महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
उझबेगिस्तान व इराण दरम्यानच्या वाळवंटात इचन काला हे प्राचीन सहर आहे. या शहरात मध्य आशियन शैलीत बांधण्यात आलेल्या इमारती आणि मशिदींचे अवशेष पहायला मिळतात.
म्यानमार हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश – म्हणजे १,९३० कि.मी. – लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत.
आसाम राज्यातील जिल्हामुख्यालय असलेले शहर गोलाघाट. १५ ऑगस्ट १९८७ रोजी गोलाघाट जिल्ह्याची स्थापना झाली. ब्रिटिश काळात १८४६ पासून गोलाघाट हा उपविभाग होता. १८७६ पासून या शहरात पोस्ट आणि टेलिग्राफ सर्व्हिस सुरु झाली. समुद्रसपाटीपासून ३१२ फूट उंचीवर हे शहर असून धनसिरी नावाच्या नदीच्या किनार्यावर ते वसलेले आहे.
गोलाघाट शहरातील साहित्यिक इतिहास -
गोलाघाट साहित्य सभा ही आसाम साहित्य सभेची सर्वांत जुनी शाखा असून, १९१८ साली तिची स्थापना झालेली आहे. अनेक नामवंत साहित्यिक या सभेचे सभासद आहेत. या शहरात राज्यातील सर्वात जुने रेल्वेस्थानक असून, देशाच्या स्वतंत्र्यसंग्रामात येथील अनेक देशभक्तांनी योगदान दिले आहे.
मुंबादेवी याच देवीच्या नावावरुन या शहराला मुंबई असे नाव पडले. या देवीचे मंदिर मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केट येथे महात्मा फुले मंडईत आहे.
श्री बाबुलनाथ मंदिर मलबार हिल येथील १७८० मध्ये बांधण्यात आलेले श्री बाबुलनाथ मंदिर तेथील शंकराच्या पिंडीसाठी प्रसिद्ध आहे.
औरंगाबाद हे अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान मानलं जातं. तसंच टोमॅटोची भाजी, शेवेचा रस्सा हे पारंपारिक खाद्यपदार्थ प्रसिध्द आहेत.
अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल व डाळ बनवणाऱ्या मिल आहेत.
लष्करी ठाणे असल्याने हिंगोली हे हैदराबाद राज्यातील महत्वपुर्ण घटक होते. इ. स. १८०३ साली टिपू सुलतान – मराठे तर इ. स. १८५७ मध्ये नागपूर – भोसले यांच्यातील युध्दे या शहराने अनुभवले आहे.
स्पेनमधील क्युनका हे गाव डोंगरातील दगडांवरील विशिष्ट प्रकारच्या घरांसाठी प्रसिध्द आहे.
१२ व्या शतकात हे गाव वसविण्यात आले. याची रचना आणि त्याचा ऐतिहासिक ठेवा स्पेनने जपला आहे.
आठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे.
राज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात. १५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात.
Copyright © 2025 | Marathisrushti