महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
टेंपल ऑफ हेवन हे मंदिर बीजिंग शहरात आहे. इ.स. १४२० ला या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मोंग आणि क्विंग या राज्यकर्त्यांचे वारसदार या मंदिरात चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात.
नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तेलुगूचा व दखनी उर्दूचा उपयोगही काही प्रमाणात या जिल्ह्यात केला जातो.
भारताचे माजी गृहमंत्री व कॉंग्रेस नेते, हे शिवराज पाटील हे लातूरचे आहेत.
राज्यातील गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यात आदिवासींची विशिष्ट अशी संस्कृती आहे.
पूर्वी खानदेश या नावाने संबोधला जाणारा जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून जळगावचे नाव अग्रस्थानी येते. केळी व तेलबियांसाठी आघाडीवर असलेला हा जिल्हा उद्योगव्यवसाय आणि शिक्षणक्षेत्र या क्षेत्रांमध्येही भरघोस कामगिरी बजावत आहे.
म्यानमार हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश – म्हणजे १,९३० कि.मी. – लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत.
कॅमरुन हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखातातील एक छोटासा देश आहे.
कॅमेरुनमध्ये बांतूभाषीय लोक व मुस्लिम फुलानी लोकांची वस्ती होती. १५व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत केली. मात्र, १७ व्या शतकात डचांकडून ते पराभूत झाले.
१८८४ मध्ये जर्मनांनी कॅमेरुनचा ताब घेतला.पहिल्या महायुध्दात जर्मनांनी येथून माघार घेतली. दुसर्या महायुध्दानंतर फ्रेंच व इंग्रजांचे प्रशासकीय विभाग विभक्त झाले.
१९६० मध्ये फ्रेंच वसाहतीचा भाग, तर १९६१ मध्ये इंग्रज वसाहतीचा भाग स्वतंत्र झाला.
रायचूरला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बहामनी , विजयनगर आणि निजामशाही राजवटी या शहराने अनुभवलेल्या आहेत.
हरियाणा राज्यातील पानीपत येथे ७०० वर्ष पुरातन मकबरा आहे. मुस्लिम सुफी संत कलंदर शहा यांचे पवित्र तीर्थस्थळ हा मकबरा आहे. इ.स. १२०९ मध्ये कलंदर शहा यांचा जन्म झाल्याची नोंद इतिहासात आहे.
राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते.
Copyright © 2025 | Marathisrushti