(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • रामेश्वरा, बघतस ना, काय चल्ला ह्या ?

    माझ्या ऑफिसमधल्या परबकाकांच्या तोंडी हे पालुपद कायम असायचे. मुंबईत काम करणारे हे परब, शेकडो मैल लांब असलेल्या त्यांच्या या रामेश्वराच्या रेंजमध्ये कायमच असायचे. सिंधुदुर्गामधील आचरे येथील हा देव रामेश्वर म्हणजे मोठा जागृत देव ! भक्तांची देवावर श्रद्धाही तशीच गाढ. आपण कुठेही असलो आणि काही चुकीचं वागलो तर " रामेश्वर बघता हा " अशी भीती आणि काही संकट आले तर " रामेश्वरा, बघतस ना, काय चल्ला ह्या ? " अशी हाक. या देवाचे भस्मचर्चित आणि पूर्ण अलंकृत असे दोन्ही प्रकारचे फोटो मला काढायला मिळाले. कोकणातील देवळांमध्ये आढळणाऱ्या जांभ्या दगडाच्या आणि काळ्या पाषाणातील दीपमाळा येथेही उत्तम स्थितीत पाहायला मिळतात. " रामेश्वरा, बघतस ना ? "

    --मकरंद करंदीकर.

  • नवमध्यमवर्गाचे राजकारण

    चिनी बनावटीच्या गृहोपयोगी वस्तू पार केरळपर्यंत मिळायला लागल्याला आता काही वर्षे होऊन गेली. या सर्व वस्तू खासगी क्षेत्रातील उत्पादने आहेत. चिनी उत्पादक हे कसे करू शकले? आर्थिक उदारीकरणाची, खासगीकरणाची चीन व भारतातील प्रक्रिया जवळजवळ एकाच वेळी सुरू झाली.

  • विज्ञान आणि अध्यात्म. अती सामान्य पण असामान्य.

    दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग येतात किंवा घटना घडतात पण त्या आपल्याला इतक्या सामान्य वाटतात की त्यांचे असामान्यत्व आपल्याला कळतच नाही. पण थोडा विचार केला की लक्षात येते की तो प्रसंग किंवा ती घटना इतकी असामान्य असते की ती आपल्या विचारशक्तीच्या पलीकडली आहे.

  • सलाम पोलीस दल सलाम !!!!

    पोलिसांवर विश्वास ठेवा .....

    पोलिसांवर विनाकारण केलेले शक्ती प्रदर्शन , मोर्चे, बंद, नेत्यांच्या संरक्षणाचे नको ते ताण देवू नका. त्यांना वेठीला धरू नका. त्यांच्या घरांचे,मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न तत्परतेने सोडवा . त्यांची काम करण्याची शक्ती वाढेल. पोलीस गणवेशातील देश प्रेमी नागरिक आहेत.त्यांचे जीवन सुसह्य करा.

    हे लिहिण्याचे मुख्य कारण असे कि -

    पुण्याच्या घोरपडे पेठेत अलका हिचे माहेर आहे. ती प्रसूतीसाठी माहेरी आली होती. अलकाला शनिवारी पहाटे प्रसवकळा सुरू झाल्या. अलकासोबत तिची आई होती. आईने अलकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोघी घराबाहेर पडल्यानंतर अलकाची आई रिक्षा शोधण्यासाठी पुढे गेली. नेमक्या याचवेळी खडक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक इप्पर, हवालदार दत्तात्रय रत्नपारखी, नितीन पेठकर, पोलीस मित्र शिरीष शिंदे, नसरूल्ला बागवान हे तेथून गस्त घालत चालले होते.बोचऱ्या थंडीत एका महिलेचा विव्हळण्याचा आवाज रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी ऐकला..प्रसवकळा सोसणाऱ्या त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.. घोरपडे पेठेतून सुसाट वेगाने निघालेली पोलीस व्हॅन बाजीराव रस्त्यावर असतानाच ती महिला व्हॅनमध्येच प्रसूत झाली. त्यानंतर कमला नेहरू रुग्णालयात डॉक्टरांच्या मदतीने सर्व सोपस्कार पोलिसांनी पार पाडले आणि खाकी वर्दीत दडलेल्या माणुसकीची प्रचिती दिली.

    -- चिंतामणी कारखानीस

  • काटेपुराण…

    जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो, असो…

    काटा पाहिला नाही, असा माणुस या पृथ्वीवर सापडणे अवघडच. अगदी राजघराण्यात जन्मलेला असला तरी त्याच्याही पायात काटा कधीना कधी रुतलेला असतोच. कसा ते माहित नाही. पण हे होतं. गवतावर चालताना, शेतात काम करताना काट्यांशी सामना होत असतो. शेतकऱ्याच्या पायात किती काटे टोचले असतील त्याची मोजदाद कुठेच नसते. कदाचित त्याच्या नशीबाचा ते भाग असावेत. काटेही विविध प्रकारचे असतात. काही बोचणारे असतात, काही टोचणारे असतात, काही रुतणारे असतात, काही रक्त काढणारे असतात, काही आग करणारे असतात. काट्यांचे जितके प्रकार आपल्याला डोळ्यांनी दिसतात त्याही पेक्षा अनेक प्रकारचे काटे या पृथ्वीतलावर आहेत. अगदीच गुगलवर काटा हा शब्द जरी टाकला तरी २ कोटी ८ लक्ष इतकी पानं सेकंदभरात उघडतात. त्यात काट्यांचे शास्त्रीय नाव, औषधी उपयोग, प्राचीन काळातील संदर्भ आदी सविस्तरपणे असलेली माहिती आपल्यासमोर येते.

    आपल्या जीवनातही काट्याला महत्व आहेच. कसे ? खडतर ज़ीवनाचे विश्लेषण करतांना अनेकदा गुलाबाचे उदाहरण दिले जाते. काट्यांवर राहुनही गुलाबाची मोहकता सर्वांना आपलीशी करते, त्यामुळे फुलांचे राजेपण गुलाबाकडे आलेय. गुलाबाला असलेले काटे पसरट पण टोकदार असतात, टोचले की आग करतात. बाभळीचे काटे लांब असतात. टोचले की लगेच तुटतात. कॅक्टसचे काटे बारीक पण टोचणारे असतात. गव्हाच्या ओंबीला येणारे काटे केसांप्रमाणे बारीक पण तितकेच टोकदार असतात, टोचले की शरीराची आग व्हायला लागते. या सारख्या अनेक वनस्पतींचे रक्षण काटे करत आलेले आहेत. भाज्यांचा विचार केला तर भेंडीला बारीक काटे असतात, डोळ्यांनी दिसत नाहीत पण हाताला टोचतात. वांग्यांना असलेले काटे वांगे तोडतांनाच टोचतात. फणसाचे कवच काटेरीच असते पण त्याखाली आतमध्ये असतो फणासाचा गोडवा असलेला गर.

    सजीव प्राण्यांचा विचार केला तर विंचवाचा काटा विषारी असतो, त्याच्या इंगळीत तो असतो. मधमाशीचा काटा शरीराची आग करायला लावतो. माशांचा काटा घशात रुतणारा असतो. साळशिंगी हा प्राणी त्याच्या शरीरावर असलेल्या काट्यांपासुनच स्वत:चे रक्षण करतो. हे झाले प्राण्यांचे. मानवी काट्यांचे काय? मानवी काटेही असतातच की. विशिष्ट प्रसंगात, भीतीदायक प्रसंगात शरीरभर उठणारा काटा वेगळा असतो. आनंदाच्या प्रसंगात हर्षभराने शरीरावर उठणारी संवेदना काटेरीच असते. हृदयात बोचणाऱ्या सलीचा काटा निराळा असतो. काव्यपंक्तीत येणाऱ्या काट्यांची दुनिया निराळीच असते. प्रेयसीच्या वाटेतील काटे वेचण्यासाठी प्रियकराची आतुरता अनेक कवींनी वर्णन केलेलीच आहे.

    काटेरी गुलाब असतो, काटेरी हलवा असतो. वजनकाटाही असतोच ना. थोडक्यात काय तर आपले आयुष्य ‘काटे भरा’ प्रवास आहे. रस्त्यात पडलेले दु:खाचे काटे बाजुला सारत आपल्याला चालायचे आहे. कधी काटे बोचतीलही, मनाच्या अंतरंगात ही बोच घर करेलही… पण त्यावर मात करून पुढे चालायचे आहे. काटे आहेत म्हणुन चालणे सोडणे माणुसपणाचे लक्षण नाही. चालणे, लढणे आणि यशस्वी होणे हेच माणुसपणाचे लक्षण… वाट कितीही काटेरी असली तरीही…!

    दिनेश दीक्षित, जळगाव.

  • देहात भरून घ्यावा सूर्य…

    सोनेरी उन्हाची शाल अंगावर लपेटून घेतांना आख्या देहात भरून घ्यावा सूर्य अन् उगवावे आपणही निरुत्साहाच्या विशालकाय डोंगरापाठीमागून रोज अन् उजळून टाकावे स्वत:सहित सा-या जगाला.

  • वेट लॉस तमाशा…

    शेजारचा कुचळ आगलाव्या मला ट्रॅक सुटवर घराबाहेर पडतांना बघुन म्हणाला.हा आगलावे म्हणजेना,एक नंबरचा डॅंबिस मानुस…कधीही सरळ बोलणार नाही.ह्याच स्वतःच्या घरच्यापेक्षा ईतरांच्याच घरात जास्त लक्ष असत.अगदी ह्याचा एक कान शेचजार्‍याच्या भिंतीला कायमच चिकटलेला असतो.

  • महासत्तेची पावले…

    आपल्या देशाने महासत्ता व्हाव ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील इच्छा आहे. २०२० पर्यंत इंडिया महासत्ता होईलच. पण भारत महासत्ता होईल का? एकीकडे झपाट्याने बदलणारा इंडियाचा कार्पोरेट चेहरा तर दुसरीकडे ‘जैसे थे’ स्थितीतील ग्रामीण भारत; याला महासत्ता म्हणता येईल का? अनेक खेडी ही समस्यांच्या अंधारात चाचपडत आहेत. अस्वछ्चता, स्थानिक राजकारण, नेतृत्वाचा अभाव, शैक्षणिक सुविधांचा अभाव, स्पर्धा परीक्षांबाबतची उदासीनता, सरकारी कर्मचाऱ्यांची मनमानी, अनिष्ठ चालीतीती या असंख्य अडचणींचा विळखा सुधारणा होऊ देत नाही. खेड्यातील तरुण व सुशिक्षित नागरिक एकत्र आले तर ही स्थिती बदलू शकेन.

  • एक अविश्वसनिय कलाकृती : मोढेरा सुर्यमंदिर

    आपल्या देशात एवढया सुंदर कलाकृती आहेत/होत्या ना की त्या जगातील सात आश्चर्य आहेत ना सुद्धा मागे सोडतील ,पण तरीही आपल्याला पाहायचं काय असतं ताज महाल ,असं नाही की ताजमहाल सुंदर नाही ,पण डोळे उघडून बघा ,ताजमहाल पेक्ष्या कितीतरी सुंदर वास्तू/मंदिरे भारतात आहेत ,डोलदार पणे दिमाखात अजुनही आपले गतवैभव सांभाळत उभे आहे,विचार करा ,हे परकीय आक्रमणकर्ते ,इंग्रज जर भारतात नसते आले तर आपले किती तरी मंदिरं आता पण दिमाखात उभे असते ,असो ....
    तर भारतात खुप सुर्यमंदिरंआहेत पण त्यातल्या त्यात मुख्य दोन सुर्यमंदिर आहेत ,एक उडीसा मधलं कोणार्क चं सुर्यमंदिर आणि दुसरं गुजरात मधील मोढेरा चं सुर्यमंदिर ....
    अहमदाबाद पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या मेहसाना जिल्ह्यातील मोढेरा मधे हे सुर्यमंदिर १०२२-१०६३ च्या दरम्यान सोळंकी राजा भीमदेव पहिला ह्यांनी बांधलं ,सोळंकी घराणे हे सूर्य उपासक होते आणि म्हणुनच भीमदेव पहिला ह्याने हे मंदिर भगवान सुर्याला समर्पित केलं ,(मंदिर कुणी बांधलं ह्या मध्ये मतांतरे आहेत ,गूगल किंवा इतर माहिती स्त्रोत मध्ये आणि मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखात तफावत आहे ,वरील माहिती ही मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखावरून घेतली आहे....)
    मंदिर परिसरात शिरताच आपल्याला दिसतं ते सुंदर हिरवेगार गार्डन ,मंदिर परिसर विविध झाडांनी वेढलेला आहे ,गार्डन संपवून आपल्या नजरेत भरतं ते अतिसुंदर असं मंदिर आणी त्याच्यासमोर असलेल भव्य रामकुंड , मंदिर मुख्यतः तीन भागात व्यापलेल आहे, प्रवेश करताच दिसते ते रामकुंड हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर सभामंडप आणि शेवटी गूढमंडप अथवा गर्भगृह. सभामंडपामध्ये अतिशय सुरेख असे कोरीव खांब आहेत. गर्भगृहात प्रदक्षिणेसाठी चिंचोळा मार्ग आहे.
    असं म्हणतात की हे मंदिर अश्या प्रकारे बनवलं गेलं होतं की २१ जून ला सूर्याचे पहिले किरण नृत्यमंडपातून आत येऊन त्या काळी गर्भगृहात असलेल्या सुर्यदेवाच्या सोन्याच्या मूर्तीच्या मुकुटावर असलेल्या हिऱ्यावर पडत असे आणी ते किरण त्या हिऱ्यावरून परावर्तीत होऊन पूर्ण गर्भगृह उजळुन निघत असे,किती नयनरम्य दृश्य असेल ते ,आपण आता फक्त कल्पनाच करू शकतो....
    सूर्य जिथे दुपारी बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून(वर्षातील सर्वात मोठा दिवस ) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो....आणी ह्याच वृत्तावर हे मंदिर उभारलेलं आहे ,तेही त्या काळी कुठलेही आधुनीक तंत्रज्ञान नसतांना....
    हे मंदिर मारू गुर्जर स्थापत्य शैली मध्ये बनवलं गेलं आहे ,मंदिराच्या समोरच्या भागात सुर्यकुंड किंवा राम कुंड आहे ,स्थापत्य कलेचा एक अदभुत अविष्कार म्हणजे हे सुर्यकुंड ,ह्या कुंडात १०८ छोटे छोटे मंदिरं आहेत आणी कुंडात जायला पायऱ्या आहेत ,हे कुंड आणी त्या त्या पायऱ्या एवढया कोणबद्ध आहेत की सुमारे बाराशे वर्षांपूर्वी अशी कोणती टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली असेल की सर्व पायऱ्या एकदम एकसारख्याच ,राम कुंड किंवा सूर्य कुंड बनवतांना पण खुप विचार केला गेला ,कुंडात १०८ मंदिरं आहेत ते सर्व १२ राशी आणी ९ नक्षत्र (१२*०९) ला ध्यानात घेतलं आहे ....
    भीमदेवांनी कुंड बनवतांना एक विचार केला की सर्व लोकांना तिर्थ यात्रा करणे शक्य नाही म्हणून कुंडातच सर्व मंदिरं बनवले ,आणी कुंड बनवतांना ह्या कुंडात ७ समुद्राचं पाणी ,विविध पवित्र नद्यांचे पाणी टाकण्यात आले ,आणी असं म्हणतात की तेंव्हा पासून त्या कुंडाचं पाणी कधीच आटत नाही.....
    सूर्य कुंडानंतर येतो नृत्य मंडप ह्या नृत्य मंडपात ५२ खांब आहेत जे वर्षातील ५२आठवड्यांना दर्शवतात ,ह्या खांबांवर अतीशय बारीक कोरीवकाम ,नक्षीकाम केलेलं आढळतं, ह्या खांबांची रचना अश्या प्रकारे केलेली आहे की वरतुन खाली बघितलं तर हे खांब गोलाकार दिसतात आणि खालुन वर बघीतल्यास हेच खांब अष्टकोणी दिसतात ....
    खांबांवर रामायण ,महाभारतातील महत्त्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहे ,आणी नृत्यमंडपाच्या छतावर देखील असेच महत्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहेत छताची रचना देखील खूप वेगळी आणी कलात्मक पध्दतीने केलेली आहे,मंदिरातील दगड ,खांब हे लॉक पद्धतीने एकमेकांत घट्ट बसवलेले आहेत ,आणी ते एवढे वर्ष होऊन सुध्दा उत्तम आहे ...
    नंतर येतो गर्भगृह ,त्या काळी गर्भगृहात सुर्यदेवांची सोन्याची मूर्ती होती जी आक्रमनकर्त्यांनी लुटून नेली ,मंदिराची नासाधुस केली आणी त्याच्यामुळे आता खंडित झालेल्या ह्या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे,गर्भगृहात आधी जेथे मूर्ती होती तिथे आता दरवाजा बसवुन ते बंद केल्या गेलं आहे ....
    मंदिराच्या गर्भगृहात सूर्य,इंद्र ,विष्णु आणि इतर देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत ,त्या काळात कुठल्याही आधुनिक साहित्या शिवाय एवढी सुंदर आणी बारीक कलाकुसर तेही दगडावर ,विश्वास करायला पण खूप कठीण जातं, बाहेरच्या बाजूलापण पूर्ण बाजुंनी सुर्यदेवांच्या बारा प्रतिमा कोरलेल्या आहेत ज्या वर्षातील बारा महिन्यांचे प्रतीक आहे आणी सोबतच दहा दिशांच्या बाजुला दहा दिशांचे दिगपाल देखील कोरलेले आहेत ,प्रत्येक दिगपालांसोबत त्यांचे वाहन देखील भिंतींवर कोरलेले आहे ,भिंतीवर सुर्यदेवांची रथारूढ प्रतिमा देखील कोरलेली आहे त्या रथाला ७ अश्व जोडलेले आहेत जे सात वारांचे प्रतीक आहे ,पूर्ण गर्भगृहाभोवती ३६४ हत्ती आणी एक सिंह कोरलेला आहे हे हत्ती आणी सिंह वर्षातील ३६५ दिवसांचे प्रतीक आहे ,मंदिराच्या भिंतीवर इतरही काही देव देवतांच्या महत्वपूर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत ,ह्या सर्व मूर्त्यांच्या सर्वात वरच्या बाजूला विणाधारी सरस्वती मातेची मूर्ती कोरलेली आहे ,ज्याचा अर्थ होतो की आम्ही शिक्षणाला सर्वांत वरचं स्थान देतो ....
    मंदिरावर मुख्यतः धर्म ,अर्थ ,काम ,आणी मोक्ष ह्या विषयानुसार प्रतीमा कोरलेल्या आहेत.
    मंदिरावर त्या काळचे सामाजिक जीवन देखील कोरलेलं आहे ,एका ठिकाणी नृत्य करणाऱ्या स्त्रिया कोरलेल्या आहेत ,त्या एवढया सारख्या कोरलेल्या आहेत की असं वाटतं की त्या एका लयीत नृत्य करत आहे ,आणी त्याच बाजुला पुरुष नृत्य करतांना दाखवले आहे ,ज्यात एकही मूर्ती दुसऱ्या मूर्तीसोबत मॅच होत नाही,म्हणजे पुरुष ऑर्गनाईज्ड नसतात हे सुचवलेलं आहे.....
    हे एवढं सुंदर मंदिर सर्वांत पहिले मोहम्मद गझनी ने लुटलं , नंतर मंदिर परत बनवण्यात आले ,त्या नंतर मंदिर परत धर्मांध मुर्ख खिलजी ने लुटले ,आणी ह्या वेळी त्याने फक्त लुटच नाही केली तर मंदिराची भरपूर लुट केली आणी आपल्या वैभवाला गालबोट लावलं ,त्यानंतर ब्रिटिश आणि इतरही लोकांनी हे मंदिर लुटलं ,एवढी लुटा लूट होऊन देखील मंदिर अजून दिमाखात उभं आहे ....
    #मंदिर परिसरात एक छोटंसं संग्रहालय देखील आहे ,त्यात विविध काळात सापडलेल्या मुर्त्या आहेत ...
    #जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल ,तर मोढेरा नक्कीच तुम्हाला आवडेल .
    कसे जाल :मंदिर अहमदाबाद पासून खूप जवळ आहे (अंदाजे १००किमी) मेहासाना पासून मोढेरा साठी सिटी बसेस सुरू असतात, तुम्ही मेहसाना मधुन खाजगी रिक्षा करून देखील जाऊ शकता, पण बस चा पर्याय योग्य आहे ....
    मंदिर पूर्ण हफ्ता उघडे असते आणी संध्याकाळी ६:०० पर्यंत मंदिर परिसरात प्रवेश दिला जातो.…..
    संध्याकाळी मंदिरावर लेसर शो दाखवतात ज्यात मंदिराचा इतिहास आणी इतर माहिती दाखवल्या जाते ,तो लेझर शो एवढा जबरदस्त असतो की तुम्ही आपोआपच म्हणाल की ये लेझर शो नहि देखा तो कुछ नही देखा....
    उत्तरायण काळात इथे गुजरात सरकार तर्फे सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन असते ....
    प्रो टिप:शक्यतो मंदिर बघायला सकाळी सूर्योदय जेंव्हा होतो तेंव्हा जा किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर जा,सुर्यमंदिराची खरी महती सूर्योदयाच्या वेळीच कळते .....
    #अमिताभ बच्चन उगाच नाही म्हणत खुशबू गुजरात की आणी कुछ दिन तो गुजारिये गुजरात मे ...
    -–नितीन काकड
  • मराठी माध्यमात शिकल्याने काय कमावले? न शिकल्याने काय गमावले?

    ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.