नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
इथे दंतकथांच्या वदंता होतात. हे पुढच्या पिढ्यांना सप्रमाण सांगायची जबाबदारी आता आपली ! “इरफान ” नांवाची दंतकथा प्रत्यक्ष पाहिली याबद्दल स्वतःची पाठ थोपटून मी आता त्याचे न बघितलेले चित्रपट पाहणार आहे – तेवढंच माझ्या हाती आहे.
तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू.
माझ्या आयुष्यातून ‘बाबू’ या नावाच्या व्यक्तींना वजा केलेतर, हाती बावांच्याच राहील! इतके ‘बाबू’ माझ्या भूतकाळात ठासून भरलेत. बहुदा गेल्या जन्मी एक जुलमी राजा असेन, आणि माझ्या अत्याचाराला बळी पडलेली जनता, या जन्मी ‘बाबू’ होऊन, बदला घेत असावेत अशी शंका मला येऊ लागली आहे.
मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे, काका मामा आत्या …..

प्रदर्शनाला अलोट गर्दी झाली होती. तशी ती रोज होत होती .लोंढेच्या लोंढे येत होते आणि , वॉव , क्युट , एक्सलंट असे चित्कारत बाहेर पडत होते. बाहेर पडण्यापूर्वी मात्र सगळी गर्दी अचंब्यानं थांबत होती . कारण तिथे प्रदर्शनार्थ ठेवलेली वस्तू सूक्ष्मदर्शकानं पहावी लागत होती .
लेखक एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद होता. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत. निसर्गाचं विराट रुप त्यांना सतत आकषिर्त करीत होतं तर जिम कार्बेटचं जंगल जीवन त्यांना शीळ घालीत होतं. वन्यप्राण्यांच्या विशेषत: वाघाच्या शिकारीवर निर्बंध घालणार्या जिम कार्बेटला ते सलाम करतात. त्या सर्व ठिकाणांची पुराणाचा आधार घेऊन केलेली वर्णनं मनाला मोहवून टाकतात.
हिमशिखरांच्या सहवासात
लेखक : प्रकाश लेले
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १८०/- रुपये
पाने : १५०
हिमालयाच्या निसर्गाला पावित्र्याची, अध्यात्माची, संस्कृतीची जोड आहे. हिमालयातील स्थाने, मंदिरे, पर्वत शिखरे, सरोवरे, प्रपात, नद्या बघताना मन मंत्रमुग्ध होते. हिमालयाचा निसर्ग अनुभवावयाचा असेल तर अनवट वाटेवरुन पदभ्रमंती सारखा दुसरा पर्याय नाही. या पुस्तकातील सर्व स्थाने उत्तराखंडातील आहेत. या सर्व हिमशिखरांचे आभार कसे मानायचे हेच कळत नाही. त्या हिमशिखरांनी माझ्यावर केलेल्या प्रमाचा, आपुलकीचा वर्षाव आहे. सर्वांना माझे एकच सांगणे आहे, वर्षातील काही दिवस तरी तुम्ही अशा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात घालवा.
-- प्रकाश लेले
भुदरगड येथील साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखक -शिवाजी सावंत म्हणाले होते- “अश्रुंचे वय किती ?” डोळ्यात उगवल्यापासून ते ओघळून जाईपर्यंत (किंवा डोळे कोरडे होईपर्यंत)कां खूप आधीपासून (आत खोलवर साठल्यापासून ते कधीच बाहेर न येईपर्यंत?)

सुरुवातीला पोहण्याच्या तलावासाठी तासाला दोन रुपये होते. ते कसेबसे भरुन उन्हाळ्यात का होईना पोरं पोहायला जात. वर्षभर शक्यच नव्हतं. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेला दृष्ट लागेल असा कॉम्प्लेक्स ओसच राहिला. नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने तरण तलाव खाजगी कंत्राटदाराकडे दिला. त्याने तासाची फी १५ रुपये केली. पोरं बाहेरच राहिली.
आज मला वेगळेच समाधान व आनंद मनास वाटू लागला होता. ऋणमुक्ततेचा आनंद. उपकाराची परत फेड व्हावी आणि त्यासाठी एखादी नैसर्गिक घटना घडावी ह्यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. कृत्रिमरित्या व आपल्या प्रयत्नाना आपण एखद्या गोष्टीचे ऋण फेडणे, वेगळे. ते फेडण्यासाठी निसर्गाने तुम्हास मदत करणे ह्यात खूप फरक पडतो. तुमच्या अपेक्षित अंतर्मनाची तगमग ह्याची निसर्गाने दाद घेतली हा त्याचा अर्थ बनतो. ह्या ऋणमुक्तीच्या व्यहारात कुणी किती उपकार केले, आर्थिक शारीरिक वा भावनिक हा प्रश्न गौण असतो. त्याची फक्त प्रासंगिक मदत असते, त्याच्या योगदानाची कदर व्हावी हा तुमच्या वागणुकीतील मोठेपणा.
मी माझ्या नांवाचे लेटरहेड आणि विजिटिंग कार्ड ह्यांची छपाई करून घेण्यासाठीचा मजकूर श्री फडके यांच्या मुद्रणालयांत देऊन आलो. चार दिवसांनी त्याचे व्यवस्थित गठ्ठे व छपाई केलेले साहित्य त्यांनी माझ्याकडे पाठून दिले. त्याचे बिल त्यावेळी मात्र पाठविले नव्हते. अर्थात ती रक्कम मला माहित होती. मी नंतर त्यांना भेटून छपाईचे पैसे नेऊन देणार होतो. अचानक एका प्रसंगात मला गांवी जावे लागले. मला तेथेच तीन महिने राहवे लागले. त्यामुळे त्यांचे बिल देण्याचे राहून गेले. परत आल्यानंतर मी ते बिल देण्यासाठी गेलो. एक गोष्ट बघून मी चकित झालो. फडक्यांनी मधल्या काळांत मुद्रणालय बंद करून त्यांचा व्यवसाय दुसरीकडे नेला होता. त्यांचे तेथे कुणीच नव्हते. ते कोठे गेले हे ही कळू शकले नाही. मनाला रुख रुख लागून गेली की त्यांचे पैसे देण्याचे राहून गेले. उपाय नव्हता.
जवळ जवळ तीस वर्षाचा काळ निघून गेला. निसर्गाच्या चक्रामध्ये अनेक प्रसंग, त्यांचे चांगले वाइट परिणाम हे सारे पडद्या आड होत असतात. आठवण विसरणे ही निसर्गाची एक अप्रतिम देणगी असते. मनाच्या शांततेसाठी हे फार महत्याचे असते. मनुष्य ती घटना व त्याचा आशय विसरत असला, तरी म्हणतात की हे सारे त्याच्या दैवी खात्यात नोंदविले जाते. कोणत्याही कर्म केलेल्या गोष्टीची परत फेडकरावी वा तो भोग भोगावा ही निसर्गाची अपेक्षा असते.
मुलीच्या लग्नासाठी एका गांवी जाण्याचा योग आला होता. लग्न पत्रिकेचा मजकूर घेवून एका मुद्रनालयात गेलो. ते वाचून मालकाने विचरले ” आपण ठाण्याचे कां? ” पूर्वी माझ्या वडिलांचे तेथेच मुद्रणालय होते. क्षणात साऱ्या गोष्टीचा उलगडा झाला. त्यांचे वडील आजारी असल्याचे कळले. जांच्या कडून मी तीस वर्षपूर्वी माझे छपाईचे काम करून घेतले होते, तेच हेच गृहस्त होते. त्यांचे त्यावेळचे पैसे देण्याचे राहून गेले होते. ते कर्ज अर्थात अलिखित ऋण म्हणून माझ्या कपाळी शिक्का मोर्तब झाले होते. मला ते फेडण्याचा निसर्गानेच योग दिला होता. त्या प्रसंगाची पुनरपि आठवण जागृत करीत मी हे करू शकलो.
फडके तर हे सारे विसरून गेले होते. मी मात्र त्या ऋण मुक्त तेचा आनंद व समाधान घेत होतो. जागृत राहून, सतर्कतेने प्रत्येक कर्माचे फळ त्याच जन्मी भोगून सदा ऋणमुक्त असावे हाच गीतेमधला उपदेश नव्हे कां? आत्म्याचा बंधनमुक्त होण्याचा हाच संदेश असेल.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सकाळचे नऊ वाजत आले तरी पण माधुरीचे दार बंद. रोज सकाळी उठून दारात छोटी का होईना रांगोळी काढली की माझ्या कडे हसत बघणारी आज दिसली नाही. वाटलं की आज रविवार असल्याने उशिरा उठेल.
Copyright © 2025 | Marathisrushti