नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बदल्याची आग घेऊन मनोहर संतुकरावांचा माग काढत मुंबईत पोहंचला. जमेल त्या प्रकारे त्याने संतुकरावची सखोल माहिती काढली,आणि समोर जे आले ते अविश्वसनीय होते!
“मी तुमची मदत करतो. हवालदार सावंत, दोन कप चहा मागवा.” यशवंतने सावंतला इशारा केला. सावंतने आणलेला चहा शिर्के दांपत्याने घेतला.
माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.
अपेक्षा न ठेवता फळाची कर्म करत रहायचे असे ऐकले आहे. पण सामान्य माणूस संतवृत्तीचा नसतो. फार फार नाही पण किमान जाणिव ठेवली तरी खूप आहे. मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे. आणि अशा वेळी मला शांत बसवत नाही. शाळेत असताना रोज आम्ही भेटलो की एक शिक्षिका स्मित हास्य करत वर्गावर जायच्या. एकदा त्या वरच्या मजल्यावर वर्गावर जात असताना मी तिथेच होते. पण त्या सरळ निघून गेल्या. मात्र मला वाईट वाटले. आज त्या अशा कशा गेल्या न हसता. चैन पडली नाही. मधलीसुट्टीत विचारले की माझे काही चुकले का? त्या म्हणाल्या नाही हो बाई वरच्या वर्गातील मुले जरा वेगळी आहेत. मी जाई पर्यंत नको असलेले भांडण होतात म्हणून मी घाईघाईत गेले. माझच चुकले. मी मु. अ. इथेच नव्हे तर मंडईतील भाजी विकणारी. दूध आणणारा. भांडी घासणाऱ्या अशा अनेक ठिकाणी घडल्या होत्या. याचे कारण म्हणजे माझा स्वभाव आणि सवय झाली होती एकमेकांना. पण पुढे पुढे मात्र याची सवय होऊनही माझ्यात बदल केला नाही मी....
साधारण पणे बारा वर्षे झाली असतील एका नातेवाईकांनी माझ्या बाबतीत जे केलं होतं त्यातून मी शिकायला हवे होते. परत तोच अनुभव आला या आठपंधरा दिवसात पणजी झाले होते. खूप दिवसाचे चांगले सबंध आहेत पण आम्ही दोघेही जात नाहीत कुठल्याही कार्यक्रमात. आणि बारसे तर थाटामाटात मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे वाटल की लोक येतात. जेवण करून अगदी सोन्या चांदीचे दागिने देतात. आणि मी निदान कल्पना करुन आपण खूश राहू शकतो. शिवाय बाजारात सगळे काही विकत मिळते. मात्र मायेची ऊब आणि आशीर्वाद मिळत नाहीत. त्यामुळे मी याच नात्याने एक आशीर्वाद देत असल्याची छोटीशी कविता आणि माझ्या साड्यांची घोधडी पाठवली. त्यामुळे सहाजिकच अपेक्षा होती की खूप छान आहेत दोन्ही गोष्टी. गोधडी बाजारात मिळते. पण मायेची ऊब नसते आणि आशीर्वाद तर कुठेच कितीही किंमत मोजली तरी नाहीच मिळत याची तरी जाणिव .आणि आशीर्वाद फारच मोलाचे असतात ते मिळाले. फक्त एवढेच जरी म्हटले असते तर मी भरुन पावले असते. पण नाही . विरस झाला होता. हॉटेल मध्ये पाणी चहा दिला की लगेच वेटरला थॅंक्स म्हणणारी ही पिढी आपल्याला काहीही म्हणत नाही. याचे वाईट वाटले. कोणतीही वस्तू देताना कृष्णार्पण असे म्हणतात ते बरोबर आहे देवाला अर्पण करून अपेक्षा ठेवू नये. हेच खरं आहे आणि तसेही मी बाळकृष्णालाच दिले होते ना एक गोष्ट नक्की आपलेपणा. माया. प्रेम या दिल्यान वाढतात नाही तर बूमरँग सारखे आपल्या वरच उलटून येतात. काय शिकायचे पुढील पिढीने. बघा आले ना मी मूळ पदावर तुम्ही काय प्रतिक्रिया देणार याची वाट पहात आहे.
–सौ. कुमुद ढवळेकर.
एकदा एक वाघ आणि वाघीण पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.
प्रियेचा किती छान पत्ता सांगितला आहे त्या रसिक प्रियकराने, वा वा! सुंदर! तुला रस्त्यात पारिजातकाचा सडा पडलेला दिसला की तिथून डावीकडे वळ, पुढे नदीच्या किनाऱ्यावर केवड्याचा सुवास येईल, तिथे वेढा घालून बसलेल्या नागिणीला विचार, ती तुला माझ्या घराचा पत्ता सांगेल. किंवा वसंतात घरी येणाऱ्या प्रियकराला तू पहाटे पहाटेच तिथे पोहोच, सकाळी मोगरा तुला माझ्या घरी ओढून घेऊन येईल.
भैय्याजीच्या गल्ल्यावर भाजी घेत उभी होते. पंजाबी ड्रेस परिधान केलेली साधारणपणे पंचविशीतली एक तरुणी धक्का मारत धाडकन शेजारी येऊन उभी राहिली. तिचा मोबाईल फोन चालूच होता. एका हातात तो कानाशी धरून, मान वाकडी करत तिने पर्स उघडली. त्यातला एक कागद काढला आणि भैय्याजीकडे दिला. भैय्याजीनी पण माझी भाजी तोलता तोलता तो हातात पकडला. त्याचा मला भाजी देण्यातला उत्साह मावळला.
मला अगदी मी वाचायला शिकलो, त्या वेळेपासूनच वाचायची आवड लागली होती. तेंव्हा परिस्थिती यथातथाच. आमचीच नव्हे, तर बहुतेक सर्वच कुटूंब गरीब म्हणता येतील अशीच. वाचायची आवड शाळेच्या पुस्तकांवर भागवायची कारण इतर पुस्तकं मिळणं अशक्यच होतं. संस्कृतीत सण ही एकच गोष्ट असायची, वाचन वैगेरेही संस्कृतीचा भाग आहे, हे कुणाच्या गांवीही नसायचं. पुस्तकं सोडा, रोजचा पेपर मिळणंही दुरापास्त असायचं. पेपर न घेणं यासाठी, परवडत नाही हे एकच कारण असायचं.
“आज धुणारायस का रे कपडे” ? बायकोने नेहमीप्रमाणे मला न आवडणारा प्रश्न विचारला. कपडे धुणारायस का ? कसं वाटतं ते ! म्हणजे मोरीत बसून मी धोका हातात घेऊन कपडे बडवतोय , असं चित्र डोळ्यासमोर येतं.
अक्कमा चेरीयन ह्यांनी राज्य कांग्रेसवर लागलेले सगळे प्रतिबंध रद्द करण्यासाठी थंपनूर ते कोडीयार महाला पर्यंत एका विशाल मोर्च्यांचे नेतृत्व केले ज्यात सगळ्यांनी खादी टोपी घातली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पोलिसांना मोरच्यावर गोळीबार करायला सांगितला, त्यावेळी अक्कमा चेरीयन ह्यांनी गर्जून सांगितले, ‘मी ह्या मोर्च्याची नेता आहे, गोळ्या झाडायच्याच असतील तर माझ्यापासून सुरवात करा.’ अक्कमा चे हे रूप पाहून पोलिसांनी आपले आदेश मागे घेतले. गांधींपर्यत त्रावणकोर ची वार्ता पोचली, त्यांनी अक्कमा चेरीयन ह्यांना ‘त्रावणकोर ची झाशी ची राणी’ अशी उपाधी दिली. १९३९ साली त्यांनी निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले अश्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना कैद केले.
Copyright © 2025 | Marathisrushti