जागतिक पाहुणचार
मर्ढेकरांच्या हाडांचे सापळे हासती ह्या कवितेवर अश्लीलतेच्या कारणावरून त्या काळात खटला भरण्यात आला होता. ह्या कवितेचा अर्थ वेगळ्या संदर्भात ऊलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे होय.
यादवकाळात महानुभाव व वारकरी या पंथांनी मराठीचा प्रसार करण्याची मोलाची कामगिरी पार पाडली. हे कार्य आजही सुरुच आहे. महानुभाव पंथातील चक्रधरस्वामींशी संबंधित `लिळाचरित्र (१२३८)' हे मराठीतील आद्य साहित्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. त्यानंतर संत ज्ञाानेश्वरांनी `भावार्थदीपिका' अर्थात `श्री ज्ञानेश्वरी' लिहिली.
वारकरी पंथातील संत कवी एकनाथ (१५२८ ते १५९९) यांनी भावार्थ रामायणाद्वारे मराठीतून समाजोपयोगी संदेश दिले. त्यानंतर संत तुकारामांनी (१६०८ ते १६४९) मराठीतून अभंगनिर्मिती करुन मराठी भाषेत मोलाची भर घातली. १८ व्या शतकात रघुनाथ पंडित, वामन पंडित, श्रीधर पंडित आणि मोरोपंत यांनी मराठी साहित्यात अनमोल भर घातली.
अनिल नाचणे, मुंबई
राजसाहेब, कुठे आहात तुम्ही? अवघा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय ! तुम्ही आता खणखणीत आवाज काढायलाच पाहिजे. या कॉंग्रेसवाल्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बीजेपी वालेसुद्धा चालतायत आणि सगळा महाराष्ट्र हताशपणे बघत राहिलाय...
राजसाहेब.. लवकरच काहीतरी करा हो !!!! आम्हाला टोलपासून वाचवा... हवी तर IRB शी मांडवली करा.. पण आमचा मुंबईचा टोल कमी करा हो !!!
त्या राष्ट्रवादीवाल्यांनी बारामतीचा टोल रद्द करुन घेतला... फडणवीसांनी नागपूरचा टोल रद्द करुन घेतला... आमचा मुंबईकरांचा वाली कोण ?
राजसाहेब... लवकर काहीतरी करा......
Anil Nachane - anc@gmail.com
पुर्वीचा प्रत्येक राजकारणी आपल्या पक्षाशी, त्या पक्षाच्या विचारांशी आणि तत्वाशी शक्यतो एकनिष्ठ असायचा पण आता तो कपडे बदलावे तसे पक्ष बदलतो आणि नोकरीचा राजिनामा द्यावा तसा पक्षाचा राजिनामा देतो. पुर्वी मतदारांचा एक विशिष्ठ वर्ग कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि तो कोणत्या पक्षाला मतदान करेल याचे अचूक अंदाज बांधता यायचे आता तसे ते बांधणे शक्य न राहिल्यामुळेच राजकीय भविष्य खोटी ठरतात आणि राजकीय गणित मांडणार्यां चाही गोंधळ उडतो.
मर्ढेकरांची कविता – झोपली ग खुळी बाळे – वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ
मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट (बॅलिस्टीक मिसाइल) आहेत. भारतीय , अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे. जागतीक शांततेचा प्रश्न आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत.
Please visit my blog http://crbelsare.blogspot.com
आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या.
आज या महाराष्ट्र भूमीत रहाताना,मराठी भाषेतुन संवाद साधताना आनंद आणि अभिमानानी ऊर भरुन येतो,जेव्हा आपण ऐकतो की जगात मराठी भाषेचा क्रमांक पंधरावा आहे. हजारो वर्षापूर्वी सुरु झालेला तिचा प्रवास अगदी आज ही टिकून आहे.
पुणे शहर म्हटलं तर सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येते ती “पेशवाई”. तसं पहावयास गेलो तर पुणे ही ‘विद्यानगरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा वैभवसंपन्न पुणे शहरात आणखीन ही काही वास्तू आहेत ज्या पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवतात. अशीच एक वास्तू म्हणजे “बालगंधर्व रंगमंदिर”. पुण्यातील संभाजी पार्क विभागात ही वास्तू दिमाखाने उभी आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti