(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्याप – हिंदी कादंबरी

    क्याप कादंबरी ही एका कम्यूनिस्ट चळवळीकडे आकर्षित झालेल्या हिमालयातील वाल्मीकीनगर जिल्हयातील  अस्पृश्य डुम जातीतील साधारण माणसाची आहे.  कस्तुरीकोट या काल्पनिक संस्थानातील हा एक  उत्तराचंलातील  प्रदेश आहे.  उत्तर आधुनिकतेतील  मिडियाग्रस्त ढोंगी समाजाची  त्यांनी  खिल्ली उडवली आहे.

  • खांबावरचा ‘मल्ल’

    पूर्वी राजांच्या काळात प्रसिद्ध असलेला मल्लखांब हा क्रीडा प्रकार तसा दुर्लक्षितच. शरीराच्या सर्वांगीण व्यायामाच्यादृष्टीने आवश्यक असा हा खेळ. शरीर निरोगी राखण्याचे काम हा खेळ करतो. कोकणात असे काही कलाकार आहेत, की ज्यांच्यातील सुप्त गुणांना कधी वावच मिळाला नाही. कोकण ही कलाकारांची खाण म्हटले तर वावगे ठरू नये. क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कोकणातील अनेक हिरे चमकले. ‘मल्लखांब’ हा क्रीडा प्रकार तसा कठीण. पण कोकणच्या काही क्रीडापटूंनी तो लीलया पेलला. त्यातलाच एक क्रीडापटू विजयकुमार.

  • तुळस—– नवीन लेख

    मित्रहो, ७ नोव्हेंबर अर्थात कार्तिक शुद्ध १२, या चातुर्मास्य समाप्तीच्या दिवशी तुलसी विवाह काल सुरु होतो

  • भारतमातेच्या वीरांगना – ४३ – राजकुमारी अमृत कौर

    पंजाब मधील जलीयनवाला बाग हत्या कांडाने त्यांचे मन उद्विग्न झाले, भारतावरील ब्रिटिश राजवटीचे काळे रंग सगळ्या देशाने अनुभवले. राजकुमारी अमृत कौर आतून हलल्या. त्यांच्यावर गांधी विचारधारेचा पगडा होताच. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. गावा-गावातून फिरून लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळी बद्दल जागरूकता निर्माण केली. त्यावेळची परिस्थिती म्हणजे कितीतरी लोकांना आपण पारतंत्र्यात आहोत म्हणजे काय ह्याचेसुद्धा आकलन नव्हते. त्याचबरोबरीने समाजात बरीच सुधारणा आवश्यक आहे जे त्यांना जाणवलं. बाल विवाह बंदी, परदा प्रथा किव्हा देवदासी ह्या सगळ्यांविषयी त्या बोलल्या. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. दांडी यात्रा, चले जाव आंदोलन ह्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येकवेळी त्यांना कारावास सश्रम भोगावा लागला.

  • प्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)

    एका पुस्तकात ‘प्लँचेट’ म्हणजे मृत आत्म्याला बोलावण्याचा विधी सांगितला होता व त्या आत्म्याला जर आपण प्रश्न विचारले तर तो त्याची उत्तरे देतो असे लिहिले होते… हे करणे मात्र मला शक्य होते साधने देखील फारशी लागणार नव्हती, म्हणजे फक्त एक गुळगुळीत पाट, स्टीलचे पाणी पिण्याचे फुलपात्र, खडू, उदबत्ती आणि तीन जण .

  • सासू सून संवाद (३)

  • तहानलेले सावरकर

    स्वतःला हिंदुसंघटक म्हणवून घेणे सावरकरांना अधिक प्रिय असले तरी प्रत्यक्षात सावरकर हे मानवतावादी होते. त्यांचे आचरण, त्यांचे बोलणे वैयक्तिक आयुष्यात अगदीच साधे होते. कवी मनाचे तर ते होतेच. हे इतकं असूनही ते क्रांतिकारक होते. सावरकरांनी केलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य पाहिले तर हा माणूस खरोखरच महात्मा किंवा महामानव आहे असे आपल्याला दिसून येईल. सावरकरांनी जवळजवळ ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी मुक्त केली आहेत.

  • लेबल

    लेबल, उपाधी,बिरुद,पदनाम एकदा चिकटले की अविभाज्य भाग होऊन जाते, काही केल्या ते सूटत नाही, नोकरीतून निवृत्त झाले तरी त्याचा ससेमीरा साथ सोडत नाही. लेबलमध्ये एकदा मनुष्य अडकला की तो त्यातून बाहेर पडणे शक्य नसते.चोविस तास लेबल घेऊन जगणारी माणसे आपले जीवन हरवून बसतात.

  • यशाला शॉर्टकट नसतात! – अभयसिंह मोहिते सर

    एमपीएससीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील कचरेवाडी-मंगळवेढे इथला अभयसिंह मोहिते राज्यात प्रथम आला आहे. इथवरच न थांबता त्याला यूपीएससीची परीक्षाही द्यायची आहे.

    निकालाची बातमी ऐकल्यावर नेमकं काय वाटले ?
    मला आणि आई-वडीलांना अतिशय आनंद झाला. मला यशाची खात्री होतीच. पण प्रथम क्रमांक येईल असं वाटलं नव्हतं. आईला या स्पर्धा परीक्षेविषयी फारशी माहिती नाही. पण आपल्या मुलाने काहीतरी मोठं यश मिळवलं आहे याचा आनंद तिच्या डोळ्यातून दिसत होता.

    अभ्यासाचे नियोजन कसं केलं ?
    मी कोणतीही शिकवणी लावली नव्हती. स्वअभ्यासावरच मी हे यश मिळवलं आहे. विविध दर्जेदार पुस्तकं, अवांतर वाचन, वर्तमानपत्र यांचं नियमित वाचन केलं. लायब्ररीतून या परीक्षेसंबंधी अनेक पुस्तके शोधली. अशा स्पर्धापरीक्षांना बसणाऱ्या इतर मित्रांचंही खूप सहकार्य लाभलं. मी कधीही लवकर उठून किंवा रात्री जागून अभ्यास केला नाही. त्यापेक्षा दिवसभरात मिळणाऱ्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल, याकडे लक्ष दिलं. मोबाईलवर कमीत कमी वेळ घालवणं, टाइमपास करण्याऐवजी अभ्यास आणि पुरेशी विश्रांती असा दिनक्रम ठेवला.

    अभ्यास करताना कोणत्या अडचणी आल्या ?
    मी याआधीही दोनवेळा या परीक्षेला बसलो होतो. आधीच्या प्रयत्नात अपयश आले तेव्हा वाईट वाटलं. आपण कमी पडतोय अशी भावना मनात निर्माण झाली. पण ज्या विषयांमध्ये अपयश आलं त्यांचा अधिक अभ्यास केला. चुकांचे विश्लेषण करून त्या टाळण्याचा प्रयत्न केला.

    नोकरी आणि अभ्यास हे दोन्ही एकाचवेळी कसं सांभाळलं ?
    मी २०११ साली विक्रीकर निरीक्षक आयुक्त आणि २०१३ ला सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर नियुक्त झालो. परंतु ही नियुक्ती होण्याआधीचे दिवस मी अभ्यासाचा पाया पक्का केला होता. नोकरी करताना संध्याकाळी मिळणाऱ्या ४-५ तासांचं अभ्यासासाठी योग्य नियोजन केलं.

    स्पर्धापरीक्षांमध्ये लेखी परीक्षेबरोबरच मौखिक चाचणी हा महत्वाचा भाग असतो. त्यासाठी काय मेहनत घेतली?
    विविध तज्ज्ञमंडळींकडून आणि सिनियर्सकडून मला मौखिक चाचणीसाठी मार्गदर्शन मिळालं. अनेक मॉक इंटरव्ह्यूज मी दिले. त्यातून हावभाव आणि उच्चार यात योग्य त्या सुधारणा करू शकलो. कारण उच्चारांबरोबरच तुमच्या चेहऱ्यावरील भाव आणि शारीरिक हालचाली यांतून अनेक गोष्टी दिसत असतात.

    इंजिनीअर असूनही प्रशासकीय सेवाक्षेत्राकडे कसा वळलास?
    इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना माझ्या मनात या क्षेत्राविषयी आकर्षण निर्माण झालं. मशिन्सच्या सान्निध्यात करिअर करण्यापेक्षा लोकांशी संवाद साधावा आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी भावना मनात निर्माण झाली. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो.

    स्पर्धापरीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील?
    मी त्यांना एकच गोष्ट सांगेन, दोस्तांनो, यशाला शॉर्टकट नसतो. कष्टांना पर्याय नाही. अपयशाचा न्यूनगंड बाळगू नका. सततचा सराव आणि यश मिळविण्याची अंतर्गत प्रेरणा खूप महत्वाचे आहेत. प्रामाणिक प्रयत्न केल्यावर यश मिळतंच.

    प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजासाठी काय करणार आहेस?
    मी कॉम्प्युटर इंजिनीअर आहे. सध्या प्रशासनात सुरू असलेल्या कॉम्प्युटरायझेशन प्रक्रियेचं महत्वही मी जाणून आहे. मी यासाठी अधिकाधिक प्रयत्न करेन. त्यातून वेळ वाचेल आणि प्रशासनात पारदर्शकता येण्यास मदत होईल. तसंच शिक्षणक्षेत्रासाठी काही काम करावं अशी माझी इच्छा आहे. मी ज्या भागातून आलो आहे, तिथे अजूनही शिक्षणासाठी फारसं पोषक वातावरण नाही. आपल्या देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आजही आहे. ती मला बदलायची आहे. शिक्षण प्रसारासाठी मी जास्तीजास्त प्रयत्न करेन.

    इतर आवडी-निवडी काय आहेत ?
    मला ट्रेकिंग आवडतं. मला रोजच्या कामांसाठी लागणारा उत्साह आणि उर्जा त्यातून मिळते.

    - दीपक गायकवाड

  • वरुणाची करुणा !

    रविवारी अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांची तारांबळ उडवून दिली आणि निसर्ग किती ग्रेट आहे हे कळले. अशाच एका मनातल्या मोरापिसाचे गाणे..!!