महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
एकेकाळी पुणे शहराची ओळख विद्येचे माहेरघर अशी होती. ५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेले पुणे विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ साली झाली. डॉ एम. आर. जयकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. नुकतेच या विद्यापीठाचे नामांतर करण्यात आले. आते ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखले जाते.
तानाजी मालुसरे – छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह असे ज्यांना म्हटले जायचे त्या तानाजी मालुसरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावी झाला.
गोविंदराव टेंबे हे ज्येष्ठ कलावंत कोल्हापूरचेच. श्री. टेंबे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादक होत. आजही त्यांचे नाव संगीत क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांनी काही नाटकांतून अभिनयही केला, पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नाटकातील पदांना शास्त्रीय संगीतावर आधारित उत्कृष्ट चाली दिल्या.
मॉडर्न आर्ट गॅलरीची स्थापना १९५४ मध्ये दिल्ली येथे झाली.
विदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे.
कारवारच्या रविंद्रनाथ टागोर बीचवर नोव्हेंबर २००६ मध्ये आयएनएस चपळ या युद्धनौकेचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रातील ‘तांदळाचे कोठार’ म्हणजे भंडारा! अनेक तलावांचा जिल्हा म्हणजे भंडारा!आणि या तलावांमुळेच जिल्ह्याच्या जलसिंचनात भर तर पडली आहेच,पण जिल्ह्याचा परिसर ही निसर्गरम्यही बनला आहे.
अंजनगाव हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून, येथून जवळच असलेले सुरजी हे या शहराचेच एक जुळे शहर आहे. येथील संत गुलाबबाबांचे समाधी मंदिर प्रसिद्ध आहे.
चॅडच्या वाळवंटात औनिंगा तलाव आहे.
मुंबई (शहर व उपनगर), पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा ५५.६टक्के आहे. भक्कम उद्योग व सेवा क्षेत्रामुळे मुंबईचा वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti