महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
दक्षिण सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हे देश आहेत. पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते. जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
नामिबियाचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Namibia, जर्मन: Republik Namibia; आफ्रिकान्स: Republiek van Namibië) हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. नामिबियाच्या उत्तरेला अँगोला व झांबिया, पूर्वेला बोत्स्वाना, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका हे देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विंडहोक ही नामिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख मोठ्या उद्योगांमध्ये यंत्र व यंत्रांचे सुटे भाग हा उद्योग येतो.
कर्नाटक राज्यातील हम्पी शहरात पुरातन दगडी रथ आहे.
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले हे शहर आहे. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावर वसलेले आहे.
शिरूर हे शहर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले एक महत्त्वाचे शहर असून, ते घोड नदीच्या काठावर वसलेले आहे.
हिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते.
ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
थिबा पॅलेस – हे रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. या ९७ वर्षांच्या जुन्या राजवाड्याचे ब्रह्मदेशाच्या इतिहासाशी नाते आहे. ब्रह्मदेशात ७ वर्षे सत्ता गाजविलेल्या राजा थिबा याची राजवट इ.स. १८५५ मध्ये ब्रिटिशांनी उलथवली.
श्रीलंकेतील सिगेरिया या ठिकाणी २०० मीटर उंचीचा एक खडक आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti