नाजूक, निर्लेप आणि निखळता ज्यांच्यात आहे अशी फुलं आणि हेवा, दावा, व्देष यापैंकी कोणताही रंग ज्यांच्यावर चढलेला नाही अशी मुलं. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू…! कशा..! फुलं उमलतं, बहरतं आणि सुगंधतं. त्याच्या उमलणं स्वाभाविक असतं. आतून आलेलं असतं. कुणी त्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही, म्हणूनच ते प्रभावी असतं, परिणामकारक, आपलं करणारं असतं.
मुलंही अशीच असतात. स्वच्छ मनाची, नितळ, कोमल आणि भावनाशील देखील. त्यांचं उमलणं देखील स्वाभाविक असतं. आकलनं करत ती वाढत जातात. ती जशी वाढतात… तशी मात्र त्यांच्यात बदल होत जातो. जसं फुलांना माहिती नसतं पुर्ण उमलल्यानंतर त्याच काय होणार ते. फुलं कुणाच्या गजऱ्यात जाऊन बसणार, की हार बनुन मूर्तीच्या गळ्यात जाणारं. की नेत्याच्या प्रतिमेला जाऊन भिडणारं. की शहीदाच्या स्मारकावर अभिमानानं जाऊन पडणारं. त्याला ते माहित नसतं. तसंच मुलांचही असतं ना. लहान असतात तोवर आई-वडिलांच्या बरोबर असतात. शाळेत गेली की मित्र येतात, शिक्षक येतात त्यांच्या मनाला आकार येऊ लागतो. आपल्या अपेक्षा साकारत लहान असलेली मुलं मोठी होऊ लागतात. त्यांचे पुढे काय होणार माहित नसते. ते चांगल्या मार्गाला लागणार की वाईट, हे आपल्याला माहित नसतं.
मानवी आयुष्यात फुलं आणि मुलं दोघेही महत्वाची आहेत. फुलांना पाहण्यातच निखळ सौंदर्याचा आनंद मिळतो. मुलांना पाहण्यात जगण्याची उर्जा मिळते. मात्र फुले आपण जशी वाढवतो, जोपसतो, जपतो त्यांची काळजी घेतो. त्यांचे नाजुकपण सांभाळतो. मुलांचे तसे करतो का? मुलांना तितक्याच नाजुकपणे सांभाळतो का? त्यांचे भावविश्व जपतो का? की आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यांच्या भावविश्वाची घडी विस्कटतो. की स्पर्धेत उतरवून त्यांच्या मनाची कोमलता हिसकावून घेत आहोत. की शिक्षणाच्या नावाखाली त्यांना अकालीच मोठे करतो आहोत. पालकांच्या अपेक्षा मुलांनी पुर्ण कराव्यात यात गैर काही नाही, पण मुलांच्या अपेक्षांचे काय? त्यांना काय वाटते आहे, याचा विचार केला जातो का? गुणांच्या मागे लागतांना गुणवत्तेचं काय झालं आहे, याचा आपणही थोडा गांभीर्याने विचार करायला पाहिजे.
मुलं म्हणजे गुणांचं मशीन नाही, पालकांना असे का वाटते त्याने पैकीच्या पैकी मार्क मिळवलेच पाहिजेत म्हणून. आपल्या मुलाने विविध स्पर्धात भाग घेतला पाहिजे. त्याला गणित, विज्ञान, इंग्रजी विषयांसह इतरही सर्व विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले पाहिजे. त्याला प्रत्येक खेळात पारितोषिक मिळाले पाहिजे. या सारख्या अपेक्षा आपण पालक व्यक्त करतो आणि मुलांना त्यांची दमछाक होईपर्यंत धावायला लावतो. या धावण्यात त्यांच्या निरागसपणाचे काय होत असेल. त्याच्या भावविश्वाचे काय होत असेल. त्याच्या मनाच्या कोमलतेचं काय होत असेलं. फुलांना जपतांना आपण जेव्हढी काळजी घेतो तितकीच काळजी किंवा त्यापेक्षा अधिक काळजी मुलांच्या मनाची घेतली गेली पाहिजे. तेव्हाच ती बहरतील, हसतील, बागडतील आणि सुगंधही देतील. त्यांचे बहरणे, फुलणे आपल्यावर अवलंबून आहे. मुलांना त्यांच्या स्वाभाविकपणे बहरू द्याना. तेव्हा विचार करा आणि जपा, आपल्या घराच्या अंगणात फुललेल्या आपल्या फुलांना…!
दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)
आधार कार्ड मुळे येणार्या अडचणी, थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.
मनुष्य हा “सामाजिक प्राणी” म्हणून ओळखला जातो आणि ते खरेही आहे. मनुष्य हा मनुष्यांच्या संगतीशिवाय राहू शकत नाही. त्यातही भारतीय माणसाचे वैशिष्ट्य असे की तो नातेसंबंधांची जपणूक भावनिक पातळीवर करीत असतो. आपल्या पूर्वजांची आठवणही तो गोत्रांच्या रुपाने ठेवत असतो.
सगे सोयरे
पाने : 240, किंमत : रु. 200/-
नचिकेत प्रकाशन
पूर्वी स्वंयपाकघर फक्त स्त्रीयंपुरतेच मर्यादित असायचे.. आता मात्र हे चित्र बदललं आहे. त्याची प्रचिती आपल्यला येतेचं… जेव्हा आपण संजीव कपूरल पाहतो… दिवसेंदिवस बद्लत चाललेली आपली खाद्य संस्कृती किंवा आपल्या खाद्य संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी टि.व्ही शोजचा मोठा हातभार आहे. संजीव कपूरचे झी वरचा खाना खजाना ते अलिकडे स्टार टि.व्हीवर गाजत असलेला मास्तर शेफ़ ही उदाहरणे आहेच ..
वात्रट-टीका
बाळाच्या आगमनाप्रित्यर्थ लिहीलेली ही कविता सर्वांना नाव टेवण्याच्या दिवशी उपयोगी पडेल
धारावी मधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी अगदी जगप्रसिद्ध झालेली आहे. धारावीच्या या लहानशा किल्ल्याला काळा किल्ला म्हणतात. स्थानिक लोकांमधे तो काळा किल्ला अथवा ब्लॅक फोर्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे.
ट्रेड मिल वर चालून पडल्या आमच्या पायाच्या तुकड्या,
अन जिथे तिथे वट खातात बॉलीवुड च्या "सुकड्या"
फिगर सांभाळताना येई, आमच्या तोंडाला फेस,
चेंजिंग रूम मध्ये फिट होईना, आवडलेला ड्रेस
तलम, तंग कपडे त्या मिरवतात छान,
ओटी-पोटी सपाट आणि देहाची कमान
असणार नाही तर काय? त्यांना मदत किती सारी,
डायटीशियन, gym इंस्ट्रक्टर असती भारी, भारी
आमचे तसे नाही, सर्व आमच्या वरच असते,
घरचे, दारचे करून मगच gym ला पळावे लागते
Calories असतो मोजत प्रत्येक क्षण नी क्षण,
डाइटिंगचा उडतो फज्जा, जेव्हा जेव्हा येती सण
वैताग म्हणजे, कित्ती झालाय metabolism मंद,
100 gm उतरले तरी भलताच होतो आनंद
बॉलीवुडच्या सुकड्यांना पाहून होतो जिवाचा तळतळाट,
चित्रपट, ads, मासिके, टीवी सर्वत्र त्यांचाच सुळसुळाट
त्यांच्या फिगरचा आदर्श ठेवला, तर वाटत खूप डिप्रेस,
तोंडावर ताबा ठेवायचा कसा, किती करावे appetite सप्रेस?
वाटत, एकदा सारी बंधन टाकावीत झुगारून,
शिरा, पुरी, जिलेबी अन् बासुंदीही प्यावी भरभरून
पण मग फिगरचा आपल्या, उड़ेल न् हो खुर्दा,
बॉलीवुडच्या सुकड्यांना मग कशी देणार स्पर्धा?
बॉलीवुड च्या सुकड्यांवर वार्ताहरांचे बारीक लक्ष,
वजनातील फेरफारी बद्दल ते असतात नेहमीच दक्ष
थोड़ी जरी सुटली अंगाने एकही तारका
वजनाची तिच्या करतील, 'ब्रेकिंग न्यूज़' बर का!
अशा तणावा खाली किती दबून जात असेल जीव,
बॉलीवुडच्या सुकड्यांची, तशी येतेही फारच कीव
आपल काय छान, जीवन स्वछंदी ते किती,
दोन चार किलो इकडे तिकडे, कोणाची भीति?
बॉलीवुडच्या "सुकड्या" होवोत लखलाभ बॉलीवुडला,
आमच्या सारख्या "सुदृढ" च पाहिजेत संसाराला.
शेवान - एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द.....
आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले.....म्हणजेच शेवान..... कापणी संपल्याची निशाणी.... कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी...
मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे... 7. 8 गडी माणसे असायची कापणीला....
पण गावातील काही बलुतेदार लोकं ...... नाव नाही घेत..... यायची अगदी कापणीचा शेवटचा दिवस कधी आहे त्याची चौकशी करून.... आणि हक्काने एक एक कवळी कापलेले भात ... आजोबा त्यांना द्यायचे... त्यांचा हक्क म्हणून.... आता देणारे पण नाहीत.... अन् घेणारे पण नाहीत....
मी तेव्हा विचारलेले... आजोबा का देताय यांना हे धान्य ते पण न मळता?
आजही आठवतय त्यांच उत्तर..
बाऴा आपण जरी पिकवलं तरी सगळ्यांचा वाटा काढायचा... भात त्याला दिलं तरी त्याची गाय उपाशी राहील म्हणून गवतासकट.... कवळी..... देतो...
तेव्हा प्रत्तेकाची काळजी होती ... पिकवणार्याला.... अगदी किडमुंगी
पशुपक्षी सगळ्यांची काळजी होती त्यांना...
आणि त्यांच्यासाठी चार आवे शिल्लक ठेवतो... तेकाच शेवान म्हणतात
बापूर्झा
डॉ बापू भोगटे
9422632456
Copyright © 2025 | Marathisrushti