नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सकाळी अकरा- साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करुन यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बील, पाणी बील, बाजार हाट, बँकाची आणि ही सगळी कामे सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेंट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून जवळ जवळ नाचतच आनंदात घरी परत चालली होती.
ऐन पावसाळ्याचे दिवस होते. अगदी आषाढातला जोरदार पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होता. जागोजागी पाणी साचलेले होते. आमच्या गल्लीत तर पाणी खूपच साचून रहाते. त्या साठलेल्या पाण्यातून चालत गल्लीच्या बाहेर पडायचे म्हणजे एक दिव्यच. त्यातून चालताना घाणही वाटते आणि काही चावेल याची भीती सुध्दा वाटत होती.
नातं’ आणि ‘मैत्री’ दोनही दोन अक्षरी शब्द आहेत. बाराखडीतील एकही अक्षर आणि एकही मात्रा दोन्ही मध्ये सारखी नाहीत. पण तरीही हे दोनही शब्द खूप जवळचे आहेत. ह्या दोनही शब्दातील ‘नातेच’ खूप मजेशीर आहे. यांच्या अर्थाची सीमा कुठे सुरू होते आणि कुठे संपते की, त्याला काही सीमाच नाही हे समजतच नाही.
संध्याकाळची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस होते. दिवसभर पाऊस नुसता भरभरून कोसळत होता. मुंबईत पावसाळ्याच्या दिवसात झुमझोड पाऊस आणि ट्रॅफिक अडकून पडणे ही काही नवीन गोष्ट नव्हती.
जिंदगी’ एक रेस है रफ्तार के सिवा कुछ नही. आपल्या सगळ्यांची जगण्याची ही एक पध्दतीच झाली आहे. आयुष्यभर या रेस बरोबर आपण धावतच असतो. आला दिवस गेला दिवस रुटीनच्या नावाने फक्त जगतच असतो. काही कारणांनी या रुटीनमध्ये जेव्हा खंड पडतो किंवा बदल होतो तेव्हा लक्षात येते की अरे त्या रेस बरोबर आपण धावत पळत कुठपर्यंत पुढे निघून आलो.
भैय्याजीच्या गल्ल्यावर भाजी घेत उभी होते. पंजाबी ड्रेस परिधान केलेली साधारणपणे पंचविशीतली एक तरुणी धक्का मारत धाडकन शेजारी येऊन उभी राहिली. तिचा मोबाईल फोन चालूच होता. एका हातात तो कानाशी धरून, मान वाकडी करत तिने पर्स उघडली. त्यातला एक कागद काढला आणि भैय्याजीकडे दिला. भैय्याजीनी पण माझी भाजी तोलता तोलता तो हातात पकडला. त्याचा मला भाजी देण्यातला उत्साह मावळला.
रोजंदा या जीवनाच्या वाटचालीत खूप वेगवेगळे सुखद दुख:द अनुभव आपल्याला येत असतात. वेगवेगळे प्रसंग आपण बघत असतो. कित्येक प्रसंगाचा आपल्याशी काही सबंध सुद्धा नसतो. केवळ आपल्या समोर तो घडत असतो म्हणून आपण बघत असतो.
थंडी खूपच पडली होती. संध्याकाळच्या वेळेस तर बाहेर पडणे शक्यच नव्हते. घरांतील बाहेरची कामे सकाळीच उरकून टाकण्याची आता सवयच झाली होती. गेले दोन महिने थंडीने कहरच केला होता. भाजी आणण्यासाठी सुद्धा उन्हाच्या वेळेत जाणे भाग पडत होते.
आजकाल कुठल्याही समारंभाला जा, कुठल्याही पार्टीला जा, अगदी आम्हा बायकांच्या किटी पार्टीला जा कुठेही जा, सगळीकडे एका कॉमन विषयावर लोक बोलत असतात. “बदललेले हे जग आणि आजच्या मुलांचे रहाणीमान.” सगळ्यांची मुले खूप शिकलेली असतात
दुपारच्या वेळेस जेवण उरकून थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून झोपले होते. जरा डोळा लागला होता की फोन वाजला, अगदी त्रासून फोन उचलला. समोरुन संध्याचा आवाज आला, “हॅलो, मॅडम कशा आहात? ” खरे तर ठीक आहे म्हणण्यापेक्षा ही काय फोन करायची वेळ आहे का? असे विचारवासे वाटत होते पण काय करणार असे बोलता येत नाही नां नाईलाजास्तव अगदी उसना उत्साह आणून म्हणाले, “बरी आहे, बोल कां फोन केलास ह्या वेळेस आज? ” “मॅडम, उद्या दुपारी तीन वाजता संस्थेमध्ये मिटींग ठेवली आहे,
Copyright © 2025 | Marathisrushti