(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • जैसलमेर येथील मरु उद्यान

    राजस्थानातील जैसलमेरमध्ये असलेले मरु उद्यान हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.

    या उद्यानात लक्षवधी वर्षांपूर्वीच्या वृक्षांचे फॉसिल्स आहेत. इ.स. १९८० मध्ये या उद्यानाची निर्मिती झाली आहे.

  • सुरीनाम

    सुरीनाम हादक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • माल्टा

    सोळाव्या शतकात माल्टामध्ये सरंजामदारांचे अस्तित्व होते. १७९८ मध्ये नेपोलियनने माल्टावर ताबा मिळविला. १८०५ मध्ये माल्टाची सत्ता पुन्हा सरदारांच्या हाती गेली.

  • नंदुरबार जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.

  • पोर्तुगाल

    पोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगाल ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • पुणे महानगरपालिका सेंद्रिय घन कचरा बायो गॅस ऊर्जा

    पुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे.

  • रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण महाड

    रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे.

  • कोकणचा मेवा – कोकम

    आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही बाजारात मिळतात. कोकमच्या सारची चवही पर्यटकांना या दिवसात घेता येते. मात्र सोबत पॅकींगमध्ये उपलब्ध असलेले गोड-आंबट कोकम किंवा कोकम सरबतालाच पसंती जास्त असते. नारळ आणि कोकमापासून बनविलेल्या सोलकढीची लज्जतही काही निराळीच असते.

  • सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यास अनुकूल पार्श्र्वभूमी तयार करणा-या समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य बराच काळ सातारा जिल्ह्यात होते. साता-याजवळ असलेल्या सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधीया असून येथे समर्थ रामदासांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिरही आहे.

  • मुंबईतील फ्लोरा फाऊंटन

    महाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच रुपांतर झाले.