(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्रियांचे घरातले स्थान नेमके कोणते?

    अजुनही स्रियांना घरात समान वागणुक मिळत नाही.नवर्‍यासाठी rule वेगळे आणि बायको साठी वेगळे. पुर्वी पेक्षा अजुन वाईट परीस्थिती आहे आता.पुर्वी कामांची विभागणी तरी होती …..

  • आतल्या आत

    खळखळ वाहणारी नदी, तिच्या काठावर असलेला वटवृक्ष. त्याच्या विस्तीर्णपणे पसरलेल्या पारंब्या. पारंब्यातून पुन्हा नव्या वृक्षाची पालवी फुटतेय, असे स्वप्नवत चित्र. फार पुर्वी बघायला मिळत होते. आता तसे राहिले नाही. असेल कुठे एखाद्या गावकुसात. आपल्याला ते माहित नाही इतकेच. आपल्याला खरे तर बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आपल्याला हे ही माहिती नसतं आपल्याच आत दडलेला वटवृक्ष अन त्याच्या विस्तारणाऱ्या पारंब्या अन पुन्हा त्या पारंब्यांना फुटणारी नवी पालवी… काही म्हणता काहीच माहिती नसतं. अस होण्याचं कारण काय असलं पाहिजे. खरे तर दोन कारणं असू शकतात का? एक म्हणजे आपण बाहेर वागतो वेगळे, आत असतो वेगळे. हे आत आणि बाहेरचं जे जगणं आहे तेच धोका देत राहतं सदैव आपल्याला आणि आपल्या मुळांना, आपल्या पारंब्यांना. वटवृक्ष जितका विस्तीर्णपणे पसरलेला असतो, तितकाच तो जमिनीत खुप आत गेलेला असतो ना. आठवतोय ना गावांत राहत असतांना घराच्या भींती छेदून आत आलेली वटवृक्षांची मुळं. आठवत असतील ना शाळेच्या व्हरांड्याला तडा पाडणारी वटवृक्षाची मुळं. अशा अनेक आठवणींची जत्रा भरत असते नेहमीच आपल्या आत. आतल्या आत… कधी तिचा आपण सरळ सामना करतो, कधी जत्रेत फेरफटका मारून येतो. कधी जत्रेत हरवून देखील जातो. पण वास्तवाची धग लागली की तत्काळ भानावर येतो. जत्रेतून बाहेर पडतो. कधी-कधी जत्रेत जाव असही वाटत नाही, आताची भरणारी जत्रा आधुनिक होत चाललीय म्हणून…

    आपण जसे बाहेरच्या जगासमोर असतो ना, तसे आपल्या आतल्या जगात नसतो. बाहेरच्या जगात मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर मी व्यक्त होत नाही, मात्र आतल्या आत व्यक्त होत राहतो… अगदी स्पष्टपणे… एखाद्या घटनेचा निषेध मी थेट करू शकत नाही, मात्र आतमध्ये तो निषेध मी केव्हाच केलेला असतो. मग मी असा का वागतो वेगवेगळा. आत वेगळा, बाहेर वेगळा. का ही भूमिका मी निभावतो आत-बाहेर वेगवेगळी. एखाद्या माणसाला, तेही सर्वसामान्य माणसाला थेट व्यक्त होण्यासाठी लागणारे वातावरण निर्माण झाले नाही का या समाजात. की त्या सर्व सामान्याला सतत दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय प्रभावीपणे. आरशात आपली प्रतिमा वेगळी दिसते. चांगली दिसते, सुंदर दिसते, खरीच तशी ती असते का? की केवळ असते ते आपले प्रतिबिंब. खरे, खोटे की आभासी. या आभासीत्वाचा आपल्याला नाद जडलाय. त्याच्या मागे धावताना वास्तवाला सोडून देतो ना आपण… आणि म्हणून मग पारंब्या वेगळ्या आणि मुळं वेगळं अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच एखाद्या घटनेत मी बाहेर वेगळा असतो आतमध्ये मी वेगळा असतो. बाहेर कितीही वणवा पेटला तरी मी व्यक्त होत नाही, शांत असतो नदीत पाय सोडून बसलेल्या वटवृक्षा सारखा…!

    दिनेश दीक्षित, जळगाव. (9404955245)

  • राशी व त्यांचे स्वभाव – कर्क

    राशी :- कर्क
    स्वामी :- चंद्र
    देवता :- हरिवंश
    जप मंत्र :- ॐ ह्रीं हरिहराय नमः
    उपास्यदेव :- शिव
    रत्न :- मोती

    जन्माक्षर :- हि हि हु हू हे हो डडा डि डी ड् डू डे डो डॉ ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. पुनर्वसु नक्षत्राचे एक चरण, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रे मिळून ही रास बनते. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष
    बलवान असते. साधारणपणे ही रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक.

  • दिवाळीतले कंदिल

    kandil-01

  • गांजलेल्यांची बहुरंगी दैना (अजाबळी )

    उन,वारा,थंडी यांची नाही तमा

    जन्मभर साथ देतो बहुतेकांना दमा

    बालमजुरांचे नशिबी कुणा जीणे

    खळगी भरण्या पोटाची रक्तही पडे उणे

  • अमेरिकेतील सुखान्त

    कर्करोगाने ग्रासलेल्या आणि अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून पत्नीसमवेत मी मध्यंतरी तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर आंघोळ वगैरे उरकून ‘हॉस्पिस’(हॉस्पिटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंत:काळ जवळ आलेला असतो अशांना ‘हॉस्पिस’मध्ये ठेवतात. त्या ठिकाणी कुठलाही रोग बरा करणारा औषधोपचार होत नाही, परंतु अटळ असणारा मृत्यू सर्वार्थाने शांतपणे व्हावा, वेदना न होता यावा यासाठी वेदनामुक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था हॉस्पिसमध्ये असते. (‘हॉस्पिस’ ही संकल्पना आता भारतातही रुजू लागली आहे. भारतातील काही शहरांमध्ये ‘हॉस्पिस’ आहेत.) अमेरिकेतील ‘हॉस्पिस’मध्ये रुग्ण जास्तीत जास्त किती काळ जगण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. स्वच्छ आणि टापटीप असणाऱ्या या हॉस्पिसमध्ये भेटायला जाणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर वेळेचे बंधन नसते. रात्री- अपरात्री केव्हाही, कितीही नातेवाईक हॉस्पिसमध्ये जाऊन मरणासन्न रुग्णाला भेटू शकतात. रुग्णाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस होते. त्यांना कॉफी, केक इत्यादी पदार्थ मिळण्याची आणि विश्रांती घेण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. हात र्निजतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले असतात. हॉस्पिसमधील कर्मचारी आणि नर्सेस अत्यंत अदबीने वागतात. रुग्ण मरणासन्न अवस्थेत असल्याने त्याच्या मनाने खचलेल्या नातेवाईकांची काळजी सातत्याने जाणीवपूर्वक घेतली जाते. रुग्णाच्या नातेवाईकांसाठी इंटरनेटची आणि फोनची व्यवस्था असते.

    आम्ही सकाळी ११ च्या सुमारास हॉस्पिसमध्ये पोहोचलो आणि दुपारी ४.२५ वाजता माझ्या पत्नीची वहिनी निवर्तली. हॉस्पिसमधल्या सुंदर, शांत आणि आरामदायी वातावरणात हळूहळू श्वास मंद होत तिला मृत्यू आला. योग्य प्रमाणात वेदनाशामके दिल्यामुळे मृत्यू येताना तिच्या चेहऱ्यावर अथवा शरीरावर कुठलीही वेदना अथवा घुसमट जाणवली नाही. हॉस्पिसमधील डॉक्टर जवळच होते. त्यांनी व्यवस्थित तपासले आणि ‘सॉरी’ म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
    मृत्यू एक-दोन दिवसांत येईल, याची पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे फ्यूनरलची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. न्यूयॉर्कमधील लाँग आयलन्ड या भागात असलेल्या ‘फ्यूनरल होम’ या संस्थेस अंत्ययात्रेचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. दु:खाचा पहिला आवेग ओसरल्यावर फ्यूनरल होमच्या व्यवस्थापकास फोन केला गेला. काही मिनिटांच्या आत सुटाबुटातील एक तरुण आणि त्याचा साहाय्यक शववाहिका घेऊन आले. त्याने डेथ सर्टिफिकेट ताब्यात घेतले. मृतदेहाचा ताबा घेतला. चेन असलेल्या कापडी बॅगेत मृतदेह काळजीपूर्वक ठेवून तो शववाहिका घेऊन गेला. जाताना त्याने हळुवारपणे सर्व नातेवाईकांचे सांत्वन केले आणि अत्यंत खुबीने पुढील कार्यक्रमाची माहिती दिली.

    शास्त्रशुद्ध पद्धतीने मृतदेह स्वच्छ करण्यात आला. काही रासायनिक द्रव्ये शरीरात सोडली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी काही जवळचे नातलग फ्यूनरल होममध्ये गेले. त्या मृत शरीरास साडी-चोळी नेसवण्यात आली. फ्यूनरल होममधील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला चक्क मेकअप केला. मखमली पेटीत पहुडलेला तो मृतदेह एखाद्या सुंदर बाहुलीसारखा दिसत होता. दुपारी २ ते ४ आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत त्या मृतदेहाच्या अंत्यदर्शनाचा (viewing) चा कार्यक्रम होता. सुंदर मखमली पेटीत मृतदेह ठेवला होता. ज्या हॉलमध्ये मृतदेह ठेवला होता, तो हॉल उंची फर्निचर, गुबगुबीत गालिचे आणि चांगल्या आसन व्यवस्थेने सजवला होता. फ्यूनरल होमचे सर्व कर्मचारी सुटाबुटात होते. इमारतीच्या समोर सुमारे २०० गाडय़ा उभ्या राहतील, अशी पार्किंगची सोय होती. प्रवेशद्वारावरील दोन तरुणी अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे अदबीने स्वागत करीत होत्या. अमेरिकेतील भारतीय मंडळीसुद्धा सुटाबुटात आली होती. येताना अत्यंत शोभिवंत असे फुलांचे मोठे गुच्छे मृतदेहाशेजारी ठेवण्यासाठी आणत होते. शवपेटीच्या मागे अमेरिकेचा राष्ट्रध्वज होता. मंद आवाजात श्रीमद्भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायाची सीडी लावलेली होती. वातावरणात खिन्नता होती पण कुठल्याही प्रकारची भयाणता, भीती, दडपण जाणवत नव्हते.

    तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता क्रिमेशन होते. स्थानिक ब्राह्मणांनी फ्यूनरल होममधील हॉलमध्ये काही धार्मिक विधी केले. मंत्रघोषात शवपेटी बंद करण्यात आली. त्या वेळी सर्व भारतीय आणि अमेरिकन मंडळींनी हात जोडून नमस्कार केला. शवपेटी एका लांब रुंद शववाहिकेत ठेवण्यात आली. शववाहिका मार्गस्थ होण्यापूर्वी शववाहिकेबरोबर असलेल्या गाडय़ांचा जो ताफा होता, त्या ताफ्यातील प्रत्येक चालकाच्या हातात क्रिमॅटॉरिअमपर्यंत जाण्याचा मार्ग आणि नकाशा दिला गेला. शववाहिका मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे दिवे लावून गाडय़ांचा ताफा मार्गस्थ झाला. प्रचंड ट्रॅफिक असूनही या अंत्ययात्रेतील गाडय़ांच्या ताफ्याला कुणीही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत नव्हते. उलट सन्मानाने पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करीत होते. क्रिमॅटॉरिअममध्ये जाण्यापूर्वी शववाहिका मृताच्या घरापाशी गेली. घराच्या दरवाजात फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी गुलाबाची फुले ठेवली. काही काळ सर्वजण स्तब्ध उभे राहिले आणि पुन्हा गाडय़ांचा ताफा मार्गस्थ झाला.

    सुमारे ३५ मैलांवर असलेल्या क्रिमॅटॉरिअममध्ये सर्वजण पोहोचले. पुन्हा मंत्रपठण होऊन विद्युत दाहिनीमध्ये हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले. फ्यूनरल होमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होण्यासाठी साहाय्य केले. मंत्रपठण होत असताना मान खाली ठेवून आणि अदब दाखवून आपल्या धार्मिक भावनांचा आदर राखला जात होता.
    विद्युतदाहिनी असलेली इमारत भव्य नक्षीकाम केलेली होती. एखाद्या चर्चसारखी तिची रचना होती. सभोवती सुंदर फुलांची बाग होती, कारंजी होती. हल्ली दफन करण्यासाठी जमिनीचा तुटवडा असल्याने पुष्कळ अमेरिकन लोकही पुरण्याऐवजी विद्युतदाहिनीमध्ये दहन करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये विद्युत दहन करण्याच्या पर्यायावर एका पत्रकाराने भलामोठ्ठा लेख लिहून विद्युतदहनाची आवश्यकता असल्याचे ठासून सांगितले होते.
    ज्या दिवशी दहन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी अस्थी देण्यात आल्या. व्यवस्थितपणे एका खोक्यात प्लॅस्टिकच्या झिपलॉक असलेल्या पिशवीत पॅक करून अस्थी देण्यात आल्या. या अस्थींबरोबर डेथ सर्टिफिकेट आणि क्रीमेशन सर्टिफिकेट एका फाईलमध्ये देण्यात आले. ही सर्व कामे फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कुठलीही तसदी नव्हती. या सर्टिफिकेटबरोबर फ्यूनरल होमतर्फे सांत्वनाचे पत्र होते आणि एका भल्या मोठय़ा पुडय़ात केक्स्, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थ दिले होते.

    (२७ नोव्हे.२०१० साली चतुरंग लोकसत्ता मधे सदर लेख मी प्रसिद्ध केला होता. तो पुन्हा या ठिकाणी देत आहे.)

    -- चिंतामणी कारखानीस

  • हे सुर्वे नारायणा…..(श्रद्धांजली)

    तु वारसदार सूर्यकुलाचा

    ज्यांना थांबणे माहित नाही……………

  • बाळासाहेबांचं स्मारक झालेच पाहिजे !

    बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्कात व्हावे अशी लोकभावना आहे. टिळकांचे खरे नावं ‘केशव’ असे असले तरीही ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रख्यात होते. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे या दोन नावांत ‘बाळ’; या दोघांचा जन्म दिनांक ‘२३’ व इंग्रजी वर्णाक्षरात ‘BT’ म्हणजेच ‘B for Bal & T for Tilak/Thackeray’ अशी समानता या लोकोत्तर महान नेत्यांमध्ये सुयोगाने पहावयास मिळते.

  • इंधन दर वाढ आणि इंधन शिल्लक नाही

    मग काय मोजायचे ना आता वाढीव पैसे इंधनासाठी

  • तो… आंब्याचे टाळं आणि बिनशेंडीचा नारळ ?

    ..आज समोर रांग बघीतली आणि भयानक प्रकार वाटला.
    सगळे रांगेत उभे होते , आपले अवॉर्ड घेत होते...
    अनेकांना का आणि कसे मिळाले ह्याचे सगळे कोडे होते.
    साहेबाने लिस्ट बघीतली आणि पटापट खुणा केल्या,
    कोण कधी उपयोगी पडणार हे त्याला लगेच कळत होते
    कारण तो मुरलेला साहेब होता ना.
    हा प्रसंग प्रत्येक शहरात दिसतो.
    त्यात एखादे आंब्याचे टाळं पण असते स्टेजवर.
    त्याला काहीजण ' चमको ' म्हणतात.
    एखाद्या राजकारण्याला ते आंब्याचे टाळं येताना दिसले की हबकतो.
    कारण पाच पंचवीस हजाराची फोडणी निश्चित.कुणासाठी तरी मदत मागतो.
    स्वतः क्रेडिट घेतो.
    कारण ह्यांचा वावर सगळीकडेच असतो . प्रत्येक कार्यक्रम ते असतातच.
    मग कधी तो कलाकार असतो , तर कधी तो शिक्षणतज्ञ म्ह्णून असतो , कधी तो डॉक्टर असतो .. तर एखादा कागदभरू लेखक.
    मला एक कळत नाही ह्या कवी-लेखकांनी लिहावे मस्त पैकी रहायचे .
    कशाला पुढे पुढे करतात.
    कारण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या पुरवणीमध्ये फोटो हा पायजेल कारण त्याची चटकच असते त्याला.
    पेप्रात फोटो आला की हा खुश...मी त्याला एक दिवसांचाच गणपती म्हणतो आणि तो सुद्धा गल्लीतला .
    दुसऱ्या गावात शहरात त्याचा मागमूसही नसतो.
    कार्यक्रमात तो अगदी प्रमुख पाहुण्याच्या जवळ उभा रहातो.
    कधीही दोन्ही कोपऱ्यात उभा रहात नाही कारण हे पेपरवाले निश्चित त्याचा फोटो कापणार, येदित करणार.
    पेपरवाले हरामी असतात म्हणजे फोटो कापण्यात.
    एक दोनदा कोपऱ्यात उभा राहिला टाकला फोटो मधून कापून.
    म्ह्णून तो विशेष काळजी घेतो, अगदी सराईत सावधपणे.
    मध्ये उभे राहिले की झक मारून तो फोटो लावता येतो.
    कारण त्या फोटोमधून त्याला एडिट करता येत नाही.
    असा तो हळूहळू मोठा होत जातो.
    पेप्रात फोट म्हटल्यावर साधी माणसे मानतात त्याला कारण पेपरातफोटो आला म्हणून.
    ह्याबाबतीत हे आंब्याचे टाळं फार जागरूक असत.
    समजा आपल्या नावापुढे भाऊ किंवा राव नाही लावले गेले की चिडतो.
    आज तो पण दिसला.
    भाषण देण्यात एकदम तरबेज,
    प्रमुख पावण्याच्या आधी बोलून घेतो,
    इतका बोलतो की प्रमुख पाहुण्यांचा बोलण्याचा स्टॅमिना खलास होतो.
    तिकडे मीडिया वाले बोबलत रहातात कारण त्यांना प्रमुख पावण्याची ' बाईट ' हवी असते.
    परंतु हा आधीच ' चावत ' असतो..
    उद्या पेप्रात हमखास फोटो आहे बघा तुम्ही.
    आणि खरेच त्याचा फोटो आला आणि समोरच्या चहावाल्याने पहिला.
    त्याने सांगितले त्याला चहा पण मिळाला . त्याने पैशाचे पाकीट काढले...म्हणा नाटक केले.
    तितक्यात चहावाला म्हणाला काय साहेब.
    आंब्याचे टाळं एकदम खुश.
    चहावाल्याने त्याला वाकून नमस्कार केला.
    आंब्याचे टाळं भलताच गहिवरल . नाक्यावरचे लोक हे रस्त्यात बघत होते.
    आणि असेच गावागावात आंब्याचे टाळं खुश होत असणार हे निश्चित.
    पण त्याचा उपयोग कुणाला...त्या बिनशेडीच्या नारळाचा उपयोग कुणाला..
    त्याच्या बायकोला चटणी करायला..
    ती नेहमीच होत असते...
    ..आणि ती म्हणत पण असते जा उनाडायला .

    सतीश चाफेकर