(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • सोलापूर – भौगोलिक माहिती

    सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागी आहे. सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ चौरस किलोमीटर आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३ (इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार) आहे.

  • अमर जवान ज्योती

    अमर जवान ज्योती

    देशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे.

  • अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर तिवसा

    तिवसा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. समुद्रसपाटीपासून ३०६ मीटर उंचीवर ते वसलेले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने या शहरात राज्य शासनाची अनेक कार्यालये आहेत.

  • P-6598-kumbhakonam-01

    कुंभकोणम

    कुंभकोणम हे तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तंजावरपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे. या शहराच्या उत्तरेस कावेरी नदी वाहते, तर दक्षिणेस अर्सलर नावाची नदी वाहते.

  • सिंधुदूर्ग जिल्ह्याचा इतिहास

    महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावर व सागरी सुरक्षिततेसाठी अजिंक्य असा जलदुर्ग बांधणे अत्यावश्यक आहे, हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिल्ह्यातील कुरटे बेटावरील सुमारे पन्नास एकर जागेवर सिंधुदुर्ग ह्या किल्ल्याची उभारणी केली.

  • तुवालू

    तुवालू

    तुवालू हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. तुवालू हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचे क्षेत्रफळ फक्त २६ चौरस कि.मी. आहे.

  • ट्युनिसिया

    ट्युनिसिया

    ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिसियाचा ४०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. ट्युनिस ही ट्युनिसियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

  • गोंदिया जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे व येथील धान (भात) गिरण्यांसाठीदेखील हा जिल्हा प्रसिद्ध आहे. गोंदिया शहर म्हणूनच ‘तांदूळाचे शहर’ असे ओळखले जाते. सुवर्णा, जया इत्यादी जातींचा तांदूळ जिल्ह्यातून मध्यपूर्वेतील देशांना निर्यातही केला जातो.

  • सांगली जिल्हा

    कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, तर २१ नोव्हेंबर, १९६० पासून स्वतंत्र सांगली जिल्हा अस्तित्वात आला.

  • नंदुरबार जिल्हा

    दि. १ जुलै, १९९८ रोजी धुळे जिल्ह्याची विभागणी करून नंदूरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आदिवासींची म्हणजेच अनुसूचित जमातींची जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा हा आदिवासी जिल्हा या नावानेही ओळखला जातो.