महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसागर पसरलेला आहे. या सागराला येऊन मिळणार्या नद्यामधील वैतरणा ही एक प्रमुख नदी आहे. सह्याद्रीमधे उगम पावलेली वैतरणा जेथे सागराला मिळते तेथे खाडीच्या मुखाजवळ अर्नाळ्याचा बुलंद जलदुर्ग उभारलेला आहे.
महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आणि चाळीसगाव तालुक्यात विभागल्या गेलेल्या पितळखोरा येथे अश्मयुगापासूनच्या वसाहतीचे अवशेष आढळले आहेत.
डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर. ठाणे जिल्ह्याला फार मोठा इतिहास आहे. मात्र डोंबिवली शहराचे वैशिष्ट्य असे की हे शहर कोणत्याही राजाने किंवा सरदाराने वसविलेले नाही. तत्कालीन परिस्थितीत सामान्य लोकांच्या गरजा व आकांक्षा यातून या शहराची निर्मिती झाली आ
बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
चीनचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: तायवान, तैवान) हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तैवान व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे.
गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर आहे.
बिदर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला कर्नाटकाचा मुकूट असेही म्हणतात.
बिदर शहराला बहामनी काळापासूनच इतिहास आहे. येथील महमूद गवान अरेबिक विद्यापीठ, बिदरचा ऐतिहासिक किल्ला, पापनाश शिवमंदिर, नानक जिरासाहेब गुरुव्दारा, सिध्दारुढ मठ, रंगीत महाल, हजरत खलिउल्लाहची चौखडी ही स्थळे प्रेक्षणीय आहेत.
बिदरच्या जवळून वाहणार्या मंजिरा नदीतून या शहराला पाणीपुरवठा केला जातो. देशातील सर्वात स्वच्छ २२ शहराच्या यादीत बिदरचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र ९ आणि २१८ या शहराजवळून जातात.
महाराष्ट्र राज्यास ७२० कि.मी. चा सागरी किनारा लाभला आहे. बृहन्मुंबई जिल्ह्यास ११४ कि. मी. ठाणे जिल्ह्यास १२७ कि. मी, रायगड जिल्ह्यास १२२ कि. मी. रत्नागिरी जिल्ह्यास १२० कि.मी.चा समुद्रकिनारा आहे.
गोंड, कोहली, पोवार, गोवारी, हळबी या जाती-जमातींचे लोक भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात त्याचबरोबर विविध प्राचीन जाती-जमातींचा निवास आणि धातूच्या भांड्यांची निर्मिती करणारे,पारंपरिक कलाकुसर ही आढळतात.
Copyright © 2025 | Marathisrushti