(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विज्ञानाचे अध्यात्म

    जिथे विज्ञान थांबते,,,,तिथे म्हणे

  • वेळेचा अपव्यय

    जनता केंद्रातील सरकारला उबगलेली आहे. अशा वेळी त्या लाटेवर स्वार होऊन दिल्ली काबीज करण्याची तयारी करण्याऐवजी पंतप्रधानांच्या राजीनाम्याचा विषय टोकापर्यंत ताणून धरणे हितकारक नाही.

  • भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेशिवाय सर्वकाही अशक्य

    श्रीकृष्णानंद प्रभूंच्या प्रवचनाने परिपूर्ण अशी अध्यात्मिक माहिती आणि त्याबरोबरच महाप्रसाद सेवन करण्यास मिळाल्याने माझ्यासह सर्वच कृष्णभक्त संतुष्ट झाले.

  • गंगा आरती -एक दिव्य अनुभूती

    आजवर जी आरती दूरदर्शनवर कधीतरी पाहिली होती, ती प्रत्यक्षात अनुभवता आली याचा अतिशय आनंद वाटत होता. आता उठून परत फिरण्याच्या विचारात होतो तोच लाटांवर नाचत छोट्या छोट्या प्रकाशज्योती येताना दिसू लागल्या. मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्या पाण्यावर कशा तरंगताहेत याचे आश्चर्य जवळ आल्यावर निवले.

  • रिओ निग्रो

    फोर्थ इंजिनियर , थर्ड मेट, कॅप्टन, स्टीवर्ड, मोटरमन , एक ए बी आणि मी पकडून असे एकूण सात जण मनौस शहरात सकाळी दहा वाजता गेलो होतो आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास परत आलो होतो. सकाळी जहाजावरुन जाताना छोट्या स्पीड बोट मध्ये पायलट लॅडर ने सगळे एका मागोमाग उतरले.

  • भाव अंतरी उमलत होते…

    दत्ता डावजेकर यांच्या संगीतसाजाने नटलेलं हे गीत डोळ्यांत पाणी उभे करते. किंवा

    ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती

    परि जयाच्या दहन भूमीवर नाही चिरा, नाही पणती…‘

    त्याचप्रमाणे मनात राष्ट्रभक्तीची, मातृभूमीची, मायबोलीची ज्वाला तेजाने तळपत ठेवणारी गीते वेगळेच स्फुरण आणतात. अगदी वाचता क्षणी जीव

    ओवाळून टाकायचीही तयारी व्हावी, इतकं वजन त्या गाण्यांतून असे.

  • लक्ष्मीपूजन

    अश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.

  • चिव काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट

    एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते? हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा.

    हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड.

    बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात तोडले का? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली.

    आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. चिवताई ये दाणा खा, म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.

    आजीने डोळे उघडले. ACवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली.

    एक होती चिव, एक होता काऊ. चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते). एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट ....

    -- विवेक पटाईत

  • मेड फॉर इच अदर

    कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं.
    लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.
    वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?
    सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.
    सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.
    निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं
    नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा?. त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं.
    - अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.
    कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा.. या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.
    लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं.
    तेव्हा म्हणाली होती, 'वाचनाचा छंद आहे' पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बयेनं...
    जाब विचारू शकतो आपण?
    किंवा तो म्हणाला होता - 'प्रवासाची
    आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं - असं स्वप्न आहे!'
    पण
    प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.
    जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं.
    प्रवासाची आवड कसली?
    - कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब... वर्षभर सांगतेय, माथेरानला जाऊ तर
    उत्तर म्हणून फक्त जांभया देतो.
    कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे. उरलेले न जुळलेले ४ कुठले ते कळले असते तर...
    मनापासून सांगतो,
    त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं.
    तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली... नाही जमलं की विस्कटली.
    अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला... पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी.
    पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना
    सांगितलंच जात नाहीये;
    नाही जुळलं -मोडा; व्हा विभक्त.
    आणि मग करा काय??
    आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे.
    धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ?..
    एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?-
    या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी
    देऊन मगच संसार मांडायला हवा.
    आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या
    व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं हे या वाटेवरच पाहिलं पाऊल...
    ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात..
    आणि मग ती "सप्तपदी" - "तप्तपदी" होत नाही..
    हेच संसाराचं खरं मर्म आहे.
    "मेड फॉर इच अदर"
    आपोआप होत नाहीत.
    होत जातात.

  • पुई येथील एकवीस गणपती

    पाली गावातील अष्टविनायकातील एक श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन अवघ्या ३ किमी अंतरावर वसलेल्या “पुई” या गावी “एकवीस गणपती मंदिर” आहे.