महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

दिल्ली येथे प्रसिध्द अक्षरधाम हे विशाल मंदिर आहे. हे मंदिर पुरातन नाही पण विशाल असे असून अहमदाबाद येथील स्वामी नारायण मंदिराची प्रतिकृती आहे. प्रमुख स्वामी यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे.
दिल्लीतील मंदिर ६ नोव्हेंबर २००५ ला अधिकृतपणे खुले झाले. जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिर म्हणून याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. यमुना नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे ३००० स्वयंसेवक व ७००० कारागिरांनी मेहनत घेतली. स्वामिनारायण यांच्या आयुष्यातील प्रसंग आणि भारताच्या इतिहासातील प्रसंग या मंदिरावर कोरण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील विराज हिंदू मंदिर एक श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचा परिसर ३०० एकरांत पसरलेला आहे.
कोमोरोस हा हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्याजवळील एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. १९१२ ते १९७५ ह्या काळामध्ये कोमोरोस ही फ्रान्स देशाची वसाहत होती. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी व प्रमुख शहर आहे.
महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर महाप्रभू यांनी भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
गुजरात या राज्याची पहिली पायरी चढताच जणू एक नवा जग अनुभवायला मिळतो. गजबजलेल्या उद्योग-धंद्यांसोबत इथली परंपरा, संस्कृती, रंगीत सण आणि खाद्यसंस्कृती मनाला वेगळाच ठसा उमटवतात. खाद्यसंस्कृतीचा अनुभव गुजरात मध्ये पाऊल टाकताच आपले स्वागत एका ताटाने होते – ज्यात गोड, तिखट, आंबट अशा सगळ्या चवींचा सुंदर समतोल असतो.
कोस्ता रिकाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
लॅटिन अमेरिकेमधील अनेक देशांप्रमाणे स्पेनची वसाहत असलेल्या इक्वेडोरला १८२२ साली स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर अल्प काळाकरिता ग्रान कोलंबियाचा भाग असलेला इक्वेडोर १८३० साली पूर्णपणे स्वतंत्र देश बनला.
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. येथे गुहेतील जैन लेणी प्रसिध्द आहेत. शहराला लागूनच असलेल्या डोंगरात सहा जैन लेण्या आहेत. यामध्ये आदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शुकट व बाहुबली यांचा समावेश आहे. प्राचीन काळचे जैनपूर म्हणजेच आजचे जिंतूर होय.
धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ. किमी. इतके आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti