प्रेम कविता
स्वातंत्र्य मिळालें, पुढें काय ?
चालेल पुढें हें मढें काय ?
स्वातंत्र्यासाठी फुकटच लाखों पडले
अम्हि-तुम्हि घेतले धडे काय ?
सत्तर वर्षें स्वातंत्र्याला होतिल रे
गाजण्यांयोग्य पण घडे काय ?
सांडलें रक्त हें खरेंच आहे, परी
अविरत त्याचे चौघडे काय !
राज्यावर शिवबांच्या बाजिराव-दुसरा !
मग राज्य बुडालें, अडे काय ?
जो खाली, तो तर खाली-खाली जातो
अंधांच्या दृष्टिस पडे काय ?
जो वर चढतो, त्याला खेचूं रे खाली
आम्हांला टाळुन उडे काय !!
स्वातंत्र्याच्या हर्षानें पोट भरा
अन्नासाठी कुणि रडे काय ?
नेते-च गुन्ह्यांना देती चिथावणी
लावतील पोलिस छडे काय !
करीतसे आगळीक राष्ट्र-शेजारी
पण करील UN-बडें काय ?
दुर्दशा बघुन दो-चार फार अस्वस्थऽ
पण, त्यांशिवाय, कुणि कुढे काय ?
दुस्थिती सांगु जर जाई कुणि नेत्यांना
ते मख्ख उत्तरत, ‘कुठे काय ?’
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
मैत्री मैत्री असते तरी काय
स्वार्थ आणि स्वार्थ दुसरे काय
असली गरज कि आठवतो तो मित्र
मिळाली मदत कि वाटतो खरा मित्र
स्वतःला विचारा असा असावा कि नाही मित्र
पण आपल्या मित्राला पण हव असत काहीतरी हे विसरतो मित्र
खरच हाथ नाही दिला एकमेका तर काय कामाचा मित्र
पण मैत्रीमध्ये असावे मात्र निर्मल मैत्री आणि मैत्री
त्यामध्ये नसावा स्वार्थाचा लवलेश
असो सुख का दुख ,हवी साथ जीगारीची
अपेक्ष्यांच्या कक्षेबाहेर असावी मैत्रीची गुंफण
गुंतावे मात्र मन आणि मन !
-- संतोष पाटील
आम्ही घाणा हा भरीला
आम्ही घाणा हा भरीला
(नाव) ताईच्या लग्नाचा ।।धृ।।
आम्ही घाणा हा भरीला
आम्ही घाणा हा भरीला
आधी वंदू कुलदेवीला
गजाननाला नमुनी
स्मरू आप्त पूर्वजांना ........ ।।१।।
आल्या काक्या, आल्या आत्या,
मावशी, मामी, ताई आल्या
आम्ही घाणा जो भरीला
आम्ही घाणा जो भरीला.......।।२।।
आम्ही घाणा हा भरीला
आम्ही घाणा हा भरीला
पहिली हळद कुटली
(नाव) ताईच्या कांतीला
आली पिवळी झळाळी.......।।३।।
आम्ही घाणा जो भरीला
गहू दळा सूप सूप
गव्हले करंज्या शेवया
करा रुखवत खूप, आम्ही......।।४।।
(नाव) ताईचे सासर
जसे नांदते गोकूळ
सासू सासरे नणंदा
दीर जावाही प्रेमळ, आम्ही.......।।५।।
तुपा दुधाच्या घागरी
(नाव) ताईच्या सासरी
तोटा नाही हो दह्याला
ताईच्या गावाला आम्ही .......।।६।।
ताईचे सासर (गावाचे नाव)
नाही बाई फार दूर
नको रडू (मुलीच्या आईचे नाव) बाई
आसू आवर आवर, आम्ही ......।।७।।
आम्ही घाणा जो भरला
साखरेचा मूठ मूठ
(नाव) ताई साजरी नवरी
गाली लावा गालबोट, आम्ही .....।।८।।
निसर्गावर प्रेम केले तर तो सर्व देतो, निसर्ग हा देवासमान मनाला पाहिजे.
डोनेशनच्या पेट्या भरून दिले गेले अडमिशन,
वाटते पाहू नयेच स्वप्न
ना ते भंगण्याची भिती
करु नये प्रेम कुणावर
ना प्रेमभंगाची ही भिती ।
घेऊनी स्वप्ने ऊराशी
तव जीवनी मी आले
स्वप्न ते सत्य करण्या
रात्रंदीन मी एक केले ।
वाटले तुझ्या समवेत
नाही कठीण काही जगात
मिळता साथ तुझी मजला
काय आहे कठीण जगात ।
परी फसगत अशी जाहली
मम स्वप्ने ती विरुन गेली
पौर्णिमेची रात्र सुध्दा मज
अंधार जीवनी देऊन गेली ।
सुरेश काळे
मो.9860307752
सातारा
५ सप्टेंबर २०१८
शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे,
खिडकी मधूनी वाहे, मंद मंद वारे ।।१।।
तोच अचानक तेथे, चिमणी एक आली,
मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली ।।२।।
जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला,
काय घडले भोवती, कानोसा तो घेतला ।।३।।
माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती,
बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती ।।४।।
मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे,
तगमग देखूनी तिची, कांहीं न कळे ।।५।।
भाषा न कळली जरी, धडकन सांगत होती,
‘संकटात आहे हो मी, ह्या भयाण मध्यरात्री’ ।।६।।
केविलवाणी बघूनी, भूतदया ही आली,
काय हवे तिजला, या अवचित वेळी ।।७।।
जेंव्हां बसे माळांवरी, ओरड वाढत होती,
हालचालीतील बैचेनी, काही सुचवित होती ।।८।।
आधार घेवूनी कसला, माळावरती चढलो,
विखूरलेल्या सामानी, निरखूनी बघू लागलो ।।९।।
धस्स झाले मन बघूनी, एक लांब त्या सर्पाला,
छोट्या घरट्या पुढती, विळका घालूनी बसला ।।१०।।
जीभल्या चाटीत होता, समोर बघूनी भक्ष्य,
चिव चिवणारी पिल्ले, होती त्याचे लक्ष्य ।।११।।
चाहूल माझी लागता, सावध परि झाला,
छलांग मारीत वेगे, झरोक्यामधूनी गेला ।।१२।।
काळसर्प तो बघूनी, उडाली होती चिमणी,
घुटमळला जीव परि, पिल्लामध्ये अडकूनी ।।१३।।
आघाद होता हृदयी, कळवळूनी ती गेली,
मातृत्वातील ओढीने, गहीवरूनी ती आली ।।१४।।
भयाण असूनी संकट, चिमणीची बघता शक्ती,
यश मिळविले तिने, योजूनी केवळ युक्ती ।।१५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे ।
परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे ।।१
आपण कर्म केलेले आपणचि भोगतो ।
फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो ।।२
आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना ।
खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना ।।३
इतरांसाठीं आहे ती भावना उदरीं ।
सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी ।।४
शोक भावना दाखवी तुझ्या दुःखाची ।
नसतां तुज निर्दयी ठरवी हीच भीति जनाची ।।५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti