गोव्याचे उपमुख्यमंत्री श्री फ्रान्सिस डिसूझा यांचे “भारतात राहणारे सर्व भारतीय हिंदूच आहेत” – या मोठ्या मनाने केलेया विधानाबद्दल अभिनंदन करावयास हवे. हे विधान केल्याने त्यांच्या काथोलिक असण्यावर कुठलीच बाधा येत नाही.
श्रीकृष्णानंद प्रभूंच्या प्रवचनाने परिपूर्ण अशी अध्यात्मिक माहिती आणि त्याबरोबरच महाप्रसाद सेवन करण्यास मिळाल्याने माझ्यासह सर्वच कृष्णभक्त संतुष्ट झाले.
कथा म्हटलं की त्यात ‘नायक’ आला आणि ‘नायक’ नेहमी शुर,पराक्रमी वगैरे असायचाच. मग तो परंपरागत महाकाव्यांचा नायक असू दे किंवा आजच्या चित्रपटांचा ! मात्र या दोन्ही नायकांमध्ये बराच फरक असतो. आपल्या प्राचीन महाकाव्यांचे नायक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असायचे. त्या त्या काळातल्या आसुरी शक्तींविरुद्ध त्यांनी हातात शस्त्रही घेतलं. पण लढणं आणि मारणं एवढाच त्यांच्या शौर्याचा निकष नाही.
आता बोला… काय म्हणावं या बायकांना
कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे…मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.
आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे,
मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे...
भैरवीला, आप्पा ठाकूरांच्या सुप्रसिद्ध गजलेच्या ओळी दस्तुरखुद्द आप्पांच्याच करारी वाणीतून, कानावर पडताच श्रोतृवृंदातून जोशपूर्ण टाळ्यांचा एकच गजर होत ‘गुंतलेले पाश’ हा लालित्याने नटलेला कार्यक्रम संपन्न झाला आणि प्रेक्षकांमधून आज भरून पावलो अशी लखलखित प्रतिक्रिया उमटली.
दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘बांधण जनप्रतिष्ठान’ आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ’ वाशी आयोजित, ज्येष्ठ गजलकार श्रीयुत आप्पा ठाकूर यांचा ‘गुंतलेले पाश’ हा मराठी गजलांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात मोठ्या दिमाखात सादर झाला.
गुंतलेले पाश थोडे सैलसे करणार आहे,
आणि काही रंग गहिरे त्यात मी भरणार आहे...
या संमोहित करणाऱ्या गजलेने कार्यक्रमाची नांदी झाली. येथून पुढे कवयत्री शिल्पा देशपांडे या आकर्षक युवतीने तितक्याच मनभावनं निवेदनाद्वारे गजलचे, आप्पांच्या भावविश्वाचे, मानवी जीवनातील द्वैत-अद्वैताचे, सुख दु:खाचे, कधी बोचणारे तर कधी लोभस आलिंगनासम भासणारे शब्दकळ्यांच्या सुगंधित आभूषणाने अलंकृत अदाकारीने नटलेल्या समयोचित निवेदनाद्वारे गजलविश्वाचे रेशीमबंध अलगद उलगडत नेले.
आयुष्याचे अवघड ओझे खूप दिवस मी पेलत आहे,
आणिक त्याच्या मोहापायी वृद्धत्वाला झेलत आहे...
सांजवेळी, उन्हाच्या उतरणीच्या शांत पर्वाला, लांबलेल्या सावल्या जसजशा धूसर होत जातात, परंतु कुठेतरी तळ्यामध्ये पाण्यात पिकलेले पान पडते आणि चकचकणारे तरंग उमटत जातात, तशाच!
ते तरंग का प्रवाहित होत असतील बरे? याच आशयाच्या पुढच्या ओळींमध्ये आप्पा म्हणतात...
बालपणीची स्वप्ने माझ्या मागे मागे धावत होती,
आणि आता मी मावळताना स्वप्नामागे धावत आहे...
उलिग्नतेतून लगेचच श्रोत्यांना सावरत, दर्दी प्रेक्षकांसाठी प्रेमभरल्या विद्रोहाची पुढची गजल पेश होते...
तुझे ऋतू...
सरळपणाने राहावयाचे तुझ्यात कुठे इमान होते
मी जन्माचा फकीर आणिक तुझे इरादे महान होते...
या विरक्तीने आप्पा मनमानातल्या प्रेयसीला आव्हानात्मक साद घालतात.
आप्पांचा पत्नीवियोग सर्व सुजाण श्रोत्यांनी अनुभवाला तो प्रौढत्व आलं त्याचं काय, या पुढील सादरीकरणात...
आपल्या सुविद्य पत्नीप्रती कृतज्ञतेने व्यक्त होताना ते म्हणतात...
तिच्या सावलीत सदा बहरलो कधीच गलबललो नाही
वादळ वारे होते, तरीही थरथरलो नाही...
आठवांच्या कळवळ्याने भावविवश होत, आपल्या सुसंस्कृत पत्नीकडून अलौकिक विवेकाची शिकवण मिळाल्याचे ते आवर्जून नमूद करतात,
संस्काराने हळूहळू मग विवेक मजला तिने दिला
म्हणून तर मी अतिमोहाने कधीच भरकटलो नाही...
हृदयातून प्रसवलेल्या या ओळीतील आत्मिक रुदनाने, आप्पांसह सर्व सभा गलबलून गेली, अन् श्रोत्यांच्या पापण्या नकळत ओलावल्या.
दु:खालापाचे अश्रु-मोती असेच घरंगळत राहतात.. पुढील गजलेत...
कफन बांधुनी फिरतो आहे,
तरी जगावे म्हणतो आहे...
प्रेक्षकांचा कंठ गहिवरतो, आवंढा गिळताना कष्टी होतात. परंतु आप्पा नवचैतन्याचे मर्म मांडताना वाळूचे घर बांधण्याचा सल्ला देतात.
दिवस उद्याचा घेत उशाला,
स्वप्ने पुढची बघतो आहे...
हळूहळू गजल आणि श्रोत्यांची गुंतलेल्या पाशांची वीण अधिकाधिक घट्ट होत जाते.
आपल्या ओघवत्या निवेदन शैलीने श्रोता आणि गजलकार आप्पा यांच्यामधील सुरेख दुवा साधण्याचे आणि उत्तरोत्तर कार्यक्रम खुलवित नेण्याचे कसब आत्मसात केलेल्या निवेदिका शिल्पाने मग मोर्चा वळविला तो आप्पांच्या कवितेकडे...
इतर काही जागतिक दिनांप्रमाणे
जागतिक महिला दिनही साजरा करतील, हे तुझ्यासाठी
आणि दुसऱ्याच दिवशी
यांच्या नजर तुझ्या देहाच्या
आकृतिबंधावर स्थिरावतील...
अशा परखड भाष्याने प्रेक्षक दिग्मूढ होऊन गेले. निवेदिका शिल्पाने पुढील गज़लेच्या प्रास्ताविकेत म्हटले...
माझ्याच माणसाशी मज बोलता न आले,
त्यांच्या उरात माझे घर बांधता न आले...
आप्पांनी या गज़लेच्या मतला पेश करताना म्हटले..
तसा विश्वास कोणाचा कुठे होताच माझ्यावर,
नको ते यायचे कानी जराशी पाठ फिरल्यावर...
आप्पांच्या या एकापेक्षा एक सरस रचनांच्या आस्वादात सर्वांगाने डुंबत असलेल्या श्रोत्यांना आश्चर्याचा धक्का दिला तो शिल्पाने.
आता आप्पा विठ्ठलालाच धारेवर धरणार आहेत आणि काही आदेशवजा सूचना करणार आहेत. प्रेक्षकही कान टवकारून बसले, तर आप्पा बोलते झाले...
तूर्तास विठ्ठलाने आता असे करावे
सोडून वीट मागे थोडे पुढे सरावे...
बांधून ठेवलेले सोडून हात दोन्ही
आता खुशाल देवा कामात गुंतवावे...
पुढे, समाजातील दंभावर आसूड ओढताना आप्पा विठ्ठलाला साकडे घालतात.
दारातल्या तुझ्या तू हटवून दांभिकांना
संपूर्ण पंढरीचा वारस मला करावे.
ही गजल सादर होतानाच प्रेक्षकांची कधी हसून मुरकुंडी वळली तर कधी आप्पांनी, भक्त पुंडलिकाने विठ्ठलाला जसे वीटेवर ताटकळत उभे राहण्याचे फर्मान सोडले होते तत्सम आता वेळ आली आहे विठ्ठलाने वीट मागे सोडून थोडे पुढे सरतानाच कटीवरील हात सोडून कार्यप्रणव होण्याचे निर्देश दिलेत ते केवळ त्यांच्या गजलेप्रती असलेल्या प्रतिभासंप्पन्न निस्सीम भक्तीमुळे आणि चोखंदळ रसिकवत्सल भावनेने.
भक्तवत्सल विठ्ठलाच्या प्रेमापोटीच साक्षात ईश्वराला म्हणजेच पंढरीच्या विठूरायाला जनोद्धाराची कास धरण्याचे बाळकडू पाजतानाच आख्ख्या पंढरीचा वारस आपल्यालाच करावे अशी सूचना आप्पा करू शकले ते गजलप्रान्तातील त्यांच्या एकमेवाद्वितीय चारित्र्यसंप्पन्न संतशिरोमणी प्रतिमेमुळेच.
या प्रसंगी, सूर निरागस हो... या गाण्यावर सहजहस्ते श्रीगणरायाचे सुंदर चित्र रेखाटणारे चित्रकार श्री. प्रकाश पाटील यांचा सत्कार ‘बांधण प्रतिष्ठान’तर्फे गज़लप्रेमी विश्वस्त श्री. नाना लोडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच आप्पांच्या आग्रहास्तव नुकत्याच नवी मुंबई अभिमान पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्रीयुत ललित पाठक आणि सुभाष कुलकर्णी यांचा सत्कार माया ठाकूर यांचे मानसपुत्र आणि ठाणे महानगरपालिका उपायुक्त, श्री. संदीप माळवी, यांचे शुभ हस्ते करण्यात आला. आभारप्रदर्शन श्री. दिलीप जांभळे यांनी केले. या प्रसंगी सर्वश्री सर्जेराव कुईगडे, महादेव देवळे, पल्लवी देशपांडे, विजय दाते, भूषण मालवणकर, वसंत साळी, डॉ. राम पंडित, प्रमोद कर्नाड, संदीप माळवी, डॉ. अशोक पाटील, नाना लोडम, सुभाष कुळकर्णी, ललित पाठक, अशोक भगत, प्रा. वर्षा भोसले आणि विद्या तांबवे यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गुणग्राहक रसिक श्रोते उपस्थित होते.
लेखक - श्री घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-
बातम्या आणि जाहिराती यांच्यातले अंतर हळुहळू मिटत चालले आहे. कोविडनंतर तर जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या जातात. पेड न्यूज फक्त निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादीत राहिल्या नाहीत, तर त्या कायमच्याच मानगुटीवर बसल्या आहेत. त्यामुळे बातमी कुठली आणि जाहिरात कुठली हे वाचकांना कळेनासे झाले आहे.
काही माणसांमध्ये समोरच्या व्यक्तीचे अंतर्भूत् गूण ओळखण्याची एक विशेष दृष्टी असते. एकेकाळचा कॉमेडी किंग मेहमूद याच्याकडे ती दृष्टी होती. बरं नुसती दृष्टी असूनही भागत नाही त्या गुणानां संधी कशी व केंव्हा देता येईल याचाही ते विचार करतात. आज चित्रपटसृष्टीतल्या ज्या दिग्गजानांवर आपण मनापासून प्रेम करतो त्यात अमिताभ, आर.डी.बर्मन व राजेश रोशन यांचाही समावेश आहे. आणि या तिघानांही मेहमूदने मूख्य संधी दिली आणि या तिघानाही आपला अमीट ठसा उमटविला. आर.डी. बमर्न खरं तर खूप मोठ्या संगीतकाराचा मुलगा. वडील एस.डी.बमर्नची अनेक गाणी खरं तर स्वत: आरडीने कंपोज केली आहेत. मनात आणले असते तर त्यांनी कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडे शब्द टाकून आरडीच्या कारकिर्दीची वाट मोकळी केली असती पण ‘स्वत:च्या कर्तृत्वावर काय हवे ते करा’ असं मानणाऱ्या लोकांचा तो काळ असल्यामुळे सचीनदांनी शब्द टाकला नसावा.
मेहमूद हा फक्त एक कॉमेडियनच नाही तर निर्माता-दिग्दर्शक होता. स्ट्रगल करणाऱ्या कलावंताचे कलागूण हेरणारा मोठ्या मनाचा माणूसही होता. त्याने आरडीतले टॅलेंट बरोबर ओळखले. १९६१मध्ये मेहमूदने ‘छोटे नवाब’ नावाचा चित्रपट काढला व त्यात आरडी ला पहिली संधी दिली. यात विविध मूडची ९ गाणी होती. मॉर्डन डान्स, विरह गीत, कॉमेडी गीत, कव्वाली, कब्बडी खेळावरील गीत पैकी अशा सर्व प्रकारची गाणी त्यात होती. पैकी “घर आजा घीर आए….” हे लताचे अप्रतिम क्लासिकल ढंगाचे गाणे आजही ओठावर सहज येते. या चित्रपटा पासून या दोघांच्या मैत्रीस सुरूवात झाली जी शेवट पर्यंत टिकली. पूढे आर.डी. बर्मनने चित्रपटसृष्टीत आपल्या आगळ्या रंगाने व ढंगाने चित्रपट संगीतात धूमाकूळ घतला. गमंत म्हणजे याच आरडीच्या बासू देव चक्रवर्ती व मनोहारी सिंग( बासू मनोहारी) या सहाय्यकानां मेहमूदने आपल्या ‘सबसे बडा रूपैय्या’ या चित्रपटात स्वतंत्र संधी दिली.( आठवा… ना बिबी ना बच्चा, ना बाप बडा ना मैया..द होल थिंग)
१९६१ ला सुरू झालेला हा संगीतमय प्रवास १९९४ ला संपला. ३०० च्या आसपास गाणी देणारे आर.डी बर्मन चिऋपटसृष्टीत पचंम या नावाने ओळखले जात. संगीतातल्या सात सुरात सा आणि प हे दोन स्वर शुद्ध मानले जातात तर बाकीचे पाच स्वर दोन प्रकारात गणले जातात तीव्र आणि कोमल. संगीतातला प अर्थात पचंम ही आरडी ओळख ठरली. लहानपणी त्यानां टुबलू या नावाने सर्व हाक मारीत. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांनी एका गाण्याला चाल लावली ज्याचा पूढे सचिनदानी फंटूश या चित्रपटात वापर केला….”ये मेरी टोपी पलटके आ” हे ते गाणे. तसेच प्यासा ममधील “सर जो तेरा चकराये” याची चाल पण त्यानीच बांधली होती. परदेशी वाद्यां इतकाच देशी वाद्यांचा अप्रतिम वापर पचंम दा करीत असत. पूढे ते, आशाताई, किशोर व गुलजार यानीं चित्रपटसृष्टीला अप्रतिम गाणी दिली………………‘घर आजा घिर आई बदरिया सावरिया’ (छोटे नवाब- लता) मुजरा शैली व सेमी क्लासिकल असलेले हे गाणे मेलडीचेउत्तम उदाहरण आहे……….. ‘दइया ये मैं कहां आ फंसी’ (कारवां-लता) यात हास्य निर्मितीसाठी ऑर्केस्ट्राचा उत्तम वापर केला आहे……….’चुनरी संभाल गोरी’ (बहारों के सपने- मन्नडे व लता) पाश्चीमात्य संगीताचा छाप म्हणून ओळखले जाणाऱ्या पंचमदानी या गाण्यात अस्सल बिहारी मातीचा दरवळ दिलाय. यातील ताल वाद्यांचा मेळ ऐकण्या सारखा आहे…………’पल दो पल का साथ हमारा’(बर्नींग ट्रेन- रफी व आशा) साहिरची ही कव्वाली पचंमदानी केदार रागाचा मुलायम मुलामा देऊन किती सुंदर बांधली आहे…………….’अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी’ (किताब) या गाण्यात तर चक्क मुलांच्या डेस्कच्या ध्वनींचा वापर करून घेतला आहे……………….’मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है’ (इजाज़त- आशा भोसले) हे गाणे जेव्हा गुलजार यांनी पचंमदाकडे पाठवले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती- ‘मला ही सामानाची यादी कशाला पाठवलीत. याला कशी चाल लावायची?’ पण गुलजार यानां माहित होते पचंमदाच याला चाल लावू शकतात आणि झालेही तसेच. या गाण्याने इतिहास रचला…………………………..’तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं’ (आंधी- किशोर लता) यातील मधून मधून पेरलेले संजीव कुमारचे संवाद आणि लता किशोरचा आवाज म्हणजे पचंमदाच्या प्रतिभेचे सर्वोच्च शिखर…………’चांद मेरा दिल’ (हम किसी से कम नहीं)या गाण्यात पाच सहा छोटीछोटी गाणी होती. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचा अनोखा मेळ म्हणजे हे गाणे……………’दम मारो दम’(हरे कृष्ण हरे रामा- आशा) या गाण्यातल्या सुरूवातीच्या गिटारच्या सुरांनी ७० च्या दशकातील पिढी पार वेडी झाली होती……………..’रैना बिती जाए’( अमर प्रेम- लता) हे गाणे जेव्हा मदन मोहन यांनी ऐकले तेव्हा त्यांनी सचिन देव बर्मन यानां फोन केला -‘’हे गाणे तुम्ही अप्रतिम रचले आहे,शुभेच्छा’’ म्हणाले. पण सचिनदा म्हणाले हे मी नाही पचंमने केले आहे तेव्हा मदन मोहन देखिल चकीत झाले………………………………बिती ना बिताई (परीचय- भूपेंद्र व लता)…………पचंमदाच्या गाण्याची यादी खूपच मोठी आहे…
रसिक प्रेक्षकातील प्रत्येकाला त्यांचे किमान एक तरी गाणे हे आवडतेच. ते स्वत: उत्कृष्ट हार्मोनिका व माऊथ ऑर्गन वाजवित असत. सामता प्रसाद या विख्यात तबलजी कडून तबला वादनाचे धडेही त्यांनी गिरवले होते.शोले मधील चल धन्नो अशी साद घालून वसंती जेव्हा टांगा पळवते तेव्हा तबल्याचे कडाडणारे बोल आठवा ते पचंमदानी वाजवले होते. तसेच शोले मधील गब्बर जेव्हा जेव्हा येतो त्यावेळचे पार्श्व संगीत आठवून बघा….काचेच्या ग्लासाने या ध्वनीची निर्मिती त्यांनी केली होती…..त्यांनी स्वत:च्या वेगळ्या आवाजाचा देखील छान वापर करून घेतला………चित्रपट विश्वातील अनेक गुणी कलावंत कमी वयात आपल्याला सोडून गेले. शुद्ध स्वराचे प्रतिक असलेला ‘पंचम’ सूर वयाच्या ५५ व्या वर्षी कोमल होऊन कायमचा विसावला.….
-दासू भगत (२७ जून २०१७)
१९३० ते १९४० या दरम्यान भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू झालेली अनेक मराठी कुटुंब दिल्लीत स्थायिक झाली. त्यांच्यासोबत मराठी सण, परंपरा आल्याच. याचवेळी त्यांनी गणेशोत्सवाची परंपराही सोबत आणली. दिल्लीत कामधंदा आणि राजकारण या दोन्हीसाठी मराठी माणसांची संख्या वाढल्यावर महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव ही उत्सव संस्कृतीही इथे रुजायला लागली.
पैसा म्हणजे देव नाही
Copyright © 2025 | Marathisrushti