अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या नोव्हेंबरमधील नियोजित भारतभेटीची सध्या तयारी सुरू आहे. या भेटीतून भारत-अमेरिका संबंधांना काही नवे वळण लागेल का ? अण्वस्त्र नष्ट करण्याचा कार्यक्रम आखून शांततापूर्ण जगाची उभारणी करण्यात दोन्ही देश पुढाकार घेतील का ? त्यासाठी आवश्यक ते धैर्य दाखवण्याची दोन्ही नेत्यांची तयारी आहे का ? ओबामा यांच्या भेटीच्या निमित्ताने हे प्रश्न आधी चर्चिले जायला हवेत.
October 4, 2010
हातात ह्याच्या मिळताच सत्ता
सुरुवात केली मिळवायला मत्ता
धनोपहार हाच याचा शिरस्ता
चमच्यानां याच्या फुकटचा भत्ता
March 10, 2011
तात्पुरता सदस्य म्हणजे नेमकं काय? त्या संदर्भातील इत्थंभूत माहिती देणारा हा लेख.
June 30, 2021
माझा मोठा भाऊ सुरेश त्याच्या दोन मित्रांना घेऊन कुठल्यातरी नाटकातले संवाद सादर करायचा. घरातल्या हॉलमध्ये आईच्या काही नऊवारी साड्या किंवा रोज वापरायच्या चादरी इकडे तिकडे लटकावून त्यांचं स्टेज तयार व्हायचं. आम्ही बाल गोपाळ , मित्रमंडळी हे सगळे त्यांचे प्रेक्षक असायचो.
November 28, 2024
पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत !
पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे.
डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा !
गूळ म्हणजे यमन!
यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व!
इथं तीव्र मध्यम श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा
(अन्यथा बट्ट्याबोळ!).
हां, आता ज्यांना जमत व गमतं
('प्रभू आजि गमला' या अर्थाने) नाही ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात म्हणजेच गुळात साखरही मिसळतात.
जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. 'गनिसा' ही संगती देस ची ओळख (सिग्नेचर) तसंच, रटरट आवाजाबरोबर घमघमाट येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण आणि देस हे ओघवते असावेत पण चंचल नकोत.
नंतर होरीप्रमाणे पुरणाचं वाटण करायचं. म्हणजेच लवकर आटपायचं .... ख्या ख्या
आता महत्वाचा 'टप्पा' ! पोळ्या करणे ! बिहागचा टप्पा साधायला कुण्या दिग्गज हाद्दूखान - हास्सूखान अशांचीच तालीम हवी. आणि सगळेच मालिनीताई होत नाहीत हे ही विनयशीलतेने मान्य करायला हवं. रागाला शरण जावं तशी निगर्वी शरणागती झाली तर हळूहळू जमेल. पण तपश्चर्या हवी.
आता अशा कमालीच्या रंगरस-संपन्न मैफलीत तराणा यावा तशी तुपाची धार!
तराणा मूळ आलाप-जोड यापासून वेगळा काढता येऊ नये अगदी तस्संच तुपानं पोळीशी अद्वैत करून असावं.
मग .. 'जो भजे हरिको सदा', 'चिन्मया सकल ह्रदया", "माई सावरे रंग राची" अशा विविध रूपांनी सर्वगुणसंपन्न भैरवीचं रसग्रहण करावं त्याप्रमाणे एकेक घास जिभेवर ठेऊन असीम आनंद घ्यावा आणि मग "हेचि दान देगा देवा" अशा थाटात 'अन्नदाता सुखी भव' म्हणावं.
भैरवीचे सूर मनात दीर्घ काळ रेंगाळावेत तशी पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळावी. दिवस सार्थकी लागावा ...... आयुष्य सार्थकी लागावं !!!
लेखक : अनामिक
व्हाॅटसअपवरुन साभार
March 12, 2017
एक विशाल मन, भाग त्याचे अनेक ।
विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,
छोट्या भागावरी, वेष्टण शरीराचे ।
अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,
मनाचे स्वभाव, सारखेच असती ।
फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,
अगणीत मनें, कोठे नसे फरक ।
अनेक बनली, जनक तिचा एक....४,
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 27, 2016
तुम्हाला पन्नास पैसे व रुपयाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल का ?
October 21, 2010
विज्ञान प्रारब्ध मानत नाही आणि आध्यात्म प्रारब्धाखेरीज दुसरे काही मानत नाही.
November 6, 2016
माणूस, प्राणी, पक्षी, जलचर वगैरे सजीव दिवसातला काही काळ तरी झोपेत घालवितात. आहार, श्वसन, उत्सर्जन या क्रियांइतकीच निद्राही सजीवांना आवश्यकच असते. अगदी युध्दआघाडीवर असलेल्या सैनिकांचीदेखील पुरेशी झोप झाली नाही तर ते सक्षमदृष्ट्या लढू शकणार नाहीत. थकल्याभागल्या जीवांना, लहानशी डुलकी जरी काढली तरी, ताजेतवाने वाटते.
April 4, 2012
November 22, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti