महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
चेक प्रजासत्ताक हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. चेक प्रजासत्ताकाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही चेक प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापुर्वक विघटन झाले व चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले.
कोलंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. कोलंबियाच्या पूर्वेला ब्राझिल व व्हेनेझुएला, दक्षिणेला इक्वेडोर व पेरू हे देश, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. इतर बहुसंख्य दक्षिण अमेरिकेतील देशांप्रमाणे कोलंबियाची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे. बोगोता ही कोलंबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.
अमेरिकेतील रिओ ग्रँड या आदिवासी भागात ताओस ही वैशिष्ट्यपूर्ण घरे आढळतात.
रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे. २० मार्च १९२७ रोजी बाबासाहेबांनी तवदार तळे अस्पश्यांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह केला आहे.
आईसलॅंडमधील सुर्त्से बेट हे १९६३ ते ६७ या काळात ज्वालामुखी उद्रेकानंतर तयार झाले आहे. मानवविरहित असणारे हे बेट शास्त्रज्ञांसाठी प्रयोगशाळाच बनले आहे
लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे शहर महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. अनेक छोटे-मोठे धबधबे या ठिकाणी पहायला मिळतात.
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते.
इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून सोलापूर जिल्ह्याने अनेक राजवटींचा उदय आणि र्हास पाहिला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्यावर राज्य करुन गेल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते.
Copyright © 2025 | Marathisrushti