महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
नायजेरियाचे संघराज्यीय प्रजासत्ताक हा आफ्रिकेतील एक देश आहे. नायरजेरियाच्या उत्तरेला नायजर, पश्चिमेला बेनिन, पूर्वेला कामेरून हे देश तर दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. आहेत. अबुजा ही नायरजेरियाची राजधानी तर लागोस हे सर्वात मोठे शहर आहे.
उन्हाळा लागला की समुद्र किनाऱ्याची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, गणपतीपुळे, मुरुड, केळशी, भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्यावर परतीचा प्रवास गोड करण्यासाठी आणि या आनंददायी सफरीच्या आठवणी घरापर्यंत पोहचविण्यासाठी सोबत असतो तो कोकणचा मेवा...आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे... कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.
रत्नागिरी जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून दाट वनराई आढळते. डोंगर उतारावरच्या जमिनीमध्ये अनेक प्रकारची फळझाडे चांगल्या प्रकारे उभी राहतात. भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतांना कोकणी माणसाने फळबागा उभ्या केल्यात. सोबत डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात निसर्गत: येणाऱ्या करवंद आणि जांभूळाच्या झाडांमुळे विपूल प्रमाणात फळे उन्हाळ्यात बाजारात येतात.
कोकणात मिळणाऱ्या या मेव्यामुळे उन्हाळ्यातली ही सफरही आनंददायी होत असते. आपल्या आवडत्या व्यक्तिकडे हा मेवा पाठविण्यासाठी कुरिअरची मदतही घेतली जाते. कोकणी मेव्याने रोजगाराची आणि तेवढ्याच 'मधूर' संबंधाची अशी साखळीच तयार केली आहे. 'कोकणच्या राजा' ने रत्नागिरीचे नाव सर्वदूर पोहोचविले असले तरही कोकणचा इतरही मेवा सर्वांच्या पसंतीस उरला आहे.
आल्बेनिया हा आग्नेय युरोपातील देश आहे. याच्या आग्नेयेस ग्रीस, उत्तरेस माँटेनिग्रो, ईशान्येस कोसोव्हो (सर्बिया) तर पूर्वेस मॅसिडोनिया आहे. या भूसीमांशिवाय याच्या सीमा पश्चिमेला एड्रियाटिक समुद्रास व नैऋत्येस आयोनियन समुद्रास भिडल्या आहेत. तसेच आल्बेनियाच्या पश्चिमेस ओत्रांतोच्या सामुद्रधुनीपलीकडे सुमारे ७२ किमी अंतरावर इटलीचा दक्षिण भाग स्थित आहे.
आल्बेनियामध्ये संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. याची राजधानी तिराना येथे असून, देशाच्या ३६,००,००० लोकसंख्येपैकी ६,००,००० लोक तिराना शहरात राहतात. साम्यवादी कालखंडानंतर आल्बेनियाने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून दूरसंचार, वाहतूक, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांसह एकंदरीत अर्थव्यवस्था लक्षणीय प्रगती करीत आहे. सध्या आल्बेनिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपामधील संरक्षण व सहकार संस्था इत्यादी प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २००९ साली आल्बेनियाने युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : तिराना
अधिकृत भाषा : आल्बेनियन
स्वातंत्र्य दिवस : नोव्हेंबर २८, इ.स. १९१२ (ऑटोमन साम्राज्यापासून)
राष्ट्रीय चलन : लेक
देश : अल्बानिया
राजधानी : तिराणा
चलन : अल्बानिया लेक
Country : Albania
Capital city : Tirana
Currency : Albanian lek
Calling code : 355
Country Domain : .al
( Source : Wikipedia )
गडचिरोली जिल्ह्याचा बराचसा भाग जंगलांनी व्यापला असल्याने येथील आदिवासींची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
मालीचे प्रजासत्ताक हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत द’ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९२ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या मालीची लोकसंख्या सुमारे १.४५ कोटी आहे. बामाको ही मालीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मालीमधील बहुतांशी लोकवस्ती दक्षिण भागात नायजर व सेनेगाल नद्यांच्या काठावर वसलेली आहे. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे
भंडारा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध असून जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे.
तिन्ही बाजुंनी समुद्राने वेढलेला भूभाग आणि चौथ्या बाजुला म्हणजे उत्तरेला मुंबईशी जुळलेली शहरे, असे वाढीला प्रतिकूल परिस्थिती असलेले शहर भारतात इतर कोणतेही नाही.
सर्व शहरांची वाढ जमीनीला समांतर होत असते. मात्र मुंबईची वाढ आकाशाच्या दिशेने होत आहे.
१९५० आणि १९५७ साली मुंबईची सीमा उत्तरेच्या दिशेने वाढवण्यात आली. १९५० साली मुंबईच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढवण्यात आल्या. मूळ शहराशी ताळमेळ साधताना पायाभूत आणि आवश्यक सेवासुविधा देणे शक्य व्हावे हा यामागचा उद्देश होता.
मुंबई बंदराचा पूर्वेकडील किनारा संपूर्णपणे मानवनिर्मित आहे.
मोरोक्कोमध्ये असणारी हसन मशीद ही जगातली सातव्या क्रमांकाची मोठी मशीद म्हणून प्रसिध्द आहे.
थोडुपुझा हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. त्रिवेंद्रमपासून२०० किलोमीटरवर असलेले हे शहर ३५.४३ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलरलर आहे.
खुनी दरवाजा दिल्ली येथे आहे.
सत्तासंघर्षात औरंगजेबाने त्याचा भाऊ भाईदारा शिकोह याचे याचे धड शिरापासून वेगळे केले होते.
१८५७ मध्ये इंग्रजांनी शेवटचा बादशहा जफर यांच्या दोन मुलांना येथेच गोळ्या घातल्या होत्या.
Copyright © 2025 | Marathisrushti