महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
नागझिरा अभयारण्य – हे या जिल्ह्यातील अभयारण्य पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहे. दिनांक ७ जून, १९७० रोजी अभयारण्याचा दर्जा मिळालेले, सुमारे १५० चौ. कि.मी परिसरात पसरलेले नागझिरा अभयारण्य हे व्याघ्र दर्शनासाठी, वर्षभरात सरासरी ३०,००० पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरते.
उझबेगिस्तान व इराण दरम्यानच्या वाळवंटात इचन काला हे प्राचीन सहर आहे. या शहरात मध्य आशियन शैलीत बांधण्यात आलेल्या इमारती आणि मशिदींचे अवशेष पहायला मिळतात.
अन्नधान्यांपैकी ज्वारी हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात.
बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला जळगाव जालना परभणी हे जिल्हे आहेत.
म्यानमार हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश – म्हणजे १,९३० कि.मी. – लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते. नंतर फोर्ट सेंट जॉर्ज येथील कारखाना पुनर्रचित करून प्रेसिडेन्सी म्हणजे अध्यक्षांच्या हुकुमतीखाली चालणारी संस्था निर्माण करण्यात आली.
कोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी.
अहमदनगर आणि जिल्हा यांना इतिहासात स्थान आहे. सहकारक्षेत्र आणि साखर उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्यात चांदबिबीचा महाल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व विकास विभाग, भिंगार छावणी तसेच कारागृह आहे.
अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज यांनी अंबेजोगाई विवेक सिंधु ही मराठी कविता लिहिली. निजामशाहीत म्हणजेच १९४८ पूर्वी या शहराला मोमानाबाद म्हणून ओळखले जायचे.
करमाळा हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले शहर आहे. करमाळा हे कमालादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून, हे मंदिर राऊराजे निबाळकर यांनी १७२७ ला बांधले.
Copyright © 2025 | Marathisrushti