माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाचे शरीर अमोल किंमतीचं
पशु-पक्ष्यांपेक्षा खूपच मोलाचं
माणसाच्या हातून चांगलंच घडावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाच्या वागण्यात स्वार्थ नसावा
माणसानं आचरणात बदल करावा
आपल्या आचरणातून इतरांना सांगावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं नजरेतून चांगलच पहावं
चांगलच ऐकावं,चांगलच बोलावं
चांगलं वाईट माणसाला कळावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं चंचल मनाला आवरावं
चांगल्यांच्या संगतीत त्याला रमवावं
वाईटाला दूर करावं, चांगल्याला जवळ करावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं तहानलेल्या जीवाला पाणी पाजावं
भुकेलेल्या जीवाला अन्न द्यावं
इतरांसाठी प्रेम द्यावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट
कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट....१,
अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला
वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला...२,
उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा
उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा...३,
वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा
केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर सदा....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत,
कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ....१,
भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही,
नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही...२,
कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून,
एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून...३,
गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे,
प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे...४,
स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली
घराबाहेर पडून पाऊल लोप पावू लागली...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
असे कसे गं असे कसे.
कां तुझे गं मज वेड असे
वेळी, अवेळी केव्हांही
नेत्री सामोरी गं तूच असे।।
नित्य प्रभाती त्या नभाळी
तांबूसलेल्या सांजसकाळी
आठविताच सहजी तुजला
खुदकन मनी मीच कां हसे।।
हिरव्या वेली, कोमल कळी
अलवार, जणू तूंच उमलते
पाकळी पाकळी अधर तुझे
मकरंदा गंध तुझा कां असे।।
निर्मल, शामल तुझी गं तनू
माळूनी घेता श्वेत चंद्रचंद्रिका
उजळुनी टाकिते नभांगणाला
सर्वत्र स्पर्श तुझाच कां भासे।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८.
८ - १ - २०२२.
विसर सर्व गतकाळां,
उगा मना रेगांळशी,
पुढे जाऊन, समोर पहा ,;---
का मागे, मागे वळून पाहशी,---!!!
मागे राहिला बालपणा,
त्यात कशाला हुंदडशी
चार सुखाचे थेंब दिसतां
सारे आभाळ पुन्हा पेलशी,--!!!
कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, सारख्या सारख्या विसरशी,
पाहून आपल्या भूतकाळां,
पुन्हा पुन्हा रे गहिंवरशी,--!!!
घरात माणसांचा राबता,
सांग आता कुठून आणशी,
अशा अनमोल दौलतीला,
तूच ना रे झुगारशी,--!!!?
येता काळ तरुणपणाचा,
तुला जाणीव नव्हती जराशी, गमावशील जर यांना,
कसे त्यांना परत आणशी,-?
एक एक करून सर्व तुला,
राजा, बघ सोडून जाती,
काळाची ही महान किमया,
नातीगोती संपून जाती,--!!!
आता उरला एकटेपणा,
जो जन्माचा सोबती,
दाबून टाक भूतकाळा,
वर्तमानच फक्त या जगी,--!!
हिमगौरी कर्वे. ©
ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जावूनी भिडती
नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती...१
शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी
मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई...२,
सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण ते दुषीत होते
संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करिते...३,
कारण जरी ते असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती होई भयकंर
केवळ तुमचे प्रेमळ शब्द, दुष्ट चक्र ते थांबवी सत्वर ….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कपाशीचे ढीग अगणित
विखुरले दिसती आकाशीं
मानव येथें उघडा असूनी
वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।।
कोठे आहे कापड गिरणी
वस्त्र जेथें बनत असें
दयावान तूं मालक असतां
त्रोटक कापड निघे कसे ।।२।।
पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा
लाज राखण्या मानवाची
गरीब बिचारा विवस्त्र तो
कीव करावी वाटे त्याची ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
अनामिक जे होते पूर्वी,
साद प्रेमाची ऐकू आली ।
योग्य वेळ येतां क्षणी,
हृदये त्यांची जूळूनी गेली ।।१।।
शंका भीती आणि तगमग,
असंख्य भाव उमटती मनी ।
विजयी झाले ऋणानुबंध,
बांधले होते हृदयानी ।।२।।
उचंबळूनी दाटूनी आला,
हृदयामधला ओलावा ।
स्नेह मिळता प्रेम मिळाले,
जगण्यासाठी दुवा ठरावा ।।३।।
मनी वसविल्या घर करूनी,
क्षणीक सुखांच्या आठवणी ।
जगण्यासाठी उभारी देतील,
शरीर मनाच्या दु:खी क्षणी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची
जाण सदैव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं अनंतात समावतो
परमेश्वरि रुपांत विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला आत्मा असे सोडीत ।।७।।
देह सोडूनी भुवरी आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां मिलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन प्रभू मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें सार असते जिवनाचे ।।९।।
जिवंतपणीच तुम्हीं प्रभूमय होत असे
आनंदी नितांत क्षण खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti