महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
वाडी हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हयातील एक महत्त्वाचे शहर आहे या शहरात मोठे रेल्वे जंक्शन असून मुंबई , बंगलोर ,चेन्नई ,हैदराबाद येथून येणार्या अनेक एक्स्प्रेस गाड्या या स्थानकातून पुढे जातात.
या शहरात एसीसी कंपनीचे देशातील दोन मोठे सिमेंट प्लँट असून त्यांची क्षमता अनुक्रमे २.११ व २.०९ लाख मे.टन आहे तसेच येथे अनेक चुनखडीच्या खाणीही आहेत.
वाडी हे शहर एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द आहे येथून जवळच असलेले कोंचूर या गावातील पुरातन हनुमान मंदिर प्रेक्षणीय आहे. तसेच सुफी संत अस्थाना कादिरी हलकता शरीफ यांचा दर्गाही येथून जवळच आहे देशभरातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.
या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.
जळगाव येथे भिल्ल, पावरा, तडवी, पारधी, गोमीत, गोंड यांसार‘या आदिवासी जमातीचे लोक राहतात. चोपडा, यावल, व रावेर या तालुक्यांमध्ये हे लोक बहुसंख्येने राहत आहेत.
रायगड या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीचा किल्ला रायगड हे या जिल्हयाचे प्रमुख वैशिष्ट्य.
ल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत.
छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श जालना शहरास झाल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मराठवाड्याच्या इतिहासाशीच जिल्ह्याचा इतिहास निगडीत आहे. हा मुलुख निजामाकडून मराठ्यांनी जिंकून घेतला व त्यानंतर १८०३ मधील जाफराबाद तालुक्यातील असईच्या युद्धात मराठ्यांना हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यावा लागला.
प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे.
आसाममधील कार्बी अँनलाँग जिल्ह्यातील एक शहर बोकजन. आसाम आणि नागालँडच्या सीमेवर असलेले हे शहर दिमापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून १३८ मीटर उंचीवर वसलेले हे शहर अॅटोनोमस जिल्हा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १९९३६ इतकी या शहराची लोकसंख्या आहे.
महाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे. सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची संख्या वाढत असून यामध्ये शेतकर्याचे भागभांडवल असते.
या जिल्ह्यातील प्रमुख पिके संत्री व कापूस ही नगदी पिके आहेत. खरीप हंगामात मुख्यतः तांदूळ, ज्वारी, भूईमुग, कापूस, मूग, तूर, सोयाबीन ,तर रब्बी हंगामात ज्वारी व ऊस, डाळी, ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रात गव्हाच्या क्षेत्रात नागपूर जिल्हा पहिल्या ५ जिल्ह्यांमधे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti