होय.

      September 28, 2018