महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
राजस्थानातील जैसलमेरमध्ये असलेले मरु उद्यान हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
या उद्यानात लक्षवधी वर्षांपूर्वीच्या वृक्षांचे फॉसिल्स आहेत. इ.स. १९८० मध्ये या उद्यानाची निर्मिती झाली आहे.
विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.
जम्मु आणि काश्मीर राज्यतील रीयासी जिल्ह्यात ही गुंफा आहे. १५० मीटर लांबीच्या या गुंफेत ४ फुट उंचीचे शिवलिंग आहे.
एका मुस्लीम गुराख्याने या गुंफेचा शोध लावला असून ही गुंफा एक पुरातन धार्मिक स्थळ आहे.
तेझू हे अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहरात मिश्मी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. या जमातीचा इतिहास महाभारत काळापर्यंत मागे जातो. कृष्णाची पहिली राणी असलेली रुक्मिणी ही मिश्मी जमातीची होती, अशी या लोकांची श्रध्दा आहे.
कर्नाल हे हरियाणा राज्यातील अतिशय पुरातन शहर आहे.
महाभारत काळात या शहराचे नाव कर्नालय असे होते. हे शहर कौरवांनी स्थापन केले आहे.
उच्च प्रतिच्या तांदळाच्या निर्मितीसाठी हे शहर आता प्रसिध्द आहे. डेअरी संशोधन संस्था येथे असून, येथे मोठे चराई क्षेत्र आहे.
उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या दिसू लागतात. हापूसला चांगली किंमत येत असल्याने बागेची राखण करण्यासाठी गड्यांची हालचाल सुरू झालेली दिसते. आंब्याच्या पॅकींगसाठी लाकडी पेट्या बनविण्याचा व्यवसाय सुरू होतो.
भातशेतीनंतर उरलेला पेंढा शेतकरी उडवी (ढीग) करून जपून ठेवतात. या पेंढ्याला आंबा पॅकींगसाठी मागणी असते. स्थानिक बाजारापासून सातासमुद्रापारही हा हापूस जातो. मुंबई-गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी शेतकरी आंबा विक्रीसाठी बसलेले असतात. रत्नागिरीकडून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या प्रत्येक खाजगी वाहनात किंवा एसटीमध्ये हापूसची पेटी या दिवसात दिसतेच.
ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट हे ज्वालामुखीनिर्मित बेट असून, या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट महत्त्वपूर्ण आहे.
कोलंबसने १४९२ ला या बेटावर पाऊल ठेवल्यानंतर हे बेट प्रकाशात आले.
बेनिन येथील अॅबॉमी राजघराण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाला विशेष महत्व आहे.
१६२५ते१९०० या काळात १२ राजांनी येथे वास्तव्य केले.
४४हेक्टर परिसरात पसरलेल्या या परिसराची नोंद जागतिक वारसा यादीत आहे.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एका स्तंभावर गणेशपट्ट आहे. येथील भट यांच्या घरासमोरील ओसरीमध्ये असलेल्या ९० से. मी स्तंभावर चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. यापैकी सर्वतोभद्र हा एक गणेश आहे. अतिशय पुरातन मूर्तीमुळे या गणेशाला अनोखे महत्त्व आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti