(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फक्त हिमतीने लढ

    घरटे उडते वादळात
    बिळा, वारूळात पाणी शिरते
    कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
    म्हणून आत्महत्या करते ?

    प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
    शिकार मिळाली नाही म्हणून
    कधीच अनूदान मागत नाही

    घरकुला साठी मुंगी
    करत नाही अर्ज
    स्वतःच उभारते वारूळ
    कोण देतो गृहकर्ज ?

    हात नाहीत सुगरणी ला
    फक्त चोच घेउन जगते
    स्वतःच विणते घरटे छान
    कोणतं पॅकेज मागते ?

    कुणीही नाही पाठी
    तरी तक्रार नाही ओठी
    निवेदन घेउन चिमणी
    फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

    घरधन्याच्या संरक्षणाला
    धाऊन येतो कुत्रा
    लाईफ इन्शुरन्स काढला का ?
    अस विचारत नाही मित्रा

    राब राब राबून बैल
    कमाउन धन देतात
    सांगा बरं कुणाकडून
    ते निवृत्ती वेतन घेतात ?

    कष्टकर्याची जात आपली
    आपणही हे शिकलं पाहिजे
    पिंपळाच्या रोपा सारखं
    पाषाणावर टिकलं पाहिजे

    कोण करतो सांगा त्यांना
    पुरस्काराने सन्मानित
    तरीही मोर फुलवतो पिसारा
    अन कोकिळ गाते मंजुळ गीत

    मधमाशीची दृष्टी ठेव
    फुलांची काही कमी नाही
    मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
    कोणतीच रोजगार हमी नाही

    घाबरू नको कर्जाला
    भय, चिंता फासावर टांग
    जिव एवढा स्वस्त नाही
    सावकाराला ठणकाऊण सांग

    काळ्या आईचा लेक कधी
    संकटापुढे झुकला का ?
    कितीही तापला सुर्य तरी
    समुद्र कधी सुकला का ?

    निर्धाराच्या वाटेवर
    टाक निर्भीडपणे पाय
    तु फक्त विश्वास ठेव
    पुन्हा सुगी देईल धरणी माय

    निर्धाराने जिंकु आपण
    पुन्हा यशाचा गड
    आयुष्याची लढाई
    फक्त हिमतीने लढ

    फक्त हिमतीने लढ

    !! आवडली तर इतरांनाही पाठवा !!

    ऍड. अनंत खेळकर,
    अकोला

      September 14, 2016


  • ज्यांना पटते त्यांनी घ्या बाकीच्यांनी सोडून द्या

    स्पर्धापरिक्षांसंदर्भात एक लेख.. या क्षेत्रातील शिकवण्यांचं वास्तव उलगडून दाखवणारा

      July 8, 2017


  • वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?

    एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्रेंना म्हणाले, “वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?”

    अत्रे म्हणाले, ” योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन.”

      December 31, 2010


  • सुख जेव्हा लोटांगण घालते

    यंदाच्या अनंत चतुर्दशीला लिहिलेल्या माझ्या काव्य लेखातील सरत्या ओळी मला पुन्हा पुन्हा आठवू लागल्या मी बाप्पाकडे काहीतरी मागावं असं म्हणून म्हटलं होतं …..

      June 30, 2025


  • नेपाळी मित्राचा सहवास

    त्याची मातृभाषा नेपाळी. तो नेपाळहून महाराष्ट्रात येतो. आई देवाघरी गेलेली. वडील गुरखा म्हणून रात्रभर जागत. गावात पहारा देत. लोकांना जागवत. एक भाऊ पाठीशी. तो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण घेतो. गावातील व्यापारी , शिक्षक त्यांना मदत करतात. माणुसकी जपतात. मराठी भाषा उत्तम बोलतो. पुढे तो इंजिनीयर होतो. पुण्यामध्ये स्वत:चे वर्कशॉप चालवतो. जगण्यासाठी धडपड करतो. आता ते दोघेही भाऊ परदेशात काम करतात.

    बालपणी आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. गावाकडून माझा डबा यायचा. मनसोक्त जेवायचे. तलावात पोहायला जायचे असा दिनक्रम. आंतरराष्ट्रीय, अनभिज्ञ, विषयावर तो बोलायचा. उत्सुकतेने आम्ही ऐकायचो. आम्ही घडत होतो. तो आम्हास घडवत होता.

    कलाटणी देणारा हा मित्र होता. भीमबहादूर लालबहादूर बम असे त्याचे नाव. त्याची मातृभाषा मराठी नसतानाही या विषयात त्याला सर्वात जास्त गुण दहावीच्या परीक्षेत मिळाले.

    तीसेक वर्षांपूर्वीच्या त्याच्या सहवासातील अनेक आठवणी ताज्या आहेत. पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास असायचा. कष्ट घेऊन, परिस्थितीशी झगडणे, यश संपादन करणे हे गुण त्याच्याकडून शिकायला मला मिळाले. शिकण्यासारखे त्याच्याजवळ भरपूर होते. त्यांचे वडील आजमितीस हयात नाहीत. माणसं आठवणी ठेवून जातात कुठे? हा निरुत्तर करणारा प्रश्न. आता त्यांची भेट नाही; पण माणूस सहवासात घडतो, तो सहवास आम्हाला लाभला.

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, बीड

      November 8, 2016


  • हे सुर्वे नारायणा…..(श्रद्धांजली)

    तु वारसदार सूर्यकुलाचा

    ज्यांना थांबणे माहित नाही……………

      August 16, 2010


  • यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं..!

    यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. त्यांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रापुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला.

      March 13, 2013


  • आजी

    आज दिवाळेक ईल्लले मुंबईकार परत तात्याकडे ईले. दिवाळेच्या विषयार चावदिवसाच्या आंघोळीचो विषय ईलो.... आणि तात्याक सांगल्यानी... तात्या तुकाआवस कशी न्हावक घाली ती सांग?

    तातो म्हणता अरे मी आवस बघुकच नाय... मेली 3 म्हयन्याचो आसताना... आजयेन सांभाळल्यान माका...

    आता आजी कशी होती?

    मेल्यानू आवस मी काय बघुक नाय ... बापाशीन दुसरा लगीन काय करूक नाय ... माका आनी हयत्या ईट्याच्या बापाशिक तिनाच सांभाळल्यान...... चावदिवसाक सकाळी पयल्या कोंब्याक ऊठय.... तेवा भयानक थंडी..... दातार दात आपटत.... बेसनच्या पिटाचा उटना लाय.... आऩी न्हावक घाली.... पयलो तांबयो आंगार वतल्यान काय अशी शिरशिरी येय ..... आठावला काय आजय आंगार काटो येता.... तेवा कोन पयलो कारीट फोडता तेचे पैजी लागत.... पण म्हातारेन मरापर्यंत माका कारिट पयला फोडुक गावाक व्हया तेची काळजी घेतल्यान... तेवा न्हानयेरला मडक्या रंगवची पद्धत होती रे.... तेका कारटाचो हारय घालित आदल्यादिवशी.... न्हानी सारवन सापसुप केली जाय.... आता सारखी परीस्थीती नाय रे तेवा... पण वालयच्या गोड्या फोवाची सर मेल्यानू तुमच्या जिलेबीक येवची नाय अशी चव होती तिच्या हाताक.... आणी एक गोस्ट सांगतय तुमका... अरे मयग्या तुझो आजो मरताना आजयेेक पाठवल्यान आमच्याकडे आनि सोलाची कडी करुन घेतल्यान... आणी ती पीऊन मगे प्राण सोडल्यान .. ईचार बापाशीक अशी चव होती तिच्या हाताक.... वायंगान पेरतानाचे पोऴयेची आठवण कोणय आजुनय सांगात.... तिच्या हातचा एकदा खल्ललो जल्मात ईसराचो नाय

    तीच्या हाताक गुन होतो.... मी जी औषधा देतय ती तीनाच दाखवलेली.. ती आणी धोंडग्याची आवस खास मैत्रीनी... आणी दोघाय औषधा देयत... धोंडग्याच्या बायलेन छळल्यान सासयेक. ... त्याऐवजी औषधा शिकली आसती तर भला झाला असता.... आता रडता सासू बरी होती.....

    म्हातारेन माका सगळा शिकवल्यान... बापाशीची माझ्या मरापर्यंत हिम्मत नाय होती ..आजी पुढ्यात आसताना माका हात लावची... काय सांगु पोरांनो तुमका... अगदी म्हारापोरापासुन भिकार्या पर्यंत तिच्या समोरसुन कोन ऊपाशी जावक नाय..... कदाचीत आजचे आमचे दिवस हे तीचीच पुण्याई...

    प्रत्तेक घराक घरपण व्हया तर एक म्हातारी व्हयी रे......

    तिच्या शिवाय घराक घरपण नाय रे येना... आसलेल्यानी झपले तर म्हातारे सांभाळा रे ... मगे नाय गावाची.......

    ..... बापुर्झा

    डॉ बापू भोगटे

      March 12, 2017


  • गर्द रानातला गड-वासोटा

    सातारा जिल्ह्यात पाहण्यासारखे अनेक गड किल्ले व पठारं आहेत, त्यातच महाबळेश्वर कोयना, डोंगर रांगेत वसलेल्या वासोट्याला जाणं म्हणजे “दुर्गप्रेमी व ट्रेकर्स” साठी एक पर्वणीच आहे.

      July 8, 2013


  • कुणी घर देता का…घर?

    झोपडपट्टी पुनर्वसन(एस.आर.ए.) योजनेंतर्गत झोपडीधारकाला फुकट मिळणारे घर किमान १० वर्षे विकता येणार नाही अशी नियमावलीत अट आहे. नव्याने झोपडपट्ट्या वाढू नयेत एवढाच त्यामागचा उद्देश होता. …..

      January 29, 2013