(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उस्मानाबाद जिल्हा

    उस्मानाबादेचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचे कायम वसतिस्थान असलेले तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.

  • यवतमाळचे शारदाश्रम पांडुलिपी संशोधन केंद्र

    यवतमाळचे शारदाश्रम पांडुलिपी संशोधन केंद्र

    महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात इतिहास संशोधक डॉ. वाय देशपांडे यांनी सन १९३२ मध्ये शारदाश्रमाची स्थापना केली

  • बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प

    बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प

    बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प मोताळ तालुक्यात असला तरी मलकापुर शहराची तहान भागविण्यासाठी उपयोगी आहे.

  • सातारा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे.

  • एलिफंटा केव्हज

    एलिफंटा केव्हज

    मुंबईच्या समुद्र किनार्‍यापासून अरबी समुद्रामध्ये लेण्या आहेत. या लेण्याना एलिफंटा केव्हज् असे म्हणतात. गेट वे ऑफ इंडियापासून या लेण्यासाठी मोटारबोटीसोबतच लेण्या पाहण्याचा आनंद मिळतो.

  • महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण

    महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण

    फलटण हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण व महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. फलटणचे श्रीराम मंदिर प्रसिध्द असून येथे साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत रथोत्सव साजरा केला जातो.

  • p-1758-Chandrapur-Tadoba

    ताडोबा व्याघ्र अभयारण्य, चंद्रपूर

    ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य. भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा ४१वा क्रमांक लागतो. ताडोबा नॅशनल पार्क ( ११६.५५ चौ. कि.मी. ) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ५०८.८५ चौ. कि.मी.) असे एकूण ६२४.४० चौ.कि.मी. परिसरात जिल्हा चंद्रपूर येथे ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे.

    मुळच्या आदिवासी लोकांचा देव तारु आणि अंधारी नदी यामुळे या अभयारण्याला वरील नाव पडले. बांबू ( गवत ), साग, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभूळ, अशा अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असे हे जंगल आहे. १९९५ मध्ये ताडोबा हे संरक्षीत व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले गेले. ताडोबा हे ‘Land of the Tiger’ म्हणून ओळखले जाते.

    ताडोबा अभयारण्यातील मोठ्या प्रमाणात वन्यजीव विविधता आढळते. या अभयारण्यात ४५ प्रकारचे सस्तन प्राणी ( Mammals ); २८० प्रकारचे पक्षी (Birds) ; ९४ प्रकारची फुलपाखरे (Butterflyes) ; २६ प्रकारचे कोळी (Spider) आणि ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी (Reptites) आढळतात.

  • रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण महाड

    रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे.

  • अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास

    या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.

  • सातारा जिल्हा

    सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणार्‍या समर्थ रामदासांचा सहवास या जिल्हयाला लाभला.