(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • कळत नकळत शीर्षक गीत

    कळत नकळत या मालिकेचे शीर्षक गीत

  • महागाई कमी होणार तरी कधी ?

    देशातील महागाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. तुरडाळीचे दर अव्वाच्या सव्वा वाढण्यापासून खर्‍या अर्थाने सुरू झालेलीमहागाई कांदे आणि दुधापर्यंत येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे हे सर्व सरकारला दिसत असूनही त्यावर ठोस उपाय होतानादिसत नाहीत. आठ रुपयांवर असणारा कांद्यांचा दर शंभर रुपयांवर न्यायचा आणि चाळीसवर आणल्यानंतर भाव कमी केलेम्हणून पाठ थोपटून घ्यायची असे सरकारचे धोरण आहे.

  • सखी, अलिबाग

    मुक्तांगण ही संस्था चालु करुन लहान मुलांमधील मुलपण जपण्याचा प्रयत्न करीत असताना सौ स्वाती लेले यांनी अधिक खोलात जावून तळागाळातील महिलांच्या उन्नतीसाठी सखी चा मंच उभारायचे ठरवले व या कामी त्यांना त्यांच्या जीवाभावाच्या तेरा मैत्रिणींची साथ मिळाली. सखी ने कुठलीही जहिरातबाजी न करता अलिबागमधील गरजु महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना नियमीत रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.

  • थांब ना आई

    पालकांनी ही कविता जरुर वाचावी

  • भक्तीयोग

    देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
    गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
    मोदकच का ?
    गणेशांना आवडतो म्हणून !
    का आवडतो ?
    गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

    देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
    पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

    नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

    वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

  • एक रुपया दंड

    ” सर, आपल्या इथे पेंटिंग सेक्शनचा राजेश हल्ली फार चिडचीड करायला लागला आहे.” सुपरवायझर गडहिरे सकाळी सकाळी तक्रार घेऊन आले होते.” अरे, मग तुम्ही त्याच्या चिडचीडीच कारण शोधायचा प्रयत्न करा .”

  • विरही भैरवी

    प्रत्येक झाडाचे
    प्रत्येक पक्षी कसले तरी
    कसले तरी गाणें गातो
    प्रत्येक सूर
    पानाइतकाच झाडांनाही
    आपला आपला वाटतो
    गाणें गातात
    देणें देतात
    झडून जातात
    उडून जातात
    झाडे नुस्ती नुस्ती
    नुस्ती रहातात
    आरतीप्रभूंची ही अजरामर कविता. छंदात्मक रचनेपासून वेगळे अस्तित्व दाखवणारी आणि तरीही आशयाचा अप्रतिम नमुना दाखवणारी. केवळ शब्दांच्या उलटापालटी मधून, वेगवेगळे आशय व्यक्त करणारी. या कवितेत,
    गाणें गातात
    देणें देतात
    झडून जातात
    उडून जातात
    या ओळी मला भैरवी रागाचे अस्तित्व दर्शवतात, असे मला वाटते. भैरवी रागिणीचा सगळा प्रवास हा असाच चालू असतो. स्वर येतात आणि येताना काहीतरी संपल्याची जाणीव देत, मनाला हुरहूर लावतात. ही रागिणी अशीच आहे, साफल्याचे समाधान देत असताना, अस्तित्वाचा अंत दर्शवत असते. कधीकधी तर दु:खाच्या आवर्तात गुंतवून ठेवतात आणि तसे ठेवत असताना, या भावनेच्या अनंत "परी" दिसतात. इथे, अंत संपून जीवनाची नव्याने सुरवात झाली, असले काही नसते. जे आहे ते आता विरायला लागले आहे, हेच खरे.
    या रागात, एक, नाही दोन नाही चक्क चार स्वर कोमल आहेत. "रिषभ,गंधार,धैवत, निषाद" हे स्वर कोमल आणि त्यामुळेच, या रागाची ठेवण अंतर्मुख आहे. वादीसंवादी स्वर आहेत - मध्यम/षडज. भारतीय संगीतातील, "षडज/पंचम" भावानंतर "षडज/मध्यम" भावाला अनन्वित महत्व आहे. तसे बघितले तर संस्कृत ग्रंथानुसार रागिणीचा समय, दिवसाचा पहिला प्रहर किंवा पहाटेची वेळ दर्शवली आहे. पण, भैरवी ही रागिणी, कधीही सादर केली तरी तितकीच गहिरी, आर्त आणि अवीट गोडीची आहे. रागाच्या प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "रे ग रे ग सा रे सा","प ध नि ध म","सा ग रे ग म". या स्वरांना अतिशय महत्व आहे.
    "मेवाती" घराण्याचे प्रथितयश गायक, पंडित जसराज यांनी सादर केलेली भैरवी आपण ऐकायला घेऊया. मुळात, पंडित जसराज यांचा अत्यंत मुलायम आवाज पण विसविशीत नसलेला. प्रसंगी अति खर्जात जाउन देखील आवाजाचा निराळाच पोत दाखवण्याचे त्यांचे कौशल्य असामान्य आहे. गायनात केवळ मेवाती घराण्याचेच सौंदर्य न दाखवता, बरेचवेळा आग्रा घराण्याची छाया देखील पडलेली आढळते. रागदारी गायन, सुगम संगीताच्या जवळपास आणता येते, हा विचार त्यांच्या गायनातून वारंवार दिसतो, याचा परिणाम असा झाला, अगदी सामान्य रसिक देखील, त्यांच्या गायकीकडे आकृष्ट झाला. तीनही सप्तकात विहार सहजतेने करण्याची अचाट क्षमता, "मुर्घ्नी" स्वराचे अस्तित्व दाखवण्याची करामत, आणि "मूर्च्छना" या अतिशय अवघड अलंकाराचे दर्शन घडविणे इत्यादी सौंदर्यस्थळे सहज मांडता येतात.
    "रसिकनि रस में रहत" या अप्रतिम रचनेत, आलापीतून रागाचे सौंदर्य अतिशय विलोभनीय पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळते. स्वरांवर आरूढ होण्यापेक्षा त्या स्वरांशी "मैत्री" साधून, रागाचा आविष्कार कसा करता येऊ शकतो, याचे ही रचना हे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल.साधारणपणे, भैरवी म्हटले की - आता सगळे संपत आले, ही भावना दृग्गोचर होते. हे संपणे, साफल्याचे असू शकते, अपयशाचे देखील असू शकते परंतु आता पुढे काही नाही, हीच भावना या रागातून जी प्रकर्षाने आढळते, तिचा आढळ या रचनेतून पुरेपूर घेता येतो. अर्थात, या रागाचे जो "स्वभाव" आहे, त्या स्वभावाला साजेसे असे गायन म्हणजे परिपूर्तीचा अप्रतिम अविष्कार आहे.
    संगीतकार जयदेव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नवोदित गायकांना, गायनाची संधी दिली आणि त्यांना प्रकाशात आणले, जसे हरिहरन, सुरेश वाडकर किंवा छाया गांगुली. छाया गांगुली तर, हे गाणे प्रकाशात येण्याआधी फारशी कुणाला माहितीच नव्हती. "गमन' सारखा नवी वाट चोखाळणारा चित्रपट, अशा चित्रपटातील "आप की याद आती रही" हे गाणे भैरवी रागातील, एक अनुपमेय रचना म्हणून गणली जाते.
    "आप की याद आती रही रातभर,
    चश्म-ए-नम मुस्कुराती रही रातभर".
    निखळ रचना म्हणून जरी या गाण्याची विचार केला तरी हे गाणे फार वेगळ्या ढंगाचे आहे. एकतर रचना, ठराविक साच्यात बसणारी नाही. सुरवात फक्त आलापीमध्ये गायन तर मधेच वाद्यमेळ फार वेगळ्या अंगाने वाजलेला. आता भैरवीचाच विचार करायचा झाल्यास, "आप की याद" या ओळींच्या सुरांतून नेमके सूचन होते. गाण्यात, मध्येच अतिशय गुंतागुंतीच्या रचना आहेत तसेच गायन देखील त्याच अंगाने गेलेले आहे. गाण्यातील ताल देखील तसा खास "उठावदार" नसून, गायकीला पूरक इतपतच तालाचे अस्तित्व आहे. ययाचा परिणाम असा झाला, गाण्यात गायनाला अपरिमित महत्व मिळाले. खरतर जयदेव यांच्या बहुतेक सगळ्या गाण्यांत, वाद्यांचा नेहमीच नाममात्र वापर असतो. थोडे बारकाईने ऐकले तर आपल्याला समजून घेत येईल, मोजक्याच वाद्यातून चालीची अर्थपूर्णता आणि शब्दांचा आशय अधिक अंतर्मुखतेने सादर केलेला आढळून येतो. या गाण्यात, जेंव्हा सुरवातीला ताल विरहित गायन चालू असताना, या कौशल्याची प्रचीती आपल्याला नेमकेपणाने घेता येते.
    गीतास रागाधार असावा पण गीत रागात नसावे, या पंथाचे, जयदेव हे संगीतकार आहेत. प्रस्तुत गाण्यात, याच वाक्याचा प्रत्यय आपल्याला घेता येतो. भैरवी रागाचे सूर ऐकायला येतात, जाणवतात पण गाणे भैरवीपासून वेगळे होते आणि मुख्य म्हणजे "गाणे" म्हणून सादर होते. बरेचवेळा इष्ट ते चमकदार वा भरून टाकणारे सुरावटींचे परिणाम देखील जयदेवांनी वेचक वाद्यांच्या सहाय्याने साधले आहे. इथे आपल्याला बासरी वाद्याने साधलेला इष्ट परिणाम ऐकायला मिळतो. गीताचा लयबंध यामुळे पुढे सरकत असला तरी तो गीतास बळजबरीने पुढे ढकलतो आहे, असे अजिबात दिसत नाही आणि, संगीतकार म्हणून जयदेव इथे फार वेगळे होतात. आणखी खास वैशिष्ट्य लिहायचे झाल्यास, साधे, मधुए आणि तसे पहाता परिचयाचे, बारकाव्यांनी भरलेले व विस्तारशक्यता असलेले संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत असत. बरेच रचनाकार नेहमी म्हणतात, मुखडा सुचण्यातच खरी प्रतिभा लागते. नंतर सगळे बांधकामच असते आणि हे जर मान्य केले तर जयदेव फार मोठे कारागीर ठरतात.
    आताचे गाणे आपण ऐकणार आहोत, हे देखील सरळ सरळ भैरवी रागावर आधारित अजिबात नाही पण, आपण चित्रपट गीत बांधत आहोत, याची नेमकी जाणीव ठेऊन, रचना केल्याचे स्पष्टपणे दिसते. "हमे तुमसे प्यार कितना" हे "कुदरत" चित्रपटातील, संगीतकार राहुल देव बर्मन यांनी सादर केलेली रचना आहे.
    "हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते;
    मगर जी नहीं सकते, तुम्हारे बिना."
    किशोरकुमारने गायली आहे. गाण्यात, केरवा ताल वापरले आहे. या संगीतकाराची खासियत अशी आहे, गाण्यातील ताल हा कधीही पारंपारिक पद्धतीने आपल्या समोर येत नाही, पण जर का मात्रांचा हिशेब लावायला बसलो तर मात्र, भारतीय पद्धतीचा ताल आढळतो. अर्थात, गाणे भारतीय बनावटीचे असल्याने, हा संगीतकार, परंपरेपासून जरी फटकून वागत असला तरी त्याची अखेर मात्र परंपरेशी नाळ जोडून असते. इथे गंमतीचा भाग म्हणजे चालीतून रागाचे सूचन होण्यापेक्षा, गाण्यात जो वाद्यमेळ वापरला आहे, त्यातून भैरवी रागाचे सूर आपल्याला मिळतात याचेच वेगळा अर्थ, तत्काल म्हणजे महत्वाचे वा अर्थपूर्ण सांगीत विधान करण्याआधीच परिणाम साधणे, हे या संगीतकाराचे आद्य उद्दिष्ट होते. म्हणूनच त्याने बहुदा तारतेच्या ध्वनीपरिणामावर लक्ष केंद्रित करून संगीत रचना मार्ग थोडा सहज करून घेतला. हे ध्वनीपरिणाम सर्वांत सहज आणि सर्वांच्या कानात लवकर शिरते, त्याचा बोध होतो.
    मघाशी मी, तालाच्या बाबतीत जे मांडले आहे, त्या बाबत आणखी लिहायचे झाल्यास, ध्वनीपरिणाम, भारतीय केरवा तालाशी वरकरणी साम्य नसणारा मात्रांचा एक लायाबंध, तसे बघत सुटेपणाने केलेले गायन, सहज प्रतीत न होणारी सुरावट आणि घसीट तसेच मींड या स्वर लगावांचा मुबलक वापर करताना, लयखंडाचे भान काळजीपूर्वक ठेऊन, सादर केलेले गायन!! या संगीतकाराच्या शैलीचा आणखी एक बारकावा म्हणजे अनेक वेळा रचनेचा लयबंध लयवाद्यांतून प्रतीत न होता गीताच्या गतीतून प्रत्ययाला येतात. गीतांत लय प्रतीतीला येते ती शब्दांच्या घनतेमुळे, चरणाला आणि छंदाला मिळणारी गती अबाधित राहिल्यामुळे. या गाण्याच्या बाबतीत आपल्याला असे म्हणता येईल, भैरवी रागचौकटीपासून दूर सरकूनही रागाचे एकसंधपण आपल्या चालीस देण्याची प्रशंसनीय क्षमता या संगीतकाराकडे होती. भोवतालच्या निसर्गाचे निमित्त करून काहीसे अंतर्मुख होण्यासाठी हे गीत अवतरले आहे आणि या परिणामासाठी, या संगीतकाराने इथे संयमित भावनावेग आविष्कृत शास्त्रोक्त बाज - किंचित पातळ करून - एक अप्रतिम चित्रपट गीत निर्माण करण्यासाठी कामी लावला आहे, असे ठामपणे म्हणता येते.
    सुप्रसिद्ध गझल गायक, जगजीत सिंग यांनी भैरवी रागावर आधारित अतिशय सुरेख रचना सादर केली आहे. मुळातली अतिशय मुलायम गायकी आणि त्यात भैरवी सारखी रागिणी!! रचना अप्रतिम होणारच. अतिशय ठाय लयीत सुरु झालेली ही रचना, शेवटपर्यंत त्याच लयीत चालत आहे आणि सुरवातीला घडवलेला परिणाम, उत्तरोत्तर गडद होत जातो.
    "मेरी तनहाइयो तुम ही लगा लो मुझको सीने से,
    कि मैं घबरा गया हुं इस तरहा रो-रो के जीने से".
    जगजीत सिंग यांच्या सादरीकरणात बरेचवेळा तोचतोचपणा जाणवतो पण, जर का गाण्याची चाल, स्वतंत्रपणे तपासली तर त्यात नेहमीच वैविध्य आढळते. गायनशैली कायम ठेवल्या मुळे, ऐकायला येणाऱ्या हरकती आपल्याला सारख्या वाटतात. उर्दू गझल सामान्य माणसापर्यंत पोहोचवताना, त्यातील "अर्क" सांभाळून सामान्य लोकांना "सजग" करण्याचे काम, या गायकाने निश्चित केले असे म्हणता येईल.
    आधुनिक चित्रपट संगीतात, "शंकर-एहसान-लॉय" या त्रिकुटाने आपले स्थान सिद्ध केले आहे. सध्या एक समज प्रचलित झाला आहे, चित्रपट गीतांतील "मेलडी" हरवत चालली आहे आणि त्यात थोडेफार तथ्य देखील आहे पण ज्या संगीतकारांनी मेलडीबाबत प्रशंसनीय काम केले आहे, त्यात यादीत या त्रिकुटाचे नाव घ्यावेच लागेल. वास्तविक, शंकर महादेवन हा गायक म्हणून फारच अप्रतिम आहे. कुठल्याही प्रकारचे गाणे गायची क्षमता याच्या गळ्यात आहे आणि केवळ गायचे म्हणून नसून, गायलेले गाणे प्रतवारीनुसार अप्रतिम ठरेल, याची खात्री देता येते. "लक बाय चान्स" या शंकरने "सपनो से भरे नैना" हे गाणे गाउन, आपल्या गायनातील वैविध्याचा असामान्य पुरावा सादर केला आहे.
    "बगीया बगीया बालक भागे,
    तितली फिर भी हाथ ना लगे,
    इस पगले को कौन बताये,
    ढूढ रहा हैं जो तू जग में,
    कोई जो पाये तो, मन में ही पायें;
    सपनो से भरे नैंना, तो नींद है ना चैना".
    प्रसिद्ध शायर जावेद अख्तर यांच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, त्यांची शब्दरचना कधीही एका ठराविक पातळीच्या खाली घसरलेली फारशी दिसत नाही. काही वेळा अपवाद म्हणून फडतूस शब्दरचना वाचायला मिळेल पण संपूर्ण आवाका बघितला तर दर्जा दिसून येतो. बरेचवेळा उर्दू शब्दांची पखरण दिसते पण त्यामुळे शायरीच्या श्रीमंतीत भर पडली आहे, असेच दिसून येते. तसे बघितले तर, प्रस्तुत गाणे पारंपारिक भैरवी थाटात बसत नाही पण तरीही सादरीकरणाच्या दृष्टीने बघितले तर गाणे सुंदर वाटते. सुगम संगीतात, रागाची तंतोतंत ओळख पटवून घेण्याचा अट्टाहास हा चुकीचाच असतो आणि हे एकदा मान्य केल्यावर मग हे गाणे आपल्या पचनी पडू शकते.
    - अनिल गोविलकर

  • डेल्टा-१५ (९-११ च्या दिवशी घडलेली सत्यकथा)

    दिनांक सप्टेंबर ११, २०१२. अकरा वर्षापूर्वी घडलेल्या ह्या सत्य घटनेची हकीकत एका फ़्लाईट-अटेंडंटकदूनच ऐका:  दिनांक ९-११-२००१. आमचे विमान फ्रांकफूर्टच्या विमानतळावरून निघून जवळ जवळ ५ तास ऊलटून गेले होते. नुकत्याच दिल्या गेलेल्या ड्रिंक्स आणि खाण्यामुळे खर तर प्रवासी मंडळी खूप आळसावलेली होतो. आता एखादा मस्तपैकी सिनेमा पहावा, नाहीतर छानपैकी तण्णावून द्यावी अशा विचाराने सारे तयारी करू लागलेले मी अगदी स्पष्ट पाहिले.

  • लायब्ररी

    एक वास्तू माझ्या-तुमच्या, सगळ्यांच्या कॉलेजमध्ये आहे. आपण येता-जाता ती नेहमीच बघतो. कोणती ही वास्तू?आठवतं का? ही आहे आपल्याच कॉलेजमधली लायब्ररी. बरेच दिवस इथे तुमची पावलं फिरकली नसतील तर चला एक फेरफटका मारू.

    कॉलेजातली लायब्ररी.. एका कोप-यातली.. शांत शांत. जिथे पाऊल टाकताना तिथल्या शांततेचा दबदबा वाटतो. जरा कुठे खुट्ट आवाज झाला की सर्व कोप-यांमध्ये अचूक नजर ठेवून असणा-या लायब्ररीयनची नजर आपल्याकडेच असेल म्हणून आपल्याला तिथे भीती वाटते. अर्थात त्यांची भीती वाटते म्हणून नाही पण एकूणच लायब्ररीत जाण्याची फारशी हौस नसल्यामुळे आपण तिथे फिरकत नाही. कधी कधी लेक्चरला बंक मारून टाईमपास म्हणून लायब्ररीत जाऊन पुस्तकं चाळण्याची हुक्की येते पण तिथे ग्रुपने जाऊन गप्पा मारता येत नाहीत, मग अशा खेपा कमीच होतात. लायब्ररीची आठवण सर्वानाच हमखास परीक्षेच्या वेळी येते.

    निवांत अभ्यास करण्यासाठी कॉलेजातले सर्व कट्टे भरून जातात तेव्हा लायब्ररीत जागेची शोधाशोध सुरू होते. इथल्या शांततेत आणि मित्रमैत्रिणींच्या बरोबर अभ्यासाला एक वेगळीच लय येते. खरं तर इथली पुस्तकं आयुष्य समृद्ध करणारी असतात. आता मात्र एका क्लिकवर मिळणा-या माहितीकडे कल वाढला असून कॉलेजातली लायब्ररी विस्मृतीत जातेय की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. आजकाल विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी मोबाईलवर उपलब्ध असते. पण काहीही असो.. ख-या लायब्ररीची सर कोणालाच येणार नाही. याचं कारण तिथलं वातावरण. मन लावून अभ्यास करण्याची स्फूर्ती देणारी जागा म्हणजे कॉलेजातली लायब्ररी. ‘अभ्यासू’ प्रकारात मोडणा-या मुलांचं जणू दुसरं घर. आपल्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील नोट्सपासून ते साहित्यविश्वातील प्रसिद्ध पुस्तकं, वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिक, मासिके, नियतकालिके, अनियतकालिके, दिवाळी अंक आदी सर्व आपल्या कॉलेज लायब्ररीमध्ये उपलब्ध असतात. परंतु हल्लीचे विद्यार्थी इंटरनेटवर जास्त विसंबून राहात असल्यामुळे लायब्ररी आता सुनीसुनी वाटते.

    चुकला फकीर मशिदीत सापडतो त्याप्रमाणे परीक्षेच्या काळात चुकला विद्यार्थी सापडण्याची हमखास जागा म्हणजे लायब्ररी! कधी कोणाचा डोळा चुकवायचा असेल तर विद्यार्थी मुद्दामहून लायब्ररीत जाऊन बसतात. अभ्यास करताना संदर्भासाठी लागणारी पुस्तकेही इथे असतात, परंतु इंटरनेटनं आपल्याला एवढं आळशी बनवलं आहे की सर्च इंजिनमध्ये आपल्याला हवा असलेला शब्द टाकला तर त्याच्याशी संबंधित लाखो वेबसाईटस् मिळतात. मग का बरं संदर्भाची एवढी जड पुस्तके वाचायची? असा विचार करणारे विद्यार्थी लायब्ररीकडे फिरकत नाहीत.

    आपण, थ्री इडियटस्, टू स्टेट्स, कुछ कुछ होता है, मोहब्बते अशा चित्रपटांमध्ये कॉलेज लायब्ररी पाहिली असेल. पुस्तकांनी भरगच्च लायब्ररी, त्यात प्रेमीयुगुल डोळ्यांनी बोलताहेत किंवा एखादं कॉलेज जीवनातलं रोमँटिक गाणं असं काहीसं चित्र तुमच्या मनात लायब्ररीविषयी असेल. या फिल्मी लायब्र-या पडद्यावर पाहायला मजा वाटते. पण तुमच्या स्वत:च्या कॉलेजच्या लायब्ररीतही जरा डोकावून पाहा की! आजची तरुणाईही खूप वाचते, लिहिते असं म्हणतात. पण हे वाचणं केवळ ऑनलाईन रीडिंग आहे किंवा ऑनलाईन विकत घेतलेलं पुस्तक असतं. त्यामुळे भरगच्च वाटणारी कॉलेज लायब्ररी आता काहीशी ओस पडलेली दिसते. काही महाविद्यालयात तर आपली नजरही पुरणार नाही एवढय़ा लांबचलांब लायब्ररी आहेत, जिथे गेल्यावर हे पुस्तक घेऊ की ते घेऊ असा विचार पडतो.

    पूर्वी परीक्षेच्या काळात तर लायब्ररीमध्ये बसण्यासाठी रांगा लागत असत. बसायला जागा मिळणार नाही या विचारानेच विद्यार्थ्यांना सकाळी लवकर जाग यायची, त्यातही आपल्याला हवं असलेलं पुस्तक जर कोणी घेतलं तर परीक्षा संपेपर्यंत आपल्या हातात येणार नाही या कल्पनेनं बिचारे विद्यार्थी सकाळीच कॉलेजची पायरी चढत असत. शिवाय गेल्या वर्षीच्या नोट्स, गेल्या वर्षीचे पेपर्स हे सारं लायब्ररीत उपलब्ध असल्याने त्यासाठीही विद्यार्थ्यांची रांग लागायची. आणि हो.. आजही हे सर्व अभ्यास साहित्य तुमच्या कॉलेजच्या लायब्ररीत देखील उपलब्ध आहे बरं!

    लायब्ररी हे दुसरं घर वाटतं त्यामुळे तिथले ग्रंथपाल म्हणजे लायब्ररीयन सुद्धा अगदी घरचेच वाटतात. प्रत्येक वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांवर यांची बारीक नजर असते. आताशा मुलांना आपला ग्रंथपाल कोण आहे याची देखील जाणीव नसते. कोणत्या चित्रपटाचं शूटिंग असेल किंवा प्रश्नपत्रिका लायब्ररीत मिळत आहेत अशी अफवा उठली तरच आपण लायब्ररीचा रस्ता धरतो, नाही तर ती वाट मात्र विद्यार्थ्यांची वाट पाहतच उभी राहते. इंटरनेटवर सर्व पुस्तके उपलब्ध असली तरी कधीतरी त्या लायब्ररीत जाऊन बघा, माहीत नसलेली पण वाचावीशी वाटतील अशा पुस्तकांशीही तुमची भेट होईल. केवळ परीक्षा आलीय म्हणून जाऊ नका, तर आपल्याच कॉलेजचा हा एक भाग तुमच्या किती मदतीचा ठरू शकतो हे अनुभवण्यासाठी लायब्ररीची रोज एक खेप माराच. इथेच वाचन, संग्रह, लिखाणासारख्या चांगल्या सवयी लागतील. आणि तुमच्या येण्या-जाण्यामुळे थोडीशी अडगळीत पडलेली कॉलेजची लायब्ररी पुन्हा एकदा हॅपनिंग होईल!

    -- स्नेहा कोलते

  • आयुष्याची तुझ्या फुले

    आयुष्याची तुझ्या फुले