महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान व रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्या क्रमांकाचे हिरवे शहर असा नागपूरचा लौकिक आहे.
भारतातील हजारो शहरांमध्ये काही शहरे फक्त वास्तूंच्या आणि रस्त्यांच्या ओळखीवरून जिवंत राहत नाहीत; ती शहरं जन्माला येतात श्रद्धेतून, संस्कृतितून आणि अध्यात्मातून. अशीच एक नगरी म्हणजे वाराणसी किंवा काशी.
सियेरा लिओन हा पश्चिम आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनार्यावरील एक छोटा देश आहे. सियेरा लिओनच्या उत्तरेला गिनी, पूर्व व दक्षिणेला लायबेरिया तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सियेरा लिओन ही एक ब्रिटीश वसाहत होती. १९९१ ते २००० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते.
चीनमधील दॅनयांग कुंशन ग्रॅण्ड ब्रिज हा जगातील हाय स्पीड रेल्वेसाठी बांधलेला सर्वात लांब पुल आहे. या पुलाची लांबी १६४.८ किलोमीटर तर रुंदी ८० मीटर आहे. या पुलावरुन जाणारा रेल्वेमार्ग शांघाय आणि नानजिंग या शहरांना जोडतो.
हा पुल २०११ मध्ये वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. ८.५ दशलक्ष डॉलर्स खर्च करुन बांधलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी १०,००० कर्मचारी ४ वर्षे काम करत होते.
मोठे आणि लांब पुल बांधण्यात चीन आघाडीवर आहे. जगातील ३५ लांब पुलांपैकी १७ चीनमध्ये आहेत.
जगातील पहिल्या तीन क्रमांकांचे लांब पूल चीनमध्येच आहेत. दुसर्या क्रमांकावर टियानजिंग ग्रॅंड ब्रिज (११३.७ कि.मी.) तर तिसर्या क्रमांकावर Weinan Weihe Grand (७९.७३ कि.मी.) आहे.
मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. गोंदिया या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे
पँथर टायग्रेस या नावाने ओळखला जाणारा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदे पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो.
महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.
संयुक्त राष्ट्रे (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स) ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे. या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी संयुक्तराष्ट्रांच्या सनदेनुसार आंतरराष्ट्रीय व्यव्हार करायचे, जागतिक शांतता व सुरक्षा रक्षण, परस्पर सहकार्य, मानवी मूल्यांची जपणूक आदी बंधने स्वत:वर लादून घेतली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या विकासात्मक संस्थेपैकी एक संस्था असलेल्या युनिसेफ या संस्थेची स्थापना ११ डिसेंबर १९४६ ला झाली.
Copyright © 2025 | Marathisrushti