(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ब्रोकर लोकांनो आमचाही थोडा विचार करा

    त्यामुळे बघा आणि विचार करा, आणि आमचही एक स्वप्नातल्या घराच स्वप्न पूर्ण होऊ द्या |

  • माझ्या पावसाळी चारोळ्या…….

    पावसावरची ही चारोळी प्रातिनिधिक आहे. कृपया माझ्या या पहिल्या प्रयत्नासाठी आपल्या काही सूचना किंवा काही प्रतिक्रिया असतील तर त्या स्वागतार्ह आहेत.

  • संगीतातून व्यसनमुक्ती… (बेवड्याची डायरी -भाग ३४ वा)

    आज सायंकाळी ' म्युझिक थेरेपी ' आहे हे मला सकाळीच समजलेले ...शनिवारी संध्याकाळी प्राणयाम आणि समूह उपचाराच्या ऐवजी संगीत उपचार होतो हे सांगून शेरकर काका मला म्हणाले होते ..तुला पण गाणे म्हणावे लागेल ..मी घाबरलोच ..मला संगीत आवडत असले तरी ..गाणी म्हणण्याचा वगैरे प्रकार कधी केला नव्हता ..गाणी खूप ऐकली होती ..म्हणजे सिनेसंगीत ..गझल्स ..विरहगीते वगैरे अनेक प्रकारची गाणी मी आवडीने ऐकत असे. .. दारू पितांना बार मध्ये बसल्यावर आम्हा मित्रांची खास गझल्स लावण्याची फर्माईश असे बारमालकाला ..मेहंदी हसन ..गुलामली ...पंकज उधास ..अशा गायकांच्या गझल्स ऐकून ' चियर्स ' करण्यात ..आम्ही वेळेचे भान विसरून जात असू ..मात्र मी कधी गाणे म्हणण्याचा प्रयत्न केला नव्हता ..शेरकर काकांनी तुला पण गाणे म्हणावे लागेल हे सांगून मला काळजीत टाकले होते ..

    काही उत्साही लोक सकाळपासूनच लायब्ररी मधून गाण्याची पुस्तके घेवून त्यातील गाणी पाठ करण्याचा मागे लागलेले..सायंकाळी ७ वाजता ...बाहेरच्या ऑफिस मधून तबला ..पेटी ..कोंगो ..अशी वाद्ये वार्डात आणून लावली गेली ..एका कार्यकर्त्याने माईक सिस्टीम लावली ..एकंदरीत वातावरण निर्मिती झाली होती ..सर वार्डात आल्यावर प्रार्थना घेवून त्यांनी बोलायला सुरवात केली ..मित्रानो मला माहित आहे आपण शनिवारच्या संगीत सभेची वाट आतुरतेने पाहता ..कारण संगीत अशी एक जादू आहे ज्याचा प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होत असतो ..आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच आहे संगीत असे म्हणता येईल ..आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण करण्याची शक्ती संगीतात आहे ..नकारात्मक भावनांवर मात करण्याची शक्ती संगीत देवू शकते ..म्हणूनच आपण इथे आठवड्यातून एकदा संगीत उपचार घेतो ..

    इथे कोणी मोठा गायक अथवा कलाकार नाहीय आपल्यात .. तरीही सर्वांनी स्वताच्या आनंदासाठी या उपचारात भाग घेतला पाहिजे अशी माझी सर्वाना विनंती आहे ..प्रास्ताविक झाल्यावर सरांनी एक हिंदी भक्ती गीत म्हंटले ..अनुप जलोटाने गायिलेले हे भक्तीगीत मी पूर्वी लहानपणी अनेकदा ऐकलेले होते ..सर गाणे म्हणतात हे पाहून मला नवल वाटले ..दुसरे सर हार्मोनियम वर बसले होते ..वा म्हणजे आज दोन्ही प्रमुख समुपदेशक या थेरेपीला हजर होते तर ..सरांचे गाणे झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या ..मग सरांनी आम्हाला एकेकाला आवाहन केले गाणी म्हणण्यासाठी ..जे उत्साही गायक वार्डात होते त्यापैकी एक जण उठून समोर गेला ..त्याने माईक हातात घेवून गाणे म्हणण्यास सुरवात केली ..' दोनो ने किया था प्यार मगर ..मुझे याद रहा ..तू भूल गई ' महुवा सिनेमातील हे दर्दभरे गाणे तो म्हणू लागला ..त्याचा आवाज यथातथाच होता ..मात्र तो अतिशय तल्लीन होऊन हे गाणे म्हणत होता ..तबल्यावर आमच्यातीलच एक जण बसला होता ..तो उत्तम तबलजी नव्हताच तरी तालाचे बरे भान होते त्याला ..मध्ये एक दोन ओळी विसरल्याने गाणाऱ्याने जेव्हा शब्दांऐवजी न ना ना न नाना ..नान न नाना सुरु केले तेव्हा सगळे हसू लागले ..दर्दभरे गीत सुरु असताना एकदम विनोदी वाटू लागले ..त्याचेही गाणे संपल्यावर टाळ्या वाजवल्या आम्ही ...

    एकाने मराठी लावणी म्हंटली ..त्याबरोबर शिट्ट्या वाजू लागल्या ..वातावरण चांगलेच रंगले ..शेरकर काका माझ्या मागे बसून मला बोटांनी ढोसत होते ..तू जा गाणे म्हणायला म्हणून ..वैतागून मी उठून दुसरीकडे गेलो ..मध्येच सर्वांनी ' वुई वांन्ट रमेश 'असा गलका सुरु केला ..एक रमेश नावाचा गांजाचा व्यसनी तयारच होता गाण्याचे पुस्तक घेवून ..हा खूप चांगला गायक असावा म्हणून सर्व त्याची मागणी करत आहेत असे मला वाटले.. रमेशने माईकचा ताबा घेतल्यावर खूप मोठा गायक असल्यासारखे जरा ' हॅलो माईक टेस्टिंग ...वन ..टू ' ...मग एकदम त्याने हिमेश रेशमाईया सारखा नाकात सूर लावला ..' झलक दिखलाजा ..एक बार आजा ...आजा ' सगळे हसू लागले ..रमेशला ताल सुराशी काही घेणे देणे नव्हते असे दिसले ..तो मस्त डोळे मिटून ...आजा ..आजा आळवीत होता ..त्याची तल्लीनता पाहून सर्वाना हसू येत होते ..सुदैवाने त्याचे डोळे बंद असल्याने त्याला समजत नव्हते की आपल्याला सगळे हसत आहेत ..एक गाणे संपल्यावर लगेच त्याने दुसरे गाणे सुरु केले ..' लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता ' ..जेमतेम दोन ओळी म्हंटल्यावर मग पुन्हा दुसरे गाणे ' ओब्लाडा डा डा डा ..ओब्लाडू डू डू ' तो डोळे मिटून असे अंगविक्षेप करत होता ..की हसून हसून आमची मुरकुंडी वळली ..बरेच मनोरंजन झाल्यावर मग सर्वांनी एकदम टाळ्या वाजवायला सुरवात केली ..गाणे सुरु असताना सतत टाळ्या म्हणजे श्रोते तुम्हाला खाली बसायची सूचना करत आहेत हा अर्थ रमेशला माहित नसावा ..त्याचे ..डा डा डू डू सुरूच होते ..शेवटी सरांनी त्याला थांबवून आता नंतर म्हणा गाणे असे सांगितले तेव्हा त्याने माईक सोडला ..

    मला लक्षात आले रमेश चांगला गायक होता म्हणून नव्हे तर त्याची फिरकी घेण्यासाठी त्याला गाण्याचा आग्रह होता होता ..बराच वेळ धमाल सुरु होती ... ' देखा ना हाये रे सोचा ना ..हाये रे ' या गाण्याला पब्लिक उठून नाचू लागले ...' खैके पान बनारसवाला ' पण झाले ..सुमारे दोन तास अतिशय मजेत गेले सर्वांचे..आम्ही सगळे आमच्या जीवनातील अडचणी ..संकटे ..दुखः ..विसरून जणू आनंदाच्या प्रदेशात शिरलो होतो ..सरांनी जेवणाची वेळ झाल्यावर सरांनी थांबण्याची सूचना केली आणि माईक हातात घेतला ..मित्रांनो सुमारे दोन तास आपण हा संगीताचा आनंदानुभव घेत होतो ..आता वास्तवात परतायची वेळ झालीय असे म्हणत ..समारोप करू लागले..

    माणसाच्या जीवनात निराशा ..अडचणी ..संकटे असणारच ..तरीही जेव्हा जेव्हा आपण खूप अवस्थ असू ..कशातच मन लागत नसेल ..सगळ्या नकारात्मक भावना घेरतील तेव्हा संगीत नक्कीच तुम्हाला सगळ्या चिंता विसरायला लावते ..व्यसने करण्याच्या काळात देखील आपण संगीताचा आनंद घेतला आहे ..मात्र पोटात आणि डोक्यात दारू असताना आलेला आनंद हा कितीही झाले तरी कृत्रिमच ...भानावर राहूनच संगीताचा खरा आनंद लुटता येतो ..गीतकाराचा शब्द न शब्द बोलका होतो ..त्यात दडलेला गहन अर्थ मनात उतरतो ..सुरांची जादू हृदयात आनंदाचे कारंजे निर्माण करते ..तसेच वाद्यांचा ध्वनी आपल्या डोक्यात ताल निर्माण करून कोणतीही नशा न करता पाय थिरकायला लावतो ..मन भारून टाकतो हा अनुभव आता आपण सर्वांनी घेतलाय ..जगातले कोणतेही मादक द्रव्य देवू शकणार नाही अशी नशा संगीत आपल्याला देते ..इथून बाहेर पडल्यावर आपण हा आनंद विसरता कामा नये ..जेव्हा जेव्हा सगळे जग तुमच्यावर रागावले आहे असे वाटेल ..जगण्याचा कंटाळा येईल ..जीवन निरस वाटू लागेल ..एकटेपणाची भावना मनाला ग्रासेल ..व्यसन करण्याची अनावर ओढ मनात निर्माण होईल ..त्या त्या वेळी आपण जर संगीताचा वापर केला तर नक्कीच आपल्याला व्यसनमुक्तीचे जीवन आनंदाने व्यतीत करण्यास उर्जा मिळेल ..असे सांगत सरांनी उपचारांचा समारोप केला ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • दशनाम गोसावी समाज वधू-वरांसाठी सुवर्ण संधी

    दशनाम गोसवी समाज महाराष्ट्रातील खेडोपाड्यात पसरलेला असल्याने तेथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते.

  • महान कर्मयोगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे !

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मुखपत्रांतून नेहमीच हिंदू राष्ट्र-स्थापनेचा पुरस्कार केला होता. त्यांचे हे विचार सत्यात आणून दाखवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !’

    डॉ. जयंत आठवले

    संस्थापक, ‘सनातन संस्था’

  • विधीलिखित

    कोणाला कोणच्या प्रसंगातून कोणत्या वेळी जावं लागतं ते विधिलिखित असतं.
    ते टळणार नसतं. त्यांतून किती जीव मनस्तापाने होरपळून निघतात. आपण सिरीयल्स मधून,कथा कादंबर्यातून हे बघतो, वांचतो पण मी प्रत्यक्षात घडलेली घटना इथे सांगत आहे. ( पात्रांची नांव बदलली आहेत)
    वैशाली ताईंच्या लग्नाचा वाढदिवस होता, संध्याकाळी बाहेर जेवायचं ठरलं होतं. मोठी मुलगी गांवातच होती, ती पण येणार होती केक घेऊन.
    आंघोळ आटपून त्या पूजेला बसल्या, तितक्यात फोन खणखणला. "आई, वेळ आहे कां ऐकायला" हो हो बोल बेटा.
    वैशाली ताईंना वाटलं, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पूजानी त्यांच्या धाकट्या मुलीने फोन केला असावा. "आई" तिचा आवाज थोडा रडवेला वाटला. रात्रीच तिच्याशी गोष्टी झाल्या होत्या, थोडी तुटकच बोलली होती, जेवण झालं कां असं विचारलं तर , "नाही ग इतक्यांत कसंच जेवण? आई तू झोप. मी सकाळी करते फोन" म्हणाली होती.
    "आई, तूं बसून घे" पूजा म्हणाली. बराच वेळ ती बोलणार होती.
    तिने सांगितलं ते वैशाली ताईंना धक्का देणारं होतं. तरी त्यांनी शांततेन एकेक गोष्ट ऐकली. "बरं मी ठेवते, मी कोर्टात जाते आहे. बघते कोणी वकील मिळाला तर. तूं अजिबात काळजी करूं नकोस. मी मॅनेज करीन. बाबांना पण ऊगीच पाठवू नकोस. त्यांच्या तब्येतीची काळजी घे" असं म्हणून तिने फोन कट केला. कशातरी रडवेल्या होत त्यांनी पूजा संपवली आणि तिच्या बाबांना सगळं सांगितलं. ते पण खूप काळजीत पडले.
    पूजाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. पहिलं नव नवलाईचं वर्ष एकमेकांचे वाढदिवस साजरे करण्यांत, हाॅटेल, आऊटींग मध्ये गेले. नंतर पूजानी तिच्याच कंपनीत पुनः जाॅब मिळवला. सासू सकाळीच डबा घेऊन शाळेत निघून जात होती. नंतरचं सगळं पूजा बघून घेत होती. सगळ्यांसाठी पोळ्या भाजी करून ती आॅफीसला जायची.
    हळूहळू घरांत कुरबूर सुरू झाली. एका माणसाचा खर्च वाढला. तिचे सासरे तिच्या आॅफीसमध्ये जाऊन जाऊन पैसे मागत. वरून म्हणतं, तूला आमच्याकडे सगळं घरचं जेवण मिळतं, राहायला झोपायला जागा मिळते, फळ-दूध सगळं मिळतं तर घरभाड्या सकट तूं सगळे पैसे दे.
    तिनी त्यांना ते द्यायला सूरवात केली. एका महिन्यांत प्रिमियम भरायचे होते म्हणून ती देऊ शकली नाही, तर सासरे आॅफीसमध्ये पोचले. पूजानी संध्याकाळी येतांना काढून
    आणते सांगितलं. तर तिला एटीएम कार्ड मागायला लागले. ती कांही पेइंग गेस्ट नाही, जे ते एक दिवस ऊशीर झाला तर कांगावा करत होते. त्यांचा मुलगा पूजाचा नवरा बॅन्केत मॅनेजर आहे, तो तिचा खर्च चालवूं शकत होता तरी ती भीक नको ........म्हणून पैसे पुरवत होती.
    त्यांना पैसे दिले. घरी पोचल्यावर पूजाच्या कानावर नवर्याचे बोलणे पडले. बाबा, तिला कां मागतां मी देतो आहे न ? घरभाडं, किराणा, प्लाॅटचं लोन सगळं मी करतो न. आईचा पूर्ण पगार वाचतोच आहे. बाबा म्हणत होते तिचा पगार घर बांधायला लागेल.
    खूप रगडा झाला त्यांवरून. सासूनी दोघांना वेगळं राहा सांगितलं. दोघं वेगळे झाले. थोडे दिवस बरे गेले. नंतर पूजाचा नवरा घरी आईकडे जाऊन जेवून यायचा. कधी न सांगता तिथेच राहून जायचा असं सुरू झालं. मग त्यावरून पूजात व तिच्या नवर्यात दोघांमध्ये वाद होऊ लागले. एक दिवस अचानक त्यानी बॅग भरली आणि चेन्नई ला जायचं आहे असं सांगून निघून गेला. सकाळी सकाळी दाराची बेल वाजली, पूजा नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तिनी दार उघडलं तर कोर्टाचा माणूस नोटिस घेऊन दारांत ऊभा. तिच्या नवर्यानी घटस्फ़ोटाची नोटिस पाठवली होती. तिच्या ह्रदयाचा थरकांप झाला. एका रात्री भांडणं झालं होतं तेव्हां मला आतां तुझ्या बरोबर राहायचचं नाही असं म्हणाला होताच. पण खरंच असा वागेल वाटलं नव्हतं. कालच बॅग घेऊन चेन्नई ला गेला आणि आज ही नोटिस. पूजाचा थरकांप उडाला. हात पाय कांपायला लागले. तिनी कशीतरी नोटीस घेतली व विचारलं हे काय आहे? घटस्फ़ोटाची नोटिस पाठवली होती त्याने. दार बंद करून बालकनीत आली नोटिस वांचतच होती, तेवढ्यात तिला टोपीखाली चेहरा लपवून तो (तिचा नवरा) सुजित जातांना दिसला. तिने त्याचीच बाईक बाहेर काढली आणि त्याचा पाठलाग करून त्याला गाठलं. खूप सवाल जबाब झाले, तो घरी आलाच नाही. ती सासरच्या घरी गेली तर सासूनी घरांत घेतलंच नाही. उलट कांगावा केला, "मी पोलीसांना बोलावते, सांगते ही मुलगी आम्हांला त्रास द्यायला आली आहे" पूजा परत स्वतःच्या घरी आली.
    कोर्टात त्यांची भेट झाली. शेवटी सहा महिन्यांच्या ऊहापोही नंतर परस्पर संमतिने घटस्फ़ोट घेतला.
    त्यांतही सुजितने mutual divorce साठी मी कांही ही एल्युमिनी देणार नाही असं वकीलांना सांगितलं. आई आणि मुलानी मिळून सगळी योजना आधीच आंखून ठेवली होती.
    सुजितच्या एका मैत्रिणीने तिच्या भावासाठी पूजाला होकार द्यायला लावला, तो पण पूजाला ओळखत होता.
    इतक्या चंगल्या मुलीचे असे हाल झालेले त्यानी पण बघितले होते.
    वैशाली ताईंना आतां खूप छान जांवई मिळाला. पूजा आणि दिपक दोघंही आतां अमेरिकेत आहेत. त्यांना एक गोड मुलगी आहे.
    दिपक गंमतीनी म्हणतो, "सुजितचे आभार मानायला हवे आपण सुजितशी तुझं लग्न झालंच नसतं तर माझी तुझी गांठच पडली नसती, तूं इथे मिरजला कशाला आली असतीस? "
    --प्रतिभा जोगदंड केकरे
  • सुहास्य-वचने तुमच्यासाठी

    हास्य हे सर्वच आजारांवर रामबाण उपाय आहे. चेहर्‍यावर ओढूनताणून हसू आणता येत नाही. पण ही सुहास्यवचने आपल्याला नक्कीच हसायला लावतील..

    दारुबाज नवरा त्याच्या बायकोला म्हणत असतो..... `मी नेहमीच दारूला नको म्हणत असतो …… पण काय करू, ती माझं ऐकतच नाही.'

    फॅमिली कोर्टातला वकील त्याच्या अशीलाला सांगत असतो..... `घटस्फोटाचं एक महत्वाचं कारण असतं …….. लग्न'

    अयशस्वी माणूस नेहमी म्हणतो .... `ज्या वेळी मला यशाची गुरुकिल्ली सापडते … तेंव्हा कुणीतरी त्याचे कुलूप बदललेले असते.'

    मधूमेह (डायाबेटीस) झालेला माणूस नेहमीच म्हणतो .... `आयुष्याचा काय भरंवसा …. स्वीट डिश आधी खाऊन घ्या.. '

    मार्केटिंगच्या क्लासमधला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो ..... `कुणाला काही पटवून देऊ शकत नसाल …... तर त्याला गोंधळात टाका.'

    आता हास्ययात्रेतील ही आणखी काही सुहास्य-वचने वाचा...

    जर तुम्हाला रस्त्यातल्या सगळ्या वस्तूंचा अडथळा होत असेल …. तुम्ही चुकीचा रस्ता धरला असेल.

    बोगद्याच्या टोकापाशी दिसणारा उजेड ..... समोरुन येत असलेल्या गाडीच्या दिव्याचाही असू शकतो.

    गालातल्या गालात हसून घ्या …... का हसताय याचा विचार करण्यात लोकांचा गोंधळ उडेल.

    तुम्ही जमीनीवर दोन्ही पाय घट्ट रोवून उभे रहाल तर ……. पँट कशी घालाल?

    तुम्ही वेळेवर पोचाल …… ते पहायला तिथे कोणीच असणार नाही.

    कड्यावरून कोसळत असतांना कोणाचा जीव जात नाही …. खाली गेल्यावर अचानकपणे पडणे थांबते तेंव्हा जीव गेलेला असतो......

  • श्रेष्ट गं तू रातरानी

  • कॉमन मॅन

    हा कॉमन मॅनच आहे, ज्याच्या जिवावर उभे राहतात इमलेच्या इमले. ज्याच्या जिवावर चालतोय गाडा व्यवस्थेचा, लोकशाहीचा, विश्वासाचा, परंपरेचा अन संस्कृतीचा. तोच सगळं सांभाळतोय हे सारं. सगळे अन्याय अत्याचार सहन करूनही तो मात्र फार आशावादी. त्याला निश्चितपणे वाटतंय हे सारं बदलणार आहे. आज ना उद्या परिस्थिती बदलेल. सारं काही चांगल होईल असे चित्र तो मनाशी रंगवत असतो.

  • देर भी और अंधेर भी?

    मुळात, कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी नुसता कायदा कठोर असून चालत नाही, तर कायदा बनविणारे आणि राबविणारे हातही प्रामाणिक आणि निष्पक्ष असावे लागतात. आपण गुन्हा केला तर आपल्याला शिक्षा होईलच. हा धाक गुन्हेगाराच्या मनात निर्माण व्हायाला हवा. तेंव्हा कायदा अशा प्रकाराला काही प्रमाणात रोखू शकेल. पण सध्या तेच होत नाहीये.