नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जोडपं “गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन” बघण्यासाठी गेलं. तसं पूर्वी जाणं व्हायचं बरेचदा तेव्हा त्याचं इतकं काही कौतुक वाटायचं नाही पण या मधल्या सगळ्या कोरोना प्रकरणामुळे चार माणसांत फिरायला जाणं दुर्लभ झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाला जाण्याचा आज एक वेगळाच उत्साह होता. त्याच आनंदात दोघेही आत शिरले. सगळे तसेच पूर्वीसारखे स्टॉल. तीच लगबग. अनेक महिन्यांनी जुनं चित्र डोळ्यासमोर बघून दोघांनाही खूप बरं वाटलं. स्टॉलच्या दोन रांगांमधलं किंचितसं वाढलेलं अंतर आणि काही जणांच्या चेहऱ्यावर मास्क या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं पूर्वीसारखंच .
आनंदवनाच्या निर्मितीत बाबा आमटे यांना त्यांच्या पत्नीची साधनाताईंची फार मोलाची साथ लाभली होती. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी केलेल्या 'साधने'त कोठेही खंड पडला नाही. साधनाताईंनीही अगदी मनापासून बाबांच्याप्रमाणेच या कार्यात स्वतःला वाहून घेतले. साधनाताई आमटे म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंदू घुले. आमटे व घुले परिवाराचे मित्रत्वाचे संबंध होते. बाबा आमटे यांच्या कलंदर वृत्तीची साधनाताईंना प्रथमपासूनच कल्पना होती. परंतु चाकोरीबाहेर जीवन जगणाऱ्या व काही तरी वेगळे करून दाखविण्यासाठी जिद्द असलेल्या या तरुणाबद्दल त्यांना आकर्षण होतेच. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळीं बाबांनी त्यांना 'तुझे एका वादळाशी लग्न झाले आहे' असे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु साधनाताईंनीही पूर्ण विचारांनीच त्यांच्यासारखा जोडीदार स्वीकारला होता. त्यामुळे पुढे बाबांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी त्यांना मनापासून साथ केली. कुष्ठरोग्यांची मुले जेव्हा स्वतःच्या घरात ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा साधनाताईंनी त्या मुलांना स्वतःच्या मुलासारखी वागणूक दिली. एक दिवस रड्याच्या कडेला टाकून दिलेल्या एका ताज्या मुलीला घेऊन कोणीतरी आश्रमात आले व साधनाताईंनी त्या मुलीला स्वतःच्या फरात घेतले. तिचे नाव ' धरती' असेच ठेवले व तिला मायेची ऊब दिली. दुर्देवाने ती मुलगी फार काळ जगली नाही; मात्र अनाथ मुलांसाठी 'गोकुळ प्रकल्प सुरू करण्याचे ती प्रेरणास्थान ठरली. 'गोकुळमधील अशा अनेक अनाथ मुलांना साधनाताईंनी आईचे प्रेम दिले. अशा मुलांबरोबर शिकून माझी मुले मोठी झाली व बाबांचे समाजकार्य त्यांनी नेटाने पुढे चालविले आहे, असे साधनाताई मोठ्या अभिमानाने सांगत.
वैद्यकीय शास्त्र अथंग पसरलेले आहे. त्याच्या अनेक शाखा, उपशाखा, ह्या वाढतच आहे. शिवाय हे बद्लत जाणारे वा दर दिवशी ज्यात नाविन्याचा शिरकाव होत होता. त्यामूळे त्या क्षेत्रातिल सततचा सम्पर्क, वैचारिक देवान घेवान अत्यन्त महत्वाची ठरते. ह्याच तत्वावर वैद्यकीय व्यासाय मधल्या व्यक्ती भेटताच, एकमेका विषयी आदराची भावना उत्पन्न होते. मग हे भारतात असो व इतर देशात असो. मेडिकल एथिक्स म्हणतात ते ह्यालाच.
सूर्य आणि चंद्र दोघे सख्खे भाऊ. सूर्य मोठा तर चंद्र धाकटा होता. त्यांच्या घरची परिस्थिती कमालीची खालावलेली. घरी त्यांची आई आणि हे दोघे असे तिघेच जण होते. आई काबाडकष्ट करून दोघांना भरवत होती. पण तिच्या मिळकतीत एकवेळचे पोटभर जेवणही मिळत नव्हते.
त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते. भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. ग्रंथालयात शिरताच भिंतीवर एक भव्य काचेची फ्रेम केलेली तसवीर दिसली. फ्रेमची चौकट सोनेरी असून, अतिशय आकर्षक होती. मध्यभागी एका वहीचा वेडावाकडा फाडलेला कागद चिकटवलेला होता. त्यावर चार रेघोट्या आखून कसलासा आलेख काढलेला होता. अतिशय उत्कृष्ट सजविलेल्या कालाकृतीपूर्ण, अशा फ्रेम मधल्या त्या लहानश्या तुकड्याने, मनाची उत्सुकता शिगेला पोहोंचली. खालती टीप म्हणून एक संदेश होता.
वैद्यकीय शास्त्रातला एक महान संशोधक अलेक्झांदर फ्लेमिंग याने पेनिसिलीन ह्या जीवदायी व मानववादी जीवसृष्टीला वरदान ठरेल असे औषध शोधून काढले. त्याच्या ह्या शोध कार्याची दाखल घेऊन त्याला नोबेल पारितोषिक ही दिले गेले. त्यांनी भारताला भेट दिली, तेव्हा ते पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले होते.
जमलेल्या एका विद्यार्थी समुदायात अनौपचारिक गप्पा मारीत असताना, कुणीतरी त्यांना पेनिसिलीन विषयी प्रश्न विचारला. एका विद्यार्थ्याच्याच हातातली वही घेऊन, त्यांनी चटकन छोटा ग्राफ काढला. आणि प्रश्नाची उकल केली. तोच तो भाग्यवान कागदाचा तुकडा,
ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तास्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवीत होता.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
बराक ओबामांची भारताची ट्रीप पक्की झाली आणि आमच्या कॉलनीत उत्साहाचे वातावरण पसरले.अर्थात ओबामांच्या ट्रीपचा आणि आमच्या नवजीवन कॉलनीचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही .ओबामा आमच्या कॉलनीला सोडाच पण आमच्या शहरालाही भेट देणार नव्हते.पण जगात कुठलीही घटना घडली की आमच्या कॉलनीत अत्यंत उत्साहाचे वातावरण पसरते.तसा अमेरिकेचा आमच्या कॉलनीशी तसा काही विशेष संबंध नाही ,फक्त आमच्या कॉलनीचे सेक्रेटरी कुलकर्णींचा मुलगा दोन महिने कंपनीतर्फे अमेरीकेला जाउन आला ,एवढाच संबंध . पण एवढ्याशा संबंधावरपण आमच्या कॉलनीतले लोक अमेरिकेविषयी अत्यंत अधिकारवाणीने बोलतात. फक्त बोलण्याचा शेवट ” अहो , कुलकर्ण्यांच्या मुलाने बघितलय ना हे सगळ . हो अगदी अस्सच, अगदी खर ” असा करतात. ते जाउ द्या . कुलकर्ण्यांनी रात्री कॉलनीची मिटिंग बोलावली , आणि आपण आपल्या कॉलनीतर्फे बराक ओबामांच्या स्वागताचा एक जंगी कार्यक्रम करावा असा प्रस्ताव मांडला . देशपांड्यांनी त्यांना लगेच दुजोरा दिला . कुलकर्ण्यांनी अगदी काहीही म्हटल तरी देशपांडे त्याला लगेच दुजोरा देतात .( यांची मुलगी लग्नाची आहे आणि त्यासाठी त्यांना कुलकर्ण्यांचा फॉरिन रिटर्न मुलगा डोळ्यासमोर आहे ) आता कॉलनीतील दोन प्रतिष्ठित मंडळींनी ठरवल्यावर मोडता घालायचे काही कुणाला कारण नव्हते . शेवटी शनिवारी संध्याकाळी आठ वाजता गणपती मंदिरात कार्यक्रम करायचे ठरले आणि सभा संपली.
आमच्या कॉलनीचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बरीचशी मंडळी कलाकार आहेत. अर्थात ती नुसतीच कलाकार नाहीत , तर पोटापाण्याची नोकरी सांभाळुन कलाकार आहेत. नुसत्या कलाकाराला त्या कलेशिवाय दुसरे काही येत नाही . पण आमच्या कॉलनीतल्या कलाकारांना आपल्या कलेशिवाय पोटपाणी सांभाळण्याची कलाही पार पाडावी लागते . त्यामुळे समोरचे पांडेकाका बॅंकेत कॅशियर कम कवी आहेत , आणि बाजुच्या ढोलेकाकु एलायसीत क्लर्क कम नर्तिका आहेत. पांडेकाकांचा तर “ नोटा मोजा पटापटा ” नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला असुन त्यांच्याकडे गेलेल्या सर्वांना तो ते सही करुन देतात. ढोलेकाकुंच्या नाचाचा प्रोग्रामपण कॉलनीत नेहमीच होतो .
आता या कलाकार असण्याला माझा मात्र अपवाद आहे. मी बॅंकेत अकाउंटंट असल्याखेरीज काहीही नाही . त्यामुळे चेक पास करणे किंवा लेजरला डेबीट टाकण्याखेरीज मला दुसरे काहीही येत नाही . तसे लहानपणी माझ्या वडीलांनी मला तबला शिकविण्याचा बराच प्रयत्न केला . दररोज मला ते तबल्याच्या क्लासला घेउन जायचे . पण इतरांच्या तबल्यातुन तिरकीट , धा , कत्ता , त्रक , धिन असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायचे तसे माझ्या तबल्यातुन कधीच आले नाहीत . माझ्या तबल्यातुन फक्त ” ढुम्म “ असा एकच आवाज यायचा . शेवटी कंटाळुन माझा क्लास बंद झाला. या गोष्टीनंतर मला आयुष्यात दुसरी कला किंवा छंद कधीच जमला नाही . नाही म्हणायला टिव्ही बघण्याचा छंद मला पुढच्या आयुष्यात जडला पण या छंदाचे स्टेजवर प्रदर्शन करता येत नसल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता.आमच्या हिला मात्र उखाणे म्हणण्याचा छंद आहे . प्रत्येक कार्यक्रमात तिचा एकतरी ऊखाणा असतोच .
शनिवार उजाडला , संध्याकाळ झाली , आणि गणपति मंदिरात मंडळी जमायला चालु झाली . कलाकार मंडळींची गडबड दुपारपासुनच चालु होती. आम्ही मात्र प्रेक्षक असल्याने जेवण वगैरे करुन आरामात समोरच्या खुर्चीवर जाउन बसलो. एलायसीतले सराफ माझ्याच ‘अ’कलाकार लायनीतले. तेही माझ्याशेजारी येऊन बसले. आम्ही सिक्स्थ पे कमिशन वगैरे गप्पा मारीत बसलो. आमच्या बोलण्याचे विषय काहीही प्रसंग असला आणि जागा कुठलीही असली तरी सारखेच असतात . उद्या समोर लता मंगेशकर गायला बसली काय किंवा माधुरी दिक्षित नाचायला बसली काय आम्ही आपले “ पे रिव्हिजन , सॅलरी हाइक बॉसची लफडी ” या विषयामधेच असतो . काही वेळाने समोर स्टेज म्हणुन एक सतरंजी अंथरण्यात आली.पुर्वी असे काही कार्यक्रम असताना आम्ही लाकडी स्टेज अरेंज करायचो. पण काही वर्षांपुर्वी बिल क्लिंटन भारतात आले असताना त्यांच्या स्वागतार्थ केलेल्या कार्यक्रमात ढोलेकाकुंनी कथ्थक डान्स केला , त्यावेळी तो स्टेज कोसळला. तेव्हापासुन फरशीवरच सतरंजी अंथरुन त्याला स्टेज म्हणुन आम्ही कार्यक्रम करतो. अर्ध्या तासात तयारी पुर्ण झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरवातीला कुलकर्णी काकु अमेरिकेची आपल्याला थोडक्यात ओळख करुन देतील असे सांगण्यात आले आणि नउवारी साडी , मोठे कुंकु ,केसांचा अंबाडा या वेषातल्या काकु बोलायला उभ्या राहिल्या.काकु भुगोलशिक्षिका म्हणुन रिटायर झाल्या असल्या तरी त्यांचे भुगोलाचे ज्ञान पुस्तकीच होते. त्या स्वतः औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेर कधी गेल्याच नाहीत. अपवाद एकदाच . मुलाला एअरपोर्टवर सोडायला. काकुंनी अमेरिकेची ओळख करुन द्यायला सुरुवात केली.
” अमेरिका हा अत्यंत खंडप्राय देश असुन त्याचे श्रेत्रफळ सुमारे दहा हजार चारशे चौरस किमी आहे. उत्तरेकडे पॅसिफिक समुद्र असुन दक्षिणेकडे अटलांटीक समुद्र आहे .पुर्वेकडे मेक्सिको आणि पश्चिमेकडे कॅनडा आहे.एकुण पन्नास प्रदेशांनी बनलेला हा देश जगातला अत्यंत बलाढ्य देश आहे . “
काकुंची अमेरिकेची पुस्तकी ओळख सुमारे अर्धा तास चालली .त्यानंतर पांडेकाका ओबामांच्या स्वागतार्थ आपल्या कविता गातील असे समजले. पांडेकाका चालु झाले.
ओबामांच्या घराचे
नाव व्हाइट हाउस
ओबांमांपुढे नतमस्तक
चायना फ्रान्स व रुस
ओबामांच्या विमानाचे
नाव एअरफोर्स वन
ओबामांचे मात्र
भारतावर जडले मन
अशा कवितांचा रतीब चालु झाला . सर्व प्रकारची यमके जुळवुन झाली.” मिशेल ,स्पेशेल “, ” बराक नाक ” अशा पंचवीस तीस कवितानंतर कवितावाचन संपले. काकांनी नंतर भाषण केले . त्यात आपल्या “ नोटा मोजा पटापटा” या काव्यसंग्रहाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. आता आपण सध्या एक थ्रिलर सस्पेन्स कादंबरी “ बंद दरवाजा ” लिहित असल्याचे सांगितले . हा ” बंद दरवाजा ” बॅंकेच्या एका लॉकरचा असुन आपल्या पुर्वीच्या मालकाच्या खुन्याचा हे लॉकर कसा प्रतिशोध घेते ह्यावर ही कादंबरी आधारित होती . ह्यावर सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
त्यानंतर ढोलेकाकुंचा नवीन हिंदी गाण्यावर डान्स झाला , शेजारच्या गौरीचे ( वय चार ) गाणे झाले , एकंदर खुप कला सादर झाल्या . बराक ओबामांच्या येण्याचा आणि ह्या हिंदी गाण्यांचा कसा संबंध ? हा प्रश्न पडला असता , हे ओबामांना भारतीय संस्क्रुतीचे दर्शन आहे असे उत्तर मिळाले .
कार्यक्रमाच्या शेवटी आमच्या हिचा उखाणा घेण्याचा प्रोग्राम होता. आता या प्रकाराला मी फार भितो. आमच्या हिला कसला पाचपोचच नाही . मागे बिल क्लिंटन आले तेव्हा ” क्लिटनच्या घरी मोनिकाचा मुक्काम , – रावाचे डोके दुखले की मी लावते बाम ” असा उखाणा घेतला .आता या उखाण्यात कशाचा कशाला काही संबंध आहे का ? पण नाही . स्टेज दिसले की उखाणा झालाच पाहिजे . आतासुध्दा ” मिशेलला म्हणतात सगळे फर्स्ट लेडी , —- रावांशी बांधली मी लग्नाची बेडी .” हा उखाणा घेतला . आता आमच्या लग्नाचा आणि मिशेलला फर्स्ट लेडी म्हणण्याचा काही संबंध आहे का ? पण असंबध्द बोलण्यात बायकांचा हात कोणी धरु शकत नाही . त्यातल्या त्यात एक बरी गोष्ट म्हणजे आमच्या कॉलनीत माझ्या ऑफिसमधले कोणी रहात नाही . नाहीतर माझे ऑफिसमधे जाणे लोकांनी मुश्कील करुन टाकले असते.
कार्यक्रम संपल्यावरचे जेवण ही एकच जरा त्यातल्यात्यात बरी गोष्ट होती. बाकी जाऊ द्या , चांगल्या जेवणामुळे आणि त्यातल्या त्यात जिलेबीमुळे कार्यक्रमाचा शेवट अत्यंत गोड झाला.
-- निखिल नारायण मुदगलकर
सर्वसाधारणपणे सिनेरसिकांना, या दोघींमध्ये सुश्मिता आवडते. कारण ती आपल्यातील वाटते. उलट ऐश्वर्या ही सुंदर असली तरी एखाद्या कचकडी बाहुलीसारखी वाटते. तिचं सौंदर्य हे संगमरवरी पुतळ्यासमान वाटतं.. सुश्मिता ही हाडामासाची रेखीव शिल्प वाटते.. शेवटी काय, दोघीही गोडच आहेत.. एक पुन्हा पुन्हा घ्यावी अशी खीर, तर दुसरी तब्येतीला जपून मागावी, अशी बासुंदी!!
ताजमहल’ हा बीना राय सोबतचा चित्रपट त्यातील सुमधुर गीतांइतकाच, अप्रतिम होता. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चित्रलेखा’चा रिमेक १९६४ साली झाला. हा चित्रपट भव्य सेट्स व मातब्बर कलाकारांमुळे नेत्रदीपक ठरला. नर्गिस सोबतचा ‘रात और दिन’ हा नायक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या..
२१ जुलै २०१९ रोजी पश्र्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘शोर’ चित्रपटातील लता मंगेशकरचं ‘एक प्यार का नगमा है…’ गाणं गाऊन भिक मागणारी रानू मंडल रातोरात सोशल मीडियाच्या जादूने मुंबईच्या मायानगरीची काही काळासाठी पार्श्वगायिका झाली!
कुणा कडे दुर्लक्ष करायचे. घासाघीस कुठे करायची. हे सगळे आम्हाला पण समजते. आमच्या काळी तर बाहेर जायचे नव्हतेच पण आम्ही मात्र मुलांना सातच्या आत घरात अशी समज दिली होती.
Copyright © 2025 | Marathisrushti