जर कुटूंबातील प्रत्येकाने थोडी संयमित वागणूक दाखवली तर एकत्र कुटूंब पद्धती समान सुख-सम्रुद्धीचा सागर दुसरा होणे नाही.
शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. घटस्थापना असे या दिवसाचे महत्त्व संस्कृत भाषेत सांगता येईल आणि आजपासून घट बसणार आहेत, असे मराठीत म्हणता येईल.
१९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली.

स्वतंत्र भारतातल्या पहिल्या महिला मुख्य मंत्री - सुचेता कृपलानी
अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या स्थापक - सुचेता कृपलानी
संविधान सभा सदस्य - सुचेता कृपलानी
आपली ओळख आपल्या कामातून उभ्या केलेल्या भारतमातेच्या वीरांगना सुचेता कृपलानी
२५ जून १९०८ साली पंजाब अंबाला येथे एका बंगाली ब्रम्हओ परिवारात त्यांचा जन्म झाला. सुचेता मुजुमदार अतिशय हुशार, आपल्या विचारांशी ठाम तरीही मृदू स्वभावाच्या होत्या. अगदी लहानपणी त्या थोड्या एकट्या राहत, बुजऱ्या स्वभावाच्या होत्या, पण वेळेबरोबर आणि बदलणाऱ्या परिस्थिती बरोबर त्यांनी स्वतःला घडवलं. पुढे जेव्हा कुठलाही राजनैतिक निर्णय घेण्याची वेळ येई, त्यावेळी मात्र त्या कधीही हृदयाने विचार न करता अतिशय कोठारपणे आणि बुद्धीला प्राधान्य देऊन विचार करत. त्यांचे वडील जरी इंग्रजांच्या सरकारात काम करत होते तरी मनाने ते राष्ट्रवादी होते. तेच गुण सुचेता मध्ये आले.
त्यांचे शिक्षण दिल्ली, लाहोर अश्या ठिकाणी झाले. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना स्वातंत्र्य संग्रामात उडी घ्यायची होती, पण त्याचवेळी त्याच्या वडिलांचा आणि बहिणीचा मृत्यू झाला,घराची जवाबदारी त्यांच्यावर आली. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये त्या शिकवू लागल्या.
दरम्यानच्या काळात त्यांच्या विवाह श्री जे. बी. कृपलानी ह्यांच्याशी झाला. ह्या दोघांच्या विवाहाला त्यांच्या घरच्यांपासून गांधीजींपर्यत सगळ्यांचा विरोध होता, पहिले कारण श्री कृपलानी सुचेताजींपेक्षा २० वर्षांनी मोठे होते आणि दुसरे कारण श्री कृपलानी गांधीजींचा उजवा हात म्हणवले जात आणि त्यांना असे वाटले की एकदा का लग्न झाले की कृपलानींचे देशसेवेतील लक्ष कमी होईल, त्यावर सुचेता म्हणाल्या, "की तुम्ही असा विचार करा की आता तुम्हाला २ नाही तर ४ हात मिळतील कामाला." त्या जसं बोलल्या तसंच वागल्या. लग्ना नंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे देशसेवेच्या कामात झोकून दिले.
१९४० साली त्यांनी अखिल भारतीय महिला काँग्रेस ची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून देशातील महिलांना स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यायला प्रेरित करणे, महिलांचे संघटन मजबूत करणे इत्यादी कामे केली. १९४२ च्या चले जावं आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला, परिणामस्वरूप त्यांना १ वर्ष सश्रम कारावास भोगावा लागला. तुरुंगातून आल्यावर त्या पूर्णवेळ गांधींबरोबर विविध चळवळीत काम करत होत्या. देशाच्या विभाजनाच्या वेळी सुद्धा त्यांनी गांधींबरोबर पूर्णवेळ काम केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर चीन युद्धाच्या वेळीसुद्धा त्यांनी त्यांची राजनैतिक जवाबदारी सांभाळत आपल्या मनाच्या जवळचे काम म्हणजे देशसेवा सतत करत राहिल्या.
१९६३ ते १९६७ त्यांनी उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली. १९७१ पर्यत त्या विविध राजनैतिक जवाबदाऱ्या सांभाळत होत्या. १९७१ साली त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. कुठे थांबायचे हे फार कमी लोकांना कळते, कदाचित सुचेतजींना भविष्य समजले होते. १९७४ साली दिल्ली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आपल्या कामातून आपली प्रतिमा बनवणाऱ्या, अगदी लहान वयातच मोठ्या जवाबदाऱ्या पार पडणाऱ्या, आपल्या वागण्या-बोलण्यातून देशातील महिलांचा सन्मान वाढविणाऱ्या भारतमातेच्या ह्या वीरांगनेला माझी शब्दसुमानांजली.
|| वंदे मातरम् ||
-- सोनाली तेलंग.
०५/०७/२०२२.
संदर्भ :
१. Bharatdiscovery.org
२. Wikipedia.org
३. inuth.com
2007-08 मध्ये झालेल्या टूजी स्पेक्ट्रम आणि परवान्यांच्या वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपामुळे केंद्रीय माहिती आणि दळणवळण मंत्री ए. राजा यांना राजीनामा द्यावा लागला. या घोटाळ्याचा तपास करण्याची जबाबदारी महालेखा परिक्षकांकडे (कॅग) ती. कॅगच्या अहवालानेच राजा यांना मंत्रीपद गमवावे लागले. या अहवालात नेमके होते तरी काय ?
मयेकराच्या शकल्याचा गेल्यावर्षीच लगिन झाला. कमनशिबी पोर... बेवडो घो आणी रोज बिनकारणाचे गाळी.... रांडेच्या ५२मोडीचा आसस वरती जोताच्या काटयेचो मार.. चार दिवसापूर्वी मायेराक ईल्ला रडान आजयेक सांगी होता... तिना कायतरी मंत्र दिल्यान... तसा ताबडतोब बाजार करून घराक गेला.... आणी सांजेक घोवाबरोबर शेंगदाण्याची भाटी करूक गेला... वायच आधिच गेला जोताच्या. ऊगाच गाळी नको म्हणान घोवान जोत बांधल्यान... चार तासा फिरली वाप्यात.. आणि नांगराच्या तासात कायतरी दिसला तेका.... बघून आराडलोच.... गो रांडेच्या वाप्यात इस्वन गावलो.... बघ तरी... मरांदे ती नडणी... तू ह्यो घे आणि घराक चल पयला.... तिनसानाक भाजून ठेव....
शकला गप मासो ऊचलून पुडच्या निर्गतीक वाटेक लागला..... घो खुषीत... भरडार इस्वन गावलो मस्करी हा काय?...... तिनसाना ज्वात सोडल्यान आणि पयलो मायकडे जावन दोन क्वॉटर मारल्यान..... इस्वन आसा तर एक एक्स्ट्रा.......
ईलो आट वाजता डुलत घराक... आनी सुरवात केल्यान.... रांडेच्या जेवक वाड.... शकल्यान पिटी आणी पाल्याची भाजी समोर ठेवल्यान... बघुन भिरकाटलोच काडल्यान हसोळेची काटी आणि केल्यान पेटूक सुरवात...... बावन मोडीचा रांडेचा अक्को इस्वन आपन खाल्यान आणि माका पिटी?......
शकल्यान अक्को अवाट जमा केल्यान बोंबटान.... आणी सांगल्यान ह्यो खुळावलो हा भरडार हेका ईस्वन गावलो म्हणान सांगता... आणी मारता माका ... कंटाळलेल्या अवाटकारानी घोवाक पेट पेट पेटल्यानी... आनी गेले घराक...
शकल्यान मगे हळू घोवाक घरात नेल्यान ईस्वनाच्या भाजलेल्या तुकड्यानी भरलेला ताट पुड्यात ठेवल्यान. आणि घोवाच्या पाठीवरच्या वळांका हळद लावताना सांगल्यान माका ५२ मोडीचा म्हनतास ना?
मगे मीच पुरुन ठेवलय भरडार ईस्वन..... ही एक मोड दाखवलय... तर तुमची तर्हा बघा.... आणखी ५१ आसत, शाने आश्यात तर वापरूक लाव नको.....
आता शकला सुखान संसार करता... तसो तुमी करा.......
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे
हवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं.
मानवाची निर्मिती झाली आणि हळूहळू त्याची बुद्धी विकसीत होत गेली तसा सर्वप्रथम तो अभियंता बनला! पावसापासून संरक्षणासाठी गुहे शोधले, दगडी हत्यारे बनवली, घर्षणातून विस्तव निर्माण होतो हे जाणून गारगोट्या वापरून विस्तव निर्माण करू लागला, अन्न शिजवू लागला,
उत्क्रांतीच्या काळात निसर्गाने प्रजननाच्या बाबतीत पुरुषांच्या- म्हणजे नरांच्या बाजूने थोडे झुकते माप देऊन पुरुषाच्या जबाबदार्या कमी केल्या असतील, पण स्त्री-म्हणजे मादीला यादृष्टीने मिळालेली दुय्यम दर्जाची वागणूक भविष्यात तिला तिच्या अस्तित्वासाठी एक मोठे वरदान ठरू शकते.
Copyright © 2025 | Marathisrushti