वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
काही वेळा लोकांचे पाय सुजतात. त्याला वैद्यकीय शास्त्रात एडिमा असे म्हणतात. साधारणत: लघवीचे विकार असणार्यांसचे पाय सुजतात असे मानले जाते. मात्र पाय सुजणे हे मधुमेहाचे सुद्धा लक्षण असू शकते. आपली पावले हा शरीराचा खालचा भाग आहे आणि या भागापासून रक्त वर वाहण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात काम व्हावे लागते. तसे ते झाले नाही की, पायाकडचा रक्त पुरवठा जास्त होतो आणि पाय सुजतात. साधारणपणे घोटे आणि तळवे सुजतात. अर्थात पावले सुजण्याची अनेक कारणे आहेत. महिलांच्या बाबतीत गरोदर अवस्थेत पावले सुजतात.
रक्तदाबाने सुद्धा पावले सुजू शकतात.
एका बादलीत पाणी घेऊन त्या पाण्यात पेपरमींट ऑईल अगदी थोड्या प्रमाणात टाकावे. युकॅलिप्टस्चा सुद्धा वापर होऊ शकतो. अशा पाण्यात आपले पाय बुडवून ठेवावे. मोठा दिलासा मिळू शकेल.
रक्त गोठल्यामुळे किंवा त्याचा प्रवाह मंद झाल्यामुळे पाय सुजले असतील तर मालीश करावे.
अशाच रितीने मिठाच्या पाण्यात सुद्धा पाय बुडवून ठेवता येतात. त्यानेही सूज कमी होते.
उताणे झोपावे आणि आपले पाय एका उशीवर उंच ठेवावेत. त्याने रक्तप्रवाह उलट्या दिशेने सुरू होतो. खुर्चीवर बसून टेबलावर काम करण्याची सवय असेल तर पाय ठेवायला काही तरी घ्यावे आणि थोडे उंचावर पाय ठेवावे.
भरपूर पाणी प्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
आजकाल संतुलित आहाराचा बोलबाला आहे. याचवेळी अंगावर चरबी वाढण्याची समस्याही साधारण बाब बनली आहे. आरोग्याची योग्य जाण नसल्याने ही समस्या गंभीर बनत चाललीय आणि लठ्ठपणाही वाढतोय.
लठ्ठपणामुळे आपल्याला अनेक घातक आजार होऊ शकतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी योगाचा आधार घेणे चांगले. योगशास्त्रातील एक विधी आहे कपालभाती प्राणायाम. या प्राणायामाने लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे सहजशक्य आहे. तुम्हाला अद्यापही कपालभाती कसे करावे माहित नसेल तर पुढील विधी पाहा.
चटईवर बसा. बसल्यानंतर पोट सैल सोडा. आता जोरात श्वास बाहेर सोडा आणि पोटाला हिसका देऊन आत खेचा. श्वास बाहेर सोडणे आणि पोट आत खेचणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणे अपेक्षित आहे. सुरुवातीला ही क्रिया 10 ते 15 वेळा करा. हळू हळू 60 पर्यंत ही क्रिया वाढवू शकता. मधून मधून थोडी विश्रांती घेऊ शकता. या क्रियेमुळे फुफ्फुसाच्या खालील भागातीय हवा आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर निघेल. विज्ञानाने सिद्ध झाले आहे की कपालभातीने शरीरावरील अनावश्यक चरबी नष्ट होते.
श्वाससंबंधी आजार असणार-यांनी कपालभाती करू नये. कपालभाती केवळ रिकाम्या पोटीच करावे. अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कपालभाती केल्यास अधिक चांगले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.
कोणताही आजार हा होण्यापेक्षा जर टाळता आला तर? किंवा त्याचा प्रतबंध करता आला तर? मधुमेह हा आजार म्हणजे नुसतेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते असे नव्हे, तर हा आजार व्यक्तीचे शरीर पोखरून, चुंबकासारखे कार्य करतो व विविध आजारांना निमंत्रित करतो. उदा.- उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग, न बरी होणारी जखम (Gangrene) इ. या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा आणि तो आपणास होऊन शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केला तर?
होय, शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा त्याचा प्रतिबंध करू शकता.
प्रतिबंध कसा करता येईल, हे पाहण्याआधी आपण मधुमेह होण्याची शक्यता कोणाकोणास आहे हे विचारात घेऊ.
आपल्या कुटुंबात मधुमेहाचा रुग्ण आहे. उदा.- आपली आई किंवा वडील किंवा दोघेही अथवा आपल्या कमरेचा घेर ८० सें.मी. (महिला) किंवा ९० सें.मी. (पुरुष) पेक्षा जास्त आहे. अथवा आपल्या व्यवसायाचे स्वरूप बैठ्या पद्धतीचे आहे अथवा आपले वय वर्षे ३५ पेक्षा जास्त आहे. असे असल्यास त्या व्यक्तीस मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींनी स्वतःहून तपासणी करून घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.
भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहण्यापेक्षा, शरीर साखरेचा भार (लोड) सहन करू शकते किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे (Glucose Tolerance Test) - जेणेकरून ती व्यक्ती मधुमेही (Diabetic)आहे की मधुमेहाच्या पूर्वस्थितीत (Pre-diabetic)आहे हे जाणता येते. मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील (Pre-diabetic) व्यक्तींनी नियंत्रित आहार व नियमित व्यायाम (Life Style Modification) -केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास व पूर्ववत येण्यासही मदत होते व मधुमेहाचा प्रतिबंध होतो.
आहार व व्यायाम हे दोन्ही मधुमेहाच्या उपचारासाठीचे व प्रतबंधात्मक उपायासाठीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. नियंत्रित आहार म्हणजे काय? महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचा आहार समतोल असला, तरी नियंत्रित नसतो. त्यास नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. दिवसाचा पूर्ण आहार हा चार भागांत विभागून (सकाळचा नाश्ताी, दुपारचे जेवण, संध्याकाळी नाश्ता व रात्रीचे जेवण) घेतला पाहिजे.
आहाराच्या चारही भागांपैकी कोणताही भाग कमी केला अथवा टाळला जाऊ नये. बाह्य पदार्थाचे (fast food उदा.- पिझ्झा, बर्गर, वडा-पाव इ.) सेवन टाळावे. खाद्यतेलाचे सेवन मर्यादित स्वरूपात व मिश्रण करून केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो इत्यादीचा वापर जास्त प्रमाणात करावा.
रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान २-३ तासांचे अंतर असावे. अतिसेवन व कडकडीत उपवास- दोन्हीही टाळावे. आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा (calories) योग्य वापर हा नियमित व्यायामामुळे होतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. घरकाम, बागकाम, कार्यालयीन काम यामध्ये खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा खर्च करणे गरजेचे असते. भरभर चालणे, पोहणे, योगासने, मैदानी खेळ (वैद्यकीय सल्ल्यानंतर) या प्रकारांनी हे साध्य होऊ शकते. नियमित व्यायाम हा दिवसातून ३०-४५ मिनिटे व आठवड्यातून कमीत कमी पाच वेळा करायला हवा.
नियंत्रित आहार व नियमित व्यायामाचे फायदे- वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. नियंत्रित आहार व नियमित व्यायाम या जीवनशैली बदलामुळे (Life-style modification) मधुमेहाचा प्रतिबंध होऊ शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बदलणे अवघड आहे, पण अशक्यमप्राय नाही. जीवनशैली बदलरूपी लसीने मधुमेहाचा प्रतिबंध करता येतो. दुर्दैवाने कोणत्याही औषधीनिर्मिती कंपनीला ही लस बनवता येत नाही, म्हणून ही लस आजच सर्वांनी स्वतःहून घेतली पाहिजे व मधुमेह झाल्यानंतर त्याच्याशी लढा देण्यापेक्षा मधुमेह होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक लढा दिला पाहिजे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डॉ. अभिजित मुगळीकर,
सर्व अवयवांना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. तो निर्माण होण्यासाठी हृदयाची लयबद्ध हालचाल, रक्तवाहिन्यांची लवचीकता, रक्ताचे प्रमाण, हृदयाची गती आणि शरीरातील इतर स्रावांचे परिणाम (Hormones) या गोष्टी जबाबदार असतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावर दाब अधिक असतो, त्या दाबाला सिस्टोलिक रक्तदाब (Systolic Blood Pressure) असे म्हणतात. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत (Relaxation Stage) येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला ‘डायास्टोलिक रक्तदाब (Diastolic Blood Pressure) असे म्हणतात.
दोन्ही प्रकारचे रक्तदाब ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते. वयाच्या ५० वर्षांपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० (मी. मी. पारा.. mm of Hg) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४० च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब (Hypertension)आहे असे समजावे.
एखाद्या वेळी रक्तदाब अधिक असेल तर त्याला लागलीच औषधोपचार चालू करण्याची आवश्यकता नाही. पण अशा व्यक्तींनी नियमितपणे रक्तदाबाचे मोजमाप ठेवणे आवश्यक आहे. सर्व मोजमापे अधिक असतील तर त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार तपासण्या आणि औषधोपचार सुरू करावा.
रक्तदाबाचे प्रकार
अति रक्तदाब दोन प्रकारचा असतो.
साधा अतिरक्तदाब (Essential of Primary Hypertension) : या अतिरक्तदाबाच्या प्रकारात कुठलेही कारण सापडत नाही. त्याला मनुष्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, मानसिकता, खाण्यापिण्याच्या सवयी, आनुवंशिकता, राहणीमान, व्यवसाय आणि जीवनशैली या गोष्टी कदाचित कारणीभूत असतात. जवळजवळ ९०-९५ टक्के लोकांमध्ये साधा अति रक्तदाब असतो.
अनुषंगिक अति रक्तदाब (Secondary Hypertension) या प्रकारात उच्च रक्तदाब हा इतर शारीरिक दोषांच्या अनुषंगाने निर्माण होतो. पाच ते दहा टक्के लोकांना अनुषंगिक अति रक्तदाब असतो. त्यात मुख्यत्वेकरून खालील आजारांचा समावेश होतो.
अ. किडनीचे आजार : किडनीद्वारे लघवीवाटे शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. जर मूत्रपिंडामध्ये, किडनीमध्ये काही बिघाड झाल्यास हे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा होतात, त्याचाच एक दुष्परिणाम म्हणजे ‘वाढलेला रक्तदाब’ याला Renal Hypertension असे म्हणतात. किडनीची मुख्य रक्तवाहिनी आकुंचित पावली असेल तर रक्तदाब वाढू शकतो. (Renal Artery Stenosis)
ब. शरीरातील ग्रंथींचे आजार :
कुशिंग सिन्ड्रॉन, फिओ-क्रोमोसायटोमा, हायपो-थायसॉडियम, पिटय़ूटरी ग्रंथीचे टय़ुमर या आजारात रक्तदाब वाढलेला असतो.
क. गर्भारपणात काही वेळा रक्तदाब वाढलेला असतो, त्याला ‘टॉक्झिमिया ऑफ प्रेग्नन्सी’ Toxaemia of Pregnancy असे म्हणतात.
ड. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त वाढले की रक्तदाब वाढू शकतो.
ई. जर महारोहिणी (Aorta) कुठे आकुंचित पावली असेल (Coarctation) तर रक्तदाब वाढलेला असतो.
इतर बरीच कारणे रक्तदाब वाढवतात, पण त्याबाबत येथे सविस्तरपणे लिहिणे जागेअभावी शक्य नाही. पण मुख्यत्वे करून ‘अनुषंगिक अति रक्तदबा’चे ९० टक्के कारण किडनीचे आजार हे होय. अति रक्तदाबाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. पण स्रियांमध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर ते प्रमाण पुरुषांइतकेच असू शकते. तरुण पिढीमध्ये वाढीव रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. लहान मुलांमध्ये अति रक्तदाबाचे प्रमाण हे दोन टक्के इतके असते. उच्च रक्तदाबाचा विकार असणारे ७० टक्के लोक ४५ ते ६० वयोमर्यादेतील असतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. गजानन रत्नपारखी
पाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे (Lower Back Pain), पाठीवर ताण येणे किंवा पाठीला अस्वस्थ वाटणे होय. पाठदुखीमधे पाठीचा कणा किंवा स्नायू दुखावतात. ही व्याधी ब-याचदा मानसिक ताणामुळे सुरू होते. पाठीच्या कण्याजवळ जे मोठे स्नायू असतात ज्याचा पाठीच्या कण्याला आधार असतो ते दुखावल्या मुळे किंवा त्यावर ताण आल्याने पाठदुखी होते. खरोखरच दुखापत झाली असेल तर ती मात्र मानसिक ताणामुळे नसते.
पाठदुखीची व ताणाची कारणे आणि धोके:
ताणामुळे आलेली पाठदुखी ही एकाच जागी, एकाच पोझ मध्ये खूप वेळ बसल्यामुळे किंवा ताण आल्यामुळे येते. जसे की नोकरीच्या ठिकाणी खुर्चीत दिवसभर बसावे लागते. पाठीवरच्या ताणामुळे माणसाचा मानसिक ताण सुद्धा वाढण्याची शक्यता असते. आणि ब-याचदा मानसिक ताणामुळे पाठदुखी सुरू होते.
अशी काहीवेळा गंभीर स्थिती असते जेव्हा पाठदुखी मानसिक ताणामुळे नसते, पूर्णपणे शारिरीक असते आणि भयंकर वेदना देणारी असते; तेव्हा मात्र ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आणि गरज लागल्यास हॉस्पिटलमधे ऍडमिट होणे जरुरीचे असते. उदाहरणार्थ, एखाद्या वहान अपघातात मार बसल्याने पाठीची वेदना होते, मार बसतो तेव्हा तात्काळ मदत लागते. तसेच अतीताण घेऊन खूपच जास्त वजन उचलले तरीही पाठीला फ़्रॅक्चर होऊ शकते आणि त्याचे नंतर रुपांतर पाठदुखीत होते. पाठीमधे गाठ झाली, ट्युमर झाला, किंवा कसला संसर्ग झाला तरीही पाठदुखी ही असतेच. कर्करोग, ताप, संसर्ग, वजन उतरणे, अशक्तपणा ह्या सर्व समस्यांमुळे होणा-या पाठदुखी बद्दल आपण आपल्या डॉक्टरांना किंवा फिजिशियनना सांगणे अत्यंत गरजेचे असते.
सर्वसाधारणपणे आढळणारी खालच्या बाजूची पाठदुखी ही २० ते ४० या वयोगटात आढळते. हे दुखणे पाठ, खालची बाजू किंवा मांड्या ह्या ठिकाणी होते. अशा प्रकारचे दुखणे बरे व्हायला ४ ते ५ आठवडे लागतात. अशा ठिकाणी जखम झाली तर त्यावरचा अतीताण जायला १२ ते ३६ तास लागतात.
पाठदुखीसाठी घ्यावयाची काळजी
खालच्या बाजूची पाठदुखी (Lower Back Pain) सुरू असेल आणि त्यावर आपण काहीच उपचार घेतले नाहीत तर त्याचे रुपांतर भयानक होऊ शकते. त्यामुळे पुढचे दुखणे टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य उपचार सुरू करणे अत्यंतिक गरजेचे असते. त्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते व्यायाम शिकणे आणि ते नियमित करणे, गरज भासल्यास वजन कमी करणे, काही वजन उचलायचे असल्यास ते योग्य त-हेने उचलणे, झोपण्याची किंवा शारिरीक हलचालींची व्यवस्थित पोझ घेणे, ह्या गोष्टी तज्ञांच्या सल्ल्याने पाळणे आवश्यक असते.
उपचार
पाठदुखीची लक्षणे जर दुखणे विकोपाला नेणारी असतील तर तत्काळ उपचार सुरू करावा. बरेच जण पाठ दुखत असेल तर झोपून रहातात, पण तसे कधीच करू नये. खरे तर ती सर्वात चुकीची पद्धत आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामधे पाठदुखी बद्दलचे प्रशिक्षण आणि सर्वांगिण माहितीसुद्धा अंतर्भूत असते. त्यामधे ही व्याधी वाढू न देण्यासाठी आणि कमी होण्यासाठी काय काय करावे हे डॉक्टर सांगतात. मानसिक ताणामुळे आलेल्या पाठदुखीची काळजी आणि दुखापतीमुळे झालेल्या पाठदुखीची काळजी ही वेगळी असते; त्यामुळे त्याची गल्लत करू नये. कोल्ड कॉम्प्रेसचा उपभोग दिवसातून अधून मधून २० ते ३० मिनिटे घ्यावा. त्याचा खूपच उपयोग होतो
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
नवीन वर्षी नवी ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याचं एक टार्गेटच आपण आपल्यासमोर ठेवतो. पण आरोग्याचं काय? असा प्रश्न उरतोच. स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात आपण आरोग्याकडे सरास दुर्लक्ष करतो. आरोग्याशी निगडीत काही खास टिप्स...
दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावं. त्यामुळे त्वचेला तेज येतं.
साधारणपणे दिवसभरात ३० ते ६० मिनिटं चालावं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
दिनक्रमामध्ये व्यायामासाठी एक वेळ निश्चित करा. नियमितपणे व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.
श्वासोच्छवास महत्त्वाची भूमिका बजावतात.
स्नायूंना आराम मिळण्यासाठी त्या प्रकारचे व्यायाम करा.
व्यायामाच्या आधी, व्यायाम करताना आणि नंतर पाणी जरुर प्या.
प्रशिक्षित प्रशिक्षक निवडा. जेणेकरुन भविष्यातील अपव्यय टाळता येईल.
वजन कमी करण्याच्या नादात अति व्यायाम करू नका. त्याशिवाय नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिण्यास प्राधान्य द्या.
सकारात्मक विचारसणीचा अवलंब करा. जे तुम्हाला यश मिळवण्यास उपयोगी ठरेल.
ताजी फळं आणि सालाड खाण्यावर भर द्या.
एकाच वेळी खूप जास्त खाऊ नका. याचा पचन संस्थेवर परिणाम होतो. दिवसातून पाच ते सहा वेळा अल्पसा आहार घ्या.
हळुहळू आणि व्यवस्थित चावून खा. तुम्ही जेवढं हळू खाल तेवढं तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल.
मानवी शरीराला दररोज अर्धा किंवा एक टिस्पून मीठाची गरज असते. त्यापेक्षा जास्त मीठाचं सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो.
ताण-तणाव किंवा मानसिक त्रास कमी करण्यासाठी जास्त खाणं हा काही उपाय नाही.
दररोज ध्यानधारणा आणि प्राणायम करण्याची एक वेळ निश्चित करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.नमिता जैन
पाण्याला तर जीवन संबोधलं जातं, निरोग़ी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी अनशी पोटी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते.त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते. पित्त, अल्सर किंवा पोटात ग़ॅसचा विकार होणार्यांतसाठी तांब्याच्या भांडात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे. तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे , पोटातील जिवाणूंचा नाश होतो ,जळजळ होण्याची समस्या कमी होते. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅढन्टीबॅक्टेरीयल तसेच अॅणन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. या पाण्यातील अॅ न्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेहर्यायवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. तसेच चेहर्याीवरील नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते. हृदयरोग व रक्तदाबासारखे आजार आटोक्यात ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या अॅवन्टीऑक्सिडंट घटकांचा ,कर्करोग जडण्याचे प्रमुख कारण असणार्याल शरीरातील फ्री-रॅडिकल्सशी सामना करण्यासाठी मदत होते. शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न(लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मीतीत तांबे प्रमुख भुमिका बजावते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते. तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने , संधीवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दुर होण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पंचकर्म ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचार पद्धती आहे. यामध्ये रोग बरा करण्यासाठी एखादे औषध देऊन शरीरातच तो रोग जिरवून न टाकता तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोग समूळ नष्ट होतो.
किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. किडनी शरीराची स्वच्छता करणारे महत्त्वाचे अग आहे आणि ही योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीर आजारांचे घर बनते. किडनी शरीरातील विजातीय पदार्थ बाहेर काढून रक्त स्वच्छ करते आणि शरीरात मिनरल्स आणि आवश्यक अॅसिड्स संतुलित ठेवते.
आज आम्ही तुम्हाला किडनी खराब होण्यामागच्या काही सवयींविषयी सांगत आहोत.
लघवी रोखणे
जर तुम्ही जास्त प्रमाणात लघवी रोखून धरत असाल तर ही सवय तुमच्या किडनीसाठी खूप धोकादायक आहे.
यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते आणि किडनी खराब होते.
यामुळे लघवी कधीही दाबून ठेवू नये.
पाणी कमी पिणे
जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पीत असाल तर किडनीला रक्त शुद्ध करण्यासाठी लिक्विड लागते ते पर्याप्त प्रमाणात मिळणार नाही आणि तुमच्या रक्तामध्ये जमा झालेली घाण तुमच्या शरीरातच राहील.
यामुळे निश्चितच तुमची किडनी लवकर खराब होऊ शकते.
मीठ जास्त खाणे
शरीराला योग्यप्रकारे काम करण्यासाठी मीठ म्हणजेच सोडियमची आवश्यकता असते.
जर तुम्ही फळ, भाज्या नियमितपणे खात असाल तर त्यामधून तुम्हाला पर्याप्त प्रमाणात हे तत्व मिळते.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमचे ब्लडप्रेशर वाढेल आणि किडनीवर अतिरिक्त दबाव टाकेल.
दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम घेऊ नये.
कोल्ड्रिंक्स
जर तुम्ही कोल्ड्रिंक्स पीत असाल तर हे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी किती घातक ठरते याचा तुम्हाला अंदाज नसेल.
जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स घेतल्यास तुमच्या शरीरातील प्रोटीन लघवीद्वारे बाहेर पडते. याचा अर्थ तुमची किडनी त्यावेळी योग्यप्रकारे काम करत नाहीये किंवा डॅमेज झाली आहे.
पूर्ण झोप न घेणे
जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा किडनीच्या नवीन पेशींचे नवनिर्माणहोते.
यामुळे तुम्हाला पूर्ण आणि शांत झोपेची आवश्यकता असते.
जर तुम्ही योग्य प्रकारे झोपले नाही तर या क्रियेमध्ये बाधा निर्माण होईल आणि तुमच्या किडनीवर याचा वाईट प्रभाव पडेल.
मांसाहार
मांसाहार केल्यामुळे किडनीच्या मेटाबॉलिज्मवर जास्त दबाव पडतो.
जर तुम्ही आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेत असाल तर याचा अर्थ तुमच्या किडनीला जास्त काम करावे लागेल.
जे भविष्यात तुम्हाला विविध अडचणी निर्माण करणारे ठरू शकते.
दारू आणि सिगरेट
जास्त प्रमाणात आणि नियमितपणे सिगरेट, दारू सेवन करणे तुमच्या लिव्हर आणि किडनीवर अत्यंत वाईट प्रभाव टाकतात.
या सवयी तुम्हाला मृत्युच्या खूप जवळ घेऊन जातात.
आहारात पोषक तत्वांची कमतरता
आहारामध्ये ताजे फळ, भाज्या असणे किडनी आणि संपूर्ण शरीरासाठी खूप आवश्यक आहे.
किडनी फेल आणि स्टोन होण्यामागे मुख्य कारण आपल्या आहारातील मिनिरल्स आणि व्हिटॅमिनची कमतरता हे आहे.
मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन किडनी निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहेत.
डॉ.प्रवीण भा. रेडकर
M. Ch Urology
मुत्रविकार तज्ञ,
युरोकेअर हॉस्पिटल, मुंबई
टेनिस खेळल्यास हा आजार होतो म्हणून त्याचे नाव 'टेनिस एल्बो' असे पडले असले तरी हा आजार कोणालाही होऊ शकतो. टेनिस एल्बो म्हणजे दुखरा कोपरा. मनगटाला दंडाशी जोडणाऱ्या सांध्यावर ताण पडल्यावर कोपरा सुजतो. या आजारात कोपराच्या बाह्य भागाला वेदना होतात.
कसा होतो? : हात सतत पूर्ण ताठ ठेवून काम केल्याने किंवा एकाच प्रकारे हातांची हालचाल होत असल्यास त्याचा भार कोपरावर पडून हा आजार होऊ शकतो. यामध्ये वयाचाही प्रभाव पडतो. टेनिस एल्बो झालेल्या बहुतांश व्यक्तींचे वय ३५ ते ५० यादरम्यान असते.
टेनिस एल्बोची लक्षणे कोपराच्या बाह्य भागात वेदना होतात., कोपरावर बाहेर आलेल्या हाडाचे टोक दुखरे होते. वस्तू पकडताना किंवा हालचाल केल्यास मनगटात वेदना होतात, हाताच्या स्नायूंवर ताण देणाऱ्या हालचाली केल्यास (वजनदार वस्तू उचलणे इ.) वेदना होतात. सकाळी झोपेतून उठल्यावर हाताची हालचाल नीट होत नाही. हाताला मुंग्या येतात.
टेनिस एल्बो वर उपचार
आराम : त्रास होत असलेल्या हाताने स्क्रू ड्रायव्हर, हातोडी किंवा अन्य वजनदार वस्तू पकडणे काही काळासाठी बंद करावे. खरे तर आदर्श उपचारपद्धतीत कोपराला सहा आठवडे आराम देणे हे योग्य असते. पण दैनंदिन जीवनात हाताने करण्याची सर्व कामे बंद करणे शक्य होत नाही, म्हणून जड वस्तू न उचलण्याची खबरदारी घ्यावी.
बर्फ : त्रास होत असलेल्या ठिकाणी बर्फाचा शेक द्यावा.
व्यायाम : नुसता आराम केला तरी स्नायू कमजोर होतात व काम सुरू केल्यावर पुन्हा दुखू लागतात. त्यामुळे दंडाचे तसेच मनगटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा.
टेनिस एल्बो वरील औषधे हातावरची सूज कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
आजार बळावल्यास काहीवेळा शस्त्रक्रियेचा पर्याय अवलंबला जातो.
प्रतिबंधात्मक उपाय : स्नायू मजबूत राहिल्यास कोपराजवळचे सांधे ही मजबूत राहतील.
हाताचे दंड, कोपरा, मनगट मजबूत होण्यासाठी व्यायाम करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.डॉ. रामप्रभू, अस्थिरोगतज्ज्ञ,
Copyright © 2025 | Marathisrushti