(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर सासवड

    सासवड हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आचार्य अत्रे यांचे जन्मगाव आहे.

  • मंदिरांचे शहर – खजुराहो

    मंदिरांचे शहर – खजुराहो

    मध्यप्रदेशातील छत्तरपुर जिल्ह्यातील खजुराहो हे मंदिर समूहाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. या शहरात लहान मोठी ८५ पेक्षा जास्त मंदिरं आहेत.

  • पुण्याची पर्वती टेकडी

    पुण्याची पर्वती टेकडी

    पुण्याच्या अनेक भागांतून दृष्टीस पडणारी पर्वती ही ऐतिहासिक टेकडी पुणे शहराच्या मध्यभागात आहे. या टेकडीची उंची २१०० फूट आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे १०० पायर्‍या आहेत. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.

  • राजस्थानातील भरतपूरचा लोहगड आयर्न फोर्ट

    राजस्थानातील भरतपूरचा लोहगड आयर्न फोर्ट

    राजस्थानातील भरतपूर येथे जाट शासक महाराजा सूरजमल यांनी हा किल्ला बांधला. यासाठी त्यांनी संपूर्ण संपत्ती खर्ची घातली.

  • रायगड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७१४८ कि.मी.² इतके आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २२,०७,९२९ एवढी आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडे अरबी समुद्र असून पूर्व दिशेला सह्याद्रीची पर्वतरांग आहे.

  • पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले एक महत्त्वाचे शहर शिरुर

    शिरूर हे शहर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले एक महत्त्वाचे शहर असून, ते घोड नदीच्या काठावर वसलेले आहे.

  • अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिर

    अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिर

    जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग येथील प्रसिध्द मंदिर आहे. सूर्याला समर्पित असलेले हे देशातील एकमेव सर्वांत सुंदर मंदिर आहे. कर्कोटक वंशाचे राजा ललितादित्य मुक्तापीड यांनी इ.स. ७२५-७५६ च्या मध्यात मंदिराची स्थापना केली.

  • रॉक गार्डन – चंदीगड

    रॉक गार्डन – चंदीगड

    पंजाब, हरियाणा राज्याची राजधानी असलेल्या चंदीगड या शहरात प्रसिध्द रॉक गार्डन आहे. राजधानी शहर प्रकल्पात इन्स्पेक्टर पदावर असलेल्या नेकचंद व्यक्तीने या गार्डनची निर्मिती केली.

  • p-2276-kanakeshwar-mandir-alibag

    कनकेश्वरचा श्रीराम सिद्धीविनायक

    रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे १० किमी अंतरावर मापगाव येथून ७५० पायर्‍या चढून गेल्यावर कनकेश्वर हे २००० फूट उंचावर डोंगराच्या गर्द झाडीत वसलेले गाव आहे. याठिकाणी श्रीराम सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या ठिकाणी शंकराचे स्वयंभू स्थान आहे आणि शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे.

    p-2276-kanakeshwar-mandir-alibagगणेशमूर्तीच्या बाजूंना ऋद्धि-सिद्धिच्या संगमरवरी मूर्ती आहेत. शेजारीच मूळ मूर्तीची प्रतिकृती व तांब्याच्या पेटीत ठेवलेली मूळ गणेश मूर्ती आहे. ही मूळ मूर्ती म्हणजेच 'लक्ष्मी गणेश' आहे. ती पिवळ्या संगमरवराची असून तिच्याही बाजूस ऋद्धि सिद्धी व लक्ष लाभ (पुत्र) असून ती कोरिव व अती लहान आहे. ही मूर्ती सन १७०० च्या सुमारास परशुरामांनी लंबोदरानंद स्वामीना ध्यानधारणेसाठी दिली अशी कथा आहे. परशुरामांच्या सांगण्यानुसार तिची पुजा केली जात नाही. पूजेची मोठी मूर्ती बडोद्याचे सावकार मैराळ यांच्याकडून आणली आहे. येथील उंदीर सुद्धा एक लहान स्वतंत्र मंदिरात आहे.

    या मंदिराशेजारी लंबोदर स्वामींची समाधी आहे.

    कनकेश्वराला मुंबईहून रेवसपर्यंत सागरमार्गे जाता येते; रेवस ते कनकेश्वर अशी एस . टी . आहे. अलिबाग धरमतर एस. टी. नेही कनकेश्वरला जाता येते.

    कनकेश्वर मंदिराची माहिती देणारा हा एक व्हिडिओ बघा...

    https://www.youtube.com/watch?v=WwrOvkE-hOk

  • बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    बीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे,त्यामुळे राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो.