महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
उत्तर इटलीमद्ये असणारे टेट्रो थिएटरचे बांधकाम १५८० ते १५८५ या काळात झाले. आंद्र पलाडिया याने याची रचना केली. मात्र, याचे उद्घाटन पलाडियाच्या मृत्यूनंतर ३ मार्च १५८५ ला झाले.
मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतूक प्रकल्पात, विरार ते अलिबाग हा १४० कि.मी.चा मल्टी मोडल कॉरिडोर प्रकल्प आहे.
अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे शहर प्राचीन काळात ‘भिल्लठाणा’ म्हणून ओळखले जाई. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे निवासस्थान वा मुक्कामाचे स्थान होय. काळाच्या ओघात या भिल्लठाणाचा अपभ्रंश होत-होत ‘बुलढाणा’ हे नाव रूढ झाले असे म्हटले जाते.
मुंबई-पणजी-कोची हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ या जिल्ह्यामधून जातो. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्ग या नावाने परिचित आहे. सातारा जिल्ह्याला जोडणारा कुंभार्ली घाट, रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट व कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट हे महत्त्वाचे घाट रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.
कसबा गणपती हा पुणे शहराचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो. पुणे शहरात कसबा पेठेत जिजामाता उद्यानाजवळ हे गणेश मंदिर आहे.
अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.
देहू हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, संत तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे. येथेच आपल्या विठ्ठलभक्तीतून तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कागद उद्योग आहे. येथील कागद गिरणी उत्तम प्रतीच्या कागदाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.
हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. भारतातील प्रमुख गणेश पीठापैकी हे एक पीठ होय. या स्थानांजवळील तलावात वर्षाऋतूत नेहमी कमळ असतात. कमळ म्हणजे पदम आणि आलय म्हणजे घर – म्हणून याला पद्मालय असे म्हणतात.
कापूस हे विदर्भाचे मुख्य पीक असून राज्यातील ३२ लाख हेक्टरपैकी निम्मे म्हणजे १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti