(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • हृदयाचे वेगवेगळे आजार

    हृदयाचे वेगवेगळे आजार
    हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांसंबंधी आपण थोडक्यात माहिती पाहू :
    जन्मजात दोष : काही दुर्दैवी व्यक्तींच्या बाबतीत हे लक्षात आले की त्यांच्या हृदयाच्या रचनेत जन्मतःच दोष असतो. त्यामुळे वेगवेगळ्या व्याधी त्यांना त्रस्त करीत असतात. रचनेसंबंधीच्या दोषातून उद्भवलेल्या या व्याधीवर शल्यक्रिया हा उपचार लाभदायक ठरतो. हृदयाच्या थैलीला अतिसूक्ष्म छिद्र असणे किंवा हृदयाच्या झडपांमध्ये काही दोष असणे हे मुख्य जन्मजात दोष आहेत. हे दोष औषध योजना, आहार नियंत्रण व तज्ज्ञांनी सुचविलेले व्यायाम याच्या साह्याने नियंत्रणात राहतात. हृदयाच्या मुख्य व्याधी कोणत्या आहे ते आपण पाहू :
    १) हृदयक्रिया बंद पडणे (कार्डियाक अरेस्ट)
    या व्याधीवर कोणताच इलाज उपयोगी पडत नाही. छातीजवळ हृदयपटलाच्या भागात अतिशक्तिशाली मर्दन करणे व त्याच वेळी मृतवत असलेल्या व्यक्तीच्या तोंडात दुसर्याने जोरजोराने श्वास सोडणे. हा उपचार क्वचित उपयोगी पडतो. अन्यथा या व्याधीचे मृत्यू हेच उत्तर आहे.
    २) हृदयाच्या काही रोहिणीमध्ये अवरोध (कोरोनरी थांब्रोसिस)
    हृदयातून निघणार्या किंवा हृदयाला रक्त पोहचविणार्या काही रोहिणींमध्ये आतून थर जमा झाल्यामुळे रक्त वाहून नेण्याच्या त्यांच्या कार्यात बाधा येते. त्यामुळे श्वास प्रश्वास घेणे अत्यंत जड होऊ लागते. चालणे, बोलणे, बसणे इत्यादी सर्वच क्रिया अति कठीण वाटू लागतात. अशा वेळी दुर्लक्ष झाले तर हृदयक्रिया बंद पडून मृत्यू येऊ शकतो. यावर उपाय म्हणजे जोड रक्तनळ्या लावणे अर्थात बायपास सर्जरी करणे.
    ३) रक्ताभिसरणाच्या क्रियेची लय मंद होणे (अंजायना पेक्टोरिस)
    या व्याधीत रक्ताभिसरणाची गती हृदयातूनच मंद होते. त्यामुळे प्रत्यक्ष हृदयाला रक्तपुरवठा कमी पडतो. त्यामुळे डाव्या छातीच्या आत तीव्र व जीवघेणी कळ येते. तसेचसंपूर्ण डाव्या हातात मुख्यतः खांद्यात आणि दंडात भयंकर दुखणे जाणवू लागते. ही कळ इतकी भयंकर असते की त्याचे वर्णन करणे कठीण वाटते. या व्याधीवर आधुनिक वैद्यकशास्त्रात औषधोपचाराद्वारे हमखास अशी उपाययोजना केली जाते.
    ४) हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक)
    या विकारातसुद्धा हृदयक्रिया एकाएकी बंद पडते. तत्काळ औषधोपचार केले तर या व्याधीतून सुधारण्याची बरीच शक्यता असते. हृदयविकाराचा झटका हा आधीच अॅन्जायनाचा त्रास होत असलेल्या रुग्णाला होऊ शकतो. तसेच पूर्वी हृदयाला कोणताही त्रास नसलेल्यासही येऊ शकतो. अशा व्यक्तीला छातीत,तसेच डावा खांदा, हात या ठिकाणी जड वाटू लागते व दुखू लागते. या दुखण्याची तीव्रता अॅन्जायनापेक्षा जास्त असते. दुखण्याबरोबर चक्कर येणे, घाम फुटणे, मळमळणे, उलटी होणे हेही त्रास संभवतात. झटका आल्याचे दुखणे २० मिनिटाहून जास्त तसेच राहते. अशा रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक ती यंत्रणा असलेल्या अतिदक्षता विभागात त्याला ठेवले जाते. त्यात मॉनिटरच्या योगे रुग्णाचा आलेख सतत पडद्यावर दिसत राहतो. रुग्णाच्या यथायोग्य उपचारासाठी इतरही सुविधा अतिदक्षता विभागात उपलब्ध असणे आवश्यक आहे.
    ५) हृदयाच्या आत चाललेल्या कार्यात अवरोध (हार्ट ब्लॉक)
    ही व्याधी हळूहळू वाढीस लागते. त्यामुळे योग्य वेळी योग्य ते निदान झाल्यास या व्याधीवर नियंत्रण ठेवता येते व तिचे गंभीर परिणाम टाळता येतात.
    ६) हृदयाच्या सामान्य गतीपेक्षा कमी गती व अनियमित अशी हृदयाची धडधड होणे (ब्रॅडी कार्डिया)
    या व्याधीमध्ये हृदयाचे अखंड चालू असलेले प्रसरण-आकुंचन क्षण दोन क्षण बंद होते. मात्र दुसर्याच क्षणी हृदयाचे धडकणे चालू होते. या व्याधीत जीव कासावीस होतो. अशक्तता वाढत जाते. कोणत्या वेळी काय होईल हे सांगणे कठीण होते. औषध, गोळ्यांनी बरे वाटू शकते; पण शल्यक्रिया करून ‘पेसमेकर’ नावाचे उपकरण छातीत बसविल्याने हृदयाचे ठोके नियमित करणे हा उपचार हमखास उपयोगी ठरतो.
    ७) हृदयाची गती वाढणे (टॅकी कार्डिया)
    यात हृदयाच्या ठोक्याची गती खूप वाढते. त्यामुळे वारंवार जीव घाबरा होतो. छातीत फार मोठ्या प्रमाणात धडधड ऐकू येते व त्यामुळे काही सुचेनासे होते. औषधी गोळ्यांनी ही व्याधी नियंत्रणात राहते.
    ८) हृदयाचा आकार वाढणे (कार्डियाक हायपर ट्रॉफी)
    ९) हृदय ज्या जागेत बसले आहे त्या हृदय कपाटाचा आकार वाढणे (कार्डियाक डायलेटेशन)
    या व्याधीवर आधुनिक वैद्यकशास्त्रात महत्वपूर्ण संशोधन झाले आहे. त्यामुळे हृदयविकार तज्ज्ञ या व्याधीच्या रोग्याचे जीवन सुसह्य करू शकतात.
    १०) हृदयाच्या आसपास काही द्रव पदार्थ एकत्रित होणे (पेरी कार्डियल इन्फ्यूजन)
    या व्याधीत हृदय गतीमध्ये व कार्यामध्ये अवरोध निर्माण होतो. अशा स्थितीत आधुनिक यंत्रांनी सुसज्ज अशा चिकित्सालयात दाखल होणे हा एकमेव तरणोपाय असतो.

    --

  • “हनुमान आणि आयुर्वेद”

    पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांना एकत्रितपणे पंचमहाभूते असे म्हणतात. संपूर्ण विश्वाची निर्मिती याच पाच तत्वांनी झाली असल्याचे आयुर्वेद मानतो. हनुमंताला ‘पवनपुत्र’ म्हटले गेले आहे. याचा अर्थ; वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका; की जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तिमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावले!! वायू हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे. मात्र; तो आपल्या शरीरासाठी उपकारक व्हावा याकरता त्याला आटोक्यात ठेवणे हे आवश्यक असते.

    शरीरातील वात नियंत्रित ठेवण्याचा साधा-सोपा मार्ग म्हणजे दररोज अंघोळीपूर्वी कोमट तेलाचा अभ्यंग करणे. त्वचा हा अवयव सर्व शरीरव्यापी आहे. तेल हे वातावरील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे नियमित अभ्यंग केल्यास वात आटोक्यात तर राहतोच; मात्र त्वचेचे रोगदेखील होत नाहीत. शिवाय शरीराला बळकटी येवून ते वज्राप्रमाणे कठीण होते. हनुमानाला शनिवारी तेल वाहण्याचा प्रघात आपल्याला अभ्यंगाचे महत्व तर शिकवत नसेल?!

    हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा वापरला जातो. साधारणपणे सूंठ, पिठीसाखर आणि तीळ यांच्यापासून मिश्रणापासून हा सुंठवडा तयार केला जातो. सुंठीमुळे रुची वाढते, पचन सुधारते, सुंठ पचायला हलकी, वीर्याने उष्ण व विपाकाने मधुर असते, गुणाने स्निग्ध असते, तसेच आमवातात हितकर असते. सुंठ ही केवळ वात कमी करण्यास उपयुक्त आहे असे नसून ती ‘वृष्य’ आहे असे आयुर्वेद सांगतो. थोडक्यात काय; तर सुंठ ही पौरुषशक्ती वाढवणारी आहे. हनुमंत म्हणजे साक्षात पौरुषशक्तीच नव्हेत काय?

    आणखी एक महत्वाची गोष्ट; हनुमान लंकेला जात असताना त्यांचा स्वेद हा समुद्रातील एका मगरीने प्राशन केला अशी कथा आहे. त्यापासून जन्माला आलेल्या हनुमंताच्या मुलाचे नाव ‘मकरध्वज’ असे असून तो एक अतुल्य सेनानी होता. अहिरावण-महिरावण यांसारख्या राक्षसांना त्याने पराजित केले होते. आयुर्वेदीय रसशास्त्रात ‘मकरध्वज’ नावाचे औषध असून; वैवाहिक सौख्यासाठी ते एक उत्तम औषध आहे. (अर्थात; या औषधांचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करण्याचा विचारदेखील करू नये!). पौरुषाची ही परंपराच या कथेतून मांडली जात नाही काय?

    आयुर्वेदाने उत्तम आचार हे यशाचे साधन मानले आहे. बलवान आणि बुद्धिमान असूनदेखील प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र भाव ठेवणारे हनुमान आपल्याला उत्तम आचार कसे असावे याचीच शिकवण देत नाहीत काय?

    आपले शास्त्र-परंपरा यातून काहीतरी आरोग्यसंदेश दडलेला आहे हे निश्चित. गरज आहे ती; त्याला डोळसपणे- श्रद्धेने नीट अभ्यासण्याची!! ‘नाही रे’ असे म्हणणे खूप सोपे असते. ‘आहे रे’ असे म्हणून ते सिद्ध करण्यातच खरी मजा आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपले शास्त्र आणि आपली संस्कृती यांप्रती सकारात्मक वृत्ती जोपासण्याची प्रतिज्ञा करूया.

    © वैद्य परीक्षित स. शेवडे.
    'श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद चिकित्सालय-औषधालय'; डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

  • आवळा एक जीवनीय शक्ती …!

    आज रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या आत्यंतिक वापरामुळे, आपल्या खाण्यात येणारी फळे नैसर्गिक पद्धतीने पिकविली असतील याची शाश्वती देता येत नाही. जर ती आपल्या परसबागेत पिकवून वापरता आली तर त्या फळाच्या शतप्रतिशत शुद्धतेबाबत आपल्याला विश्वास असतो.

    पाश्चात्य उपचारपद्धतीला अवास्तव महत्व दिल्याने भारतीय जीवनशैलीचे विस्मरण होत गेले. आहार विहाराबाबत ऋतुमानानुसार घ्यावयाची काळजी नगण्य वाटायला लागली. सुश्रुत सहिंतेतील सुत्रांप्रमाणे कितीतरी सूत्रे आवळ्याच्या उपयोगाबाबत संस्कृत साहित्यात लिहून ठेवलेले आहेत.

  • कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका आहाराच्या सहायाने कमी होऊ शकेल का?

    जगात आढळणार्‍या कॅन्सरपैकी कोलोरेक्टल कॅन्सर हा तिसरा क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. फक्त 1.4 दशलक्ष कोलोरेक्टल कॅन्सरची प्रकरणे एकट्या 2012 साली निदान करण्यात आली होती. आत्ताच्या परिस्थितीवरून असा निष्कर्ष काढला जातोय की 2035 सालापर्यंत 2.4 दशलक्ष प्रकरणे प्रतिवर्षी कोलोरेक्टल कॅन्सर चे निदान केली जातील. 1.08 दशलक्ष स्त्रियांमध्ये व 1.36 दशलक्ष पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त झालेले आढळेल.

    व्यक्तीच्या आहारावर त्या व्यक्तीला कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका निर्माण होईल का नाही हे अवलंबून असते. साहित्य पुनरावलोकनानुसार शाकाहारी भोजन कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात तर जास्त प्रथिने व जास्त फॅटयुक्त आहार ह्या कॅन्सरचा धोका वाढवतात. तसेच आशा प्रकारचा आहाराचे सेवन तुम्ही किती काळ केले ह्यावर ही कॅन्सरचा धोका अवलंबून असतो.

    image-2कॅलिफोर्नियातील Loma Linda विद्यापीठात 70,000 लोकांच्या खाण्याच्या सवयीचं विशलेषण केले. ह्या लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका आहे का नाही आणि असल्यास तो किती आहे हे तपासण्यासाठी शाकाहारी भोजन घेणार्‍या व्यक्तींची तुलना मांसाहार घेणार्‍या व्यक्तीबरोबर केली असता शाकाहारी भोजन घेणार्‍या व्यक्तींमध्ये 22% कॅन्सरचा धोका कमी झालेला आढळला जेव्हा ह्याच व्यक्तींची तुलना मासे खाणार्‍या व्हेजिटेरिअन लोकांबरोबर केली असता हा धोका 43%पर्यंत कमी झालेला आढळला. मासे व इतर सीफूड घेणार्‍या व्हेजिटेरिअन लोकांच्या आहाराला pesco-vegetarian डाएट असे संबोधले जाते. वरील शोधप्रबंधाची माहिती JAMA Internal medicine ह्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

    The Adventist Health Study 2 (AHS_2) हया प्रयोगात 96354 लोकांचा सहभाग होता. ह्या सर्व व्यक्तींचा पाठपुरावा 7.3 वर्ष केला असता 380 व्यक्तींना Colon cancer व 110 व्यक्तिंना rectal कॅन्सरचा धोका निर्माण झालेला आढळला तसेच शाकाहार घेणार्‍या व्यक्तींमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमीच आढळला. जेव्हा मांसाहार विरूद्ध Pesco-vegetarian आहाराशी तुलना केली असता Pesco-vegetarian आहार घेणार्‍या व्यक्तींमध्ये तो धोका कमी झालेला आढळला. हा शोधप्रबंध JAMA Intern.Medicine 2015; 175 (5):767 - 776 ह्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

    शाकाहार कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका का कमी करताना दिसतात?
    Insulin and insulin like growth factor कोलोरेक्टल कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात असे निदर्शनास आले आहे आणि शाकाहारी जेवणामुळे ह्या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण येते आणि म्हणूनच वेस्टर्न आहाराच्या तुलनेत शाकाहारी जेवणामुळे हा त्रास कमी होत असेल.

    • फोलेट, कॅल्शियम, फायबर ह्या सारखे महत्वपूर्ण अन्नघटक जे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत करतात ते शाकाहारी पदार्थातून मिळतात.

    • बर्‍याचदा ज्या पद्धतीने मटण, रेडमीट शिजवले जाते त्यामुळेही कॅन्सरचा धोका वाढतो असे प्रयोगात आढळले आहे, आणि हेच मटण प्रक्रिया केलेले असेल तर हा धोका दुप्पटीने वाढताना दिसतो.

    कॅन्सरचा धोका किती कालावधीत बदलू शकतो?
    कॅन्सरचा धोका किती कालावधीत बदलू शकतो ह्यावर US - BRITISH ह्यांच्या एकत्रित संशोधनात फक्त 2 आठवड्यातच खाण्या पिण्याच्या सवयी बदलीचा कॅन्सरच्या धोक्यावर परिणाम झालेला आढळला.

    Imperial College London आणि The University of Pittsburgh ह्या मधील शास्त्रज्ञांनी 20 अफ्रिकन अमेरिकन आणि 20 ग्रामीण साउथ अफ्रिका भागांतील लोकांची प्रयोगासाठी निवड केली. ह्या दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या प्रयोग शाळेत ठेवले. ह्या दोन्ही गटातील लोकांच्या जेवणात वापरण्यात येणारे जिन्नस व त्याची पदार्थ शिजवण्याची पद्धत वापरून त्यांच्या साठी विशेष जेवणाची निर्मिती केली आणि ते पदार्थ त्यांना खाण्यास दिले. African American लोकांना rural African लोकांचा आहार खाण्यास दिला व rural African लोकांना African American लोकांचा आहार खाण्यास दिला. Rural African लोकांना जेव्हा पाश्चात्य पद्धतीचा आहार दिला गेला तर African American लोकांना जास्त फायबर असलेला ज्यात बीन्स डाळी कडधान्य असलेला आहार खाण्यास दिला.

    प्रयोग सुरु होण्याआधी व नंतर colonoscopy, bacterial samples आणि कॅन्सरशी निगडित असलेले बाकीचे इतर महत्वाचे biomarkers ह्यांचा तपास केला. ह्या तपासात सुरवातीला असे दिसले की अर्ध्या अधिक अमेरिकन व्यक्ती मधे पॉलीप्स (polyp) दिसून आले ज्यामुळे पुढे जाऊन कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावते. परंतु एकाही अफ्रीकन व्यक्ति मध्ये हा धोका आढळला नाही पण ज्यावेळेस जेवणात अदलाबदल केली तेव्हा मात्र अमेरिकन व्यक्ती मधे अंतर्गत सूजेचे पातळी कमी आणि इतर biomarkers मध्ये लक्षणीय रित्या घट झालेली आढळली आणि अफ्रीकन गटात कॅन्सरचा धोका नाट्यमय रित्या वाढलेला आढळला.

    image-3ह्या वरून असे स्पष्ट होते की कमी दिवसातच आहारातील बदल कॅन्सरचा धोका वाढवतो आणि म्हणूनच केव्हाही अगदी ह्या क्षणापासूनही बदल केल्यास तुमचा कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. प्रयोगात असे दिसून आले आहे कि कॅन्सरचा धोका लवकरात लवकर निदर्शनास आल्यास कोलोरेक्टल कॅन्सर बरा होण्यास किंवा टाळण्यास एकदम सोपे आहे आणि त्यासाठीच वेळच्या वेळी तपासणी करणे उपयुक्त ठरू शकते. Continuous Update Project नुसार खाण्या पिण्याच्या सवयी हेल्दी केल्यास, स्मोकिंग बंद केल्यास, दररोज शारीरिक व्यायाम केल्यास, आणि उंची साठी योग्य वजन राखल्यास लोकांचा कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका साधारणतः 47% पर्यंत कमी होतो.

  • वराहकणींचे झाड, शेतकर्‍यांना मिळवून देईल घबाड !!!

    विविध ताकदवान औषधांच्या निर्मितीत वापरली जाणारी, अश्वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती असुन, सामान्यता भारतात मध्यप्रदेश व महाराष्ट्रात आढळून येते. भारताशिवाय स्पेन, मोरोक्को, इस्त्राईल, बलुचीस्थान व पूर्व आफ्रिकन देशांमध्ये उत्पादित केली जाते. ह्या वनस्पतीच्या झाडाला हातावर घासले असता घोड्याच्या मुत्रासारखा हिचा गंध येतो.

  • शेवगा एक औषधी तसेच फळभाजी वनस्पती !!!

    दिवसेंदिवस पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे तसेच भूगर्भीय जलसाठ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशा स्थितीत शेती हा व्यवसाय जुगार बनत चालला आहे. कमी पाण्यावरही उत्पादन देणारे पिक म्हणजे शेवगा होय . कमी पाणी तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पिक शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते.

  • अति साखरेचे सेवन करी जीवन कडू

    साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी म्हण प्रचलित आहे पण साखरेचे खाणार त्याला देव नेणार अशी म्हण प्रचलित होईल की काय असे नवनवीन प्रयोगावरून वाटायला लागले आहे. साखर व आरोग्य ह्या विषयीच्या प्रयोगावरून साखर व प्रदीर्घ आजार ( क्रोनिक आजार) ह्यांचा संबंध आहे असे आढळून आले.

  • वर्षा ऋतु – गर्भसंस्कार…. एक दृष्टीकोन

    वर्षा ऋतु-

    निरुक्ति- वर्षणं वृट विष | वर्षनम् अत्र अस्ति अंश आद्यश्च टाप=वर्षा:|
    मास- श्रावण, भाद्रपद
    इंग्रजी- जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
    रास- सिंह
    ऋतुलक्षण- वर्षा हा विसर्गकाळातील ऋतु आहे.
    “आदानग्लानवपुषाअग्नि: सन्नो sऽ पि सीदति |
    वर्षासु दोषैः इष्यन्ति तेऽम्बुलम्बाम्बुरेम्बरे ||
    सतुषारेण मरुता सहसा शीतलेन च |
    भूबाष्पेणाम्लेपायेन मलिनेन च वारिणा ||
    वन्हिनैव च मन्देन तोष्विन्यन्योन्वइषिषु |
    भजेत् साधारणं सर्व उष्णं तेजपनं च यत् ||”
    वा. सु. ३

    अग्नि- शिशिरादि इतर तीन विसर्ग काळातील ऋतुंच्या उष्णतेच्या योगाने शरीर निःसत्व होऊन त्यांचा अग्नि मंद झालेला असतो. अशा वेळी वर्षाऋतूत दोषांचा प्रकोप होतो व अग्नि अधिकच मंद होतो.
    दोषावास्था- वर्षा ऋतूत बल व अग्नि क्षीण झाल्याने पित्ताचा संचय होण्यास सुरुवात होते.
    रस- वर्षा ऋतुत अम्ल रसाची वृद्धि होते.

    वर्षा ऋतुतील दोषस्थितीचा जननेंद्रियावर होणारा परिणाम-
    प्रजनन संस्थेतील सर्व अवयव हे अपान क्षेत्रात येतात. वर्षा ऋतूत वातप्रकोप होत असतो. सृष्टीतील शैत्याधिक व अम्लविपाकी जल यामुळे वात पित्त कफ ह्या तीनही दोषांवर त्याचा अधिक परिणाम होतो. सृष्टीतील क्लेदाधिक्यामुळे स्थानिक (जनेनेंद्रियांवर) जिवाणु विषाणूजन्य विकार उदा. Candidiasis, Trichomonas, इ. अनेक विकार होतात.
    स्त्रियांच्या अनुषंगाने विचार केल्यास
    “ न हि वातादृते योनि नारीणां संप्रदुष्यति ||”
    च. चि. ३०

    अनियमित रजस्त्राव, नष्टार्तव, अल्परजस्राव ३ विकार हे वाढतात. स्थानिक विकारांमध्ये आर्द्रतेमुळे व शैत्यामुळे योनिकण्डु, मुत्रादाह, श्वेतस्त्राव ३ विकार संभवतात. अम्लविपाकी जलामुळे पित्तसंचय होतो व पित्ताच्या आश्रयाने असणाऱ्या रक्त धातूची दुष्टी होते. त्यामुळे त्याचा परिणाम रजावर होतो.
    पुरुष- अग्नि व बलं क्षीण झाल्याने मैथुन सामर्थ्य कमी होतो
    वर्षा ऋतु-मैथुन कालावधि-
    आचार्य सुश्रुत व वाग्भटांच्या नुसार १५ दिवसांच्या अंतराने मैथुन करावे व चरकानुसार वर्षा ऋतुत व्यवाय वर्ज्य करावा असे वर्णन आढळते.
    वर्षाऋतू व गर्भाधान-
    “ उद्मन्थ दिवास्वप्न अवश्यायं नदीजलम |
    व्यायाम आतपं चैव व्यवायं चात्र वर्जयेत् ||”
    आचार्य चरक व सुश्रूतांनी वर्षा ऋतुमध्ये मैथुन वर्ज्य करावे असे म्हटले आहे याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, वर्षाऋतुमध्ये आचार्यांना गर्भाधान अपेक्षित नाही.
    गर्भोत्पत्तीस आवश्यक घटक-
    आचार्य सुश्रूतांनी खालील चार घटकांचा उल्लेख केला आहे.
    “ध्रुवं चतुर्णां सानिध्यात गर्भा स्यात् विधीपूर्वकः |
    ऋतु क्षेत्र अम्बु बिजाणां सामग्र्यात अंकुरो यथा ||”
    “शुध्दे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रे ऽ निले हृदी |
    वीर्यवंत सुतं सुते.... ||”
    अ.हृ.शा १/१८.

    वरील सर्व श्लोकांचा विचार केला असता शारीरिक व मानसिक दृष्टीने निरोगी असणाऱ्या स्त्री व पुरुषाने संपूर्ण वीर्यात आयु प्राप्त झाल्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी मैथुन कर्म करावे असे वर्णन आढळते.
    वरील प्रत्येक घटकाचा वर्षा ऋतुच्या अनुषंगाने विचार करूया-

    ऋतु-
    वर्षा ऋतुमध्ये वातप्रकोप असतो. त्यामुळे अनियमित रजःस्राव, अल्प रजःस्राव, कष्टार्तव हे विकार दिसून येतात. गर्भात्पत्तीसाठी नियमित ऋतु चक्र असणे गरजेचे आहे.

    क्षेत्र-
    आचार्य वाग्भटांच्या श्लोकांनुसार त्यांनी शुद्ध गर्भाशय व प्राकृत अनिल (अपान वायू) यांचाही गर्भसंभव सामग्रीमध्ये विचार केला आहे. पुरुष व स्त्री जननेंद्रिय अपान वायूच्या क्षेत्रात येतात. वर्षा ऋतुतील वातप्रकोप हा क्षेत्रदुष्टीसाठी व विकृत संतान उत्पत्ती साठी कारणीभूत ठरतो. तसेच सृष्टीतील शैत्य व आर्द्रतेच्या परिणामामुळे स्थानिक व्याधि निर्माण होऊ शकतात.

    अम्बु (आहार पाकोत्पन्न रस)-
    गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाचे पोषण हे मातेकडून होत असते. गर्भधारणेवेळी असणाऱ्या मानसिक व शारिरीक स्थितींचाही गर्भावर परिणाम होत असतो. ह्याच अनुषंगाने आचार्य चरकांनी विमान स्थानामध्ये प्रकृतीचे वर्णन करताना मातु आहार, विहार, प्रकृति, काल, गर्भाशय प्रकृती असे वर्णन केले आहे.
    वर्षाऋतु अग्निमांद्य असल्याने गर्भधारणा झाल्यास अग्नि अधिक मंद होऊ शकतो व गर्भाच्या पोषणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच गर्भोपघातकार भावांचा विचार केला असता मातेने वातप्रकोपक आहारविहार केल्यास विकृत संतान उत्पत्ती होण्याची दाट शक्यता असते.

    बीज-
    उत्तम गर्भ प्राप्तीसाठी अदुष्ट शुक्र शोणिताची आवश्यकता असते. वर्षा ऋतूमध्ये जल अम्ल विपाकी असते. त्यामुळे पित्ताचा क्षय व रक्त दुष्टी होऊ शकते. सुश्रुतांनी ‘रक्तंलक्षम् आर्तवं गर्भाकृत् च’ असे आर्तवाचे वर्णन केले आहे. त्यामुळे प्राकृत बीजनिर्मितीवर वर्षा ऋतुचा प्रभाव होऊ शकतो.
    अदुष्ट शुक्रबीजाचा विचार केला असता मैथुन सामर्थ्य व प्राकृत शुक्रनिर्मिती ही देहबलावर अवलंबून असते. त्यामुळे वर्षा ऋतुत देहबल कमी असल्याने त्याचा परिणाम शुक्रधातूच्या उत्पत्तीवर होतो.
    वर्षा ऋतुत गर्भधारणा झाल्यास पुढे येणाऱ्या शरदातील पित्त प्रकोपामुळे गर्भपात, गर्भस्त्राव होऊ शकतात.
    जन्मणाऱ्या बालकाच्या प्रकृतीवर व स्वास्थ्यावर वात दोषाधिक्य दिसू शकते. वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता आचार्यांनी वर्षा ऋतूत व्यवाय वर्ज्य का सांगितला याची मीमांसा ध्यानात येते.
    आयुर्वेदाच्या दृष्टीने गर्भोत्पादन हे शुक्राचे श्रेष्ठ कर्म आहे व व्यवायाचे प्रमुख उद्देश ‘प्रजोत्पादन” असल्याने वर्षा ऋतूत व्यवाय वर्ज्य म्हणजेच गर्भधारणा न होऊ देणे हे आयुर्वेदीय संहिताकारांना अपेक्षित असावे.

    गर्भिणी व विशिष्ट आहाररस इच्छा-
    ज्याप्रमाणे वर्षाऋतुमध्ये निसर्गात वनस्पतींचा निर्मिती होत असते. त्याप्रमाणे गर्भिणी मध्ये गर्भाची नवनिर्मिती होत असते.

    वर्षाऋतुमध्ये सृष्टीची स्थिती-
    ‘ आद्भिः अम्लविपाकाभिः ओशाधीभिः समीरणाः |’ अशी असते. म्हणजेच अम्ल रसाची निर्मिती होते. याचप्रकारे गर्भिणीला अम्ल रसेच्छा होते.

    वर्षा ऋतु-
    पथ्यकर आहार-
    पुराण शाली, लाल षष्टिक, गहू, भाजलेले धान्य, पुराण जव, कुलत्थ, मूग, उडीद, जीरक, हिंग, काळे मिरे, जडवळ, माठ, कोथिंबीर, पुदिना, भेंडी, लसूण, कांदा, सुंठ, सुरण, कद्दू, बोर, ताक, दूध, उकळलेले पाणी (श्रृतशीत जल), सैंधव मीठ, मधु, निंबू, अजा मांस, दाडिम, अंगुर, गरम जेवण.

    पथ्यकर विहार-
    चंदन, खस आदि चूर्णाचा अभ्यंग, स्वच्छ, कोरडे व लघु (हलके) रंगाचे कपडे घालणे, कोरड्या जागेवर बसणे, नेहमी पादत्राणे घालणे.

    अपथ्य आहार-
    बाजरी, मका, नवीन तांदूळ, मसूर, हरभरा (अरहर), तुरीची डाळ, हिरवा वाटाणा, पालक, मेथी, कारली, फुलकोबी, बटाटा, काकडी, सिंगाडा, टरबुज, कवठ, म्हशीचे दूध, पनीर, श्रीखंड, मिठाई, थंड जल, नदी आणि विहिरीचे पाणी, शुष्क मांस, मासे, तळलेले पदार्थ, न झाकलेले पदार्थ, शिळे पदार्थ.

    अपथ्य विहार-
    दिवास्वाप, अधिक परिश्रम, अत्याधिक व्यायाम, प्रवात सेवन.
    वर्षा ऋतु - योगासने
    वर्षा ऋतूत मनुष्याचे शारीरिक बल अत्यंत कमी असते आणि वात-पित्ताची दुष्टी असते. त्यामुळे शरीरास लाभदायक व दोष दुष्टी निवारक योगासने असावीत.

    वर्षा ऋतूत उपयुक्त योगासने -
    1. पद्मासन 2. वज्रासन 3. हलासन 4. ताडासन 5. बद्धकोनासन 6. भुजंगासन 7. वृक्षासन 8. धनुरासन 9. सर्वांगासन

    डॉ. सुभाष मार्लेवार
    आयुर्वेद वाचस्पति,
    सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग
    पोदार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल
    वरळी, मुंबई – ४०० ०१८
    भ्रमणध्वनी +917738086299
    Email – subhashmarlewar@gmail.com

  • हेल्दी वूमन वेल्दी फॅमिली

    स्त्री आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत असते पण ज्यावेळेस ही स्त्री काही कारणाने आजारी पङते त्यावेळेस मात्र घरातील लोकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते, एवढेच काय पण त्यांचे दैनंदिन जीवन ही विस्कळीत होते.

  • चाय पे चर्चा – आवळ्याचे तेल – देशी/ विदेशी

    ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली.

    चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी लोक चाय पे चर्चा करतात.

    नुकताच अशोक नगर, मध्य प्रदेशला एक नातलगाला भेटायला गेलो होतो. एक तरुण वयाचा ओळखीचा युवक सकाळी-सकाळी घरी आला. नमस्ते आणि हात मिळवणी झाली. आपको कोई एतराज ना हो तो "भाई साब सुबह का चाय व नाश्ता हमारे घर हो जाय". त्याने आग्रहाचे निमंत्रण दिले. आमची स्वारी त्याच्या घरी जाऊन पोहचले.

    दिवाणखाना मोठा व प्रशस्त होता. सोफ्यावर बसल्यावर समोर भिंती वर लक्ष गेल. भारत मातेचे मोठे चित्र आणि चित्राच्या चारी बाजूला, भगतसिंग, नेताजी, गुरुजी आणि डॉक्टर साहेबांचे चित्र होते. मनात विचार आला, आयला, देशभक्त, राष्ट्रवादी स्वदेशी परिवार दिसतो. माझे लक्ष्य चित्रांकडे आहे, हे पाहून तो म्हणाला, हमारे पिताजी संघ कि शाखा में जाते थे. मै भी बचपन में जाता था.

    थोड्यावेळात बिन कांद्याचे पोहे समोर आले, (कांदे नसले तरी लाल सुर्ख अनारदाणे पोह्यांवर पसरविले होते). सोबत गायीच्या तुपात परतलेला, खोबर, बदाम घातलेला कणकीचा शिरा. घरगुती चर्चा सुरु झाली अर्थात मी कुठे आणि काय काम करतो. तो इंजिनिअर होता, इत्यादी. गप्पांसोबत पोहे आणि शिरा पोटात रिचविला, नंतर गरमागरम आले कडक चहा आला. आता खरी चाय पे चर्चेला सुरवात झाली.

    अस्मादिकांचे डोक्याचे सर्व केसं पांढरे झालेले आहे. (वय हि ५५ वर्षांचे आहें). आजकाल महिन्यातून एकदा नाव्हया कडे जाऊन केसं बारीक कापून घेतो. कधी सौ.ने टोका-टाकी केली तरच डोक्याला तेल लावतो. त्या तरुणाने डोक्यावरच्या हळू हळू मैदान सोडणाऱ्या पांढर्याशुभ्र केसांकडे पाहत विचारले, भाई साब आप कौनसा तेल लगाते हो? आता काय उत्तर देणार. अश्यावेळी मेजबानला रुचेल असे उत्तर देणे योग्य. स्वदेशी आणि देशभक्त परिवार पाहता, उत्तर दिले आजकाल पतंजलीचे आवळ्याचे तेल डोक्स्यावर लावतो. उत्तर ऐकताच त्याच्या अंगात काही तरी संचारले, आवाज चढवून म्हणाला, रामदेव! तो मर्कट उड्या मारून आणि विक्षिप्त हावभाव करून कचरा लोकांना विकतो. माहित आहे त्याच्या विरुद्ध कित्येक मुकदमें सुरु आहेत. शिकलेले आहात ना तुम्ही, मग असले प्रोडक्ट का वापरतात? त्याचे बोलणे ऐकून मी अक्षरश: हादरलोच. पुन्हा समोर भिंती वर भारत मातेच्या फोटू कडे लक्ष गेले आणि या वेळी एका कोपर्यात टेबलावर सजवून ठेवलेल्या एमवे प्रोडक्ट्स कडे हि. मनात म्हणालो आई माफ करा, पिढी बदलली आहे आणि स्वदेशीची परिभाषा हि....

    आता चहावर इतक्या प्रेमाने का बोलविले आहे हे कळले. त्याने एक एक करून एमवे प्रोडक्ट्सची ओळख करून द्यायला सुरुवात केली. एमवेचे प्रोडक्ट्स उत्तम दर्जाचे, वनस्पती आणि natural पदार्थांपासून बनविलेले असतात. कंपनी सरळ ग्राहकांना वस्तू विकते. stockist, थोक व्यापारी, दुकानदार इत्यादि लोकांना दिले जाणारे कमिशन टप्प्या टप्यावर एमवेच्या सदस्यांना दिले जाते. (त्यात किती तरी if आणि buts होते, हे वेगळे) एमवे विज्ञापन वर खर्च करीत नाही (हे वेगळे,एमवे द्वारा विकल्या जाणार्या सर्व अमेरिकन कंपन्याचे विज्ञापन टीवी वर येतात) . लाखो कमविण्याचे स्वप्न हि रंगविले.

    थोडक्यात त्याच्या म्हणण्याचा सारांश - पैसा कमविण्याचा विचार नसला तरी किमान उत्तम दर्ज्याचे एमवे प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. हे सर्व ऐकताना माझ्या मनात विचार आला एक तर अमेरिकन कंपनी, ती हि विभिन्न अमेरिकन प्रोडक्ट्सची मार्केटिंग करते. (त्या कंपन्याचा लाभांश, एमवेचा लाभांश, सदस्यांना कमिशन (३०-४० टक्के). १० रुपयाची वस्तू १०० शंभर रुपयांना निश्चित विकावी लागत असेल.

    हा विचार मनात सुरुअसताना तो म्हणाला भाई साब, लगेच आपण सदस्य बना हे मी म्हणत नाही, किमान शेम्पू, शेविंग क्रीम, साबण इत्यादी आपण वापरू शकतात. आपल्याला रुचले तरच आपण सदस्य बनू शकतात. एमवे आंवला तेलाची बाटली हातात घेत म्हणाला, हे शुद्ध आवळ्याचे तेल वापरून बघा, केस गळणे बंद होईल. याची किंमत हि पतंजलीच्या तेला एवढीच आहे अर्थात २००ml, ८० रुपये. मनात शंका आली एवढे कमिशन हे देतात, मग तेलात आवळा असेल का? मी विचारले तुमच्या या तेलात आहे तरी काय? त्याने बाटलीवर लिहिलेली बारीक अक्षरे वाचायला सुरुवात केली, वेजिटेबल ऑइल (तीळ, खोबर्याचे, ओलिव ऑइल असते तर त्यांची नावे निश्चित दिली असती, बहुतेक सर्वात स्वस्त मिळणारे .... तेल असावे), मिनिरल तेल आणि आवळा बियांची सुगंध... तो वाचता- वाचता थबकला. त्याच्या चेहरा काळवंडला, बहुतेक त्याने पहिल्यांदाच प्रोडक्टची माहिती वाचली असेल. माझ्या चेहऱ्यावर हळूच एक राक्षसी हास्य झळकले, मी म्हणालो, कोई बात नहीं, आखिर इतना कमीशन देने के बाद वो आंवला ऑइल के नाम पर कचरा हि परोस सकते हैं. घरी परत येताना, एक नुकत्याच उघडलेल्या पतंजलिच्या दुकानात तो मला घेऊन गेला. उद्देश्य पतंजली प्रोडक्ट्सचा दर्जा तपासणे, ते हि निकृष्ट निघाले असते तर त्याचे मानसिक समाधान झाले असते. दुकानात येऊन त्याने आंवला ऑइलच्या बाटली वर लिहिलेले वाचले. (त्यात ओलिव ऑइल, तिळाचे तेल आणि आवळ्याचे तेलाचे मिश्रण होते). निश्चितच पतंजलीच्या आवळ्याच्या तेलाचा दर्जा कित्येक पट जास्त होता. मासा गळाला लागण्या एवजी इथे नावच उलटली होती. त्याला चर्चेचा योग्य परिणाम साधता आला नाही. चहा आणि पोह्यांचे 'विज्ञापन' फुकट गेले.

    मनात एकच विचार आला, आपल्या देश्यात सुशिक्षित उच्च वर्ग, बिना विचार करता निकृष्ट दर्जाच्या विदेशी वस्तू विकत घेतो किंवा कितीतरी पट जास्त किंमत मोजतो. गाजराच्या अमिषाला बळी पडून साध प्रोडक्ट्स वर लिहिलेले हि लोक वाचत नाही. आता तर अशोकनगर सारख्या मागासलेल्या भागातले लोक हि विदेशी वस्तू वापरण्यात स्वत:ला धन्य मानू लागले आहे. दीड रुपयात मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांपासून बनलेल्या शेम्पू साठी ७ रुपये हि आनंदाने मोजतात. (हे वेगळे देशी हर्बल शेम्पू २ रुपयातच मिळते, ज्याने किमान नुकसान तरी होणार नाही).असो .