महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक ख्यातनाम शहर असून ते “महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी” म्हनून ख्यातनाम आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याखालोखाल डोंबिवलीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असतात.
अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वताच्या शिखरांभोवती प्रवाळ कीटकांच्या संचयामुळे निर्मिति झालेल्या बेटांना प्रवाळ बेट म्हणतात.
मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून प्रवाशांना अनेक फायदे होत आहेत. कोल्हापूर व रत्नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्र्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत.
नागपूर स्थानकाच्या बाहेर एका लहानसा टेकडीवर हे श्री गणेश मंदिर आहे. टेकडी गणेश म्हणून ते प्रसिद्ध आहे. हे एक नागपुरातील प्रेक्षणीय स्थळ आहे. हा गणपती नवसाला पावतो असा अनेकांचा अनुभव आहे.
उड्डपी हे दक्षिण -पश्चिम कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे, इथले कृष्ण मंदिर प्रसिध्द असून वैष्णव संत माधवाचार्य यांनी ते स्थापन केले आहे वादळात अडकलेल्या एका व्यापारी जहाजाला सुखरुप किनार्यावर येण्यासाठी माधवाचार्याँ मदत केली होती यामुळे खुश झालेल्या व्यापार्यांनी हे मंदिर बांधण्यास मोठी मदत केली.
उड्डपी शहरात तुलू ही स्थानिक भाषा येथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. त्याचबरोबर कोकणी व कन्नड या भाषाही येथे बोलल्या जातात या शहरातील लोकांचे दरडोई उत्पन्न संपूर्ण कर्नाटकात सर्वाधिक आहे.
सिंडिकेट बँक व कॉपोरिशन बँक या बँकांची स्थापना याच शहरात झाली आहे.
डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ मध्ये संपन्न झाले. या साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी विविध विभागीय साहित्य साहित्यसंमेलने संपन्न झाली आहेत.
हरियाणा राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले हे शहर आहे.
श्रीगोंदा हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर आहे. या शहराचा संतांची पुण्यभूमी असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.
तुतुकुडी हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहरात माहानगरपलिका कार्यरत आहे. बंगालच्या उपसागरावरील एक मोठे बंदर या शहरात असून, येथून अनेक मोठ्या मालवाहू जाहाजांची नियमित वाहतूक सुरु असते.
चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti