महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
चवळी धुऊन घ्यावी. तिच्यात मसाला व बारीक कांदा घालावा व पाणी घालून चवळी कुकरला २/३ शिट्टय़ा देऊन उकडून घ्यावी. नंतर पातेलीत कांद्याची फोडणी करून त्यात चवळी टाकावी. तिच्यात हळद, मीठ व गूळ घालावा व उसळ शिजू द्यावी. वरून ओले खोबरे (न वाटता) घालावे व आपल्याला हवी त्या प्रमाणात उसळ सैल व घट्ट करावी.
दसऱ्याचे दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस. दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात.
नवे व्यवसाय चालू केले जातात. ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी.
आपट्याच्या पानाला सोन्याचं मोल का आणि कसं आलं ह्याबद्दल जी एक कथा सांगितली जाते, ती अशी की
फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता. एकदा काय झालं. गुरू वरतंतू ह्यांचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले – गुरूजी!
तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. शहाणे केले, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरु वरतंतू म्हणाले, “बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा !” पण कौत्स मात्र ऐकेनाच, सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला मग गुरु म्हणाले, “मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.”
कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षात ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौत्साला ‘तू तीन दिवसांनी ये’ असं सांगितलं. रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना, मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला, त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली.
दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः त्या मुद्रांचा ढीग पहिला. दारी आलेल्या कौत्साला ‘हवं तेवढं धन घे’ म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता.
नऊरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. सोने लुटण्याचा. दस-याच्या दिवशी लोक एकत्र येतात. आपटा व शमीच्या पानांमुळे अर्जुन योग येतो. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. आपण दसऱ्याला नेहमीच श्रीखंड पुरी हा मेनु करतो. या वेळी जरा वेगळा मेनु करू या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कॅप्सिकम राईस
साहित्य:- दोन मोठ्या पिवळ्या रंगाच्या ढोबळ्या सिमला मिरच्या,१ कांदा, अर्धी वाटी बासमती तांदूळ
फोडणीसाठी. आले-लसून, मेथीचे दाणे, मोहरी, उडीदाची डाळ, तीळ, जिरे, बडीशेफ, कढीपत्ता, हळद.
कृती:- सर्वात प्रथम तांदूळ धुवून १५ ते २० मिनिट भिजात टाका. दोन मोठ्या पिवळ्या ढोबळ्या सिमला मिरचीच्या मध्यम आकाराच्या फोडी चिरुन घ्यायच्या, नंतर कांदा, आले-लसून, मेथीचे दाणे, मोहरी, उडीदाची डाळ, तीळ, जिरे, बडीशेफ, कढीपत्ता, हळद यांची नेहमीप्रमाणे खमंग फोडणी करुन घ्यायची. पांच मिनिटे परतून घेऊन मग चिरलेल्या सिमला मिरचीच्या फोडी फोडणीत घालायच्या आणि नीट एकजीव करुन घायच्या. गॅसची आच शक्य होईल तेवढी मंद करुन घ्यायची. पातेल्यावर एका ताटात पाणी घालून ते ताट झाकण ठेवावे. शिजून या भाजीला पाणी सुटले की त्यात फक्त तांदूळ वैरावेत. पाणी घालायचे नाही. खरे तर भाजीच्या पाण्यात तांदूळ बसतील इतकेच तांदूळ अंदाजे भिजवायचे. आता झाकण न ठेवता मंद आचेवर हा भात शिजू द्यायचा. भात शिजत आला की कडेकडेने साजूक तूप सोडायचे. हा भात चवीला तर छान होतोच, शिवाय रंग वगैरे पण एकदम छान दिसतो आणि पाणी घातले नाही म्हणून भाताला एक वेगळीच चव येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गाजर धुऊन किसून पिळून घ्यावे. (रस ठेवावा) कणीक, बेकिंग पावडर, साखर, केळ्याचा लगदा, गाजराचा किस, अक्रोडचे तुकडे एकत्र करावे
सर्वप्रथम कणकेत थोडसं मोहन टाकून कणीक मळून घ्या. त्यानंतर कढईत बुंदीला चांगल्याप्रकारे गरम करून त्यावर पाणी शिंपडून बूंदी चांगल्याप्रमाणे एकजीव करून घ्या
डेखे काढलेल्या लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या, मीठ, आवडीप्रमाणे लसून घालून जरा जाडसर वाटून घ्यावे. त्यात भरपूर लिंबाचा रस घालावा व नंतर मोहरी, हिंगपूड, मेथीपूड, हळद घालून तेलाची फोडणी करून गार झाल्यावर घालावी.
दूध घट्ट होईपर्यंत उकळा. निम्मं झालं की त्यात साखर, वेलची व कॉर्नफ्लोअर दोन चमचे पाण्यात विरघळून दुधात टाका. ढवळत उकळी येईपर्यंत शिजवा. मग मंद आचेवर 3-4 मिनिटं ढवळत शिजवा.
साहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड.
कृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ टाकावे. चवीला थोडे मीठ टाकावे. नंतर गुळाचे घट्ट पाणी तयार करावे. कणकेच्या निम्मे गूळ घ्यावा. कणकेत गरम तुपाचे मोहन घालावे व तूप कणकेला चांगले चोळावे. नंतर गुळाच्या पाण्याने कणिक घट्ट भिजवून ठेवावी. अध्र्या तासाने अंदाजाने गोळे तयार करावे, एकेका गोळ्याची पोळी लाटावी. पोळी जरा जाडसर असावी. नंतर कातणीने शंकरपाळे कापावे व तुपात मंदाग्नीवर तळावे. मंद तळल्याने शंकरपाळे खुसखशीत होतात. मुलांना डब्यात देण्यास चांगला पदार्थ आहे. खूपच चविष्ट लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
वर दिलेलं साहित्य वापरून चविष्ट आमटी तयार करावी. भिजवलेली कणीक मळून पातळ लाटून शंकरपाळे कापावे. उकळत्या आमटीत उकळावं. बाऊलमध्ये घालून वर लिंबाचा रस व तूप घालून द्यावा. वनडिश मिल आहे. चक्कीची भाजी दीड कप कणीक तिखट मीठ हळद, थोडं तूप, पाणी घालून घट्ट भिजवावी. चिमूट बेकिंग पावडर ऐच्छिक आहे
साहित्य:- ३ टोमॅटो, ३-४ लसूण पाकळ्या, १/२ टीस्पून मिरेपूड, १ टेबलस्पून लोणी, मीठ आणि साखर चवीप्रमाणे
ब्रेड क्रम्ससाठी:- ब्रेडचा १ स्लाइस, ३ टेबलस्पून तेल, चिमुट मीठ,१ चिमुट मिरेपूड,
कृती:- प्रथम टोमॅटो उकडून त्याची प्युरी करून घ्या. पातेल्यात बटर घालून गरम करा आणि त्याच्यात लसूण ठेचून घाला. मिरेपूड घालून मग टोमॅटो-प्युरी घाला. २१/२ कप पाणी घाला मीठ साखर घालून ढवळा. ५. सूप ५-१० मिनिटे चांगले उकळू दे. ब्रेड क्रम्स घालून गरम सर्व्ह करा. ब्रेडच्या स्लाइसचे चौकोनी छोटे तुकडे करा. कढईत तेल गरम करा आणि ब्रेडचे तुकडे घालून परता. वरून १ चिमुट मीठ,१ चिमुट मिरेपूड,१/२ टीस्पून ड्राय पार्सले घाला. मंद आचेवर तुकडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. गरम सुपात सर्व्ह करायच्या वेळी वरून ब्रेड क्रम्स घाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य :- एक वाटी वरी तांदूळ, पाव वाटी तूप, चवीला मीठ, पाव वाटी अळीव, अर्धी वाटी ओले खोबरे, दीड वाटी गूळ, दोन वाट्या गरम पाणी, अर्धी वाटी गरम दूध, अर्धा चमचा जायफळपूड, 10-12 काजू.
कृती :- अळीव दुधात दोन तास भिजत घालावेत. वरी तांदूळ धुवून घ्यावेत. एक मोठा चमचा तूप गरम करून त्यात तांदूळ परतावेत. मीठ आणि पाणी घालून शिजवावे. उरलेले तूप गरम करून त्यात काजू परतावेत. खोबरे, अळीव तसेच गूळ घालून शिजवावे. मिश्रण थोडे चिकट झाले, की शिजलेले वरी तांदूळ घालून ढवळावे. तांदूळ मोकळे होईपर्यंत ढवळावे, जायफळपूड घालावी. एका थाळीला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण घालून थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti