महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
संत ज्ञानेश्वर – वारकरी संप्रदायाचे दैवत व महाराष्ट्राचे अनमोल रत्न संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स.१२७५ मध्ये येथील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे झाला. ज्ञानेश्वरांनी येथेच रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले असे म्हटले जाते.
जालना जिल्ह्याचे गेल्या काही वर्षात झपाट्याने औद्योगिकीकरण झाले आहे. मनमाड-काचीगुडा हा रुंदमापी लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.
भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात मध्य रेल्वेचे सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे.
जळगाव जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. याचबरोबर या जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तुप व तेल गिरण्या, अन्नप्रक्रिया उद्योग हे उद्योग मोठया प्रमाणावर चालतात.
इंडोनेशियातील मध्य जावा येथील बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर आहे. या मंदिरात २६७३ कोरीव चित्रे व ५०४ बौध्द मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाभोवती ७२ बौध्दमूर्ती आहेत.
कापुस हे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून त्यावर चालणारे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे जिल्ह्यात चालतात.बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर, तसंच बुलढाण्यात औद्योगिक वसाहती आहेत.
प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील शिवकालीन लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. त्यांचे बालपणही याच महालात गेले. याच ठिकाणी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली.
महाराष्ट्रातील ‘तांदळाचे कोठार’ म्हणजे भंडारा! अनेक तलावांचा जिल्हा म्हणजे भंडारा!आणि या तलावांमुळेच जिल्ह्याच्या जलसिंचनात भर तर पडली आहेच,पण जिल्ह्याचा परिसर ही निसर्गरम्यही बनला आहे.
अमेरिकेतील जॉर्जिया घुमट स्टेडियम हे या प्रकारातील जगातील सर्वांत मोठे स्टेडियम आहे.
८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमचा विस्तार ९.१९ एकरांत आहे.
याचे छत टेफलॉन व फायबरपासून बनविलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti