वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
1972 चा काळ अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांचा होता. त्या वेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधी वर, संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ आर एन शुक्ल यांनी सांगितली ती अशी...
त्यावेळी वारकरी सांप्रदायाची थोर व्यक्ती ह.भ.प मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला आळंदीची समाधी उखडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मुलन चे लोक येत आहेत, त्यांचे असे म्हणणे आहे कीजर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या
शरीरातील हाडे तरी सापडतील. मामासाहेबां समोर खुप मोठा प्रश्न पडला होता यांना रोखायचे कसे त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले
माऊली पाहुन घेतील.
दुसरा दिवस उजाडला सकाळीच दोन अडिचशे माणसांचा ट्रक पुण्याहुन आळंदीला जाणार आहेत असे समजल्या वर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोहचले होते.
शुक्ल साहेबांनी सोबत तीन मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता गीगरम्यूलर काऊंटर त्यात एक्सरे अल्फा, गॅमा, बीटा नावाचे जे किरण किंवा उर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढु शकतो. ते मीटरवर दाखवले जाते. त्याला गीगरम्यूलर स्किंटीलेशन काऊंटर असे नाव आहे.
तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पासून सहा फुट अंतरावर ठेवला.
दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात. तो घेतला होता. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फारेड आहेत की नाही हे पहाता येते. तो ही मीटर समाधी जवळ ठेवला.
तिसरा फ्रिक्केन्सी मीटर रडार हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला.
तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी डाॅक्टर, दोन तीन इंग्लीश माणसे, घोषणा देतच मंदिरा पर्यंत पोहचली.
सर्व जमावाला दाराजवळच मामांनी थांबवले आणि सांगितले समाधी बद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा. आणि मग तुमचे काम करा.
तो पर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन वेष्टणे आणली होती. एक जस्ताचे, एक पितळेचे आणी एक लोखंडाचे.
शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी तीन मीटर्सही ठेवले आहेत.समाधी वर एकेक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहावयाचे आहे. तुम्ही पहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही. बाहेर थांबू.
त्यांच्यातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभा-यात घेतले आणि त्यांना माहिती देऊन मामा व शुक्ल साहेब गाभा-याबाहेर निघुन आले. आम्ही सांगितल्या प्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला.
लोखंडी, पितळी, जस्ताचे आवरण काढल्यावर एकच ठराविक रिडींग मीटर दाखवायचे. आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्न चनाही. त्या लोकांन पैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते मग काटा रिडींग का दाखवीत आहे. रिडींग दाखविणारे चैतन्य स्फुरणस्पंदने कोठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांना पडला. यामध्ये कसलाच जादुटोणा हातचलाखी नव्हती हे त्यांच्या लक्षात आले.
शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखविल्यावर त्यांच्या लक्षात आले संजीवन समाधी म्हणजे काय? हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चित पणे चैतन्य आहे. उर्जा आहे, स्पंदने आहेत,म्हणून च त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते. क्ष किरण दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच त्यांचे अस्तित्व मनुष्यच काय विज्ञान सुद्धानाकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दुर झाल्या नंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्याला समाधी च्या दर्शनाला येवु लागली. तीन परदेशी नागरिकां पैकी एकाने स्वताला आळंदीला वाहून घेतले. पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही.
वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु ह.भ.प. मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन सांगताना म्हणाले एखाद्या साधु संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तोपंचमहाभूतात्मक होतो. शरीर पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो सजग असतो. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते. निर्देही होते याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी आप तेज वायु हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रम्हांडातील पृथ्वी आप तेज वायु आकाश यात एकरूप होऊन जातात. त्यामुळे समाधी च्या जागी काहीही शिल्लक रहात नाही.
-- संजीव थोरात.
पुणे
July 9, 2017
१९७० : चेंडूला फार मोठी फिरक न देता लेगस्पिनरने ६०० बळी मिळविणे आहे खरे पण या दिवशी जन्मलेल्या अनिल कुंबळेने ते खरे करून दाखविलेले आहे. केवळ दिशेवरील नियंत्रण आणि उसळीमुळे जम्बो खूप चांगला गोलंदाज ठरला.
October 12, 2010
“जैत रे जैत” मधील “जांभूळ पिकल्या झाडाखाली —- ” ची नजाकत जावेद अख्तरने – ” होली आई ,होली आई, देखो होली आई रे ” मध्ये बरहुकूम आणली आहे. संपूर्ण गाणं रंगछटांनी भरल्यावर, विशेषतः पिकलेल्या जोडीने ” तुम हो तो हर दिवाली, हर दिन मेरी होली हैं ” हे जीवनोत्सवावर भैरवी भाष्य करणं आणि यातून त्यांचे अभिन्नत्व दाखविणे हे फक्त केवळ !
March 28, 2021
लेनोवो (Lenovo) ही जगातील अव्वल क्रमांकाची वैयक्तिक संगणक (PC) उत्पादक कंपनी असून ती तिच्या नावीन्यपूर्ण आणि टिकाऊ उत्पादनांसाठी ओळखली जाते. डेल प्रमाणेच लेनोवोच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या विविध श्रेणी विशिष्ट वापरासाठी डिझाइन केल्या आहेत.
April 10, 2026
१. खाल गाजर, मुळे तर होतील सुंदर डोळे.
२. सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त.
३.डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप.
४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त ,आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.
५.जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री
६. पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड.
७.पालेभाज्या घ्या मुखी; आरोग्य ठेवा सुखी.
८.भेसळयुक्त अन्न खाऊ नका; आरोग्य धोक्यात आणू नका.
९.भोजनोत्तर फळांचा ग्रास; थांबवेल आरोग्याचा ह्रास.
१०.रोज एक फळ खावू या; आरोगयाचे संवर्धन करु या.
११. प्रथिने, जीवनसत्वे, क्षार; यांचे आहारात महत्व फार.
१२. हिरवा भाजीपाला खावा रोज; राहील निरोगी आरोग्याची मौज.
१३. जेवणा नंतर केळी खा; पाचनशक्तीला वाव द्या.
१४. साखर व तूप यांचे अति सेवन करु नका.मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.
१५. खावी रोज रसरशीत फळे; सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.
१६. गालावर खेळते सदा हास्य, फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.
१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त, डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.
१८. सोयाबिन ज्यांचे घरी, प्रथिने तेथे वास करी.
१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका, जीवनसत्वांचा नाश करु नका.
२०. जो घईल सकस आहार, त्याला न होई कधी आजार.
२१. भाजीपाल्याचं एकच महत्व, स्वसत मिळेल भरपूर सत्व.
२२. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग, लोणी, दूध तुपवानी, सत्व तिच्या संग.
२३. कळणा कोंडा खावी नाचणी, मजबूत हाडे कांबी वाणी.
January 29, 2017
करणार्याला अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. गायन, वाचन, लेखन, चित्रकला, फोटोग्राफी, पौराहित्य, ज्योतिष, मानसशास्त्र, निसर्गोपचार, अगदी ट्रेकींगसुद्धा. काहीजणांनी जुना शाळेचा ग्रुप तयार करून ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ साध्य केले आहे. वृद्धापकाळात भेडसावणार्या अनेक समस्यांना अशा छंदातून आणि उपक्रमातून नक्कीच मन प्रसन्न राखता येईल आवश्यकता आहे एक पाऊल पुढे टाकण्याची.
November 30, 2022
आमच्या विहिरीत असलेलं नितळ पाणी पाहिलं आणि हातात घेतलं कि हीच आपली संपत्ती असं वाटतं. शेतावर असलेली झाडे पाने, शेतांचे बांध, खळा, भाजीचा मळा आणि शेतातली माती हे सगळं पाहिलं की हा सगळा आपला वारसा असल्याची भावना निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.
December 21, 2019
आपला देश पुर्वापार काळापासून ते आतापर्यंत ‘हिन्दुस्थान’ या नांवानेच ओळखला जातो. हिन्दु आणि त्यांचे स्थान म्हणजे हिन्दुस्थान. ही नांवे आपल्याला ‘सिंधु’ नदीवरून मिळाली आहेत हे सर्वानाच माहित आहे. ‘सिंधु’चं हिन्दु, हिन्दी व पुढे इंडीया कसे झाले याला काही भाषाशास्त्रीय कारणं आहेत.
December 9, 2014
फणस हा सदाहरित वृक्ष असून मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे समजले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Artocarpus heterophyllus (Family Moraceae) आहे. यास इंग्लिश मध्ये जॅकफ्रुट म्हणतात
September 17, 2021
सुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.
March 25, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti