महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद आहे.
उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे.
नियोस्चवॉतनचा किल्ला जर्मनीतील सर्वात भव्य किल्ला आहे. १९व्या शतकातील कल्पनाशक्तींचे प्रतीक असलेला हा किल्ला फुलनॅट नदीच्या खोर्यात आहे. याच्या बांधकामासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे.
मुंबईतील धनराज महल हा पुरातन राजवाडा आहे. हैदराबादचे महाराजा धनराज गीर यांनी सन १९३० मध्ये मुंबईत या सर्वात महागड्या राजवाड्याचे बांधकाम केले.
राज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात. १५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात.
सासवड हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आचार्य अत्रे यांचे जन्मगाव आहे.
जळगाव येथे भिल्ल, पावरा, तडवी, पारधी, गोमीत, गोंड यांसार‘या आदिवासी जमातीचे लोक राहतात. चोपडा, यावल, व रावेर या तालुक्यांमध्ये हे लोक बहुसंख्येने राहत आहेत.
अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचे प्रवेशद्वार आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापुर शहराची बाजारपेठ एकेकाळी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जायची.
औरंबजेबाचं सैन्यस्थळ अशीही ओळख असलेल्या बाळापूरची ८० टक्के वस्ती मुस्लिम समाजाची असूनही बाळापुरची ग्रामदेवता श्री बाळादेवी आहे. अतिशय पुरातन आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या बाळापूर या शहराला या देवीच्या नावावरुनच नाव मिळालं आहे.
‘मनकर्णिका’ जी आता ‘मन नदी’ म्हणून ओळखली जाते आणि ‘महेशा’ नदी जी आता ‘म्हस नदी’ म्हणून ओळखली जाते, या दोन्ही नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी उंच टेकडीवर बाळादेवीचं सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात बाळादेवी मातेचा सुंदर असा मुखवटा बसवलेला आहे. मुखवट्यावर दोनवेळा उगवत्या सुर्याची थेट किरणे पडतात. ही स्वयंभू देवी असल्याचं सांगितलं जातं.
बाळादेवीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी ५५ पायऱ्या चढून जाव्या लागतात. लाकडांच्या खांबावर उभं असलेल्या या मंदिराचा १९७८ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला.
इथल्या मुस्लीमांचाही बाळादेवीच्या अनेक उत्सवांमध्ये सहभाग असतो. त्यामुळे बाळादेवी या गावाला बंधुत्वाच्या एका अनोख्या नात्यात बांधणारी देवता असल्याचं येथील मुस्लीमांना वाटतं.
हरियाणा राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले हे शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti