(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सेकंड ओपीनियन

    सेकंड ओपीनियन म्हणजे एखाद्या निर्णयाबद्दल त्या क्षेत्रातल्या अन्य एका तज्ज्ञाचे मत घेणे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असतेच असे नाही; शिवाय कित्येकदा अशा सल्ल्याने काही नवीन दरवाजे आपल्यासाठी उघडू शकतात. याकरताच वैद्यकीय क्षेत्रात तरी या सेकंड ओपीनियनला अनन्यसाधारण महत्व आहे.

  • ९०/१० तत्व

    फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो.

    उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे.

    या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे.
    उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला.
    हे फक्त १०% झालं.

    यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे.

    तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत.

    तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली.

    तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे.

    तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.

    तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.

    २० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.

    तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.

    दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून वाईट झाले.

    आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.

    का?

    कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.

    तुमचा दिवस वाईट का गेला?

    • त्याला कारण कॉफी होती?
    • त्याला कारण मुलगी होती?
    • त्याला कारण पोलीस होते?
    • त्याला कारण तुम्ही स्वतः होता?

    उत्तर
    तुम्ही स्वतः

    कॉफी चं काय झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं. त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला.

    काय करायला हवे होते?

    कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
    तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे" आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता.

    मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.

    तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.

    फरक पहा
    दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.

    खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो. उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.

    ९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे?

    • जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका, पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा. त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या. चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.

    • रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता? तुम्हाला राग येतो? तुम्ही दात ओठ खाता? स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता? मुठी आवळता? भांडायला जाता? तुमचा श्वासोत्वास वाढतो?

    तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे?

    ९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.

    तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काची ऑर्डर तुम्हाला न मिळता दुसऱ्याला गेली आहे असे तुम्हाला कळले तर?

    • मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
    • तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा.

    बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले

    • संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
    • पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे
    • वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
    • आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा

    ९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुया

    -- आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवर आलेले पोस्ट

  • अर्धशिशी

    अर्धशिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे. डोके कुठल्याही भागात किंवा संपूर्ण डोकेही दुखू शकते. अर्धशिशीमध्ये डोके खूप जोरात ठणकते ; परंतु बऱ्याच वेळा डोकेदुखीवर पोटात मळमळते किंवा उलटी होते. अर्धशिशी कोणालाही होऊ शकते. ती पुन्हा पुन्हा होते ; परंतु त्याची वारंवारता , तीव्रता व त्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो. मळमळणे किंवा उलटी होणे अशी लक्षणे सोबत येतात. त्याचा निश्चित कालावधी सांगता येत नाही.

    ज्यांना कामाचा ताण असतो , त्यांना मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होते. ध्यानधारणा आणि प्राणायाम केल्याने या त्रासापासून बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळू शकते.

    काही पदार्थ असे आहेत ज्यामुळे डोकेदुखीपासून बराच आराम मिळतो. त्यात आल्याचं नाव सर्वात आधी घ्यावं लागेल. म्हणजे आल्याकडे आपण ' पेन रिलिव्हर ' म्हणून बघू शकतो. आल्याचा एक तुकडा घेऊन त्यावर थोडं लिंबू पिळा. चवीसाठी त्यावर थोडं काळं मीठ घाला आणि हलके चघळा. आलं चघळल्याने साधी डोकेदुखी थांबत असेल तर चिवट अर्धशिशीवरही नियंत्रण मिळवता येतं. आलं वेदना कमी करतं..

    अर्धशिशीचा त्रास होत असेल तर -सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्या वर लावावा. शिंक काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी होते अथवा सकाळी उठल्या बरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते. अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते व शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते. अर्धशिशी म्हणजे डोक्याचा अर्धा भाग दुखणे.हे दुखणे त्रासदायक असते व सूर्योदयापासून ते सुरू होते ते सूर्यास्तानंतर कमी होते.

    ज्यांचं वारंवार डोकं दुखतं अशांनी दोन ते चार टेबलस्पून आळशीच्या बियांची पूड नियमितपणे दोन-तीन महिने खावी. आळशीच्या बियांची पावडर बनवण्यासाठी आधी त्या कोरड्याच भाजाव्या. चवीसाठी त्यात मीठ मिसळा.

    -- सुषमा मोहिते
    आरोग्यदूत WhatsApp ग्रुप

  • थंडाई

    धुळवड व रंगपंचमीच्या दिवसात रंग खेळण्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई पिण्याची मजा काही औरच असते.

    थंडाई पिणे आरोग्यासाठीही हितकारक असते.

    होळीच्या दिवसात प्यायली जाणारी थंडाई इतर दिवशीही पिऊ शकतात. थंडाईमध्ये खसखस असल्याने पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होता. थंडाईमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मिनरल्स सारखी पोषकतत्वे असतात.

    थंडाईमध्ये बडिशेपही टाकली जाते. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. गॅसच्या समस्या दूर होतात. बडिशेपमध्ये अँटी इंफ्लेमेट्री गुण असतात ज्यामुळे पाचनक्रिया सुधारते.

    थंडाईमध्ये टरबुजाच्या बियांचाही वापर केला जातो. ज्यामुळे नॅचरल एनर्जी मिळते. याशिवाय थंडाईमध्ये बदाम आणि पिस्ताचाही वापर केला जात असल्याने शरीराला ताकद मिळते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पाच पाकळ्यांची औषधी तगर

    माझे फुलांच्या संशोधनात आलेले तगर पांच पाकळ्यांची ह्या फुलाचे औषधी उपयोग पुढील प्रमाणे :

    साधा ताप, स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू, घशाची सूज वआग, सर्वांगाला सूज,गोवर,पायालासूज,गाठी उठणे, अंगाला खाज, जास्त घाम येणे, इसब.

    पाणी करायची पध्दत

    ही 5-7 फुलेग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून घेऊन अर्धी,अर्धी वाटी 4--5वेळा पिणे. रोज नवीन पाणी करणे

    मला इंग्रजी नाव माहिती नाही आपल्याला हवे असल्यास आपला आपणच शोध घ्यावा कृपया मला विचारु नये (ही झाडे सोसायट्यामधून लावली असतात. फुलांचा सडा पडतो)

    अरविंद जोशी B.Sc

  • ब्राम्ही

    आपल्या सर्वांच्या परिचयाची ब्राम्ही,तिचे कार्य मेंदुवर होते व बुद्धि व स्मरणशक्ती वाढवायला हिचा उपयोग होतो हे आता सगळ्यांनाच माहीत आहे.तरी तिचे अजुन काही उपयोग आहेत का ते देखील आपण जाणून घेणे गरजेचे आहे.चला तर मग ब्राम्हीची माहिती पुन्हा नव्याने जाणून घेऊ.

    ब्राम्हीचे जमिनीवर पसरणारे क्षुप असते.ह्याची पाने अखंडधार युक्त व मांसल असतात.ती मऊ व गुळगुळीत असतात.तसेच त्यावर सुक्ष्म काळे ठिपके असतात.ह्याला जांभळी,पांढरी किंवा गुलाबी फुले येतात.

    ह्याचे उपयुक्तांग आहे पाने.ब्राम्ही चवीला कडू,तुरट,गोड असून थंड गुणाची व हल्की असते.हिचा प्रभाव मानस रोगांवर चांगला होतो.ब्राम्ही त्रिदोषशामक आहे.

    चलातर आता हिचे उपयोग जाणून घेऊया:

    १)आमवातावर ब्राम्हीचा रस सांध्यांवर लावतात.

    २)मानस रोगात ब्राम्हीचा रस उपयुक्त आहे.

    ३)ब्राम्हीचे चुर्ण मधासोबत घेतल्यास बुद्धि व स्मरण शक्ती वाढते.

    ४)डांग्या खोकल्यात ब्राम्हीचा अवलेह उपयुक्त आहे.

    ५)ब्राम्ही शरीरातील सात ही धातुंचे पोषण करते व रसायन कार्य करते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • सप्तपर्ण/सातविण

    हा १३-१६ मीटर उंचीचा सदाहरीत वृक्ष असतो.ह्याची त्वचा मोठी,ठिसूळ,बाहेर पांढरी व आत पिवळी असते.कापल्यावर त्यातून दुधासारखा पांढरा स्त्राव येतो.ह्याची पाने सातच्या संख्येत असतात म्हणून ह्याचे नाव सप्तपर्ण आहे.ह्याची पाने ३-४ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंद असतात वरच्या बाजुला स्निग्ध व हिरवी तर मागच्या बाजुस पांढरट असतात.पान तोंडल्यावर त्यातून दुधासारखा स्त्राव निघतो.ह्याचे फुल हिरवट पांढरे असते तर फळ ०.३३-०.६६ मीली मिटर लांब शेंग असते हि वाकडी व चपटी असते हि २ च्या जोडीमध्ये येते.बी लहान व पांढरी असून दोन्ही बाजुला कापुस असलेली असते.फळ पिकल्यावर फुटते व बिया हवेत उडतात.

    ह्याचे उपयुक्तांग त्वचा आहे.सातवीण चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाची हल्की व स्निग्ध असून कफवातनाशक आहे.

    चला आता सातवीणीचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)जखम धुवायला सातवीणीच्या सालीचा काढा उपयोगी आहे कारण तो स्त्राव कमी करतो.

    २)सातवीणीच्या सालीचा काढा हा कृमिनाशक असून यकृताचे कार्य सुधारतो.

    ३)खोकला,दमा ह्यात सातवीणीचा काढा मध व पिंपळी चुर्ण घालून चाटायला देतात.

    ४)त्वचारोगामध्ये स्त्राव कमी करायला सातवीणीचा काढा उपयुक्त आहे.

    ५)सातविणीचा काढा बाळंतीण स्त्रीला पावल्याने चांगली स्तन्य निर्मलीची होते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • सेल्फीचा रोग

    आजच्या तरुण पिढीला सेल्फीचा जणू रोगच जडला आहे। आणि हा आजार presences of mind घालवण्यापासून ते मृत्यूपर्यंत कुठलेही फळ देऊ शकतो।

  • हंसराज/हंसपदी

    हि वनस्पती पाणथळ प्रदेशात व डोंगराळ भागात उगवणारी आहे.हि ०.५-१.५ सेंमी उंचीचे क्षुप असते.पाने गुळगुळीत,तांबूस काळी व पर्णदंडावर उगवतात.हि १-३ सेंमी लांब असून ह्याच्या मागील भागावर काळ्या रंगाचे बीजाणू असतात.

    ह्याचे उपयुक्तांग आहे पंचांग.ह्याची चव तुरट असून ती थंड गुणाची व जड असते.हि कफ पित्तनाशक आहे.

    आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू:

    १)जळजळ व जखम ह्यात हिचा लेप करतात.

    २)हंसपदी जुलाब होत असल्यास देखील उपयुक्त आहे.

    ३)हंसपदी घसा बसणे,सर्दी,खोकला,दमा ह्यात देखील उपयुक्त आहे.

    ४)लघ्वीच्या त्रासात देखील हिचा चांगला उपयोग होतो.

    ५)हंसपदी रक्तस्राव होत असल्यास तो थांबावायला उपयोगी आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • IUI – मुलं तयार करण्याचा कारखाना (?!)

    मुळात ‘सुज्ञपणे’ IUI चा उपयोग केला जातो का? याचं प्रामाणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न ज्याचा त्याने करावा. इथे त्या प्रक्रियेवर सरसकट आक्षेप नसून त्याचा बाजार माजवण्यावर आहे. शरीरसंबंधातून मुलं होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी IUI वा त्यापुढील IVF हे काही मार्ग नव्हेत वा वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलं तयार करण्याचे कारखानेदेखील नव्हेत.