‘स्वराज्य 350’ या शीर्षकाने सजलेल्या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ आपण येत्या 23 जुलै 2023 रोजी, संध्याकाळी ठीक 5 वाजता, सहयोग मंदिर सभागृह, दुसरा मजला, नौपाडा, ठाणे (प.) येथे करीत आहोत. व्याख्यानाचा विषय आहे ‘नरवीर तानाजी यांची शौर्यगाथा’ आणि व्याख्याते आहेत ऐतिहासिक लढायांचे अभ्यासक आणि व्याख्याते विंग कमांडर शशिकांत ओक.
नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका मित्राला फोन केला. शुभेच्छा दिल्यानंतर सगळे म्हणतात तसं तो मला ‘सेम टू यू’ म्हणेल या आशेने मी काही क्षण थांबलो. पण कसलं काय, तो अत्यंत त्रासिक आवाजात चिरकला ‘अरे, कोणतं नविन वर्ष? कोणाचं नविन वर्ष? हे त्या इंग्रजांच्या बाळांचं नववर्ष आहे, आपलं नाही. आपलं नववर्ष सुरु झालं की शुभेच्छा दे.’ असं म्हणून त्याने रिसीव्हर आदळला. मी त्याचा कडवट झालेला चेहरा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. माणसं काही कारण नसताना अशी सतत वैफल्यग्रस्त असल्यासारखी का वागतात? त्यांना आनंदाची अॅलर्जी असते का? थोडंही नाउमेद न होता 'मित्र' नावाच्या आणखी एका प्राण्याला फोन लावला. शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद देण्याचं सौजन्य त्याने दाखवलं खरं, पण त्याचबरोबर ‘आम्ही एक जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्याला नववर्षाचा आनंद मनवणार आहोत’ हे सांगायला तो विसरला नाही. मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, पण ‘हे नववर्ष आमचं नव्हे’ हे ऐकून माझा उत्साह हळूहळू मावळू लागला.
आम्ही असे का वागतो? आयुष्याच्या क्षणभंगूरतेची यथार्थ जाणीव असल्यामुळे स्वतःच्या विवंचना विसरण्यासाठी एकत्र येऊन चार घटका आनंद मनविण्यासाठी मुद्दाम घडवून आणल्या जाण्याऱ्या विविध आनंदोत्सवांना धर्म आणि जातींमध्ये बुडवून काढण्याची आम्हाला का इच्छा होते? एका धर्माचे लोक आनंद मनवत असताना दुसऱ्या धर्माच्या लोकांनी त्यावेळी आनंद मनवू नये असं कोणत्या धर्मग्रंथात लिहिलं आहे? एखाद्या महोत्सवाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटण्यासाठी तो महोत्सव आधी ‘आपला’ असायला पाहिजे ह्यालाच सर्वधर्मसमभाव म्हणायचं का? आनंद वाटण्याऐवजी आम्ही आनंदोत्सवांना वेगवेगळ्या प्रकारची लेबलं लावून त्यांच्या वाटण्या करतो आणि त्यानंतर आनंदी राहायचं की दिवसभर आंबट चेहरा करून बसायचं हे ठरवतो. ज्यांना भूतकाळात खितपत पडायची सवय नसते त्यांच्यासाठी आयुष्यातला प्रत्येकच दिवस हा नववर्षाचा पहिला दिवस असतो !
केवळ ‘आमच्या’ नव्हे आणि ‘त्यांच्याही’ नव्हे तर ‘आम्हा सर्वांच्या’ नववर्षानिमित्त सर्व मित्र-मैत्रिणींना मन:पूर्वक शुभेच्छा !
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
आमची गांजा ओढणारी टीम आता वाढत चालली होती , दारूचा पटकन तोंडाला वास येतो मात्र गांजाचे तसे होत नाही , फक्त पिताना गांजाच्या धुराचा वास दरवळतो आणि अनुभवी किवा जाणकार लोकांनाच गांजा , चरस वगैरे च्या धुराचा वास कळतो , एकदा गांजा ओढून झाला की तोंडाला दारू सारखा भपकारा येत नाही त्यामुळे आम्ही दारू चे सेवन क्वचित आणि गांजा मात्र नियमित ओढत असू , दारू चढल्यावर बहुतेक वेळा भांडणे , शिवीगाळ , फालतू बडबड असे प्रकार घडतात पण गांजा चे मात्र तसे नाही बहुधा गांजा ओढणारे शांत राहतात भांडणे वगैरे प्रकार त्यांना मानवत नाहीत .
गिरिजात्मक किर-किर
झोपडीत प्रतिभेचा स्पर्श नसतो
गिरिजाताई किरकिरल्या आहेत.
अध्यक्षीय लढाई अगोदरच
उगीच वाकड्यात शिरल्या आहेत.
पॅरिसच्या टॉवरवरुन खालचे विहंगम दृष्य व्हर्च्युअर रियालिटीमध्ये
ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.
संस्थेने सदनिकेचे हस्तांतरणअन्वये व्यक्तीला सभासदत्व देण्याआधी काही अडचण आल्यास कायदेशीर सल्ला घेणे नेहमी हिताचे ठरते. असेच नामनिर्देशन (Nomination), एखाद्या व्यक्तीने अशा व्यक्तीचे नाव कागदोपत्री दाखल करणे, जी व्यक्ती असे नाव दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या नावे असलेली संपत्ती/सदनिका ताब्यात घेण्यास पात्र असेल/विश्वस्त(Trustee).
अगदी सुइसाइड नोट वगैरे लिहून मी आत्महत्येचा ड्रामा सुरु केला . ब्लेडने हाताची शीर कापून घेतो म्हणून उजव्या हाताच्या मनगटावर ब्लेड ने हळूच कापण्यास सुरवात केली , आता आईचा धीर सुटला व ती रडू लागली , ते पाहून , बहिण आणि तिची मुले देखील घाबरून रडू लागली तेव्हा भावाने त्यांना सांगितले ‘ तुम्ही सरळ शेजारी निघून जा मी पाहतो काय होईल ते
आता विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. तरीपण ती निसर्गात असलेल्या विज्ञानाच्या तुलनेत नगण्य आहे याचेही भान शास्त्रज्ञांना आहे. पौराणिक काळात ऋषीमुनींनी आणि विचारवंतानी दिलेली कित्येक स्पष्टीकरणे आजही तंतोतंत लागू पडतात ही खरोखर आश्चर्याची बाब आहे.
अनेक अध्यात्मिक संकल्पनांना विज्ञानीय दृष्टीकोनातून स्पष्टीकरणे देता येणे शक्य आहे. नवीन वर्षापासून विज्ञान आणि अध्यात्म हे श्री गजानन वामनाचार्य यांचे सदर सुरु करण्यामागचा हाच हेतू आहे.
कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे…मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.
Copyright © 2025 | Marathisrushti