एकदा एक तरुण संन्यासी प्रवास करीत असताना, त्याला असाच एक प्रवासासाठी बाहेर पडलेला संन्यासी भेटतो. दोघे एकमेकांना अभिवादन वगैरे करतात आणि पुढचा प्रवास एकत्र करायचा ठरवतात. दुसऱ्या संन्याशाच्या झोळीमध्ये काहीतरी जड वस्तू असते. तो ती झोळी सतत सांभाळतो आहे असे पहिल्या संन्याशाच्या लक्षात येते. रात्री झोपताना सुद्धा तो ती झोळी दूर ठेवायचा नाही. याचे पहिल्या संन्याशाला राहून राहून आश्चर्य वाटत राहते.
त्यांचा प्रवास चालूच राहतो आणि पहिल्या संन्याशाला जाणवते की याचे जास्त अवधान त्या झोळीवरच आहे. एकदा सायंकाळी दोघे एका विहरीपाशी हातपाय धुवायला थांबतात आणि तीच संधी पाहून पहिला संन्यासी त्याच्या झोळीत काय आहे ते पाहतो. त्यात एक सोन्याने भरलेली लहान पेटी असते. ती पेटी तो तिथेच टाकून देतो आणि एक त्या आकाराची वीट झोळीत ठेवतो.
ते पुढे जायला निघतात, तर दुसरा म्हणतो,"आता संध्याकाळ झाली आहे आणि पुढे जंगल आहे. चोराचिलटांची भीती आहे आपण येथे कुठेतरी मुक्काम करू." त्यावर पहिला संन्यासी म्हणतो,"अरे आपण संन्यासी! आपल्याला काय फरक पडतो?" फार आग्रह केल्यावर शेवटी दुसरा जंगलातून पुढे जायला तयार होतो. जंगलात रात्री मुक्काम करताना तो झोळी अगदी स्वतःच्या जवळ ठेवून झोपतो. अधुनमधुन चाचपून खात्री करून घेत असतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला संन्यासी त्याला, झोळीची इतकी काळजी का वाटते ते विचारतो. त्यावर तो सांगतो की त्यात सोने भरलेले एक पेटी आहे आणि तो ती पेटी जपत आहे. काय जाणो संन्यासी असलो तरी कधीकाळी ते सोने उपयोगाला येईल? त्यावर पहिला संन्यासी म्हणतो,"अरे सोन्याचा मोह आपण का ठेवावा? आणि तसेही तू काल सायंकाळपासून जे वागवतो आहेस, इतक्या काळजीने जे सांभाळतो आहेस, ज्यापायी तू रात्रीची झोप निवांतपणे घेऊ शकला नाहीस, ते सोने नसून एक वीट आहे. पाहा."
वरील कथा मी जेव्हा वाचली तेंव्हा माझ्यावर तिचा फारच परिणाम झाला. मला ती गोष्ट वाचून असे जाणवले की सोने म्हणून इतके दिवस जवळ बाळगलेले असे बरेच काही आपल्याकडे असू शकेल, की जे जपण्यासाठी आपण जीवापाड धडपडतो, खूप मानसिक ऊर्जा त्यापायी व्यस्त करतो, जे वास्तवात सोने नसून बदललेल्या परिस्थितीमध्ये मातीच असू शकेल. आपण थोड्या थोड्या अंतराने आपल्याला तपासून पाहणे, आपले 'पान रिफ्रेश' करणे हेच हितावह आहे. वर्तमानात जगण्याचा जो उपदेश आपल्याला तत्त्वज्ञ देत असतात, त्याकडे जाण्याचा हा एक चांगला उपायच आहे असे मला वाटले.
-- दीपक गायकवाड
१९६० साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान चित्रपटातील हे गाणे. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणे चित्रित झालं असून हे गीत शब्दबद्ध केले पी. सावळाराम यांनी. संगीत दिग्दर्शन होते वसंत प्रभू यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..
संगीतकार अजय-अतुल यांनी नवा प्रयोग करून ” सजवून साज जशी …” हें गीत ” a ‘ccappella ” पद्धतीत स्वरबद्ध केले आहे.
रवींद्र सावंत
पाऊस धिंगाणा माजवतो,
पाऊस तिला भिजवतो.
पाऊस तिला उअजवतो,
पाऊस तिला रूजवतो.
अलीकडे चातुर्मासातही कांदे खाणार्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात कांद्याला अधिक मागणी प्राप्त होते तसेच त्याला दरही चांगला मिळतो. पण या हंगामात किंवा अन्य वेळी बाजारात अनुकूल परिस्थिती असताना कांदा बाजारात आणायचा तर त्याची योग्य साठवणूक व्हायला हवी. या बाबीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे खराब झालेला कांदा अक्षरश: रस्त्यावर फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर येते.
पुण्यासारख्या शहरातील मॉल संस्कृती आता ग्रामीण भागातही पोहोचणार आहे. पण, हे मॉल शहरातील त्या मॉल्ससारखे नसतील.
बातम्या आणि जाहिराती यांच्यातले अंतर हळुहळू मिटत चालले आहे. कोविडनंतर तर जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या जातात. पेड न्यूज फक्त निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादीत राहिल्या नाहीत, तर त्या कायमच्याच मानगुटीवर बसल्या आहेत. त्यामुळे बातमी कुठली आणि जाहिरात कुठली हे वाचकांना कळेनासे झाले आहे.
अश्विन शुक्ल दशमीला विजया दशमी म्हणतात. या दिवशी शुंभ-निशुंभ, महिषासुर इत्यादी राक्षसांवर श्री दुर्गादेवीने विजय मिळविला, श्री रामांनी रावणावर याच दिवशी विजय मिळवला या कारणाने विजया – विजय मिळवून देणारी दशमी असे म्हटले जाते.
आता आपणच ठरवा शैव आणि वैष्णवात श्रेष्ठ कोण?
Copyright © 2025 | Marathisrushti