(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • एक साहित्यक मुलाकात

    एक साहित्यक मुलाकात -उपमा कालिदासस्य म्हणजे काय? ?????

  • दोन क्षणिका / कागदी घोडे /शहर हिरवेगार

    कागदी घोडे कुठे दौडतात, हिरवेगार शहर ???

  • मराठी भाषाभिमान्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ : भाषाशुद्धीचे व्रत!

    कोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा शब्दांच्या एका वाक्यात इंग्रजी, अरबी, फारसी आदी परकीय भाषांतील एक-दोन शब्द सहजपणे वापरले जातात. अन्य भाषेतील शब्दांची सरमिसळ करून मराठीत बोलणार्‍या किंवा ते बोलणे ऐकणार्‍या मराठी माणसाला त्याची खंतही वाटत नाही. राजकीय लाभासाठी मराठीची ढाल पुढे करणारे पुष्कळ आहेत, मराठीसाठी वर्षातून एकदा होणार्‍या साहित्य संमेलनात गळा काढणारेही उदंड आहेत; पण खरोखर मराठी जिवंत ठेवण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्तर (दर्जा) देण्यासाठी झटणारे मराठीप्रेमी अल्प आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे या अल्प मराठीप्रेमींपैकीच एक आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी `भाषाशुद्धीचे व्रत’ या एका मार्गदर्शक ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेच्या रक्षणाची चळवळ अत्युच्च वैचारिक स्तरावर पोहोचवली आहे. प.पू. डॉ. आठवले हे अध्यात्मक्षेत्रातील सर्वश्रुत नाव. अध्यात्माशी निगडित १६० हून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. थोर विभूतींनी निर्मिलेले वाङ््मय सर्वच दृष्टीकोनांतून मौलिक असते. म्हणूनच डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या `भाषाशुद्धीचे व्रत’ या ग्रंथाच्या माध्यमातून `मराठी भाषाशुद्धीच्या चळवळीला अध्यात्माचा स्पर्श झाला’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

  • दिल्लीकरांची व्यथा

    मुंबई असो व दिल्ली महानगरात राहण्यारांची ही व्यथा आहे.

  • निसबत अर्थात सम्बन्ध -प्रश्नोत्तर स्वरूपाचा काव्य प्रकार

    दोन पूर्णतया भिन्न वस्तुंमधे सम्बन्ध अर्थात समानता दाखविणारी कविता म्हणजे ‘सम्बन्ध’

  • सांग मी नसेल तर काय करशील…

    सांग मी नसेल तर काय करशील..

    कोणाच्या नजरेत पाहशील,

    कोणाच्या आठवणी जपशील,

    कोणाची मैत्रीण म्हणुन मिरवशील,

    सांग मी नसेल तर काय करशील..

    कोणाचे लाड़ पुरवशील,

    कोणाचे गालगुच्चे घेशील,

    कोणाला तु माझाच आहेस असं म्हणशील,

    सांग मी नसेल तर....

    बाईकवरुन फिरताना कोणाच्या

    खांद्याचा आधार घेशील,

    कोणासोबत चाँकलेटचा अस्वाद घेशील,

    सांग मी नसेल तर....

    समुद्रकाठी फिरताना कोणाचा

    हात पकड़शील,

    दुःखात जेंव्हा सापड़शील तेंव्हा

    कोणाच्या मिठीत शिरशील,

    गर्दझाड़ीतही निर्भीड़पणे कोणासोबत

    बसशील,

    सांग मी नसेल तर....

    कोणाच्या चेहर्यावरचा घामसुध्दा

    स्वताच्या रुमालाने पुसशील,

    कोणासाठी घासातला घास

    आठवणीने काढ़शील,

    सांग मी नसेल तर....

    मोबाईलमध्ये बँलंन्स असुनही

    कोणाला मिस्ड़काँल करशील,

    स्वताचं पोट भरल्यावरतरी

    कोणाला केक पुरवशील,

    कोणासोबत ऐका ताटात बसशील,

    ऐका नारळातलं पाणी दोन स्टाँच्या

    मदतिने कोणासोबत पिशील,

    सांग मी नसेल तर....

    संध्याकाळी अंधारातुन घरी

    जेंव्हा परतशील,

    ओरड़ा आईचा वाचविण्यासाठी

    कोणाचं नाव सांगशील,

    झाड़ असेल पण कळी नसेल

    मग फुलाचं काय करशील,

    खरंच सांग मी नसेल तर....

    प्रमोद पाटील

    (ओन्ली फाँर हर)

    -- प्रमोद पाटील

  • सृजनशील दिग्दर्शक विजय राणे

    श्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी ही मालिका अफाट लोकप्रियता मिळवून संपली, या मालिकेचे दिग्दर्शक विजय राणे यांचा परिचय.

  • आईचं नातं

    माणूस या जगात येतो तोच मुळी एका निर्विवाद अन् अतूट नात्यातून. आई… हे त्याचं पहिलं नातं! आईचं वर्णन देवादिकांपासून अनेकांनी केलेलं आहे.

  • कलीयुगातील गीता उपदेश

    आजच्या लोकशाहीत कृष्ण असता तर त्याने अर्जुनास काय उपदेश केला असता.

  • सू-सुटका!

    ती अनोळखी आई सुध्दा प्रेमळ होती.आपल्या मुलासारखंच तिने मला जवळ घेतलं होतं.पण त्या दिवशी मला एक गोष्ट समजली,

    ‘सर्व-सर्व आयांचं,सर्व-सर्व मुलांवर खूप-खूप प्रेम असतं पण तरीही सर्व-सर्व मुलांना आपलीच आई हवी असते!!’ हो किनई?