महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदर्याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.
घरबांधणीशी संबंधित एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण कुंटुंबांपैकी सुमारे ३६ टक्के लोक मातीने तयार केलेल्या घरामध्ये राहतात. ग्रामीण भागात मातीच्या घरांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय विविध प्रदेशात तेथे तेथे उपलब्ध असलेल्या बांधकाम साहित्याचा वापर केला जातो.
ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ही चव सोबत ठेवण्यासाठी किंवा आवडत्या पाहुण्यांचा पाहुणचार करतांना या मेव्यापासून बनविलेले पदार्थ उपयोगात आणले जातात. रत्नागिरीच्या गावागावातून असे पदार्थ तयार स्वरुपात मिळतात.
फणसपेाळी, आंबापोळी, आंबावडी, विविध प्रकारची सरबते, कैरीचे पन्हे, चॉकलेट्स, टीन किंवा बाटलीबंद आंब्याचा रस, चिक्की आदी विविध पदार्थ पर्यटक आवडीने खरेदी करतात. या प्रक्रीया उद्योगावर अनेकांचे रोजगारही अवलंबून आहेत. या पदार्थंाच्या माध्यमातून कोकणची ओळख देशाच्या विविध भागात जाते.
अंदमान आणि निकोबार द्विपसमूहावरील ही सर्वात उंच टेकडी आहे. कर्नल हैरियट टाईटलर यांच्या दुसर्या पत्नीच्या नावे करण्यात आली. १८६२ मध्ये टाईटलर येथे वास्तव्यस होते. या टेकडीला १९९६ साली राष्ट्रीय उद्यान घोषित केले.
मराठी साहित्यातील एक नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिध्द असणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म बुलढाणा येथे झाला.
सियेरा लिओन हा पश्चिम आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनार्यावरील एक छोटा देश आहे. सियेरा लिओनच्या उत्तरेला गिनी, पूर्व व दक्षिणेला लायबेरिया तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सियेरा लिओन ही एक ब्रिटीश वसाहत होती. १९९१ ते २००० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते.
लायबेरिया पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. सियेरा लिओन, कोत द’ईवोआर व गिनी हे लायबेरियाचे शेजारी देश आहेत. लायबेरियाच्या पश्चिम व दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. मोनरोव्हिया ही लायबेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हा एक अविकसीत देश असून गरिबी, रोगराई, बेरोजगारी या समस्यांने पछाडलेला आहे. सध्या इबोला या जिवघेण्या रोगाने या देशात थैमान घातले याहे.
प्राचीन काळापासून भंडारा शहरात अंबाबाई, पिंगळाई व निंबाई देवीची हेमाडपंती शैलीची मंदिरे आहेत.येथील कोरंभी देवीच्या दर्शनासाठीही बरेच भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. भंडार्यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे.
कांचिपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. चेन्नईपासून ७२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराने ११.६०५ वर्ग किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे.
दौडनगर बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पुरातन किल्ला आहे. इ. स. १७ व्या शतकात दाऊद खान याने या किल्ल्याचे बांधकाम केले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti