माझ्या ऑफिसमधल्या परबकाकांच्या तोंडी हे पालुपद कायम असायचे. मुंबईत काम करणारे हे परब, शेकडो मैल लांब असलेल्या त्यांच्या या रामेश्वराच्या रेंजमध्ये कायमच असायचे. सिंधुदुर्गामधील आचरे येथील हा देव रामेश्वर म्हणजे मोठा जागृत देव ! भक्तांची देवावर श्रद्धाही तशीच गाढ. आपण कुठेही असलो आणि काही चुकीचं वागलो तर " रामेश्वर बघता हा " अशी भीती आणि काही संकट आले तर " रामेश्वरा, बघतस ना, काय चल्ला ह्या ? " अशी हाक. या देवाचे भस्मचर्चित आणि पूर्ण अलंकृत असे दोन्ही प्रकारचे फोटो मला काढायला मिळाले. कोकणातील देवळांमध्ये आढळणाऱ्या जांभ्या दगडाच्या आणि काळ्या पाषाणातील दीपमाळा येथेही उत्तम स्थितीत पाहायला मिळतात. " रामेश्वरा, बघतस ना ? "
--मकरंद करंदीकर.
चिनी बनावटीच्या गृहोपयोगी वस्तू पार केरळपर्यंत मिळायला लागल्याला आता काही वर्षे होऊन गेली. या सर्व वस्तू खासगी क्षेत्रातील उत्पादने आहेत. चिनी उत्पादक हे कसे करू शकले? आर्थिक उदारीकरणाची, खासगीकरणाची चीन व भारतातील प्रक्रिया जवळजवळ एकाच वेळी सुरू झाली.
दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग येतात किंवा घटना घडतात पण त्या आपल्याला इतक्या सामान्य वाटतात की त्यांचे असामान्यत्व आपल्याला कळतच नाही. पण थोडा विचार केला की लक्षात येते की तो प्रसंग किंवा ती घटना इतकी असामान्य असते की ती आपल्या विचारशक्तीच्या पलीकडली आहे.
पोलिसांवर विश्वास ठेवा .....
पोलिसांवर विनाकारण केलेले शक्ती प्रदर्शन , मोर्चे, बंद, नेत्यांच्या संरक्षणाचे नको ते ताण देवू नका. त्यांना वेठीला धरू नका. त्यांच्या घरांचे,मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न तत्परतेने सोडवा . त्यांची काम करण्याची शक्ती वाढेल. पोलीस गणवेशातील देश प्रेमी नागरिक आहेत.त्यांचे जीवन सुसह्य करा.
हे लिहिण्याचे मुख्य कारण असे कि -
पुण्याच्या घोरपडे पेठेत अलका हिचे माहेर आहे. ती प्रसूतीसाठी माहेरी आली होती. अलकाला शनिवारी पहाटे प्रसवकळा सुरू झाल्या. अलकासोबत तिची आई होती. आईने अलकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोघी घराबाहेर पडल्यानंतर अलकाची आई रिक्षा शोधण्यासाठी पुढे गेली. नेमक्या याचवेळी खडक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक इप्पर, हवालदार दत्तात्रय रत्नपारखी, नितीन पेठकर, पोलीस मित्र शिरीष शिंदे, नसरूल्ला बागवान हे तेथून गस्त घालत चालले होते.बोचऱ्या थंडीत एका महिलेचा विव्हळण्याचा आवाज रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी ऐकला..प्रसवकळा सोसणाऱ्या त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.. घोरपडे पेठेतून सुसाट वेगाने निघालेली पोलीस व्हॅन बाजीराव रस्त्यावर असतानाच ती महिला व्हॅनमध्येच प्रसूत झाली. त्यानंतर कमला नेहरू रुग्णालयात डॉक्टरांच्या मदतीने सर्व सोपस्कार पोलिसांनी पार पाडले आणि खाकी वर्दीत दडलेल्या माणुसकीची प्रचिती दिली.
-- चिंतामणी कारखानीस
जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो, असो…
काटा पाहिला नाही, असा माणुस या पृथ्वीवर सापडणे अवघडच. अगदी राजघराण्यात जन्मलेला असला तरी त्याच्याही पायात काटा कधीना कधी रुतलेला असतोच. कसा ते माहित नाही. पण हे होतं. गवतावर चालताना, शेतात काम करताना काट्यांशी सामना होत असतो. शेतकऱ्याच्या पायात किती काटे टोचले असतील त्याची मोजदाद कुठेच नसते. कदाचित त्याच्या नशीबाचा ते भाग असावेत. काटेही विविध प्रकारचे असतात. काही बोचणारे असतात, काही टोचणारे असतात, काही रुतणारे असतात, काही रक्त काढणारे असतात, काही आग करणारे असतात. काट्यांचे जितके प्रकार आपल्याला डोळ्यांनी दिसतात त्याही पेक्षा अनेक प्रकारचे काटे या पृथ्वीतलावर आहेत. अगदीच गुगलवर काटा हा शब्द जरी टाकला तरी २ कोटी ८ लक्ष इतकी पानं सेकंदभरात उघडतात. त्यात काट्यांचे शास्त्रीय नाव, औषधी उपयोग, प्राचीन काळातील संदर्भ आदी सविस्तरपणे असलेली माहिती आपल्यासमोर येते.
आपल्या जीवनातही काट्याला महत्व आहेच. कसे ? खडतर ज़ीवनाचे विश्लेषण करतांना अनेकदा गुलाबाचे उदाहरण दिले जाते. काट्यांवर राहुनही गुलाबाची मोहकता सर्वांना आपलीशी करते, त्यामुळे फुलांचे राजेपण गुलाबाकडे आलेय. गुलाबाला असलेले काटे पसरट पण टोकदार असतात, टोचले की आग करतात. बाभळीचे काटे लांब असतात. टोचले की लगेच तुटतात. कॅक्टसचे काटे बारीक पण टोचणारे असतात. गव्हाच्या ओंबीला येणारे काटे केसांप्रमाणे बारीक पण तितकेच टोकदार असतात, टोचले की शरीराची आग व्हायला लागते. या सारख्या अनेक वनस्पतींचे रक्षण काटे करत आलेले आहेत. भाज्यांचा विचार केला तर भेंडीला बारीक काटे असतात, डोळ्यांनी दिसत नाहीत पण हाताला टोचतात. वांग्यांना असलेले काटे वांगे तोडतांनाच टोचतात. फणसाचे कवच काटेरीच असते पण त्याखाली आतमध्ये असतो फणासाचा गोडवा असलेला गर.
सजीव प्राण्यांचा विचार केला तर विंचवाचा काटा विषारी असतो, त्याच्या इंगळीत तो असतो. मधमाशीचा काटा शरीराची आग करायला लावतो. माशांचा काटा घशात रुतणारा असतो. साळशिंगी हा प्राणी त्याच्या शरीरावर असलेल्या काट्यांपासुनच स्वत:चे रक्षण करतो. हे झाले प्राण्यांचे. मानवी काट्यांचे काय? मानवी काटेही असतातच की. विशिष्ट प्रसंगात, भीतीदायक प्रसंगात शरीरभर उठणारा काटा वेगळा असतो. आनंदाच्या प्रसंगात हर्षभराने शरीरावर उठणारी संवेदना काटेरीच असते. हृदयात बोचणाऱ्या सलीचा काटा निराळा असतो. काव्यपंक्तीत येणाऱ्या काट्यांची दुनिया निराळीच असते. प्रेयसीच्या वाटेतील काटे वेचण्यासाठी प्रियकराची आतुरता अनेक कवींनी वर्णन केलेलीच आहे.
काटेरी गुलाब असतो, काटेरी हलवा असतो. वजनकाटाही असतोच ना. थोडक्यात काय तर आपले आयुष्य ‘काटे भरा’ प्रवास आहे. रस्त्यात पडलेले दु:खाचे काटे बाजुला सारत आपल्याला चालायचे आहे. कधी काटे बोचतीलही, मनाच्या अंतरंगात ही बोच घर करेलही… पण त्यावर मात करून पुढे चालायचे आहे. काटे आहेत म्हणुन चालणे सोडणे माणुसपणाचे लक्षण नाही. चालणे, लढणे आणि यशस्वी होणे हेच माणुसपणाचे लक्षण… वाट कितीही काटेरी असली तरीही…!
दिनेश दीक्षित, जळगाव.
सोनेरी उन्हाची शाल अंगावर लपेटून घेतांना आख्या देहात भरून घ्यावा सूर्य अन् उगवावे आपणही निरुत्साहाच्या विशालकाय डोंगरापाठीमागून रोज अन् उजळून टाकावे स्वत:सहित सा-या जगाला.
शेजारचा कुचळ आगलाव्या मला ट्रॅक सुटवर घराबाहेर पडतांना बघुन म्हणाला.हा आगलावे म्हणजेना,एक नंबरचा डॅंबिस मानुस…कधीही सरळ बोलणार नाही.ह्याच स्वतःच्या घरच्यापेक्षा ईतरांच्याच घरात जास्त लक्ष असत.अगदी ह्याचा एक कान शेचजार्याच्या भिंतीला कायमच चिकटलेला असतो.
आपल्या देशाने महासत्ता व्हाव ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील इच्छा आहे. २०२० पर्यंत इंडिया महासत्ता होईलच. पण भारत महासत्ता होईल का? एकीकडे झपाट्याने बदलणारा इंडियाचा कार्पोरेट चेहरा तर दुसरीकडे ‘जैसे थे’ स्थितीतील ग्रामीण भारत; याला महासत्ता म्हणता येईल का? अनेक खेडी ही समस्यांच्या अंधारात चाचपडत आहेत. अस्वछ्चता, स्थानिक राजकारण, नेतृत्वाचा अभाव, शैक्षणिक सुविधांचा अभाव, स्पर्धा परीक्षांबाबतची उदासीनता, सरकारी कर्मचाऱ्यांची मनमानी, अनिष्ठ चालीतीती या असंख्य अडचणींचा विळखा सुधारणा होऊ देत नाही. खेड्यातील तरुण व सुशिक्षित नागरिक एकत्र आले तर ही स्थिती बदलू शकेन.
ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.
Copyright © 2025 | Marathisrushti