(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माहेर

    कौसल्या’ स्वतःचा खर्च स्वतः चालवण्याला समर्थ होती. कारण ‘कौसल’ देशाचं उत्पन्न तिच्या मालकीचं होतं असं म्हणतात. रामाला ‘कोसलपती’ हे नाव कौसल्येकडून मिळालेल्या राज्यामुळे पडलं असावं. स्त्रियांचा माहेरावरचा अधिका विवाहानंतरसुद्धा शाबूत राहात असावा.

  • नातलगांच्या भेटीची ओढ ! (बेवड्याची डायरी – भाग १४)

    व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यावर पहिले पंधरा दिवस काही विशेष कारण असल्याशिवाय नातलग तुम्हाला संपर्क करू शकत नाहीत ..कारण व्यसन बंद केल्यानंतरच्या सुरवातीच्या काळात ..व्यसनी व्यक्तीला अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतात ..अशा वेळी घरी जाण्याची ओढ असते मनात ..जर संपर्क झाला तर बहुतेक जण ..मला इथे खूप त्रास आहे ..इथली व्यवस्था मला आवडली नाही ..आता मी घरी येतो ..या पुढे मी अजिबात व्यसन करणार नाही ..वगैरे प्रकारचे बोलून कुटुंबियांना घरी नेण्यास आग्रह करतात ..

  • माझ्या पावसाळी चारोळ्या…….

    पावसावरची ही चारोळी प्रातिनिधिक आहे. कृपया माझ्या या पहिल्या प्रयत्नासाठी आपल्या काही सूचना किंवा काही प्रतिक्रिया असतील तर त्या स्वागतार्ह आहेत.

  • मार्ग

    मार्ग

  • चाकोरीबाहेर जाऊन हळद उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

    नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांचा परिसर कसमादे पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करुन शेती उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयोग देवळा येथील पेशाने शिक्षक असलेल्या संजय देवरे या शेतकऱ्याने केला आहे. हळदीचे पीक घेऊन त्याचे जास्त उत्पादन काढण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करुन दाखविला आहे.

  • मन माझे पाखरू !

    कवितेतून मनाचा गुंता सोडविण्याचा प्रयास..!

  • स्पॉट लाईट

    जहाज भुमध्य समुद्र ओलांडून अँटवर्प कडे चालले होते सकाळी जिब्राल्टरला बंकर घेण्यासाठी थांबलो होतो सगळी बंकर प्रोसीजर पूर्ण होता होता जहाज निघताना रात्रीचे नऊ वाजले होते.

  • अंतु बर्वा

    कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. "अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला." अश्या वेळी अंतूशेटच्या जिभेवर लक्ष्मी नाचते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

    स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

  • आतल्या आत

    खळखळ वाहणारी नदी, तिच्या काठावर असलेला वटवृक्ष. त्याच्या विस्तीर्णपणे पसरलेल्या पारंब्या. पारंब्यातून पुन्हा नव्या वृक्षाची पालवी फुटतेय, असे स्वप्नवत चित्र. फार पुर्वी बघायला मिळत होते. आता तसे राहिले नाही. असेल कुठे एखाद्या गावकुसात. आपल्याला ते माहित नाही इतकेच. आपल्याला खरे तर बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आपल्याला हे ही माहिती नसतं आपल्याच आत दडलेला वटवृक्ष अन त्याच्या विस्तारणाऱ्या पारंब्या अन पुन्हा त्या पारंब्यांना फुटणारी नवी पालवी… काही म्हणता काहीच माहिती नसतं. अस होण्याचं कारण काय असलं पाहिजे. खरे तर दोन कारणं असू शकतात का? एक म्हणजे आपण बाहेर वागतो वेगळे, आत असतो वेगळे. हे आत आणि बाहेरचं जे जगणं आहे तेच धोका देत राहतं सदैव आपल्याला आणि आपल्या मुळांना, आपल्या पारंब्यांना. वटवृक्ष जितका विस्तीर्णपणे पसरलेला असतो, तितकाच तो जमिनीत खुप आत गेलेला असतो ना. आठवतोय ना गावांत राहत असतांना घराच्या भींती छेदून आत आलेली वटवृक्षांची मुळं. आठवत असतील ना शाळेच्या व्हरांड्याला तडा पाडणारी वटवृक्षाची मुळं. अशा अनेक आठवणींची जत्रा भरत असते नेहमीच आपल्या आत. आतल्या आत… कधी तिचा आपण सरळ सामना करतो, कधी जत्रेत फेरफटका मारून येतो. कधी जत्रेत हरवून देखील जातो. पण वास्तवाची धग लागली की तत्काळ भानावर येतो. जत्रेतून बाहेर पडतो. कधी-कधी जत्रेत जाव असही वाटत नाही, आताची भरणारी जत्रा आधुनिक होत चाललीय म्हणून…

    आपण जसे बाहेरच्या जगासमोर असतो ना, तसे आपल्या आतल्या जगात नसतो. बाहेरच्या जगात मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर मी व्यक्त होत नाही, मात्र आतल्या आत व्यक्त होत राहतो… अगदी स्पष्टपणे… एखाद्या घटनेचा निषेध मी थेट करू शकत नाही, मात्र आतमध्ये तो निषेध मी केव्हाच केलेला असतो. मग मी असा का वागतो वेगवेगळा. आत वेगळा, बाहेर वेगळा. का ही भूमिका मी निभावतो आत-बाहेर वेगवेगळी. एखाद्या माणसाला, तेही सर्वसामान्य माणसाला थेट व्यक्त होण्यासाठी लागणारे वातावरण निर्माण झाले नाही का या समाजात. की त्या सर्व सामान्याला सतत दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय प्रभावीपणे. आरशात आपली प्रतिमा वेगळी दिसते. चांगली दिसते, सुंदर दिसते, खरीच तशी ती असते का? की केवळ असते ते आपले प्रतिबिंब. खरे, खोटे की आभासी. या आभासीत्वाचा आपल्याला नाद जडलाय. त्याच्या मागे धावताना वास्तवाला सोडून देतो ना आपण… आणि म्हणून मग पारंब्या वेगळ्या आणि मुळं वेगळं अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच एखाद्या घटनेत मी बाहेर वेगळा असतो आतमध्ये मी वेगळा असतो. बाहेर कितीही वणवा पेटला तरी मी व्यक्त होत नाही, शांत असतो नदीत पाय सोडून बसलेल्या वटवृक्षा सारखा…!

    दिनेश दीक्षित, जळगाव. (9404955245)