नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
अमेरीकेला कांही महीने राहण्याचा योग आला होता. मुलाकडे गेलो होतो. छोटेसे, सुंदर आणि अद्यावत शहर. नदीच्या तीरावर वसलेले सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य. फक्त एकच खंत जाणवत होती. ती म्हणजे मन मोकळे करुन गप्पा मारण्यासाठी कुणी मित्र नव्हते. येथील लोक त्यांच्या आपसांत देखील गप्पा मारताना दिसत नव्हते. बागेत एकटे वा एखादा लहानसा कुत्रा बाळगणे. कुणाशी ही न बोलणे. नजरा नजर झालीच तर हाय म्हणणे. एकदम एकलकोंडे. स्वतःमध्येच राहून मनाला बंदीस्त कप्यात ठेवण्याची, कुणीही कांही न बोलण्याची विलक्षण स्वभाव शैली, ह्याना जमलेली असते. आपण भारतीय गप्पा मारणे, मन मोकळे करणे, नको त्या चौकशा करीत समर्थानाचे मार्ग शोधण्यात तरबेज असतो. " एक हात लाकूड, त्याची दहा हात धलपी " ह्या प्रमाणे वेळ घालविण्याची कला साध्य केलेले.
निवृत्तीचे वय. सकाळ संध्याकाळ फिरावयास जाणे. अचानक बागेमध्ये माझ्याच वयाचे एक गृहस्थ डॉ. सुब्बुराज भेटले. दक्षिण भारतातले प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले. एकमेकाचा परिचय झाला. ते पण थोड्याश्या काळाकरीता त्यांच्या मुलीकडे आले होते. विचारांची देवान घेवन झाली. थोड्याच वेळांत लक्षांत आले की आमची वैचारीक बैठक, विषय आवडी निवडी बऱ्याचशा मिळत्या जुळत्या आहेत. वेव्ह लेंग्थ जमली म्हणतात तसे झाले. मुख्य म्हणजे दोघेजण भारतीय असून मित्र व मन मोकळे करण्यासाठी कुणाच्या तरी सहवासाची गरज पूर्ण झाली. दोघेही आनंदी व समाधानी झालो. वेळ ठरवून दररोज भेटू लागलो. वेळ खूप मजेत जात होता. दोघांजवळ पाठीशी जीवनामधल्या प्रचंड अशा अनुभवाचे गाठोडे होते. शिवाय अध्यात्म, समाजाची कुटूंबाची बदलत चाललेली रचना वा घडी ह्यावर बोलत असू. शिक्षण क्षेत्रामध्ये होत जाणारे बदल, राजकारण अर्थकारण ह्यात होणाऱ्या प्रचंड उलाढाली, वातावरणामधले बदल इत्यादी एक नाही अनेक विषय प्रसंगानुसार हाताळले जात होते. चर्चा होत होती. मतासाठी आग्रह होत होता. दोघांचे ही अनुभव मनाला चटका देणारे, रोमांचकारी, हसवणारे, राग आणणारे, निसर्ग वा ईश्वर अप्रतीम अस्तित्वाची जाणीव देणारे होते. आगदी थोड्याशा काळांत दोघानाही एकमेका बद्दल अस्था आदर व सहवासाचे प्रेम वाटू लागले. भेटण्याची वेळ ह्याची उत्सुकता होवू लागली. वेळेचे बंधन नसल्यामुळे पूर्ण आनंद उपभोगला जाई. कधी बागेत, कधी नदीकिनारी, जात असू. वृद्धापकाळी जे लागते ते मिळू लागले. चांगली हवा, चांगले जेवण, चांगली बौद्धीक चर्चा, शरीराला तजेले करणारे फिरणे, सारे आनंदी व समाधानी चालले होते.
अचानक कौटूंबीक वैयक्तीक कारणास्तव त्याना भारतात परत जावे लागले. ते माझा प्रेमाचा व निराशमय निरोप घेऊन ते निघून गेले.
नदीकिनारी खडकावर बसलो होतो. नदीला पूर आलेला होता. ती दुथडी भरुन वाहत होती. मन खिन्न झालेले होते. कसलीतरी निराशा मनाला बेचैन करीत होती. डॉ. सुबुराज ह्यांचा अचानक परीचय झाला. फार थोड्या दिवसाचा त्यांचा सहवास लाभला. त्या सहवासाची तिवृता, ओढ, आपूलकी, आदर, वैचारीक प्रेमाची देवाण घेवाण, ही हा छोटासा काळ आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो ही जाणीव होत होती. सहवास किती काळ असावा ह्यापेक्षा कसा असावा हेच महत्वाचे ठरते.
माझे लक्ष वेधले गेले ते दुर अंतरावरावरुन दोन दिशानी पाण्यांत वाहात येणाऱ्या दोन लाकडाच्या ओंडक्याने. पाण्याच्या लाटांनी दोन्ही ओंडके जवळ आणले. एकमेका जवळ आले. प्रवाहा मध्ये बरेच अंतर ते एकत्र राहून वाहात होते. अचानक पाण्याच्या उसळणाऱ्या लाटेने त्यांना वेगळे केले. दोघांचीही दिशा व प्रवाह बदलले. ते वेगळ्या दिशेने निघून गेले. नजरेच्या टापू आड झाले.
निसर्ग, वातावरण, परिस्थीती ही अशीच आपल्याशी खेळ खेळत असते. जीवनाच्या टप्यावर प्रत्येकजण एकमेकास भेटतो. सह चालतो. आणि एक दिवस दुर निघून जातो. पाण्याचे अस्तित्व, लाटांचे वाहणे, आणि ओंडक्यांचे अवलंबून असणे, ह्याची जर खऱ्या अर्थाने जाणीव झाली तर जीवनचक्राचे ज्ञान झाले म्हणावे लागेल. त्यांत नसेल निराशा, न खंत, न दुःख. फक्त एक सत्य अनुभव—जीवनाचा मार्ग --- जीवन चक्र.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे २१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन लातूर येथे २५ ते २७ जुलै या कालावधीत केले आहे.
जुलै महिन्यात हॉस्पिटलच्या बेड वर मनात आलेले विचार….
“मंगळ”यानाच्या प्रज्वलनाने,
“मंगळास” “मंगलमय” केले आहे,
“अमंगल” “मंगळाचे”,
चांगलेच “मंगळ” झाले आहे I
आम्हाला बाळाविषयी काहीतरी लिहावं असं नेहमी वाटत होतं. कधीतरी विचारशृंखलेत असलो कि काय लिहावं माझ्या बाळाविषयी ? असा प्रश्न नेहमी डोळ्यांसमोर उभा राही.अगदी काही दिवसांचे असताना त्याला आम्ही आमच्या घरी आणले होते.दुपारची वेळ होती.त्याला कपड्यात असं गुंडाळल होतं की,अगदी गाठोडं करकचून बांधावं ,तसं परंतु इतर अवयवाची हालचाल नव्हती डोळे भिरभिरत होते..मी कुठेतरी वाचले होते 'ते फुल तृणातील इवले 'त्याप्रमाणे वाटले मला. आज ही आठवतं की,आमचा राहुल आणायला गेला.माझ्या सौ नी बजावून सांगितलं होतं,बारा संडासा कडून आणू नको बरं का?दुसऱ्या वाटेने घेऊन ये. सांभाळून आण.कितीतरी प्रश्नांचा भडीमार ..... दुसरं कोण असतं तर म्हटले असते, तुच जात का नाही? पण राहुल ला बाळाची फार आवड..हुं हुं करीत आणावया गेला.जवळच राहत असलेल्या माझ्या मेहुणीला कन्यारत्नाचा लाभ झाला.त्यांच्या कुटुबियापेक्षा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर माझ्या सौ.ला. बाळाची आई बाबा जवळच दोन तीन चाळी सोडून असलेल्या एका छोटेखानी घरात राहत होते.सोबत काका- काकी, आजोबा, सारे एकत्रच.बाळाची आई म्हणजे सौ च्या भगिनी.बाळ जन्मल्या पासून त्याची...म्हणजे बाळाची विचारपूस घटको-घटकी सौ नी केली नसेल तर नवलचं. एकदा बाळ आल्या पासून रडत होत मला त्याच्या रडण्यामुळे माझ्या मनाची घालमेल सुरु होती काय करावे सुचेनासे झाले? भूक लागली नाही न? कि काही दुखत असावे ? आईचं दूध सुरु होतं त्यामुळे घरातल दुध नको. ज्या प्रमाणे कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन ऊन,वारा,थंडी,पाऊस यापासून संरक्षण करते त्या प्रमाणे माझ्या बाळाचं पालनपोषण मावशी (सौ) करते. हवं नको ते आमच्या हिला फार कळते. रडण्याच कारण क्षणात शोधून नाही काढेल ती मावशी कसली ?एक हलकेशी चापटी मारली अन रडणारा तो बेसुरा आवाज क्षणात बंद झाला.इवल्याश्याला मावशीची चापटी..... वर परत येथे आणणार नाही! असा दम देखील भरला.मावशीची सवय जडलेल्या बाळाला ....इतुके पुरे ... जेव्हा रांगू लागलं तेव्हा मात्र त्याचं दुडु दुडु पळताना पायातील पैंजणाच्या नाद मधुर स्वरानी कानाला वेगळ्या संगीताची सवय जडू लागली होती. हो हो म्हणता बाळ एक वर्षाचे झाले. पहिला वाढदिवस स्टुलावर मांडलेल्या केककडे कुतुहलाने पाहत,हळूच डोळे मिचकावीत होते.त्यांच्या छोट्याश्या घरात सरासरी बाळाच्या वयाचीच अन्य मुलांनी गर्दी केली होती. केक कापला, ठो करून फुगा फुटला.त्या भयंकर आवाजांनी बाळ रडू लागले. मग मात्र समजावीत बाळ राहीना. आलेल्या गिफ्ट चे आमिष दाखविले गेले तरीही बाळ मावशीला घट्ट बिलगून होते.
आई मरो, मावशी उरो ! हे का म्हटले जाते.याचा उलगडा आज मला झाला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
तवाकी: मूर्ख रेड्या, महाबली कधीच शेरखानला मारणार नाही आणि शेरखान ही हरीण आणि ससे खाऊन आपला मस्त राहील. ……
जगभरात जेवढ्या म्हणून प्रेक्षणीय वास्तू आहेत त्यांची नक्कल करण्याचे प्रयत्न आतापर्यंत झाले व यापुढेही होतील. डुप्लिकेटच्या जमान्यात लोकांनी देवांनाही सोडले नाही. अगदी पंतप्रधान मोदींसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्तीदेखील मुंबईत आहे. शेम टू शेम!
अमेरिकेत बराच काळ वास्तव्यात होतो. मुलाकडे कांही महिने राहण्यासाठी गेलो होतो. दुरदर्शनावरिल बातम्यावरुन महाराष्ट्रामध्ये घडणारय़ा घटना कळत होत्या. Shiwaji Hindu King in Islamic India by James W. Laine ह्या पुस्तकाच्या लिखानावरुन सामान्य जनतेमध्ये संतापाची भवना निर्माण झाली होती. मी पण हे सारे वाचून बेचैन झालो होतो. एका परकिय लेखकाने शिवाजीमहाराजा संबंघी लिहीलेले वादग्रस्त लिखान काय असावे हे समजण्याची उत्सुकता वाटू लागली.
मी जवळच असलेल्या एका मोठ्या वाचनालयांत गेलो. प्रचंड ग्रंथसंख्या असलेले ते ग्रंथभांडार होते. अतिशय शिस्तीत निरनिराळ्या काचेच्या कपाटांत ठेवलेली पुस्तके दिसून आली. बसण्यासाठी उत्तमप्रकारचे फर्नीचर, टेबल-खुर्च्या शिस्तीत लावलेल्या. वेगवेगळी दालने, संपूर्ण भाग एअर कंडीशनने व्यापलेला. प्रत्येक ठिकाणी Computer ची आणि Xerox ची सोय. कागद व पेन्सचा मुबलक साठा, फोटोप्रिंटस घेण्याची सोय इत्यादी दिसून आले. सभासदाना I. Card दिलेले असून एका वेळी ३ ते ४ पुस्तके दिली जात. सभासद ती २१ दिवस घरी ठेऊ शकत होता.
कंपुटरच्या सहायाने पुस्तकांची वितरण व्यवस्था व परत मिळाल्याची नोंद अटोमँटीक होत असे. वाचनालयातर्फे देवू केलेली पुस्तके आणि वाचकांकडून परत आलेली पुस्तके फक्त वेगवेगळ्या फिरत्या Tract वर ठेऊन हे साध्य होत असे. ही सर्व पद्धती तो वाचक स्वतः करीत असत. (आगदी लहान ५-६ वर्षाची मुले देखील) लेझर दिव्याच्या झोताच्या सहायाने पुस्तकांची नोंदणी पद्धतशीर करताना, देवान-घेवान च्या नोंदी करीत. फक्त अद्यावत शास्त्रीय ज्ञान (Technical Knowledge) , आणि विश्वास ह्या दोन समजावर वाचनालयाचा व्यवहार सहज आणि सुरळीत चाललेला दिसून आला. सर्व हालचाली शांत व पद्धतशीर होत असल्याची जाणीव झाली. फक्त अडचणीच्याच वेळी तेथील मदतनिसांची मदत घेतली जाई.
मी ग्रंथपालाकडे मला हवे असलेल्या पुस्तकाची चौकशी केली. त्याने कंपुटरच्या सहायाने संपूर्ण यादी चाळली. मला ते पुस्तक मिळाले नाही. ते पुस्तक त्यांच्याकडे नव्हते. त्यानी मजकडून एक फॉर्म भरुन घेतला. त्यात माझे सभासद कार्ड नंबर, पुस्तकाचे नांव व त्याचा लेखक ह्याची नोंद केली. मला ते पुस्तक दोन आठवड्यानंतर मिळेल हे सांगण्यात आले. आणि आश्चर्य म्हणजे कांही दिवसांनी वाचनालयाने मला e-mail ने कळविले के ते पुस्तक त्यांच्याकडे उपलब्ध झाले आहे.
वाचकांच्या आवडी निवडीची इतकी कदर करणारी संस्था व यंत्रणा मी प्रथमच बघत होतो. माझे त्याना घन्यवाद.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
प्रेमळ सासू आणि सासरा….
डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य दमलेला, ओजहीन दिसत होता. सूर्य अस्त होताच, थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय. हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य. काही दया-माया न बागळता हे राक्षस आपल्या शरीरातील सर्व उर्जा, तेज, शक्ती शोषून घेतात. किती ही गरम कपडे घातले तरी ही बचाव होत नाही. रात्री बिछान्यावर पडल्यावर वाटू लागले शरीरातील जुन्या जखमा अंग वर काढू लागल्या आहे, नवीन जखमा ही भरभरून वाहू लागल्या आहे. असह्य वेदनांमुळे डोळा लागत नाही. हे अंधाराचे राक्षस व्याधीग्रस्त मानवांवर हिंस्त्र प्राण्याप्रमाणे तुटून पडतात. व्याधीग्रस्त माणसांना तडपवून मारण्यात राक्षसाना आसुरी आनंद मिळतो. किती ही डोक्यावर पांघरूण घेऊन त्यात दडले तरीही राक्षसांच्या भेसूर हास्य आणि डरकाळ्या सतत रात्रभर ऐकू येतात. बिछान्यावर कड बदलता -बदलता सारी रात्र निघून जाते. तेंव्हा कुठे जाऊन ब्राह्म मुहूर्तावर डोळा लागतो. सकाळी घड्याळाच्या गजरा बरोबर जाग येतेच (सवयच आहे ती). आधी शरीरला चिमटा घेऊन जिवंत असल्याची खात्री करतो, भिंतीवर लटकलेल्या घड्याळा कडे पाहतो, सकाळचे साडेपाच वाजलेले असतात. उठण्याची इच्छा नसते तरी ही देवाचे नाव घेऊन कसा-बसा उठतो. आता पुढचे दीड महिना तरी असेच हाल होणार. जनवरी महिन्यात संक्राती येईलच. सूर्याचे तेज पुन्हा वाढू लागेल. सूर्याच्या उर्जेने शरीरात नवचैतन्य येईल. तो पर्यंत तरी रोज जगण्यासाठी संघर्ष करावाच लागणार. ...शरीरात साठविलेल्या शक्तीने अंधाराच्या राक्षसांशी झुंज देत देत....आयुष्याची गाडी पुढे रेटावी लागणार.
-- विवेक पटाईत
Copyright © 2025 | Marathisrushti