(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • p-1970-Wadi_Junction-300

    कर्नाटकातील वाडी शहर

    वाडी हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हयातील एक महत्त्वाचे शहर आहे या शहरात मोठे रेल्वे जंक्शन असून मुंबई , बंगलोर ,चेन्नई ,हैदराबाद येथून येणार्‍या अनेक एक्स्प्रेस गाड्या या स्थानकातून पुढे जातात.

    या शहरात एसीसी कंपनीचे देशातील दोन मोठे सिमेंट प्लँट असून त्यांची क्षमता अनुक्रमे २.११ व २.०९ लाख मे.टन आहे तसेच येथे अनेक चुनखडीच्या खाणीही आहेत.

    वाडी हे शहर एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द आहे येथून जवळच असलेले कोंचूर या गावातील पुरातन हनुमान मंदिर प्रेक्षणीय आहे. तसेच सुफी संत अस्थाना कादिरी हलकता शरीफ यांचा दर्गाही येथून जवळच आहे देशभरातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.

  • अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास

    या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.

  • जळगाव जिल्ह्यातील लोकजीवन

    जळगाव येथे भिल्ल, पावरा, तडवी, पारधी, गोमीत, गोंड यांसार‘या आदिवासी जमातीचे लोक राहतात. चोपडा, यावल, व रावेर या तालुक्यांमध्ये हे लोक बहुसंख्येने राहत आहेत.

  • रायगड जिल्हा

    रायगड या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीचा किल्ला रायगड हे या जिल्हयाचे प्रमुख वैशिष्ट्य.

  • P-6615-kalpetta-01

    कल्पेट्टा

    ल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत.

  • जालना जिल्ह्याचा इतिहास

    छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श जालना शहरास झाल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मराठवाड्याच्या इतिहासाशीच जिल्ह्याचा इतिहास निगडीत आहे. हा मुलुख निजामाकडून मराठ्यांनी जिंकून घेतला व त्यानंतर १८०३ मधील जाफराबाद तालुक्यातील असईच्या युद्धात मराठ्यांना हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यावा लागला.

  • प्रागचा किल्ला

    प्रागचा किल्ला

    प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे.

  • बोकजन

    बोकजन

    आसाममधील कार्बी अँनलाँग जिल्ह्यातील एक शहर बोकजन. आसाम आणि नागालँडच्या सीमेवर असलेले हे शहर दिमापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून १३८ मीटर उंचीवर वसलेले हे शहर अॅटोनोमस जिल्हा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १९९३६ इतकी या शहराची लोकसंख्या आहे.

  • साखर उद्योग

    साखर उद्योग

    महाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे. सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची संख्या वाढत असून यामध्ये शेतकर्‍याचे भागभांडवल असते.

  • नागपूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    या जिल्ह्यातील प्रमुख पिके संत्री व कापूस ही नगदी पिके आहेत. खरीप हंगामात मुख्यतः तांदूळ, ज्वारी, भूईमुग, कापूस, मूग, तूर, सोयाबीन ,तर रब्बी हंगामात ज्वारी व ऊस, डाळी, ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रात गव्हाच्या क्षेत्रात नागपूर जिल्हा पहिल्या ५ जिल्ह्यांमधे आहे.