महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे ‘ढोल’ हे आवडीचे नृत्य आहे.
जगातील पहिला भूकंप झाल्याची अधिकृत नोंद १४ एप्रिल १६१५ मध्ये झाली.
श्रीलंका हा अशी नोंद असलेला पहिला देश आहे. या भूकंपामध्ये जवळपास २००० जण मरण पावले.
सर्वाधिक वेळेचा म्हणजे ५०० ते ६०० सेकंदाचा भूकंप २६ डिसेंबर २००४ मध्ये सुमात्रा, अंदमान येथे झाला.
महाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हे तालुक्याचे ठिकाण आहे. १७ व्या शतकात व त्यानंतर सिद्दीच्या राजधानीचे शहर होते.
भारत व तिबेट सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते.
रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुके व प्रमुख गावे जोडण्यात आली आहेत. मनमाड-काचीगुडा व पूर्णा-आदिलाबाद हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. औरंगाबाद, पुणे हे जिल्ह्याला नजिकचा विमानतळ आहेत.
ऑस्ट्रेलियातील फ्रासर बेट हे जगातील सर्वांत मोठे वाळूचे बेट आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.३ हा मुंबई व आग्रा या शहरांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग नाधिक जिल्ह्यातून जातो. या रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची प्रमुख गावे जोडण्यात आली असून नाशिक-पुणे हा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) राज्यात सुरू होऊन राज्यातच संपणारा आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातो.
पाचोरा हे जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पाचोरा हे खान्देशातील एक महत्त्वाचे शहर आहे.
पाचोरा हे मध्य रेल्वेच्या मार्गावरचे भुसावळ नजीकचे मोठे जंक्शन असून राज्य महामार्ग क्रमांक १९ वर ते येते. हे शहर राज्य मार्ग तसेच लोहमार्गानी देशाशी जोडलेले आहे.
इथले १५० वर्षे जुने बालाजी मंदिर प्रसिध्द असून बालाजीची रथयात्रा प्रत्येक वर्षी काढली जाते. यासाठी वापरण्यात येणारा रथ १५० फूट उंचीचा व भव्य आहे. हजारो भाविक तो ओढतात.
इथेच ८०० वर्षांपूर्वीचे जुने खंडोबाचे देवालयही असून इथेही प्रतिवर्षी मोठी यात्रा भरते.
यवतमाळ ह्या शहराचे नाव आधी ‘यवत’ अथवा ‘यवते’ असावे असे मानले जाते. या यवत किंवा यवतेचा माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) किंवा ‘यवते’ चा महाल (परगणा किंवा विभाग) अशा शब्द रचनेतून ‘यवतमाळ’ हे नाव पडले असावे.
Copyright © 2025 | Marathisrushti