महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.
नंदेश्वर हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जत ते मंगळवेढा हा १७१ क्रमांकाचा राज्यमहामार्ग या शहरातून जातो.
मार्च महिन्यात इतरत्र अभावानेच आढळणारी पांढरट पिवळी टपोरी तोरणीची फळे बाजारात येतात. अलिकडे या फळांचे प्रमाण कमी झाले आहे. आंबट-गोड चवीची ही फळे इथल्या विविधतेची ओळख करून देतात.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच शेगावमध्ये संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ निर्माण केले असून देश- विदेशातील पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. या विस्तीर्ण परिसरात आध्यात्मिक तसेच मनोरंजन केंद्रही आहे.
साने गुरुजी – अतिशय संवेदनशील लेखक, कवी व समाजसुधारक साने गुरुजी हे काही काळ जिल्ह्यातील अंमळनेर येथे वास्तव्यास होते.
सीताबर्डी हा नागपूर शहराचा मध्यभाग. नागपूरमधील हा एक प्रमुख व्यापारी आणि निवासी भाग. सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो. येथील सीताबर्डी किल्ला एका टेकडीवर आहे. या टेकडीचे रुपांतर इंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. या किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढविल्याचीही नोंद आहे.
चिखलदरा हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान आणि राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण याच जिल्ह्यात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी कॉफीचे मळे आहेत. चिखलदरा विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
आयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असून ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वांत मोठे बेट आहे.
वायव्येकडून व पश्र्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात जाताना या जिल्ह्यातून जावे लागते म्हणूनच या जिल्ह्यास ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हटले जाते. लोणार या खार्या पाण्याच्या अनोख्या महासरोवरामुळे तसंच या भूवैज्ञानिक नवलाईमुळे,बुलढाणा जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर ठळक झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोयना अभयारण्य आहे. कोयना जलाशयाच्या कडेकडेने कोयना अभयारण्य पसरले आहे.
४२६ किलोमीटर एकूण क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्याला सन १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलात कोयना अभयारण्याचा समावेश आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti