वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हिमांशू रॉय यांच्या निधनानंतर बॉम्बे टोकीज फुटली शशधर मुखर्जी व अशोककुमार त्यातून बाहेर पडले.तरी देविका डगमगली नाही सहायक दिग्दर्शक अमिया चक्रवर्तीला घेऊन चित्रपट काढले १९४५ साली “ज्वारभाटा” काढला. त्यावेळी चक्रवर्तीने “युसुफ खान”नावाच्या एका फळविक्याला आणले. देविका म्हणाली हे नाव चालणार नाही म्हणून त्याचे दिलीपकुमार असे बारसे केले.
August 11, 2022
मुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं.
July 18, 2018
लहान असताना रेडिओवर ‘ आवाज के दुनिया के दोस्तो ’ असे बोलून गाण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. खरंच ह्या जगामध्ये आवाजच आवाज आहे. बाह्य जगत आणि अंर्तजगत दोन्ही आवाजांनी भरलेली आहेत. बाह्य जगात ध्वनी प्रदूषण आणि अंतर्जगात विचारांचे प्रदूषण. मनातल्या विचारांना आवाज देणारे आहेत शब्द. विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द. विचारांना शब्दांचे रूप कसे द्यायचे हे मात्र प्रत्येकांनी ठरवायचे.
December 26, 2021
बदलती लाइफस्टाईल, कामाचा वाढता स्ट्रेस यामुळे जगभरातील लोकांना चांगली झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. इतकेच काय तर झोप येण्यासाठी लोकांना झोपेच्या गोळ्याही घ्याव्या लागत आहेत. सोबतच झोप पूर्ण झाल्याने किंवा येत नसल्याने वजन वाढण्यासोबतच वेगवेगळे आजारही होत आहेत.
July 31, 2019
शिवांबु बद्दल आपल्या मनात पूर्व संस्कारामुळे घ्रूणा, शिसारी असते. त्यामुळे इच्छा असूनही मनाची तयारी होत नाही. त्यामुळे शिवाबु उपचार चटकन स्विकारला जात नाही. आजाराच्या तीव्रतेने मनाचा निश्चय झाला तरी शिवांबुने भरलेला ग्लास तोंडाशी नेल्यावर सुध्दा ते पिण्यापासून पराव्रुत्त होण्याचा संभव असतो. एक गोष्ट आपण लक्षातघेणे गरजेचे आहे ते म्हणजे शिवाम्बु हे रक्तापासून तयार होते. ते टाकाऊ नाही. ह्यासाठी पुढील प्रमाणे सुरुवात करावी.
एका ग्लासात(अंदाजे२००मि.ली.) प्रथम एक चमचा शिवांबु घाला. नंतर ग्लास पाण्याने भरा. आता ह्यात जवळ जवळ सर्व पाणीच आहे. कारण शिवांबूत ९५% पाणीच असते. आता ह्या पाण्याची चूळ भरा. चूळ भरल्याने पाण्याची चव कळेल ती पाण्यासारखीच लागेल. मग ग्लासातील उरलेले पाणी औषध म्हणून प्या.
पुढील वेळेस २ चमचे शिवांबु घेऊन पाणी घालून प्या. हे दोन चमचे शिवांबु घातलेले पाणी घेणे सोपे असते कारण पहिल्या वेळी एक चमचा शिवांबु पोटात गेलेले असते. त्यामुळे मनाची तयारी झालेली असते.
पुढील प्रत्येक वेळी शिवांबुचे प्रमाण थोडे थोडे वाढवत जावे.
निम्मा ग्लास शिवांबु व निम्मे पाणी घेऊ लागले की हे प्रमाण पुढे एक महिना तसेच ठेवावे.
नंतर नुसते शिवांबु घ्यावे.
निम्मे पाणी व निम्मे शिवाम्बु घ्ययला सुरूवात केली की लगेचच शरीर शुद्धीला सुरूवात होते.
बीपी व शुगर असणार्याना सुरूवात करताना नुसते शिवांबु घेतले तर बीपी शुगर प्रथम वाढण्याची शक्यता असते अर्थात हे फार दिवस टिकत नाही आणि प्रत्येकाचे वाढतही नाही तसेच काही दिवसांनंतर कमीही होते. पण आजार वाढला की घाबरायला होते. म्हणून पहिला महिना तरी निम्मे पाणी घालून घ्यावे. निम्मे पाणी घातले तरीही तब्बेतीत चांगला फरक जाणवतो.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
March 5, 2017
भारतातील अनेक शहरांमध्ये सहसा पादचाऱ्यांची सोय आणि सुरक्षितता ह्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. पुण्यामध्ये मात्र स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स, पादचारी धोरण, नॉन मोटर राईड वाहतूक समिती अशा अनेक घटकांमुळे हे चित्र पालटण्यास काही अंशी सुरुवात झाली आहे.
December 11, 2021
भारतीय नौदलाची सामरिक क्षमता वाढवणा-या अत्याधुनिक स्कॉर्पिन पाणबुडीच्या क्षमतेचा गोपनीय माहितीचा २२ हजार पानांचा दस्तऐवज फुटल्याने देश हादरून गेला आहे.फ्रेंच कंपनी डीसीएनएसच्या सहाय्याने मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये या पाणुबडय़ांची उभारणी सुरू असून त्याचा तपशील ‘द ऑस्ट्रेलियन’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी याची गंभीर दखल घेत भारतीय नौदलाला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
August 31, 2016
जावा समजण्यासाठी सी शिकण्याची काहीच गरज नाहि. जावामध्ये इतर भाषांपेक्षा एक वेगळी खासियत आहे, ती म्हणजे जावा मध्ये एक विशिष्ट प्रोग्राम लिहिता येतो त्याला आपण अप्लेट (APPLET) असे म्हणतो. Applet ला इंटरनेट वरून डाऊनालोड केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या वेब ब्राउजर मध्ये सुरक्षित रन करता येतं. पारंपारिक कॉम्पुटर मध्ये सुरक्षिततेविषयी समस्या होती. इंटरनेट वरील साईट आपल्या कॉम्पुटर ला जास्त एक्सेस करू शकत होती. परंतु जावाने या समस्येचे निवारण केले. जावा Applet च्या क्षमतेवर निर्बंध घालते. या मार्गाने जावा समस्येचे निवारण करते. एक जावा एप्लेट युजरच्या मदतीशिवाय हार्ड डिस्क मध्ये काहीही लिहू शकत नाहि. हे एप्लेट अनियंत्रितपणे कॉम्पुटर च्या मेमरी मध्ये काहीही लिहू शकत नाही आणि त्यामुळे कॉम्पुटर सुरक्षित राहतो.जावा मध्ये एप्लेट प्रमानेच अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे JVM
May 23, 2022
टायटॅनिकची बांधणी करण्यासाठी तीन वर्षे लागली होती. अधिकृत आकडेवारी नुसार त्या दिवशी टायटॅनिक वर २,२२५ लोक प्रवास करत होते. त्यात १३१७ हे प्रवासी होते तर ९०८ लोक जहाजाचे कर्मचारी होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांपैकी फक्त ७१३ जणांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. टायटॅनिकवरून वाचलेली शेवटची जिवंत व्यक्ती होती मिलविना डीन नावाच्या बाई. टायटॅनिक बुडाले तेव्हा त्यांचे वय फक्त २महिन्याचे होते.
April 15, 2022
शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण महाभारत अशा प्राचीन ग्रंथात विशेष वर्णन केलेले भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर.
September 16, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti