दसर्याच्या निमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र येतात. विचारांचं आदान-प्रदान होतं. परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात. आशा, आनंद आणि उत्सुकता यांचा संगम हे दसर्याचं वैशिष्ट्य. दसर्याच्या मुहुर्तावर पांडव, प्रभू श्रीराम, मराठे-पेशवेशाहीने विजयाची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळेच या सणाला विजयोत्सव म्हटलं जातं. नातेबंधांमध्ये जल्लोष निर्माण करणार्या या सणाविषयी…
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही अजरामर रचना….
का फार मोठ्या कंपनीचे उदघाटन आहे म्हणून जय्यत तयारी झाली होती. कंपनीचे नाव श्रेय. कंपनीच्या सर्व मजुरांना आणि सहकारी लोकांना आमंत्रित केले होते. कंपनी सुरू होऊन बरेच दिवस झाले होते पण मग आता उदघाटन कसे कोण करणार आहेत हे कळले नाही. पण सगळेच उत्साहाने काम करत होते.
मुंबईत बोरिवली पश्चिमेला राहणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य सिनेमाभक्तांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एकेकाळी फुलांनी सजवलेला हाऊसफुल्लचा बोर्ड दिमाखात मिरवणारी आमची चित्रमंदिरे म्हणजेच अजंठा, डायमंड आणि जया सिनेमा ह्यावर काहीतरी लिहूया असा विचार गेले अनेक महिने डोक्यात फिरत होता. मात्र त्या लिखाणासाठी कुठलीच मूलभूत आणि जुजबी माहिती ना माझ्याजवळ होती ना गूगलबाबांकडेदेखील. नुकताच बोरिवलीला जाण्याचा योग जुळून आला होता.
करवीर निवासिनी भक्तीपद
मर्चंट नेव्ही मध्ये जहाजांवर कामं करणारे अधिकारी आणि खलाशी हे संपूर्ण जगभरात असंख्य देशात जात असतात. त्यामुळे जगभर पर्यटनाचा आनंद घेतात. जहाजावर भरपूर दारू प्यायला मिळते. अनेक देशात आणि अनेक बंदरात त्यांच्या मैत्रिणी असतात. एकूणच काय तर सगळ्यांना असे वाटते की मर्चंट नेव्ही मध्ये सगळे खूप एन्जॉय करत असतात.
राणी शिरोमणी आपल्या भूमीच्या शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या सोबत लढल्या. म्हणूनच त्यांना मदिनापूरची “राणी लक्ष्मीबाई” असे म्हटले जाते. ह्या लढाईत बरेच इंग्रज सैनिक मारले गेले. आधीच्या छोट्या तुकडीपेक्षा इंग्रजांनी नंतर अधिक सैन्य पाठवले. राणीचे सैन्य अपुरे पडले. ही स्वाभिमानी स्त्री शेवटच्या घटकेपर्यंत लढत राहिली आणि नजर कैद झाली. असे म्हंटले जाते की राणीचा मृत्यू त्या नजरकैदेत असतांनाच झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर राणीला जीवे मारले गेले १८१२ साली.
“फेवर ब्लोक”चे पेवच फुटले,
सगळीकडे हे लावत सुटले,
म्हणून सगळ्या मुंबईभर,
पेवर आणि फेवर ब्लोकच दिसले………
पहिल्या गोलमेज परिषदेवर भारताने बहिष्कार टाकला आणि त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर ध्वजारोहण करण्याचे ठरले. अवंतीकाबाई १३ व्या तुकडीचे नेतृत्व करत होत्या. त्यांनी सकाळी ८.१५ ला ध्वजारोहण केले. दुसऱ्या दिवशी पालिकेच्या सभेला हजर असतांना त्यांना अटक झाली आणि ६ महिने कैद व ४०० रुपये दंड करण्यात आला.
Copyright © 2025 | Marathisrushti