महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. गोंदिया या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे
माँटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. माँटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही माँटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
राजस्थानातील बिकानेर शहरात लालगड महाल हा एक पुरातन राजवाडा आहे. या राजवाड्याचे बांधकाम इ.स. १९०२-१९२६ या काळात तत्कालीन महाराजा सर गंगासिंह यांनी केले आहे.
इटलीतील व्हिकेंझा हे शहर दुसर्या सतकात वसविण्यात आले आहे.
पूर्व तिमोर (किंवा तिमोर-लेस्ते) हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. पूर्व तिमोर तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशिया व मेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणला जातो.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने ९ प्रेक्षणीय स्थळे आहेत.
असाम राज्यातील कॅचर जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर सीलचर. लोकसंख्या आणि आकारमान या दोन्ही दृष्टीने हे शहर आसाम राज्यातील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर गुवाहाटीपासून ३४३ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. बरॅक नदीच्या किनार्यावर हे शहर वसलेले असून बरॅकचे खोरे संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे
कोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मी मंदिर हे पूर्ण शक्तिपीठ तर आहेच, शिवाय ते स्थापत्य शास्त्रातील व कलेतील एक उत्तम प्रतीचा नमुना म्हणून गणले जाते. श्री महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही.
महाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच रुपांतर झाले.
मालवण पासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे या गावाजवळ, समुद्रसपाटी पासून ७५ मीटरची उंची असलेला भरतगड चारही बाजुंनी झाडी झुडुपांनी घेरलेला आहे. झाडी झुडुपांनी झोकोळल्यामुळे भरतगडावरील तटबंदी दिसत नाही. त्यामुळे दूर अंतरावरुन एक झाडीभरला डोंगरच दृष्टीपथात येतो.
Copyright © 2025 | Marathisrushti