नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कवितेच्या माध्यमातून आपण हसत-खेळत दुसर्या भाषेंतील शब्द सहज शिकू शकतो. त्याचा सर्वाना फायदाच होईल व भाषेवरून होणारे विवाद ही कमी होतील. आपण ही प्रयत्न करा. आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा.
मित्रांनो एका महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण “अवगत असलेल्या भाषा” मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा
सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला.
तू मला आताच असे उडवून लावू नकोस… कदाचित या जगात मी महान कार्य करून दाखवेन. मी तुझ्या प्रेमाचे बीज आहे. मला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे! या फुलाला फुलू दे, आई! हे बघ- मी नाजूक, कोवळ्या हातांनी तुला विनवणी करते. मला समजून घे. मला वाचव, आई! आता पपा येतीलच तुला क्लिनिकमध्ये घेऊन जाण्यासाठी! तू त्यांना नकार दे! माझी शप्पथ आहे तुला! त्यांना तू समजावून सांग! माझी हत्या करण्यासाठी कोठेही जाऊ नकोस! त्यांनी तुला क्लिनिकला नेलेच बळजबरीने, तरीसुद्धा तू परत घरी निघून ये, आई! मी इवलासा श्वास घेऊन जगत आहे. माझे जीवन तू हिसकावून घेऊ नकोस! मला निर्दयपणे मारू नकोस आई! आई, हे तू कधीच करू नकोस!
माझ्या दुमजली ऑफिसच्या गच्चीवरुन आमचा ग्रुप खाली पाहत होता .शेजारच्या कंपांउंड मध्ये काहीतरी बांधकाम चालु होते.त्यातील मजुर जेवन करत होते.चटनी, बाजरीची भाकरी व बरेच मराठ मोळे पदार्थ असावेत.तत्पुवी आमचेही प्रत्येकी पन्नास रुपये देउन कंपनीच्या केफेटेरीयामध्ये जेवन झाले होते , ज्यामध्ये फक्त मिठालाच अशी चव होती जीला आपण ठळक विशेषण देउ शकू.मेसच्या जेवनाला वैतागलेली ग्रूपमधील एक मुलगी मजूरांकडे पाहत म्हणाली ,
" काय मज्जा ए कि नई या लोकांची , चट्नी , भाकरी , किती मजा येत असेल रोज रोज चट्नी , भाकरी खायला ! "आम्ही ऐकत होतो .मुलगी शिव्या जरी देत असली तरी आम्ही ऐकतोच!! आता तर ती किरकोळ काहीतरी बोलत होती."मला तर बाई वैताग आलाय चपाती , पनीर , गुलाबजाम खाऊन !!"
मुलगी जवळपास सेरियसली बोलायला लागली होती.
मुलगी अशी विनाकारण सेरियस झाली की खुप मजा वाट्ते.
आपल्याबद्द्ल असेल (सेरियस!) तर विचारायलाच नको.
"या आयटी चाच वैताग आलाय , त्या मजुरांची बघा किती मजा !!"
आणखी एकदोघाने हो ला हो दिला.
माणसाने व्हावे तर मजुर नाही तर काहीच नाही असे काही त्यांनी बोलायच्या अगोदर मी त्यांना दिवास्वप्नातुन जागं केलं ," कसली मजा?" , इतक्या वेळ रामायण ऐकून रामाची सिता कोण या पेक्शा क्शूद्र प्रश्न मी केला.
" अरे कसली मजा काय म्हणतो चट्नी , भाजी , भाकरी आणि तेही रोज !!! " - ती मुलगी.
" मग आणखी काय खाणार ते?" - आता मी थोडा सेरियस झालो.
" ......अंअं ...अंअं " , मुलगी गोंधळली(हीहीही!!!!), माझ्यामुळे!!!.
" पनीर, चपाती , जामुन? अगं आयटीत नाहीत ते , चट्नी , भाजी
, भाकरी च्या वर काही परवडत नसतं त्यांना ! आणी तुम्ही पार आयटी पीपल पेक्शा मजूरांची मजा असं कसं म्हणता , मजा नसली येत तरी तेच खावे लागते उलट चट्नी भाकरी खाताना ते जे खाण्याची स्व्प्न पाहतात ते आपण रोज खातो आणि आपण मिष्टान्न खाताना आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. इतकेच नव्हे तर त्यांचे जगणे आपल्यापे़क्शा मजेचे वाटते रादर आपण ठरवुन तसे जगु शकतो पण ते पराकष्ठा करुणही आपल्या सारखे जगू शकत नाहीत. आप्ल्याला त्यांचा हेवा वाट्णे हा तर पांढरपेशीपणा झाला!" , मी अक्कल पाजळली .
तोपर्यन्त लंच ब्रेक संपला . मी बोललेले गम्मत म्हनुन सोडुन सगळे डेस्कवर गेले.यांच्या मेंदुपर्यंत जाईल असे मेनेजरच बोलू शकतो , मी बोलणारा कोण ?????
--
दोन क्षणिका / साजण- तुलना
वसुधैव कुटुम्बकम????
नुकताच मी टीव्ही लावला होता आणि कुठे काही चांगला कार्यक्रम आहे का ते पाहात होतो. चॅनल बदलता बदलता एका अतिप्रसिध्द चॅनलवर अचानक ब्रेकींग न्यूज झळकली ‘ढोणी इडली खातोय’. म्हटलं बघूया तर हे काय प्रकरण आहे ते. तेवढ्यात स्टुडीओत सादरकर्ती माया अवतरली.
मायाः प्रेक्षकहो, आताच आमच्या बंगळूरू येथील वार्ताहराकडून आम्हाला ब्रेकींग न्यूज मिळाली आहे कि साक्षात ढोणी आत्ता इडली खात आहे. चला तर बंगळूरू येथे आमच्या वार्ताहराकडून अधिक माहिती घ्यायला. राजू ,जरा आम्हाला सविस्तर माहिती दे.
(राजू हे नाव ऐकताच मी शेअरबाजारात गुंतवणूक करत नसताना वा स्वतः सीए नसताना देखील दचकलो. पण हा राजू वेगळा दिसत होता.)
राजूः आता सकाळच ९ वाजून ५० मिनिटे झालेली आहेत. हा बंगळूरूमधील महात्मा गांधी रोड आहे. त्यावरील नित्यानंद हॉटेलच्या बाहेर आम्ही उभे आहोत. माया.
मायाः तुम्ही तिथे काय करत आहात?
राजूः आताच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ढोणी या हॉटेलात शिरला आहे. हॉटेलच्या सूत्रांकडून आम्हाला आताच माहिती मिळाली आहे की त्याने इडलीची ऑर्डर दिली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता त्याचे इडली खाणे आम्ही लाइव्ह दाखवणार आहोत. माया.
मायाः पण त्याने इडलीचीच ऑर्डर का दिली?
राजूः त्याचा नाश्ता झाल्यावर आम्ही त्याला हा प्रश्न नक्की विचारू. चला आपण आता आतमध्ये जाऊ. हा कॅश काउंटर. इथून पुढे गेल्यावर तिकडच्या कोपर्यात तो ढोणी बसलेला दिसत आहे. वेटरने आताच त्याच्यासमोर गरमागरम इडली आणून ठेवली आहे. आता वेटर सांबार आणि चटणी ठेवत आहे. ढोणीने आता डाव्या हातात काटा आणि उजव्या हातात चमचा धरलेला आहे. त्याने आता इडलीचा पहिला तुकडा मोदून तो सांबारात बुडवलेला आहे आणि आता त्याने तो तुकडा खायला सुरुवात केलेली आहे.
मायाः प्लेटमध्ये किती इडल्या आहेत?
राजूः तीन. इथे कर्नाटकात बहुतेक ठिकाणी तीन इडल्या दिल्या जातात. महाराष्ट्रात मात्र बहुतेक ठिकाणी दोनच दिल्या जातात.(यानंतर शेवटच्या तुकड्यापर्यंत ढोणी कसा इडली खात आहे हीच कॉमेंटरी सुरू राहते.)
राजूः आताच हॉटेलच्या सूत्रांकडुन अशी माहिती मिळालेली आहे कि त्याने इडलीची आणखी एक प्लेट ऑर्डर केली आहे.
मायाः त्याने दुसरी प्लेटपण इडलीचीच ऑर्डर का दिली?
राजूः याचे कारण झारखंडमध्ये इडली मिळत नाही.
मायाः मग झारखंडमध्ये काय मिळते?
राजू ः ढोणीला विचारुन सांगतो!
मायाः बर आता आम्हाला पुढं काय होतय ते सांग.
राजूः ढोणीने आता दुसर्या प्लेटमधील इडली खायला सुरुवात केली आहे. (तेच दळण कॉफी पिण्यापर्यंत सुरू.)
राजूः आता ढोणी बाहेर पडत आहे. आता त्याच्याकडून आपण अधिक माहिती घेऊ. पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचे सोडून तू इथेच कसा आलास?
ढोणीः पंचतारांकित हॉटेलमध्ये आमच्यासारखे बरेच लोक येत असतात त्यामुळे त्यांना आमचे कौतुक नसते. इथे आम्हाला राजासारखी वागणूक मिळते वर बिलही द्यावे लागत नाही!
राजूः म्हणजे राजासारखी वागणूक मिळावी अशी तुझी अपेक्षा असते?
ढोणीः मलाच काय, सर्व क्रिकेटपटूंना वाटते की ते राजेच आहेत.
राजूः तुला पद्म पुरस्कार मिळाला तरी तू घ्यायला गेला नाहिस?
ढोणीः मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही राजे आहोत. आमच्या एकेक मिनिटाची किंमत हजारो रुपये असते. त्यातून जाहिराती करणे आणि क्रिकेट खेळणे यातून आम्हाला खूप पैसा कमवायचा असतो कारण त्यातूनच आमचे राजेपण टिकणार असते. मग त्या किरकोळ रकमेच्या पद्म पुरस्काराची काय कथा? त्यातून आम्ही राजे आहोत हे सरकार ध्यानात घेत नाही. कोण कुठले शास्त्रज्ञ, कलाकार अशा फालतु लोकांबरोबर आम्ही सत्कार करून घ्यावा अशी सरकारची अपेक्षा. ते आम्हाला कसे चालणार? सरकारने असे समारंभ आमच्या सवडीने व आम्ही सांगू तसे आयोजित केले तर सरकारवर उपकार म्हणून आम्ही असे पुरस्कार स्वीकारू. हे दाखवून देण्यासाठीच यावेळी जेव्हा दोन सामन्यांसाठी माझ्यावर बंदी आली आणि शूटींगही नव्हते तेव्हा मी हा पुरस्कार स्वीकारला.
राजूः पण सरकार तर जनतेचे प्रतिनिधी असते.
ढोणीः अहो या देशात लोक सरकारपेक्षा आम्हाला जास्त मानतात. आम्ही पैशासाठी खेळतो असे असूनही लोक आम्ही देशासाठी खेळतो असे समजतात. आम्हाला पैसा मिळावा म्हणून स्वतःचा कामधंदा सोडून आणि स्वतःचे पैशाचे नुकसान करून घेऊन लोक खेळ बघतात. राजेशाहीत दुसरे काय असते? आमचा प्रायव्हेट क्लब आहे, तो संघ निवडतो, सगळे निर्णय घेतो आणि सरकार निमुटपणाने तो देशाचा संघ म्हणून स्वीकार करते. बाकी सर्व खेळांच्या बाबतीत सरकारला अधिकार आहे पण आमच्याबाबतीत नाही. आमच्या क्लबचे पदाधिकारी खूपच पॉवरफूल आहेत त्यामुळेच आम्ही वाटेल तसे वागू शकतो. आमचा दरारा फक्त भारतातच नाही तर जगभर आहे. अंमली पदार्थविषयक चाचणीला संपूर्ण जगात फक्त आम्हीच विरोध केला आणि आमच्या क्लबने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. दुसरे उदाहरण. एका माजी क्रिकेटपटूला परकीय चलन बाळगल्याबद्दल सरकार काही करू शकलं नाही तिथे आम्ही तर आजचे क्रिकेटपटू आहोत. मग आम्ही राजेपण मिरवले तर कुठे बिघडले?
राजूः आता आणखी एक प्रश्न.
ढोणीः आता शूटींगला जायचे आहे त्यामुळे बास.
राजूः ढोणी आता गेलेला आहे. त्याने मुलाखतीत जे सांगितले त्याचा सूज्ञ प्रेक्षकांनी विचार करावा. भारतात आपण सर्वच क्षेत्रात व्यक्तीपूजेचे स्तोम माजवले आहे. ते ज्यादिवशी कमी होइल तो सुदिन. कॅमेरामन दिपकबरोबर राजू अमुक चॅनलसाठी.
(वरील सादरीकरणात कुणाला सत्य घटना आढळल्यास तो योगायोग समजावा.)
-- कालिदास वांजपे
असेल तर ‘माहेर’ या शब्दासाठी नवा काही पर्याय शोधून काढावा. आणि त्या माहेरी चार दिवस सुखानं राहावं. भिरकावून द्यावं जबाबदारीचं जड ओझं, तोडून टाकावं मौनाचं कुलूप आणि गाव्या मुत्त* चारोळ्या. आई, वडील, बहीण, भाऊ सर्वांचे हात हाती घेऊन द्यावा घ्यावा उबदार दिलासा.
किती युगं लोटली गांधारी होऊन गेल्याला. गांधारी! नव्हे, नव्हे- पतिपरायण गांधारी. सती-साध्वी गांधारी. किती शतकं उलटली
पतिपरायण गांधारी होऊन गेल्याला. काळाची उलथापालथ झाली. कलियुग अवतरलं. वर्णसंकर झाला. वर्णसंकराचा बाऊ वाटेनासा
झाला. माणसांचीही उलथापालथ झाली. पोशाख बदलले. आचार-विचार बदलले. पाश्चात्त्य-पौर्वात्य भेदाभेदातलं अंतर फारसं उरलं
नाही. स्त्री- पुरुषांच्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्यांची सरमिसळ झाली. आर्थिक सहभागाची तिला मुभा मिळाली. शिक्षणाची दारं तिच्यासाठी खुली झाली. बदलली नाही ती स्त्रीविषयक धारणा. पुरुषांची तर नाहीच नाही. सुखासुखी हाती आलेले सर्वाधिकार
फारच थोडे सोडू शकतात. बव्हंशी (मूठभर 20 टक्के सोडून) स्त्रीचीही स्वत:विषयीची धारणा बदलली नाही. पतिपरायणतेचं बिरुद मिरविण्याची स्त्रीची हौस फिटली नाही आणि पतिपरायण स्त्री ही पुरुषाची हावही सुटली नाही. कारण आम्हाला हव्या आहेत फक्त गांधारी.
Copyright © 2025 | Marathisrushti