महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
पुणे ही महाराष्ट्रची संस्कृतीक राजधानी व ऑक्सफर्ड ऑफ इस्ट अर्थात शिक्षणाचे माहेरघर समजली जाते.अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणा-या संत ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे.
नॉर्वेचे राजतंत्र (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक उत्तरी देश आहे. स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर समुद्र आहेत. स्वालबार्ड व यान मायेन हे आर्क्टिक महासागरामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही आहे. हाराल्ड पाचवा हे येथील विद्यमान राजे आहेत.
भिमुनीपट्टणम हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील एक शहर आहे. देशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात असून, तिची स्थापना ९ फेब्रुवारी १८६१ रोजी झालेली आहे.
पोलंड हा मध्य युरोपातील एक देश आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूस व युक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया, नैऋत्येला चेक प्रजासत्ताक तर पश्चिमेला जर्मनी हे देश आहेत. ३,१२,६८५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला पोलंड हा आकाराने युरोपातील ९वा व जगातील ६९वा मोठा देश आहे. वर्झावा तथा वॉर्सो ही पोलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
गडचिरोली जिल्ह्याला सर्वात जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके राज्य महामार्गांनी जोडले आहेत. चंद्रपूर-गोंदिया हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.
वर्धा शहरात सर्वच धर्म-संस्कृतींचे लोक आढळतात. येथे हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांची संख्या तुलनेने जास्त असली तरी ख्रिश्चन, जैन, शीख, या पंथाचे नागरिक ही येथे आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषा बोलली जाते. काही प्रमाणात गुजराती सिंधी आणि पंजाबी या भाषाही बोलल्या जातात.
गोपाळ कृष्ण गोखले – यांचा जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक या गावी झाला. ते भारत सेवक समाजाचे संस्थापक होते तसेच वाराणशी येथे १९०५ साली भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षही होते.
जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. भारतातील १६% केळ्यांचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यातच होत असून, जगातील सर्वाधिक केळ्यांचे उत्पादन करणार्या प्रदेशांपैकी हा एक भाग गणला जातो.
गडचिरोली जिल्ह्याचा बराचसा भाग जंगलांनी व्यापला असल्याने येथील आदिवासींची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासींच्या घराला ‘टोळा’ असे म्हणतात. गोंड वस्तीच्या गावांमध्ये गावाच्या मध्यभागी ‘युवागृह’ असते.
अमेरिकेतील रिओ ग्रँड या आदिवासी भागात ताओस ही वैशिष्ट्यपूर्ण घरे आढळतात.
Copyright © 2025 | Marathisrushti